Friday 21 May 2021


 

 

बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

 

                             -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 

Ø  जिल्हाभर सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी शोधणार

 

Ø  विधवा, परित्यक्ता, एकल माता यांच्या मुलांना मिळणार लाभ

 

     वर्धा, दि 21 (जिमाका) :- राज्य शासनाची बालसंगोपन योजना आतापर्यन्त  ० ते १८वयोगटातील  निराधार बालकांसाठी राबविण्यात येत होती. आता ही योजना  सुधारीत करण्यात आली असून  एकल माता, विधवा, परित्यक्ता अशा महिलांच्या मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  योजनेचा लाभ जिल्ह्यातील अशा सर्व महिलांना मिळावा यासाठी कालबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून दोन महिन्यांच्या आत  अशा महिलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेपासून कुणीही गरजू वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले. 

 लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था- संघटना आणि विविध विभागात काम करणारे अधिकारी ज्यांना अशा महिलांची माहिती आहे आणि त्यांना मुलांच्या संगोपनासाठी मदतीची गरज आहे अशा कुटुंबातील महिलांची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावी. जेणेकरून  गरजू महिलांना त्यांच्या मुलांची काळजी योग्य आणि चांगल्या प्रकारे घेण्यासाठी या योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत जिल्ह्यात ७०० मुलांना जुन्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आता नव्याने सर्वेक्षण करून या योजनेचा लाभ बालकांना देण्यात येईल असेही श्री केदार म्हणाले.

 

    या योजनेचा लाभ अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही, अशी बालके,  एक पालक असलेली व कौटुंबिक संकटात  असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, तीव्र मतिमंद बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशा अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार,  (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले), अशा मुलांचा व कुटुंबांचा या योजनेत समावेश करता येणार आहे.

 

शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून, बालकल्याण समितीपुढे मुलांना हजर करणे आवश्यक राहील. बाल कल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना बाल संगोपन योजनेंतर्गत अनुदान देण्यात येवू नये. बाल संगोपन योजनेसाठी बालकांची शिफारस राज्यातील दवाखाने,पोलीस स्टेशन,

कारागृह,न्यायालय, कौटुंबिक हिसाचार कायद्याखालील संरक्षण अधिकारी  हे सुध्दा करु शकतील. संबंधित स्वयंसेवी संस्था यांनी महिला व बाळ कल्याण या शासकीय कार्यालयाशी

सतत संपर्कात रहावे. या शासकीय कार्यालयामुळे, एच. आय. व्ही. ग्रस्त बालक, शिक्षा/तुरुंगवास झालेले पालक यांची मुले यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकेल.

 

लाभाची पात्रता

0 ते १८ वर्षांपर्यंतची मुले या योजनेसाठी पात्र आहेत.

 

योजनेअंतर्गत मिळणारा दरमहा लाभ

 या योजनेअंतर्गत दरमहा दरडोई  ११००  रुपये लाभ देण्यात येईल.

 

 कागदपत्रे

लाभार्थ्यांच्या निवासी पुराव्याबाबत रेशन कार्डाव्यतिरिक्त निवासासंबंधीचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत. उदा. रेशनकार्ड , विजेचे देयक, पाण्याचे देयक, घरपट्टी, नगरपालिका दाखला, नगरसेवकाचा दाखला ग्राह्य धरावा.

 तहसिलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी उत्पन्नाचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात येईल. उदा. वेतन चिठ्ठी (Slip), पालकांच्या कार्यालयाचा दाखला, पालक कोणते काम करतात याचा स्पष्ट उल्लेख असावा.

 

00000000

 

..क्र-365                                                                      दि.21.05.2021

        1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे झालेल्या रुग्णांचे

              म्युकरमायकोसिस’ आजाराबाबत सर्वेक्षण करा

                                                -विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार

म्युकरमायकोसिस आजारा बाबत टॉस्कफोर्स समिती स्थापन करा

वर्धा दि 21, (जिमाका):- म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य  आजाराचे रुग्ण  नागपूर विभागात आढळत असून  हा आजार कोविड झालेल्या व मधुमेह असलेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळून आले आहे. हा आजार चेहरा, नाक, डोळयांचा भाग व  मेंदूवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा स्तरावर नाक,कान,घसा, नेत्र व दंत तज्ञ, न्युरो चिकित्सक आदी तज्ञ असलेल्या डॉक्टरांचा समावेश असल्याची टॉस्क फोर्स समिती गठीत करावी. समिती मार्फत  1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे होऊन सुटी मिळालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराबाबत समुपदेशन करावे असे सूचना नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त  डॉ.संजय कुमार यांनी आज  व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे घेतलेल्या बैठकित सर्व जिल्हाधिका-यांना दिल्यात.

