Saturday 3 March 2012

महात्‍मा गांधी आयुर्विज्ञान संस्‍थेमध्‍ये दोन दिवशीय कार्यशाळा


     वर्धा, दि. 3- आजच्‍या या धकाधकीच्‍या युगात आणि वेगवान वाहनांच्‍या काळात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. अपघात झालेल्‍या  व्‍यक्तिला वेळेवर वैद्यकिय उपचार व  मदत मिळणे क्रमप्राप्‍त असून (सोनेरी तास) मधे योग्‍य वैद्यकीय मदत मिळाल्‍यास अशा व्‍यक्तिचे प्राण वाचविले जावु शकतात. ही बाब डोळ्यासमोर ठेवून बेसीक ट्रामा केअर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अस्थिव्‍यंगोपचार शास्‍त्र विभाग, महात्‍मा गांधी आयुर्विज्ञान संस्‍था, सेवाग्राम तर्फे करण्‍यात येणार आहे.
       10 व 11 मार्च 2012 ला होणा-या या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्‍टर व पदवी प्राप्‍त  करणा-या डॉक्‍टरांना याबाबत अनमोल मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. अपघाती व्‍यक्‍तीला अपघातस्‍थळी कशी मदत करावी, दवाखान्‍यात आलेलया रुग्‍णांना कोणत्‍या आजाराला प्राधान्‍य देण्‍यात यावे व त्‍याच्‍या शरीराच्‍या वेगवेगळ्या अवयवांच्‍या ईजांचे तात्‍काळ निदान करुन औषधोपचार करुन त्‍याचे प्राण वाचविता येईल याविषयी मान्‍यवर मार्गदर्शन करतील.
     या कार्यशाळेसाठी विविध विषयातील सुमारे 25 तज्ञ डॉक्‍टर सहभागी होणार असून मोलाचे मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेसाठी जवळपास 300 डॉक्‍टर विविध भागातून सहभागी होतील. या कार्यशाळेच्‍या आयोजनाकरीता संथेचे अध्‍यक्ष धिरुभाई मेहता, सचिव डॉ. प्रतिभा नारंग, अधिष्‍ठाता डॉ.बी.एस.गर्ग, एम.एस. डॉ. एस.पी.कलंत्री हे विशेष सहकार्य करतील.
     या कार्यशाळेचा जास्‍तीत जास्‍त डॉक्‍टरांनी लाभ घेऊन रुग्‍णांचे प्राण वाचविण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहन आर्थोविभाग प्रमुख व सत्‍यसाई ट्रामा सेंटर प्रमुख डॉ.सी.एम.बडोले व सर्जरी विभाग प्रमुख डॉ. आर.नारंग आणि डॉ.किरण वांदिले यांनी केलेले आहे.
                             000000

पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांचा दौरा



      वर्धा, दि.3- पर्यावरण आणि सांस्‍कृतीक कार्य मंत्री संजय देवतळे रविवार दिनांक 4 मार्च 2012 रोजी दुपारी 2 वाजता शासकिय विश्रामगृह, वर्धा येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता राष्‍ट्रभाषा समिती, वर्धा व्‍दारा आयोजित 27 वा अखिल भारतीय दिक्षांत समारोह 2012 आणि 22 वा अखिल भारतीय राष्‍ट्रभाषा प्रचार संमेलनास उपस्थिती. स्‍थळ राष्‍ट्रभाषा प्रचार समिती,वर्धा. सोयीनुसार वर्धा येथून शासकिय वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

राज्‍य शासकीय निवृत्‍तीवेतन धारकांना आवाहन


     वर्धा,दि.3-वर्धा कोषागार कार्यालयातुन निवृत्‍ती वेतन, कुटुंब निवृत्‍तीवेतन धारकांना सुचित करण्‍यात येते की ज्‍या निवृत्‍ती  वेतन धारकांना निवृत्‍तीबाबत काही अडचणी असल्‍यास त्‍या अडचणीचे निराकरण करण्‍यासाठी दिनांक 9 मार्च 2012 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय, वर्धा येथे मेळावा आयेाजित केलेला आहे. या मेळाव्‍याला  हजर राहुन अडचणीचे निराकरण करुन घ्‍यावे. असे कोषागार अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                              0000

