Saturday 30 July 2011

राज्यात सर्वप्रथम ई-चालन सुविधा बहुमान वर्धेला ई-चालान सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत - न्या. शिवणकर


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
       वर्धा,दि.30- न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्टॅम्पची खरेदी करावी लागते. या स्टॅम्पच्या खरेदी ऐवजी आता न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी ऑन लाईन ई-चालान पध्दत अवलंबविण्यात आल्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश़ अशोक शिवणकर यांनी केले.   
वर्धा जिल्हा न्यायालय परिसरात ई-चालान सेवेच्या उदघाटनाचा शुभारंभ न्यायाधिश अशोक शिवणकर यांच्या शुभ हस्ते नुकताच (25 जुलै) रोजी संपन्न झाला. याप्रसंगी न्यायाधिश दिपक ढोलकिया, न्यायाधिश समिर दास, मुख्य न्यायदंडाधिकारी डि.एच.शर्मा, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्रदिप देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
     राज्यात सर्वप्रथम ई-चालान सुविधा सुरु करण्याकरीता वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याचे सांगून न्या. शिवणकर म्हणाले कि संगणक प्रणालीच्या ऑन लाईन प्रक्रीयेमुळे यापुढे न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी विलंब होणार नाही. या कार्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडिबीआय बँक व इंडियन ओव्हरसिज बँकेची सेवा सुविधा देण्यासाठी निवउ करण्यात आली असून, या सुविधेचा वकिल मंडळींनी व पक्षकारांनी लाभ घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
     याप्रसंगी अडव्होकेट आर.एस.गुरु यांचे व्दारे अनंता पुरंदरे यांनी ऑनलाईन चालान सुविधेचा उपयोग करुन रु. 50 हजाराचया दिवाणी दाव्याकरीता 4 हजार 930 रुपयाची ई-चालानने रक्कम भरण्यात आली. या ऑनलाईन ई-चालान सुविधेची प्रकिया संगणक प्रणाली संचालक ए.एस.कुरेसी व प्रविण भगत यांनी पूर्ण केली.
     याप्रसंगी मोठ्या संख्येने वकील,पक्षकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                           0000

वर्धा जिल्ह्यात आता पावेतो 354 मि.मी. सरासरी पाऊस


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 29- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 354.14 मि.मी. सरासरी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून, गेल्या चोविस तासात हिंगणघाट तालुक्यात 56 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
वर्धा- 2.4 (296.8) मि.मी., सेलू -12 (409) मि.मी., देवळी -6.6 (358.32)मि.मी., हिंगणघाट- 56 (338.6) मि.मी., आर्वी -निरंक (426) मि.मी., आष्टी - निरंक (291) मि.मी., समुद्रपूर- 2 (392.3) मि.मी., कारंजा- निरंक (320.9) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 79 मि.मी. पाऊस पडला असून, आतापावेता एकूण 2833.12 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 9.87 मि.मी. असून, आतापर्यंत 354.14 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                            00000