बैठकिला वर्धा येथून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते. सभेमध्ये कोविड बाधित असलेले अनाथ बालके त्यांची घ्यावयाची काळजी,  आपत्ती व्यवस्थापन निधी, रेतीघाट व गौण खनिज घाट परवाणगी याबाबती चर्चा करण्यात आली.

म्युकरमायकोसिस आजार प्रामुख्याने मधुमेह,रक्तदाब असलेल्या व कोरोनाच्या गंभीर आजारातुन मुक्त झालेल्या व्यक्तींना होत असल्याचे तज्ञाच्या निर्दर्शनास आले आहे. या आजारावर नियंत्रण आणण्याकरीता  जिल्हयातील रुग्णालयातून कोविड आजारातून मुक्त होऊन सुटी झालेल्या रुग्णांच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी संपर्कात राहून  त्यांना म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षणे आहे. काय? याबाबत वेळोवेळी  विचारणा करावी यामध्ये नाकातून काळया खपल्या पडणे,  नाक कोरडे होणे,  रक्तमिश्रिीत सर्दी,  गालावरील सवेंदना बदलणे, चेह-यावर सूज येणे,  डोळे लाल पडणे, नजर कमजोर होणे, दात दुखणे व कमजोर होणे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ  टाक्सफोर्स समितीच्या माध्यमातुन  तपासणी करुन  पुढील उपचाराकरीता  रुग्णालयात दाखल करुन घ्यावे आवश्यकता पडल्यास शस्त्रक्रिया करावी अशा सूचना संजय कमुार यांनी आज दिल्यात.

तसेच म्युकरमायकोसिस आजाराबाबत प्रसारमध्यमे व सोशल मिडिया तर माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी अशाही त्यांनी यावेळी सूचना केल्यात.

आपत्ती व्यवस्थापनच्या निधीचे प्रस्ताव सादर करतांना आवश्यक असलेल्या कामासाठी निधीचे प्रस्ताव सादर करावे.

000000

..क्र-366                                                                      दि.21.05.2021

        शिक्षक पात्रता  परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

वर्धा दि 21, (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे  मार्फत जिल्हयात 2013 पासुन 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र राज्य  शिक्षक पात्रता  परिक्षेमध्ये पात्र  झालेल्या विद्यार्थ्यांचे  प्रमाणपत्र  शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयास प्राप्त झालेले आहे. सदर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून  शिल्लक असलेले प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांनी घेउुन जावे असे आवाहन  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय मेहेर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी  TET  परीक्षा  प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डीटीएड, बीएड उर्त्तीण  गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, जात वैधता  प्रमाणपत्र, अंपगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र इत्यादी आवश्यक  कागदपत्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात सादर करुन   उपलब्ध करुन घ्यावे.

                                                                        0000

..क्र- 367                                                                     दि.21.05.2021

जुन महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

Ø प्राधान्य गट व अंत्योदय  अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 

वर्धा दि.21  -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे. प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजने अंतर्गत  प्राधान्य गट योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्याना जुन महिन्याचे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत  देण्यात येणार आहे.

            नियमित प्राधान्य गट योजनेच्या  लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, नियमितअंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो.  गहू 2 रुपये दराने व तांदूळ 3 रुपये दराने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 3 तांदूळ 2  किलो  व्यक्ती व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

            केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्‍यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                            00000

 

 

 

 

 

..क्र- 368                                                                     दि.21.05.2021

     राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

Ø युवकांना मिळणार हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर

 वर्कर क्षेत्रामधील प्रशिक्षण

           वर्धा दि 21 (जिमाका) : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये  युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            यासंदर्भातील कौशल्य विकास,रोजगार व  उद्योजकता विभागाचा सविस्तर शासन निर्णय १९ मे रोजी निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सध्या कोरोना साथीच्या अनुषंगाने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल. शिवाय कोरोनोत्तर काळातही या मनुष्यबळाचा उपयोग होणार असून या युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगार मिळणार आहे.

