Wednesday 26 October 2011

दिवाळीच्या शुभेच्छा...


एकच पण ती










एकच पण ती.. ना  आहे एकाकी
एकच पणती.जरी न दे लकाकी
तिमिराला लढा द्यायला ती उभी..
टिम-टिम तिचा शांत या नभी..

आकाश चांदण्यांचे असू दे किती
दूरच तारे.. दूरवरचेच हे नजारे..
अंगणी आशांचे किरण जागवित.
ही पणती जिवाला गे दे उभारे..

जिवनाच्या याच रंगाचा हा गौरव
दिवाळी त्या पणती चा गं मिरव..
जरी अल्प तरी हा एक स्वल्प..
आयुष्यातला हा हसरासा संकल्प..

गुणगुणण्या आयुष्याचे हे गीत..
निभावण्यास ही सारी जनरित..
ती लढते..वा-याशी..तिमिराशी..
उजळूनी सारे.  अंधार पायाशी

चला प्रकाशाचे गीत हे गायला
पणतीचे जीवन जगायला...
आठवण करण्या या सा-याला
चला दीपावली.. साजरी करायला



प्रशांत दैठणकर

Wish you A very Happy Dipawali

Monday 24 October 2011

शासकीय वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्याचे हस्ते



महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.24ऑक्टोंबर2011
-----------------------------------------------------------------------------------------------

वर्धा, दि.24- सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गिय मुलांचे शासकिय वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज थाटात पार पडला.
देवळी येथील वस्ती‍गृहाचे लोकार्पण करुन शिलाण्यासाचे उदघाटन
प्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण 
     याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पाणी पुरवठा राज्यमंत्री रणजित कांबळे, पालकमंत्री राजेंद्र मुळक, खासदार दत्ताजी मेघे, जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्न, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, माजी होमगार्ड समादेश प्रविण हिवरे, अधिक्षक अभियंता बळवंत लूंगे, कार्यकारी अभियंता प्रशांत जनबंधू, विभागीय समाज कल्याण अधिकारी माधव वैद्य, समाज कल्याण अधिकारी माधव झोड आदी मान्यवर उपस्थित होते.
     मागासवर्गीयाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती होऊन त्यांचे राहणीमान सुधारावे व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी  तालुका पातळीवर वसतीगृह बांधण्यात येत आहे. देवळी येथे 100 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहामध्ये सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 4 कोटी 38 लक्ष खर्च आला असल्याचे सांगण्यात आले.
     यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                     0000000

आर्थिक बळकटीमुळे राज्याची प्रगतीकडे वाटचाल - मुख्यमंत्री


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,   दि.24ऑक्टोंबर2011
---------------------------------------------------------------------------------------------
            
वर्धा,दि.24- येत्या पाच सहा वर्षापासून देशाची आर्थिक प्रगती झपाट्याने वाढत असून विकास दर 8 टक्क्या पर्यंत पोहचला आहे. या माध्यमातून राज्यातील महत्वाकांक्षी ठरलेल्या पंतप्रधान ग्राम सडक येाजना, सर्वशिक्षा अभियान, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वसतीगृहे या सारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, आर्थिक बळकटीमुळे राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
देवळी येथील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी  मार्गदर्शन
करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 
आज देवळी येथील नगर परिषद हायस्कुलच्या प्रांगणात महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान अंतर्गत सुधारीत पाणीपुरवठा  34.02 कोटी रु. मुस्लीम कब्रस्थान परिसरात सिमेंट रोड व सोलर लाईट 10 लक्ष रुपये, नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छ योजना 33 लक्ष रुपये, खत निर्मिती 49 लक्ष रुपये मुल्य कामाचे भुमिपुजन तर मटन मार्केट च्या इमारतीचे बांधकाम 49 लक्ष  रुपये, नगर पालीका क्षेत्रातील 23 सिमेंट रस्त्याचे बांधकाम व दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याचे बांधकाम 1 कोटी 33 लक्ष रुपये कामाचा लोकार्पन सोहळा त्यांचे हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणी पुरवठा राज्यमंत्री रणजित कांबळे, खासदार दत्ताजी मेघे, जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हाधिकारी जयश्री भोज, मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने, न.पा.अध्यक्ष शेख गफ्फार शेख अजीज, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. किरण उरकांदे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे मंचावर उपस्थित होते.
विकासाच्या योजना गावापातळी पर्यंत राबविण्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमुद करुन मुख्यमंत्री चव्हाण  म्हणाले की जिल्ह्यातील लोवरवणा या प्रकल्पाच्या  मुळ किमतीमध्ये वाढ झाली असून दरवर्षी 5 हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल.
     स्वातंत्र्य काळापासून प्रलंबीत असलेले नझूल जमीनीच्या पट्याचा कायम तोडगा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळातील सहका-याच्या सहमतीने घेण्यात येईल. तसेच झुडपी जंगलाचा प्रश्न अंतीम टप्प्यात आला असून या बाबत शासन तातडीने पाऊले उचलणार आहे. नागपूर येथील मिहानचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असून जमीन अधिग्रहीत करण्याच्या कामांना वेग देऊन विमानतळाच्या दुस-या धावपट्टीचा मार्ग मोकळा करण्यात येईल. जेणेकरुन या परिसरातील बेरोजगारांना कायम स्वरुपी रोजगार मिळेल. नियमीतपणे वीज मिळावी हा शासनाचा प्रयत्न असून तेलंगणा व ओरीसा येथील पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नसल्यामुळे वीज संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही परीस्थीती कायमची राहणार नसून याबाबत सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या जातील असेही ते म्हणाले. केन्द्र शासनाने शेतक-यांना गेल्यावर्षी 70 हजार कोटी रुपयाचे कर्ज माफ करुन शेतक-यांना शासनाने दिलासा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट्र केले. देवळी व पुलगाव दरम्यान एम.आय.डी.सी.साठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील लोकांना रोजगार मिळेल. कापसावर निर्यात बंदी करु नका असे केंद्र सरकाला सुचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले.
     यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री मोघे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागात आमुलाग्र बदल झाला आहे. व्यसनमुक्तीला समाजाकडून सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. घरकुलासाठी शासनाने 10 लाखाचे उद्दिष्ट ठरविले होते ते 15 लाखाचे करण्यात येईल. अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा येत्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असेही ते म्हणाले.
     पालकमंत्री मुळक म्हणाले की सर्वसामान्याचे हित जोपासण्यासाठी शासन कटिबध्द आहे.
     प्रास्ताविक करताना राज्यमंत्री कांबळे यांनी देवळीच्या विकास कार्यात शासनाने भरीव योगदान दिले असल्यामुळे देवळीचा सर्वांगीण विकास होणार आहे. सुधारीत न.पा. पाणी पुरवठा योजना ही 2042 वर्षातील लोकसंख्या गृहीत धरुन मंजूर करण्यात आली. यामध्ये स्वच्छता,सांडपाणी  व्यवस्था, घणकच-याची विल्हेवाट आदींचा समावेश आहे. देवळी-पुलगाव दरम्यान विस्तारीत एम.आय.डी.सी. मंजूर करण्याची यावेळी मंत्रीमहोदयांनी मागणी केली.
     यावेळी खासदार दत्ताजी मेघे यांचेही समयोचित भाषण झाले.
     यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार न.पा.अध्यक्ष शेख अजिज यांनी केला तसेच मुख्यमंत्र्याच्या  हस्ते विकास कामाचे भुमिपूजन करुन शिलाण्यासाचे उदघाटन करण्यात आले.
     या कार्यक्रमाचे संचलन ज्योती तोटेवार व आभार शेख अजिज यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
                                                            00000