कारंजा तालुक्यातील पिक परिस्थीतीची पाहणी व शेतक-यांसोबत संवाद


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि. 30- कारंजा तालुक्यातील हेटीकुडी व चंदेवाणी या ग्रामीण क्षेत्रातील शेतक-यांच्या शेतातील पिक परिस्थिती आणि फळबागेची पाहणी नुकतीच (दि.26जुलै) जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, सेलसुरा कृषि केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे व तालुका कृषि अधिकारी जुमडे यांनी प्रक्षेत्राला भेट दिली व शेतक-यांसोबत संवाद साधला.
कारंजा तालुक्यातील हेटिकुंडी येथील केशवराव भवते यांच्या संत्रा फळबोगेला भेट देवून पाहणी करताना त्यांना येणा-या अडी-अडचणीसंबधी प्रक्षेत्रावर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भवते म्हणाले की, संत्र्याचे फळबागाची लागवड 2003 मध्ये करण्यता आली. चार एकरामध्ये संत्र्याचे 850 झाडे लावण्यात आले. लागवड केल्यापासून आतापर्यंत फळबागाच्या व्यवस्थापनावर     12 लाख रुपये खर्च झाले. त्यामध्ये ठिंबक सिंचन व विहीरीचा खर्च अंतर्भुत आहे. मात्र 2007 पासून रसाळ व स्वादिष्ट संत्र्याचे उत्पादन झाले. 2007 साली 1 लाख 82 हजार, 2008 या वर्षी 2 लाख   50 हजार , 2009 या वर्षी 3 लाख 75 हजार, 2010 यावर्षी    45 हजार रुपयाचा खरेदीचा व्यवहार झाला असून,2011 मध्ये संत्र्याचा संपूर्ण बागाच्या खरेदीचा व्यवहार 8 लाख 25 हजार रुपयाचा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आंबीयाबाहार, मृग बाहार व हस्त बाहाराची विस्तृतपणे माहिती दिली. यावर संत्रा फळबागाच्या किड व्यवस्थापनाबाबत अधिका-यांनी त्यांना मार्गदर्शन केले.              यानंतर चंदेवाली येथील निलेश घोडमारे यांच्या शेतातील पीक परिस्थितीची पाहणी करुन संत्रा फळबागाला भेट देण्यात आली. चंदेवाली येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता शेतक-यांसाठी मार्गदर्शन  बैठक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कृषि अधिक्षक ब-हाटे म्हणाले की, शेतक-यांना पिकाच्या नुकसान भरपाई आवश्यक आहे की, शेतीच्या निगडीत साहित्याची आवश्यकता आहे किंवा शेतक-यांना  तंत्रशुध्द तंत्रज्ञानाचया मार्गदर्शनाची गरज आहे यावर शेतकरी म्हणाले की, आम्हाला शेतीच्या माहितीपूर्ण नवनविन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ही माहिती शेतक-यांसाठी मोलाचा अनमोल ठेवा असतो. पीक प्रक्रियेत व उत्पादन वाढीसाठी माहितीपूर्व नवनवे तंत्रज्ञान शेतीसाठी सहाय्यभूत ठरत असते.
शेतक-यांशी संवाद साधताना डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले की,  शेतक-यांचे मुख्य पीक कपासी, सोयाबीन, तुर,फळ पीक संत्रा यावर येणारे रोग, किडी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मृद व जल संधारण व निचरा व्यवस्थापन , तण नियंत्रण याबाबत सखोल चर्चा होऊन  शेतक-यांचे शंकासमाधान करण्यात आले.
अधिक माहिती देतांना नेमाडे म्हणाले की, सद्यास्थितीमध्ये कपासी पिकावर रस शोषन करणा-या किडीचा व सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव अत्यल्प आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या किड किंवा किटकनाशकाची फवारणी करु नये व फवारणीवर होणारा अनावश्यक खर्च टाळावा. त्याचप्रमाणे या किडीविषयी जागरुक राहून किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास रस शोषण करणा-या किडींसाठी व चक्रभुंग्यासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा अॅसिटामीप्रीड 20 टक्के प्रवाही 2 ग्रॅम किंवा मिथाईल डेगॅटॉन 25 टक्के प्रवाही 8 मिली यापेकी कोणतेही एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
त्याचप्रमाणे सोयाबीन पीकावरील हिरव्या उंट अळीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 10 मिली यापेकी एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. निव्वळ किटकनाशकावर अवलंबून न राहता एकात्मिक किड व रोग नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी संवाद करताना सांगितले.
यावेळी शेतक-यांच्या पीक प्रक्रियेबाबत येणा-या अडचणी व समस्यांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच इंगळेताई उपस्थित होत्या.
यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
                           00000







सोयाबिन पिकावरील चक्रीभुंग्याचे एकात्मिक किड व्यवस्थापन


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
           वर्धा, दि.30-  जिल्ह्यातील वर्धा,सेलु,देवळी तालुक्यामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे. या किडीचे जीवनकाळ नुकसान पातळी व एकात्मिक व्यवस्थापन या अनुषंगाने शेतक-यांनी किडीची ओळख व व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावी, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
      सोयाबिन पिकावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या पहील्या आठवड्यापासून सुरु होतो. चक्रीभुंग्याची अळी तसेच प्रौढवस्था पिकाचे नुकसान करते. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करुन त्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे अन्नपुरवठा कमी होतो आणि खापाच्या  वरचा भाग वाळुन जातो. अळ्या देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहचतात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही किड उडीद, मुंग, चवळी, वाल, तुर, भूईमुंग, मिरची, कारली इत्यादी पिकाचेही नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव पीक दिड ते दोन महीन्याचे अवस्थेत असताना झाल्यास किडग्रस्त झाड इतर सामान्य झाडासारखेच दिसतात. त्यामुळे पीक दिड ते दोन महीन्याचे अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास किडग्रस्त झाड इतर सामान्य झाडासारखेच दिसतात. त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात वरील खापेवरील फांदी वाळलेली दिसते.साधारणत: लवेर पेरलेल्या सोयाबिनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
किडीच्या ओळखीनुसार किड ही प्रौढ भुंगेरा फिक्क्ट तपकिरी रंगाचा 7 ते 10 मि.मि. लांब असते. मादी नरापेक्षा मोठी असते. स्पर्शेंद्रिये शरीराच्या लांबी एवढे किंवा त्याहीपेक्षा लांब असतात. पंखाचा शरीरातील अर्धा भाग गर्द काळा असतो. मादी 8 ते 72 अंडी घालते. अंडी घालण्याचा काळ 8 ते 34 दिवसांचा असतो. अंडी अवस्था 4 ते 8 दिवस असते. अंडी पिवळसर पांढरी व गुळगुळीत असुन, तिचा डोक्यावरील भाग जाड असतो. व तिच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात. पुर्ण वाढलेली अळी 19 ते 22 मि.मि. लांब असते. अळी अवस्था 32 ते 62 दिवसाची असते. पिकाचे कापणी पुर्वी अळी फांदीचा तुकडा पाडते व आत सुप्तावस्थेत जाते. ही अवस्था ऑक्टोंबर  ते जुन-जुलै पर्यंत टिकते. अळी त्याच तुकड्यात शंखी अवस्थेत जाते. शंखी अवस्था 8 ते 11 दिवसाची असते. अळीची सुप्तावस्था मान्सुनच्या पावसामुळे संपते.
किडीचे व्यवस्थापन करताना शेतक-यांनी घ्यावयाच्या दक्षतेनुसार चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालु नये, याकरीता सुरवातीला 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी, सोयाबिनला फुलोरापुर्वी 3-5 चक्रीभुंगा प्रती मिटर ओळीत व फलारानंतर 5-6 चक्रीभुंगा प्रती मिटर ओळीत ही मर्यादा लक्षात घेऊन खालील किटक नाशकाची फवारणी करावी. इथोफेनप्रॉक्स 10 टक्के 1 ली. प्रती हेक्टर किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 25 मिली किंवा अॅसिफेट 75 टक्के 15 ग्रॅम किंवा फेनवलरेट 20 टक्के 10 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी किटकनाशकच्या निर्मुलनासाठी करावी, असे उपविभागीय कृषि अधिकारी,वर्धा कळवितात.
                        0000