           राज्यातील सर्व शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनेलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन त्यांची निवड करण्यात येईल. तसेच ज्या खाजगी इस्पितळांमध्ये २० पेक्षा अधिक बेड्स आहेत त्यांचीही व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन निवड करण्यात येईल. या संस्थांमार्फत युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण तुकडीमध्ये उमेदवारांची संख्या किमान २० व कमाल ३० असावी. परंतु विशेष बाब म्हणून या योजनेकरिता प्रशिक्षण तुकडीमध्ये एकूण प्रशिक्षणार्थ्यांची किमान मर्यादा ५ पर्यत करण्यास मुभा असेल.

वाहनचालक, ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश

        कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सक्षम यंत्रणेमार्फत पॅरामेडीकल कौन्सिलमध्ये करण्यात येईल.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांची सेवा किमान ६ महिने शासकीय किंवा खाजगी इस्पितळांना देणे अनिवार्य असेल. हे प्रशिक्षण प्राधान्याने ऑन जॉब ट्रेनिंग तत्त्वावर देण्यात येईल. याकरीता उमेदवारांचे वेतन संबंधित संस्थेकडून देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

         या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांचे सचिव व इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कौशल्य विकास आयुक्त हे या कार्यक्रमाचे नियंत्रक अधिकारी असतील.

 

00000000

 

जुन महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

Ø प्राधान्य गट व अंत्योदय  अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत

वर्धा दि.21  -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे. प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजने अंतर्गत  प्राधान्य गट योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्याना जुन महिन्याचे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत  देण्यात येणार आहे.

          नियमित प्राधान्य गट योजनेच्या  लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, नियमितअंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो.  गहू 2 रुपये दराने व तांदूळ 3 रुपये दराने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 3 तांदूळ 2  किलो  व्यक्ती व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

          केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                         00000

Thursday 20 May 2021

 







..क्र-361                                                                      दि.20.05.2021

कोविड -19 परिस्थितीबाबत प्रधानमंत्र्यानी  राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद

Ø ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन

Ø ग्रामीण भारत कोरोनामुक्त करण्यावर भर द्यावा

वर्धा दि 20, (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि राज्याने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा करून ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्रातील  वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यांचा सहभाग होता. यात अहमदनगर जिल्ह्याधिकारी यांना प्रधानमंत्र्यांशी  संवाद  साधण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

 दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोविड -19  विरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या  नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची  माहिती दिली.  वास्तविक वेळेत  देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या  वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या प्रसंगी बोलताना प्रधानमंत्र्यानी प्रत्येकाला महामारीविरोधात लढा देण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.  ते पुढे म्हणाले, कोरोना विषाणूने  काम अधिक आव्हानात्मक केले आहे. या नवीन आव्हानांच्या दरम्यान, नवीन रणनीती आणि उपाय  आवश्यक आहेत. गेल्या काही दिवसात  देशात सक्रिय रुग्ण  कमी होण्यास सुरवात झाली आहे. परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्त्वात असेपर्यंत आव्हान कायम असल्याचे त्यांनी बजावले.

महामारी विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रधानमंत्र्यानी प्रशंसा केली आणि सांगितले की, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचे अनुभव व अभिप्रायांची  व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. सर्व स्तरावर  राज्ये व विविध हितधारकांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे.

स्थानिक अनुभव आणि देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज यावर पंतप्रधानांनी भर दिला. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही गावे  कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे संदेश प्रसारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामीण व शहरी भागासाठी  विशिष्ट मार्गाने  रणनीती आखून ग्रामीण भारत कोविडमुक्त करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.

प्रधानमंत्री म्हणाले की, प्रत्येक महामारीने, तिला सामोरे जाण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये सतत नाविन्यपूर्ण संशोधन  आणि बदल घडवून आणण्याचे महत्त्व आपल्याला शिकवले आहे. महामारीचा सामना करण्यासाठीच्या  पद्धती व धोरणे   गतीशील असावीत कारण विषाणू उत्परिवर्तन आणि स्वरूप बदलण्यात माहीर आहे विषाणू उत्परिवर्तन हा आता  तरुण आणि मुलांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यासाठी त्यांनी लसीकरण मोहिमेला चालना देण्यावर भर दिला.

लस वाया जाण्याबाबत पंतप्रधान म्हणाले, एका मात्रेचा अपव्यय म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न आहे.  त्यामुळे त्यांनी लसीचा अपव्यय रोखण्याचे आवाहन केले. 

