Friday 4 May 2012

महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेच्‍या प्रभावी प्रसिध्दीसाठी पत्रकारांना पारीतोषिक 8 जुन पर्यंत अर्ज आमंत्रित


      वर्धा,दि.4 - राज्यात लोकहिताच्या अनेक योजनामधुन आर्थिक विकास व मानविजिवन मुल्य उंचावण्यासाठी सामाजिक शांतता व सुरक्षा आवश्यक असते.लहान सहान कारणावरुन निर्माण होणारे तंटे गाव पातळीवरुन समोपचाराने मिटवून भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत असे वातावरण निर्माण करुन लोकांनी स्थायी विकासाचा मार्ग स्विकारण्यासाठी पत्रकार व प्रसार माध्यमे आपली महत्वपुर्ण भुमिका बजावू शकतात.ही बाब लक्षात घेवून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रसिध्दी करण्यासाठी पत्रकारांना पारितोषीक जाहिर केले आहे.
जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कारासाठी रु 25 हजार, व्दितीय पुरस्कारासाठी रु 15 हजार व तृतीय पुरस्कारासाठी रुपये 10 हजाराचे पारितोषीक देण्यात येणार असून, विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार रु 1 लाख रुपये , व्दितीय पुरस्कारासाठी रु 75 हजार रुपये व तृतीय पुरस्कारासाठी रु 50 हजार रुपये , राज्यस्तर पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार रु 2 लाख रुपये , व्दितीय पुरस्कारासाठी 1 लाख 50 हजार रुपये व तृतीय पुरस्कारासाठी 1 लाख रुपयाचे पारितोषीक जाहिर करण्यात आले आहे. सदर पुरस्काराच्या पात्रतेसाठीच्या अटि पुढील प्रमाणे आहे.
1.      महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी दि. 2 मे 2011 ते 1 मे 2012 या कालावधीत प्रसिध्द केलले साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता मुल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
2.      पुरस्कारासाठी उक्त कालावधीत वृत्तपत्रे/ नियतकालीके यामधुन प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स, अशा साहित्याच्या विचार करण्यात येईल.
3.      पुरस्कारासाठी वृत्तपत्रे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील.
4.  पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्दी केलेल्या साहित्याच्या विचार करण्यात येईल,
5.      उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठी च अर्ज करता येईल.
6.      पारितोषीकासाठी विहित मुदतीत वैयक्तिक केलेले अर्ज विचारत घेण्यात येतील. एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबधित संपादक सबंधित समितीकडे पाठवतील. वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेले असेल तर त्यासबंधीत एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणतेही एक संपादक सबंधित समितीकडे पाठवतील.
7.      जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी सबंधित जिल्ह्यातुन प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे/नियतकालीके यांच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकारास सबंधित आवृत्तीत प्रसिध्द झालेल्या साहित्यासंदर्भात अर्ज करता येईल.
8.      माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांच्या मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ,ब,क वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिक यामधुन प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच वरील पारितोषिकांसाठी विचार करण्यात यईल.
9.      पुरस्कारासाठी गठित निवड समित्यातील सदस्य या स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाहीत.
   अर्जदारांनी विहीत नमुण्यातील आपला अर्ज तीन प्रतीत 8 जुन 2012 पर्यंत सादर करावयाचा आहे. 8 जून 2012 नंतर आलेले अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. जिल्हास्तरीय समिती प्राप्त अर्जासोबतच्या साहित्याचे निर्धारित निकष व द्यावयाचे गुण यानुसार परिक्षण करुन निकाल जाहिर करतील.
   सबंधित पत्रकारांनी दिनांक 2 मे 2011 ते दिनांक 1 मे 2012 या कालावधीत प्रसिध्द साहित्य, बातम्या, वृत्तांकन व फोटो फिचर, लेख अग्रलेख पांढ-या शुभ्र कागदावर चिकटवून त्यावर वृत्तापत्राचे नाव, प्रसिध्दी झाल्याचा दिनांक नमुद करावा. शिक्का व संपादकाच्या स्वाक्षरीने प्रमाणीत करुन आकर्षितरित्या बाईंडिंग करुन विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन वर्धा येथे 8 जुन 2012 पर्यंत सादर करण्यात यावे. सदर अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीपुढे ठेवण्यात येईल. परिक्षणानंतर जिल्हाधिकारी, वर्धा हे या स्पर्धेतील स्पर्धकांचे नावे जाहिर करतील. पुरस्काराच्या पात्रतेसाठीच्या अटीची पूर्तता करण्यांत यावी अन्यथा प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची स्पर्धेकांनी नोंद द्यावी.
   सदरहू मोहिमेच्या जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठया संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मिलींद आवळे यांनी केले आहे.
0000