Friday 29 July 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.30/7/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
354.14 मि.मी.

9.87 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -296.8 (2.4 मि.मी.
2)सेलू - 409(12.0) मि.मी.
3)देवळी -358.32 (6.6) मि.मी.
4)हिंगणघा-338.6(56.0)मि.मी.
5)आर्वी -426(निरंक) मि.मी.
6)आष्टी -291 (निरंक) मि.मी. 7)समुद्रपूर -392.3(2.0) मि.मी
8)कारंजा- 320.9 (निरंक) मि.मी.

पावले पडली पुढे...

मंगळवार, २६ जुलै, २०११

समुद्रपूर तालुक्यातील २४९ लोकसंख्या असलेले खैरगाव, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता स्वयं सहाय्य महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली.गटाच्या संघटिका म्हणून सौ. शौभा झिबलाजी गायधने, वय ४८ वर्षे यांची निवड झाली. शिक्षणाने अशिक्षित असल्या तरी त्यांच्या मध्ये असलेली जिद्द व चिकाटी मुळे संघटन, शिक्षण व व्यवहारीक ज्ञान त्यांना गटामुळे मिळाले.अशिक्षित असल्यामुळे त्यांना वाचन करता येत नव्हते. परंतु त्यांची वाचनाची आवड बघून त्यांच्या मुलांनी त्यांना रात्रीच्या शाळेत जाण्यास सां‍गितले. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईने ४५ व्या वर्षी ४ थी पास केले. शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले.

शोभाताईने गटातून कर्ज घेऊन स्वत:च्या १२ एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला.त्यासाठी त्यांनी स्वत: व गटातील महिलांनी शेती शाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे कीटकनाशके,रासायनिक खते इत्यादीचा खर्च वाचला. शोभाताईने स्वत: गांडुळ खत, जीवामृत तयार करुन शेतीमध्ये त्याचा वापर केला.शेतीमधून निघालेल्या उत्पादनातून त्यांनी विषमुक्त अंबाडी शरबत, झुणका भाकर चा स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनीमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

गावातील तलावावर गटातील महिलांच्या सहकार्याने व स्वत: पुढाकार घेऊन बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्यादी विविध कार्यक्रम गावामध्ये पुढाकार घेऊन साजरे केले जातात. सुजाता स्वयं सहाय्यता बचत गटाच्या नावाने शेतकरी वाचनालय स्थापन केले. गावातील शेतकरी वाचनालयात जावून वाचन करतात. शोभाताईनी कृषी खात्याच्या माध्यमातून शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण इत्यादी योजनाचा लाभ घेतला. शोभाताईला वाचनाची आवड असल्याने वाचनालयातील एकही पुस्तक त्यांच्या वाचनातून सुटलेले नाही.

शोभाताईला सहलीला जाण्याची खूप आवड. गटाची सहल, कृषी खात्यामार्फत अभ्यास दौरा, तीर्थयात्रा असो, त्या नियमित दरवर्षी नवीन गावाला शहरात फिरण्यासाठी जातात. गोवा, अकोला, चिखलदरा, रत्नागिरी, मध्यप्रदेश, दिल्ली इत्यादी ठिकाणी त्या गेलेल्या आहेत.

गटामध्ये सहभागी झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, मी जे काही करते आहे, ते गटांकडून मिळत असलेल्या बळामुळे. भविष्यात गटासाठी एक व्यवसाय उभारणी करावयाची आहे. जेणेकरुन सर्व सुखी समाधानी जीवन जगेल, पण ते होईल सर्व गटांच्या प्रशिक्षणातूनच आणि त्यासाठी साथ हवी माविमची.

THANKS www.mahanews.gov.in