जीव वाचवताना नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य देण्यावर त्यांनी  भर दिला. गरीबांना  मोफत शिधाची  सुविधा पुरवावी ,  इतर आवश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत आणि काळाबाजार थांबवायला हवे, असे ते म्हणाले. हा लढा जिंकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही हे उपाय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती असला तरी तेथील स्थानिक प्रशासन,  अनेक  व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी थांबवायची आहे त्यामुळे सर्वांच्या सहभाग आणि सहकार्याने आपल्याला पुढील काळात कोरोनाशी लढा देऊन यशस्वी व्हायचे आहे, त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच मास्क, शारीरिक दुरीता आणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग  होण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशाची इतर देशांशी तुलनात्मक आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे 10 हजार लोकसंख्येमागे 12 डॉक्टर आहेत तर युरोपियन देशांमध्ये 30- 35 आहेत. आपल्या देशात 10 लक्ष लोकसंख्येमध्ये 18 हजार कोविड रुग्ण आढळून येतात, ऍक्टिव्ह रुग्णांची  संख्या अमेरिकेत 10 लाखामागे 17 हजार आहे तर भारतात 2318 आहे, प्रति 10 लक्ष लोकसंख्येमागे भारतात 204 आहेत तर इटली किंवा ब्राझील मध्ये 2 हजार पेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे 2 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे तर अमेरिकेत  हेच प्रमाण 10 टक्के आहे.  त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपली कामगिरी चांगली आहे.

000000

Wednesday 19 May 2021

 





जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष  रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

     वर्धा, दि 19:- (जिमाका) घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.  जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री  मिळकत -

वर्धा -  रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर - रुपये 1,28,320/-

आष्टी - रुपये 2,44,180/-

कारंजा घा - 61, 430/-

आर्वी   - 3, 32,965/-

सेलू - 1,35, 490/-

देवळी -  1,23,760/-

हिंगणघाट - 2,13,570/-

एकूण उलाढाल - 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

चौकट

आम्ही 4 मित्रांनी  मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.

वैभव लोखंडे

तरुण भाजीपाला उत्पादक शेतकरी,

सेलू घोराड

00000


 

           रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा

        वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी दिली.

रुग्णवाहिका आणि मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सदर वाहन त्या सेवेसाठी वापरले जाते याचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग किंवा पोलीस विभागाकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनाना पुलगाव येथील पाटणी पेट्रोलियम, वर्धा रोड आणि हिंगणघाट येथील रिलायन्स बी पी मोबिलिटी लिमिटेड, एन एच 7 हैद्राबाद - नागपूर हायवे हिंगणघाट या दोन पेट्रोल पंपवर निःशुल्क पेट्रोल- डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री पाटणी आणि श्री नायडू यांनी सांगितले.

                                                            000

 

 

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण

आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा 

                 -जिल्हाधिकारी

Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक

Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा

Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये



Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये

Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे

Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये

          वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप हंगाम सुरू होत  असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आणि खत बंधावरच पोहचविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारा आहे. शेतकऱ्यांना खत व बियाणे मिळण्यास काही अडचण असल्यास त्यांनी गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. 

         कोविड 19 आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे जिल्हाधिकारी  कार्यालयातून उपस्थित होत्या, तर पत्रकार ऑनलाईन जुळले होते. 

      कोविड परिस्थितीमुळे आपल्याला यापुढे कोविड योग्य वर्तणूक स्विकारावी लागेल. गर्दी टाळणे हा आपला मुख्य उद्देश आहे. गर्दीमुळे कोविडचे संक्रमण  होते, त्यामुळे आपल्याला काही बंधने घालावी लागतात. पण आपण वारंवार अशी बंधने लावू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक सेवा घरपोच देणे आणि घरपोच  सेवा स्वीकारणे याची सवय करून घ्यावी लागेल. पुढील काळात हेच आपल्या जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी करण्याचा मार्ग राहील,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

     शेतकऱ्यांसाठी काही बाबी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा त्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे कृषी केंद्राने त्यांच्याकडील जुना साठा शेतक-यांना नवीन दराने विकू नये. असे करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी केंद्राकडील साठयाची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक केले असून  साठा तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