माजी सैनिकांचा मेळावा


      वर्धा, दि. 3- कर्नल सुहास शं. जतकर (निवृत्‍त), संचालक, सैनिक कल्‍याण विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 मार्च 2012 रोजी विकास भवन वर्धा येथे सकाळी 11 वाजता माजी सैनिकांचा मेळावा आयोजीत केला आहे. माजी सैनिकांनी मोठ्या संख्‍येने मेळाव्‍यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                             000000

किमान कौशल्‍यावर आधारीत व्‍यवसाय अभ्‍यासक्रम विना अनुदान तत्‍वावर मान्‍यता देण्‍याकरीता प्रस्‍ताव आमंत्रित विलंब शुल्‍कासह अंतिम दिनांक 31 मार्च 2012


      वर्धा, दि. 3- व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे मार्फत सन 2012-13 पासुन जिल्‍ह्यातील शासकीय व अशासकीय संस्‍थांमधुन पुर्व व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम (तंत्रिका शाळा) + 2 स्‍तरावरील व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम किमान कौशल्‍यावर आधारित व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाच्‍या नवीन तुकड्यांना कायमस्‍वरुपी विना अनुदान तत्‍वावर मान्‍यता देण्‍याकरीता प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. त्‍याकरीता जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे कार्यालयात इच्‍छुक संस्‍थांकडून अर्ज स्विकारण्‍याची कार्यवाही सुरु करण्‍यात आली आहे., प्रस्‍ताव  दि.15 मार्च 2012 पर्यंत सादर करावयाचे आहे. विलंब शुल्‍कासह दि. 31 मार्च 2012 पर्यंत अर्ज प्रस्‍ताव स्विकारले जातील. यासाठी प्रती तुकडी, प्रती अभ्‍यासक्रम नियमित शुल्‍क रु. 2000 असून विलंब शुल्‍कासह प्रती तुकडी प्रती अभ्‍यासक्रम रु. 3000 भरावयाचे आहे.
    पुर्व व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम (तांत्रिक शाळा), + 2 स्‍तरावरील व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम (बायफोकल), + 2 स्‍तरावरील किमान कौशल्‍यावर आधारित व्‍यवसाय अभ्‍यासक्रम (एम.सी.व्‍ही.सी.) अंतर्गत येणा-या विषयासाठी प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे.
     या संबधातील अधिक माहितीसाठी संबधितांनी दुरध्‍वनी क्र. 07152-243443 अथवा सौ. एम.व्‍ही.सरोदे, कार्यालय अधिक्षक, सौ. एन. डब्‍लु. ठाकरे, लेखापरीक्षक यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आर.डी.भोयर, वर्धा यांनी कळविले आहे.
                           0000000 

Thursday 1 March 2012

कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्‍पाच्‍या तळणी (भा) गावाला कृषी सहसंचालक यांची भेट