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परिक्षा आता 12 मे रोजी


     वर्धा, दि. 4- हुशार व होतकरु विद्यार्थ्‍यासाठी नंदनवन असणारी बहुप्रतिक्षीत जवाहर नवोदय विद्यालयासाठीची 9 व्‍या वर्गासाठीची प्रवेश चाचणी परीक्षा रविवार दि. 6 मे 2012 रोजी घेण्‍यात येणार होती ती आता शनिवार दिनांक 12 मे 2012 रोजी घेण्‍यात येणार आहे. असे वर्धा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कळवितात.
                              00000

लोकशाही दिनाचे आयोजन रद्द


    वर्धा दि.4– वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्‍थानिक मतदार संघ विधान परिषदेची व्‍दीवार्षीक निवडणूक दिनांक 25 मे 2012 रोजी घेण्‍यात येणार असल्‍याने त्‍या अनुषंगाने आचार संहिता लागु करण्‍यकी आली आहे. आचार संहिताचे कालावधीमध्‍ये सोमवार दिनांक 7 मे 2012 रोजी आयोजित होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्‍यात येणार आहे. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.
                              00000

Wednesday 2 May 2012

जमिनी भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत करण्‍यासाठी विशेष मोहिम


       वर्धा,दि.2-राज्‍यात प्रामुख्‍याने विदर्भातील भुमिधारी शेतकयांच्‍या जमिनीबाबत अधिकार अभिलेखात सातबारा मध्‍ये भोगवटदार वर्ग दोन म्‍हणून नोंद दर्ज आहे. संबंधीत शेतक-यांना उक्‍त जमिनी विक्री, गहाण किंवा इतर कामासाठी ब-याच अडचणी निर्माण होतात. सदर जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत करणेसाठी शासन परिपत्रक दि. 2 जानेवारी 2012 नुसार माहे एप्रिल ते जून 2012 या कालावधीत महसूल विभागाव्‍दारे विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे.
     शासनाव्‍दारे विविध योजने अंतर्गत मंजूर करण्‍यात आलेल्‍या जमिनी व्‍यतिरिक्‍त (काबीलकास्‍त, अतिक्रमण, सिलिंग, कुळवहीवाट, भुदान इत्‍यादी) या जमिनी वगळून भोगवटदार वर्ग 2 मध्‍ये धारण करीत असलेल्‍या जमिनी नियमानुसार आवश्‍यक कार्यवाही करुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केल्‍या जाऊ शकते. जिल्‍ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्‍यात येते की त्‍यांनी संबंधीत तालुक्‍याचे तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे. व विशेष मोहिमेचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्‍यावा. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.
                         00000

प्राथमिक शाळांचे अनुदान पात्रतेसाठी मुल्‍यांकनाचा कार्यक्रम


     वर्धा,दि.2- जिल्‍ह्यातील कायम विना अनुदान तत्‍वावर परवानगी दिलेल्‍या प्राथमिक शाळांचे (इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळा वगळून) अनुदान पात्रतेसाठी मुल्‍यांकन करण्‍याकरीता कालबध्‍द कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.
     अनुदानासाठी इच्‍छुक शाळेने शासन निर्णयातील निकषानुसार स्‍वतःचे मुल्‍यमापन करावे. स्‍वयंमुल्‍यांकन प्रस्‍ताव इच्छुक शाळेने शासन निर्णयातील परिच्‍छेद 5 नुसार ऑनलाईन पध्‍दतीने दिनांक 5 मे 2012 पर्यंत सादर करणे. ऑनलाईन प्रणालीमार्फत संकेतस्‍थळावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करुन लोकांच्‍या दि. 5 मे 2012 ते 10 मे 2012 या कालावधीत हरकती मागविण्‍यात याव्‍या. शासन निर्णयानुसार निर्देश दिल्‍याप्रमाणे संकेतस्‍थळावर प्राप्‍त सर्व अर्जाची तपासणी शाळा मुल्‍यांकन दि. 5 मे 2012 ते 10 मे 2012 या कालावधीत समितीने करावे. शासन निर्णय निश्चित केलेल्‍या तपासणी समितीने मुल्‍यांकनासाठी प्राप्‍त झालेल्‍या एकूण अर्जापैकी 20 टक्‍के अर्ज दि. 10 मे 2012 ते 14 मे 2012 या कालावधीत केलेल्‍या कार्यपध्‍दतीने तपासणे. तपासणी समितीने आपल्‍या विभागातील मुल्‍याकनानंतर अनुदानासाठी पात्र शाळांची यादी शासनाकडे दि. 15 मे 2012 रोजी सादर करावी.
     मुल्‍यांकनाची माहिती www.mahdoesecondary.com   या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे. Online   माहिती भरणेपूर्वी  website   वरुन फॉर्मची हार्ड कॉपी  download   करुन प्रथम पेनाने भरावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. वर्धा कळवितात.
                         0000000      