       जम्बो हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र शासनाने आता बदललेल्या धोरणानुसार त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्या करून त्यासाठी 50 टक्के निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव पुन्हा शासनाकडे तातडीने सादर करण्यात येईल. तसेच ऑक्सिजन स्वयंपूर्णतेसाठी 11 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला आपण उभारत आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 

       शेतकऱयांनी मागील वर्षीची सोयाबीनची परिस्थिती बघता यावर्षी पीक पद्धतीत बदल करावा, तूर - सोयाबीन, तूर - मूग असे आंतरपीक घ्यावे. तसेच सोयाबीनची उगवण शक्ती तपासल्यानंतरच त्या बियाण्यांची पेरणी करावी. यामुळे निकृष्ट बियाणे पेरणीपूर्वीच ओळखता येईल आणि शेतकऱयांचे नुकसान टळेल. तसेच वर्धेत धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे. मात्र लवकर पेरणी केल्यामुळे कापूस पिकावर गुलाबी बोन्ड अळी आणि बोन्डसड  रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेत -शिवारात 100 मिली मीटर  पाऊस झाल्याशिवाय कोणतीही पेरणी करू नये, यामुळे दुबार पेरणीचे आणि किडीचे संकट शेतकऱयांना टाळता येईल, असे विद्या मानकर यांनी सांगितले.

        बी जी - 3 हे अप्रमाणित बियाणे आहे, हे बियाणे उगवत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी हे बियाणे घेऊ नये. शेतकऱयांनी परवानाधारक कृषी केंद्रकडून  बियाणे खरेदी करावे, आणि बियाणे खरेदीची पावती आणि त्याचा पिशवी जपून ठेवावी. असे अप्रमाणित बियाणे आढळल्यास 07152- 250091 या क्रमांकावर तक्रार करावी असेही श्रीमती मानकर म्हणाल्या.

                                              00000000000

 

जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष  रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

     वर्धा, दि 19:- (जिमाका) घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.  जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री  मिळकत -

वर्धा -  रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर - रुपये 1,28,320/-

आष्टी - रुपये 2,44,180/-

कारंजा घा - 61, 430/-

आर्वी   - 3, 32,965/-

सेलू - 1,35, 490/-

देवळी -  1,23,760/-

हिंगणघाट - 2,13,570/-

एकूण उलाढाल - 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

चौकट

आम्ही 4 मित्रांनी  मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.

वैभव लोखंडे

तरुण भाजीपाला उत्पादक शेतकरी,

सेलू घोराड

00000

Monday 17 May 2021

 

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू

वर्धा दि, 17 (जिमाका):-  वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे

संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये आहे. पहिल्याच दिवशी शहरातील 180 पूर्वठादारांनी  या अँप मध्ये नोंदणी केली आहे. याचे लोकार्पण आज नगराध्यक्ष अतुल तराळे व नगर परिषद मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी  यांचे संकल्पनेनुसार  नगरपरिषदने माय वर्धा (MY WARDHA) हे अँप विकसित केले आहे. सदर अँप वर्धा शहरातील नागरिकांकरिता आज दि. 17 मे रोजी नगरपरिषद येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सभागृह येथून लोकार्पण (Launching) लोकार्पण करण्यात आले. 

सदर APP च्या माध्यमातून व्यापारी , अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारे व नागरिक यांचे करिता सुविधा झाली आहे. तसेच या APP च्या माध्यमातून पूरवठा करणारे दुकानदार , कामगार, डिलिव्हरी बॉय यांचे ओळखपत्र उपलब्ध होतील जेणेकरून शासनाच्या पथकांनी तपासणी केल्यास सेवा देण्यास अडचण

जाणार नाही.सदरचे ॲप हे नागरिकांना

परिषद वर्धाचे संकेतस्थळ

http//wardhamahaulb.maharashtra.gov.in / येथून डाऊनलोड करता येईल तसेच लवकरच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. याबाबत काही अडचण असल्यास 8530006063 या व्हाट्स अँप क्रमांकावर संदेश पाठवावा.

नगराध्यक्ष  अतुल तराळे यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी व

नागरिकांनी घराबाहेर न पडता अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी हे अँप उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, गटनेता  निलेश खोंड, गटनेता प्रदीपभाऊ ठाकरे ,  आशिष वैद्य शिक्षण सभापती , नगरसेवक कैलास राखडे,

सचिन पारधे, गोपी त्रिवेदी  यांच्या ऑनलाईन उपस्थितीत करण्यात आला.

00000