      वर्धा, दि. 1 – विभागीय कृषि सहसंचालक जे.सी.भुतडा व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी कोरडवाहू शाश्र्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्‍या देवळी तालुक्‍यातील मौजा-तळणी (भा) गावाला भेट दिली.
     मान्‍यवरांनी भेटी दरम्‍यान प्रकल्‍पांतर्गत म्‍हशी खरेदी केलेल्‍या लाभार्थ्‍यांशी चर्चा केली. प्रकल्‍पाचे उद्दिष्‍ट, महत्‍व, फायदे व कोरडवाहू क्षेत्रामध्‍ये शाश्र्वत उत्‍पन्‍न घेण्‍यासाठी पारंपारीक पिका व्‍यतिरिक्‍त जोडधंदे जसे गाई, म्‍हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्‍कुटपालन इत्‍यादी व्‍यवसायाची जोड देणे अत्‍यंत आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच जे दुध उत्‍पादित होते त्‍या दुधापासुन इतर दुग्‍धजन्‍य पदार्थ जसे दी, तूप, लोणी, ताक, पनीर, खवा इ. पदार्थ केल्‍यास जास्‍तीचा पैसा मिळू शकतो. या व्‍यतिरिक्‍त शेडनेट हाऊस, विहिर पुर्नभरण, शेततळे, बांधबंदिस्‍ती इ. शेतामध्‍ये उपचार केल्‍यास पाणीसाठा वाढवून बागायती खाली क्षेत्र वाढविता येते. आतापर्यंत या गावामध्‍ये 40 शेतक-यांना 37 हेकटर क्षेत्राकरीता गतिमान कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा बियाणे जॉकी वाण 80 किलो, रायझोबियम 1 किलो, बिव्‍हेरीया 3 किलो, पीएसबी 1 किलो, ट्रायकोडर्मा अर्धा किलो, झिंक सल्‍फेट 20 किलो, डीएपी 100 किलो, फेरस सल्‍फेट 10 किलो, एचएनपीव्‍ही 500 मि.ली., अॅझोडिरेक्‍टीन 1 लिटर, फेरोमन सापळे 15 नग, हेलिलुर्स 45 नग असा रुपये 5400 प्रती हेक्‍टर प्रती शेतकरी करीता लाभ दिलेला आहे.
     वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 25 शेतक-यांना 7.20 हेक्‍टरसाठी चा-याचा मका, ज्‍वारीचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत 35 शेतक-यांनी शासकीय अनुदानावर म्‍हशीची खरेदी केलेली आहे व त्‍याचा व्‍यवसाय सुरु झालेला आहे.
     गावामध्‍ये पायाभूत सवर्हे करुन 100 शेतक-यांची निवड केलेली आहे. त्‍यांना गाई, म्‍हशी, शेळ्या व कृषि विभागाच्‍या इतर योजनांचा सुध्‍दा लाभ मिहणार आहे. यावेळी डॉ. भुतडा यांनी या सर्व उपक्रमाची पाहणी केली. व शेतक-यांशी चर्चा सुध्‍दा केली. व राबवित असलेल्‍या  प्रकल्‍पाबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. सदर भेटीच्‍या वेळी उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, देवळीचे तालुका कृषि अधिकारी सुभाष निगोट, मंडळ कृषि अधिकारी कऊटकर, कृषि सहाय्यक राठोड व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                00000     

अपंग अनुशेष अंतर्गत प्रत्‍यक्ष मुलाखती 12 रोजी


      वर्धा,दि.1-महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागातर्फे अपंग अनुशेष भरती अंतर्गत लिपीक-टंकलेखक (कनिष्‍ठ) पदासाठी प्रत्‍यक्ष मुलाखत दिनाक 12 मार्च 2012 रोज सोमवार सकाळी 8-30 वाजता प्रादेशिक कार्यालय, नागपूर, मध्‍यवर्ती बसस्‍थानकाजवळ, गणेशपेठ, नागपूर येथे आयोजित केलेली आहे.
    संबधित उमेदवारांना प्रत्‍यक्ष मुलाखत पत्रे पाठविण्‍यात आले आहे. सदर उमेदवारांची निवड गुणवत्‍तेनुसार होणार असुन, पारदर्शकता राहावी म्‍हणुन उमेदवारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी पडू नये. प्रलोभने दाखविणारी व्‍यक्‍ती आढळल्‍यास किंवा पैशाची मागणी करीत असल्‍यास त्‍यांच्‍या विरुध्‍द त्‍वरीत रा.प. महामंडळाचे अध्‍यक्ष, म.रा.मा.प. महामंडळाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक, मुख्‍य सुरक्षा व दक्षता अधिकारी, महाव्‍यवस्‍थापक (क. व. औ.स. रा.प.मुंबई प्रादेशिक व्‍यवस्‍थापक, रा.प.नागपूर विभाग नियंत्रक, रा.प. वर्धा तसेच संबंधित पोलीस स्‍टेशन व अॅन्‍टी करप्‍शन ब्‍युरो, वर्धा यांचेकडे तक्रार करावी. असे विभाग नियंत्रक राज्‍य परिवहन, वर्धा कळवितात.
                                 000000

राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचा दौरा


      वर्धा, दि. 1- पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता, पर्यटन, अन्‍न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्‍यमंत्री दिनांक 1 मार्च 2012 रोजी सायंकाळी वर्धेत आगमन होणार असून, शुक्रवार दिनांक 2 मार्च  व शनिवार दिनांक 3 मार्च 2012 रोजी स्‍थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. राखीव व मुक्‍काम करतील.