क्रीडा पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित


      वर्धा, दि. 2- राज्‍य शासनामार्फत राज्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडू, (साहसी व अपंग खेळाडूंसह) संघटक किंवा कार्यकर्ते व अपंग खेळाडू यांच्‍यासाठी शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार  क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्‍कृष्‍ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्‍कार महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्‍य क्रीडा पुरस्‍कार सन 2009-10 व 2010-11 या वर्षासाठी प्रदान करण्‍यात येणार आहेत.
    यासाठी मान्‍यता प्राप्‍त खेळांच्‍या अधिकृत राज्‍य संघटनेमार्फत त्‍या त्‍या आंतरराष्‍ट्रीय किंवा राष्‍ट्रीय स्‍तरावरील कनिष्‍ठ व वरिष्‍ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू कार्यकर्ते किंवा संघटक तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुन्‍यातील अर्ज संबंधित राज्‍य संघटनेचा ठराव शिफारशीसह दि. 31 मे 2012 पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्‍यवर्ती इमारत पुणे 1 या पत्‍यावर मागविण्‍यात येत आहेत. खेळाडू (साहसी व अपंग खेळाडू) किंवा मार्गदर्शकांस विहिती नमुन्‍यातील अर्ज वैयक्तिकरित्‍याही परस्‍पर  विहित तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करता येईल. क्रिडा संघटक किंवा कार्यकर्ते यांनी विहीत नमुन्‍यातील अर्ज संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्‍या कार्यालयाकडे विहीत मुदतीत सादर करावेत.
      वरील सर्व क्रीडा पुरसकाराबाबत अधिक माहिती व नमुना अर्ज क्रीडा विभागाच्‍या www.mahasportal.gov.in या संकेतस्‍थळावर तसेच क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा अथवा संबंधित जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांच्‍या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा कळवितात.
                             000000
     

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम जारी


वर्धा दि.2– वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 15 मे 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असे आदेशात नमूद आहे.
                           00000

Tuesday 1 May 2012

महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 52 वा वर्धापन दिन मोठया उत्‍साहात साजरा पालकमंत्र्याच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन



      वर्धा दि. 1 – महाराष्‍ट्रराज्‍य स्‍थापनेचा 52 वा वर्धापन दिन येथील क्रीडा संकुलनाच्‍या प्रागंणात मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यांत आला या निमित्‍ताने अर्थ व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी त्‍यांच्‍या शुभहस्‍ते आज सकाळी ध्‍वजारोहन करुन राष्‍ट्रध्‍वजाला मानवंदना दिली.
      या प्रसंगी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज व पोलीस अधिक्षक अविनाश कुमार आदी मान्‍यवर उपस्थित होते.
      या वेळी बोलतांना पालकमंत्री मुळक म्‍हणाले की महाराष्‍ट्र स्‍थापनेचा मंगल कलश 1 मे 1960 रोजी भारताचे तात्‍कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांना सन्‍मानपूर्वक दिला आणि  संयुक्‍त महाराष्‍ट्र अस्थित्‍वात आला. मात्र 106 हुतात्‍मांच्‍या बलिदानानंतर व त्‍यांच्‍या असिम त्‍यागातून हे राज्‍य निर्माण झाले. गेल्‍या 50 वर्षात राज्‍याने विविध क्षेत्रात नेत्रदिपक वाटचाल केली असून नैसर्गिक आपत्‍ती सारख्‍या संकटाचा व आव्‍हांनाचा सामना करुन राज्‍याने देशात अनेक क्षेत्रात आघाडी कायम ठेवली आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. राष्‍ट्रपिता माहात्‍मा गांधी, आचार्य विनोबा भावे महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या स्‍मृतीला अभिवादन करुन ते म्‍हणाले की, सेवाग्राम आश्रम येथे गांधी तत्‍वज्ञान तसेच स्‍वतंत्र चळवळीच्‍या इतिहासाच्‍या अभ्‍यास करण्‍यासाठी देश विदेशातील विद्यार्थी व पर्यटक मोठया प्रमाणावर भेटी देतात. त्‍यांच्‍या सोयी व सुविधांमध्‍ये वाढ करण्‍यासाठी मी सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे असेही ते म्‍हणाले.
      यावेळी पोलीस पथकांनी बॅन्‍डवर राष्‍ट्रगिताची धून वाजवली. पोलीसदल व गृहरक्षक दलांतील जवानांच्‍या परेडचे निरीक्षन मंत्री महोदयांनी केले तसेच पोलीस व गृहरक्षक दलातील जवानांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली या प्रसंगी मंत्रीमहोदयांनी स्‍वातंत्र सौनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांची भेट घेवून त्‍यांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या सुभेच्‍छा दिल्‍या.
      याप्रसंगी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, नगर पालिका अध्‍यक्ष आकाश शेंडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, न.प. आरोग्‍य सभापती प्रा.सिध्‍दार्थ बुटले, उपजिल्‍हाधिकारी आर.बी. खंजाची, जे.बी.संगितराव, नियोजन अधिकारी पी.एन.डावरे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार सुशांत बन्‍सोड, स्‍वातंत्र संग्राम सैनिक,जि.प.व न.प. चे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍याने उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ.अजय येते व ज्‍योती भगत यांनी केले यावेळी मोठया संख्‍येने लहान थोर मंडळी उपस्थित होती
000000.