*
निराधारांना आधार मुळे थेट घरपोच रक्कम
* आधार नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्याची आघाडी
* जिल्ह्यात 86 टक्के आधारची नोंदणी
* योजनांचा लाभ
आता थेट बचतखात्यात
वर्धा दि.14- आधार
नोंदणीमध्ये संपूर्ण देशात वर्धा जिल्ह्याने उल्लेखनिय कार्य केले असून शासनाच्या
विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करणे सुलभ झाले आहे.
जिल्ह्यात एक व्यक्ती एक आधार क्रमांक
व एक बँक ही योजना यशस्वी करुन गरजू व निराधारांना योजनांचा लाभ थेट बँकेमार्फत
पोहचविण्यासाठी सहकार्य करुन जिल्ह्यात ही योजना यशस्वी करा अशा सूचना मुख्य सचिव
जयंत कुमार बॉंठिया यांनी आज येथे दिल्यात.
सेलू येथील तहसिल कार्यालयाच्या
सभागृहात आधार नोंदणी व त्याआधारे विविध 32 योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या
बचत खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेची माहिती तसेच लाभार्थ्यांना थेट बचतखात्यात
अनुदान जमा करण्याच्या योजनेची पाहणी मुख्य
सचिव श्री.बॉठिया यांनी केली त्याप्रसंगी अधिका-यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत
घोराड येथील श्रीमती सुमन माधव भांदककर (वय 65) या निराधार महिलेला बँक ऑफ
इंडियाच्या बिजनेस अभिकर्त्यामार्फत आधार नोंदणी क्रमांकाच्या आधारे अनुदान
राशिचे वितरण करण्यात आले. आधार नोंदणी क्रमांकाव्दारे थेट लाभार्थ्यांना
अनुदान योजनेच्या यशस्वीतेबद्दल मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन
केले.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान
सचिव डॉ. भगवान सहाय,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, एस.एस. संधु ,आधारचे
महासंचालक डॉ.ए.बी.पांडे, जिल्ह्याच्या संपर्क सचिव व प्रधान सचिव डॉ. श्रीमती
मालिनी शंकर,सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे सचिव आर.डी.शिंदे माहिती व
तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल, विभागीय
आयुक्त व्ही.बी. गोपाल रेड्डी ,जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, सामाजिक सहाय्य
विभागाचे संचालक श्री.गायकवाड, मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यावेळी
उपस्थित होते.
आधार नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्यात 86
टक्के तर सेलू तालुक्यामध्ये 90 टक्के नागरिकांना आधार नोंदणी क्रमांक देण्याचे
काम पूर्ण झाले असल्यामुळे मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन
करतांना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व गावे शंभर टक्के नोंदणी करुन प्रत्येक
लाभार्थ्यांना आधार नोंदणी व बचत खात्यामार्फतच योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी
सहकार्य करावे. बँकेत बचतखाते उघडतांना आधार ओळखपत्र ग्राह्य धरुन सर्व महिलांचे
तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचे बचत खाते उघडावे अशा सूचनाही त्यांनी
यावेळी दिल्या. ही योजना यशस्वी करण्यासाठी बँकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे
असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना यापुढे सर्व शिष्यवृत्ती
अथवा शैक्षणिक अनुदान बँकेमार्फतच देण्यात यावे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना
आधार नोंदणी व बचत खाते उघडण्यासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये विशेष शिबीर
आयोजित करावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या संजय गांधी निराधार योजने
अंतर्गत निराधारांना व अपंगांना त्यांच्या घरापर्यंत अनुदान राशी पोहचविण्यासाठी
बिजनेस करसपॉन्डन नियुक्त करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
वर्धा जिल्हा आधार नोंदणीच्या उत्कृष्ट
कार्यामुळे केंद्रशासनाने देशात थेट अनुदान वाटपासाठी पायलट जिल्हा म्हणून जाहिर
केल्यामुळे विविध योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती डाटाबेसव्दारे एकत्र करुण
विविध राष्ट्रीयकृत बँकांना उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच आधार नोंदणी
क्रमांकानुसार प्रत्येक गावनिहाय लाभार्थ्यांना थेट अनुदान प्रक्रिया सुरु करावी
अशा सूचनाही यावेळी मुख्य सचिवांनी दिल्या.
सामाजिक सहाय्याच्या योजनासोबत महात्मा
गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सारर्वजनिक वितरणप्रणालीव्दारे केरोसिन तसेच
गॅसचे वाटप ई-स्कॉलरशिप,योतक-यांना रासायनिक खतांचा पुरवठा तसेच विविध अनुदान
वाटपाच्या योजनांचाही आढावा यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बॉंठिया यांनी घेतला.
प्रारंभी जिलहाधिकारी एन.नवीन सोना
यांनी स्वागत करुन आधार नोंदणी तसेच लाभार्थ्यांना थेट अनुदानवाटपाबाबतच्या
वर्धा जिल्ह्यातील कार्याची माहिती दिली.
वर्धा जिल्ह्यात 12 लाख 99 हजार 592
लोकसंखेपैकी 10 लाख 54 हजार 743 आधार नोंदणी पूर्ण झाली असून सुमारे 9 लाख 3 हजार
755 व्यक्तींचे विविध राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडण्यात आले
आहेत.सार्वजनिक वितरण प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले रेशन कार्डाचे शंभर
टक्के संगणकिकरण पूर्ण झाले आहे.
यावेळी राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ
अधिकारी आधार नोंदणी संदर्भातील सर्व प्रमुख अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संजय
भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गाडे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक,उमेश
काळे,सुनिल कोरडे,सेलूचे तहसिलदार गावीत,लिड बँकेचे महाव्यवस्थापक,व ,सर्व महसूल
विभागाचे अधिकारी विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
000000