Wednesday 29 February 2012

पर्यवेक्षिका पदाच्‍या मुलाखती 6 मार्च रोजी


      वर्धा,दि.29-वर्धा जिल्‍हा परिषदे अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्‍या पर्यवेक्षिका या सवंर्गातील रिक्‍त असलेल्‍या पदाकरीता दिनांक 6 मार्च 2010 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक 28.2.2012 रोजी जाहीर करण्‍यात आला असुन लेखी परीक्षेत गुणानुक्रमे पात्र ठरलेल्‍या उमेदवारांच्‍या मुलाखती दिनांक.6 मार्च 2012 रोजी मा.जिल्‍हाधिकारी वर्धा यांचे कक्षात सकाळी 11.00 वाजता पासुन आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.
     लेखी परीक्षेचा निकाल जिल्‍हा परिषद कार्यालय वर्धा व मा.जिल्‍हाधिकारी कार्यालय वर्धा चे नोटीस बोर्डवर प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. लेखी परीक्षेतून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्‍या उमेदवारांनी दिनांक. 6 मार्च 2012 रोजी जिल्‍हाधिकारी वर्धा यांचे कक्षात स्‍वखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे असे महिला व बाल विकास विभागामार्फेत कळविण्‍यात येत आहे. मुलाखतीचे पत्र स्‍वंतत्रपणे पाठविण्‍यात आले आहे. असे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (बाक)जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
0000

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


      वर्धा,दि.13 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण  जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे फेब्रुवारी 2012 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 156 किलो लिटर, वर्धा येथील रतलाल केला  108 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 60 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 108 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 144 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 132 किलो लिटर, आर्वी येथील बी..लाठीवाला यांना 120 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ..रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 96 किलो लिटर केरोसिचे वितरण केल्याचे पत्रकात मुद आहे.
                                                           000000


महालोकअदालत 4 मार्च रोजी


         वर्धा,दि.29- वर्धा जिल्‍ह्यातील मुख्‍यालयी व सर्व तालुका न्‍यायालये, कामगार न्‍यायालये तसेच धर्मदाय आयुक्‍त व इतर न्‍यायालये व न्‍यायाधिकरणे येथे दिनांक 4 मार्च 2012  रोजी महालोकअदालत भरविण्‍यात  येणार आहे.
     दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे व इतर प्रकरणे सामंजस्‍याने सोडविण्‍याकरीता न्‍यायाधीश वर्ग व तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनल) आपणास मदत करेल.
     न्‍यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा-लोकअदालतीमध्‍ये ठेवणेकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्‍या न्‍यायालयात प्रलंबित असतील त्‍या न्‍यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व दिनांक 4 मार्च 2012 रोजी आयोजित करण्‍यात येणा-या महालोकअदालतीमध्‍ये आपली जास्‍तीत जास्‍त प्रकरणे सामंजस्‍याने व आपसी तडजोडीने सोडवावीत. असे आवाहन जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष अ.श्रा.शिवणकर यांनी केले आहे.
                           000000

Tuesday 28 February 2012

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 17 मार्च रोजी


          वर्धा,दि.28- महाराष्‍ट्र सुवर्ण महोतसवी वर्षानिमित्‍य राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून सुवर्ण जयंती राज्‍स्‍व अभियान या नावाने राबविण्‍याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जिल्‍ह्यातील सर्व तालुकयात 17 मार्च रोजी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानाला प्रारंभ होईल.
      जिल्‍ह्याने याआधी समाधान योजनेची अंमगलबजावणी केलेली असून त्‍यास मोठे यश देखील प्राप्‍त झालेले आहे. त्‍याच धर्तीवर या अभियाना अंतर्गत आतापावेतो जिल्‍ह्यामध्‍ये विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, प्रलंबित फेरफार, प्रलंबित महसुल प्रकरणे निकाली काढणे अशी कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत. आता या अभियाना अंतर्गत जिल्‍ह्यात प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये दिनांक 17 मार्च 2012 रेाजी मेगा कॅम्‍प घेण्‍याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
     तालुकास्‍तरीय कॅम्‍पमध्‍ये खालील प्रमाणे कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढल्‍या  जाणार आहेत व जनतेला विविध दाखले कॅम्‍पचे ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.
     तलाठी दप्‍तर  अद्यावत करणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, सात बारा वाटप करणे, महसुल अभिलेखातील नकला देणे, विविध प्रमाणपत्राचे वितरण (जात,उत्‍पन्‍न,वारसान,रहिवासी, हैसियत व इतर प्रमाणपत्रे), जमिन मोजणी प्रकरणे, इंदिरा आवास योजने अंतर्गत भुखंड वाटप, शिधा पत्रिकेसाठी अर्ज, शिधा जिन्‍नस मिळत नसल्‍याबाबत तक्रारी, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्य योजनेतील लाभ, आम आदमी विमा योजना, गावठान विसतार योजने अंतर्गत भुखंड वाटप, जलपुर्ती सिंचन विहिरीसाठी अनुदान वाटप करणे, कृषी विषयक योजनेचे विविध लाभ देण्‍याचे योजना, नविन विज जोडणी,आदिवासी विभागाच्‍या विविध योजनेचे लाभ व समाज कल्‍याण  विभागाच्‍या योजनेचे विविध लाभ देण्‍यात येईल.
     जिल्‍ह्याच्‍या आठही तालुक्‍याच्‍या कार्यालयात दिनांक 12 मार्च रोजी अर्ज करण्‍याचा अंतीम दिनांक असून वर्धासाठी उपविभागीय अधिकारी वर्धा , सेलूसाठी जिल्‍हा नियेाजन अधिकारी,वर्धा, देवळीसाठी जिल्‍हा पुरवठा अधिकारी वर्धा, आर्वीसाठी उपविभागीय अधिकारी आर्वी, आष्‍टीसाठी खजांची विशेष भुसंपादन अधिकारी, कारंजासाठी मेश्राम, विशेष भुसंपादन अधिकारी, हिंगणघाटसाठी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट व समुद्रपूरसाठी संगितराव उपविभागीय अधिकारी यांच्‍या नेमणूका प्रभारी अधिकारी म्‍हणून करण्‍यात आल्‍या आहेत.
     जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी त्‍यांच्‍या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेच्‍या शिबीराचा पुरेपूर लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                               00000
                                               

हत्‍तीरोग दूरिकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्‍हा आरोग्‍य अधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि. 28- हत्‍तीरोग दूरीकरण मोहीमेचा शुभारंभ आज सकाळी नालवाडी येथील आरोग्‍य उपकेंद्र येथे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांनी हत्‍ती रोगाची बाधा होऊ नये यासाठी डि.ई.बीच्‍या गोळ्या लाभार्थ्‍यांना देवून मोहिमेचा शुभारंभ केला.
    यावेळी नालवाडीच्‍या सरपंच संजिवनी उरकुडे, अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर, जिल्‍हा हिवताप अधिकारी मोनीका चारमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.झोडे, डॉ. सुनितकरी व डॉ.पि.आर. धाकटे उपस्थित होते.
     याप्रसंगी बो्लताना डॉ. राठोड म्‍हणाले की हत्‍तीरोग हा आजार गंभिर स्‍वरुपाचा असून, त्‍यापासून शरिरावर विकृती निर्माण होऊ शकते. हा आजार होऊ नये यासाठी हत्‍तीरोग दूरीकरण मोहीम सुरु करण्‍यात आली असून, त्‍याचा लाभ सर्व ग्रामीण व शहरी जनतेनी करुन घ्‍यावा जेणेकरुन भविष्‍यात आरोग्‍य  अधिक सुदृढ राहील.
     यावेळी चारमोडे म्‍हणाल्‍या  की 2 वर्षाखालील मुले गर्भवती स्‍त्री व गंभीर आजार रुग्‍ण सोडून लाभार्थ्‍यांना घरोघरी गोळ्या खाऊ घालण्‍याकरीता आरोग्‍य कर्मचारी येतील, त्‍यांच्‍या समक्ष डि.ई.सीच्‍या गोळ्याचे सेवण करावे. ह्या मोहिमे अंतर्गत जिल्‍ह्यात 1642 कम्रचारी तसेच 400 पर्यवेक्षक कार्यरत आहेत. सदर मोहिमेत 34 लाख 67 हजार डी.ई.सी. गोळ्या जिल्‍हास्‍तरांपासून गांवपातळीस्‍तरावंर पोहचविण्‍यात आलेले आहेत. ह्या आजाराचा प्रसार डासापासून सुक्ष्‍मकृतीमुळे होतो. प्रथम अवस्‍थेतील हत्‍तीरोग या आजाराचे लक्षण विरहित असून जंतू आपल्‍या शरीरात राहू नये व भविष्‍यात कधीही हत्‍तीरोगाची बाधा होवू नये म्‍हणून प्रत्‍येकाने गोळ्या खाणे गरजेचे आहे. एकदा रोग बळावल्‍यावर उपाय नाहीच. परंतू हत्‍तीरोग होवू नये म्‍हणून डी.ई.सी.गोळ्यांची फक्‍त एकच मात्रा वर्षातून एकदा सतत 5 वर्ष घेतल्‍यास, हत्‍तीरोग होत नाही. डी.ई.सी.गोळ्या  सुरक्षित असून, गोळ्यांचे सेवन केल्‍यानंतर एखाद्या व्‍यक्‍तीला ताप किंवा पुरळ आल्‍यास त्‍यांच्‍या शरीरात मॉयक्रोफायलेरीयाचे जंतू आहेतच असे समजावे.असेही त्‍या म्‍हणाल्‍या
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व आभार डॉ. झोडे यांनी केले.
    कार्यक्रमाला मोठ्यासंख्‍येने परिसरातील लाभार्थी तसेच आरोग्‍य कर्मचारी उपस्थित होते.
                                    000000 

आठवडी बाजाराचा लिलाव


      वर्धा, दि.28- जिल्‍हा परिषद, वर्धा अंतर्गत आठवडी बाजाराचा फेरलिलाव (चौथ्‍यांदा लिलाव) दिनांक 5 मार्च 2012 रोजी ठिक 11.30 वाजता जिल्‍हा परिषद, वर्धाचे सभागृहात आयेाजीत केलेला आहे. ज्‍या कुणाला या बाजाराचा लिलाव घ्‍यावयाचा आहे त्‍यांनी वरील तारखेला नियेाजीत वेळी उपस्थित रहावे. त्‍याचप्रमाणे ज्‍या बाजाराचा लिलाव करावयाचा आहे ते खालील प्रमाणे आहे.
      पंचायत समिती वर्धा अंतर्गत सालोड (हिरापुर), मदनी , पंचायत समिती  देवळी अंतर्गत सावंगी (येंडे), शिरपुर (होरे), सोनोरा (ढोक), नागझरी, पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत खानगांव, पंचायत समिती समुद्रपुर अंतर्गत वायगांव नि., कांढळी रोडवरील आंबा फळबहार व पंचायत समिती आर्वी अंतर्गत यदहेगांव मु रोडवरील आंबा फळबहार.
     वरील बाबतीत सर्वच बाजाराची सन 2012-2013 ची सरासरी , अटी व शर्ती ग्राम पंचायत विभाग, जिल्‍हा परिषद, वर्धा तथा पंचायत समिती कार्यालयामध्‍ये कार्यालयीन वेळेमध्‍ये पहावयास मिळु शकेल असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिलहा परिषद, वर्धा कळवितात.
                                00000
    

शिधापत्रिकेवर गॅसची नोंद आवश्‍यक


       वर्धा, दि. 28 – जिल्‍ह्यातील सर्व शिधा पत्रिकाधारकांचे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थे अंतर्गत संपुर्ण यंत्राणेची संगणीकृत आज्ञावली तयार करण्‍याची कार्यवाही सुरु असून, सर्व गॅस एजन्सिमध्‍ये गॅस स्‍टँपींगचे काम प्रगती पथावर आहे.
    सर्व जनतेस याव्‍दारे जाहिर आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांनी आपल्‍या शिधापत्रिका संबंधित गॅस एजंन्सि मध्‍ये जावून शिधापत्रिकेवर एक किंवा दोन गॅस सिलेंडरची नोंद करुन घ्‍यावी. तसेच ज्‍यांचेकडे शिधापत्रिका नाही त्‍यांनी विहित नमुन्‍यातील बंधपत्र संबंधित गॅस एजन्सिमध्‍ये जमा करुन आपला दुरध्‍वनी क्रमांक वा भ्रमणध्‍वनी क्रमांक नोंद करुन द्यावा.
    ज्‍या गॅस धारकांनी आपलेकडील गॅसची नोंद शिधापत्रिकेवर घेतली नसेल वा बंधपत्र भरुन दिले नसेल अशा गॅस धारकांना त्‍यांचेकडील रिकामे झालेले सिलेंडर भरुन मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा  पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                0000