अपंग व्यक्तींकडून
पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रीत
वर्धा दि. 19- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग मार्फत देण्यात येणारे राज्य पुरस्कारासाठी उत्कृष्ठ अपंग
कर्मचारी, उद्योजक आणि संस्था यासाठी देण्यात येणा-या पुरस्कारासाठी 21 ऑक्टोबर
पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्कारासाठी विहीत नमुनातील अर्ज परीपुर्ण
भरुन तिन प्रतिमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कडे
सादर करण्यात यावा. अर्जाच्या नमुना आणि अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण्य
अधिकारी कार्यालय तसेच www.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या संकेतस्थाळवर उपलब्ध आहे.
00000
प्र.प.क्र.724
दिनांक – 19
ऑक्टोबर, 2016
प्रलंबीत लेखा
प्रकरणाच्या आढावा घेण्यासाठी
दक्षता पथक 21 ऑक्टोबर
रोजी येणार
000000
प्र.प.क्र.725
दिनांक – 19 ऑक्टोबर, 2016
जलयुक्त शिवार
अभियान लोगो निर्मितीसाठी स्पर्धेचे आयोजन
Ø 24 ऑक्टोबर रोजी लोगोची निवड
Ø निवड झालेल्या लोगोला मिळणार 11 हजार रुपयाचे बक्षीस
सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 हा महत्वकांक्षी कार्यक्रम राज्य शासन राबवित आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांची टप्पा टप्पाने निवड करुन, कृषि विभाग, जलसंधारण, लघुसिंचन विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सवेर्क्षण विकास यंत्रणा या विभागांमार्फत मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या अभियाना अंतर्गत ज्या गावांची निवड झाली आहे त्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी योजनेचा माहितीफलक तयार करुन ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा लोगो डिझाईन करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता इच्छुक स्पर्धकांनी लोगोचे डिझाईन हार्ड व सॉफ्ट कॉफीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत एका लोगोची निवड करण्यात येवून निवड झालेल्य स्पर्धकाला किवा संस्थेला शासनामार्फत 11 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. एक व्यक्ती किंवा संस्थेकडून एकच लोगो स्वीकारण्यात येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
000000
प्र.प.क्र.726
दिनांक – 19
ऑक्टोबर, 2016
अवैध गावठी दारु
निर्मिती विक्री केंद्रावर धाडी
1 लाख 13 हजाराचा
मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई, 83 नुसार कार्यवाही करण्यात आली असून अवैध दारुची वाहतुक करणा-या गणेश नेमाडे, सुनिल ठाकरे, हरिष कुकेकार या तीन व्यक्तीना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून 1 लाख 13 हजार रुपयाच्या मुदेमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत प्रभारी निरिक्षक डि.बी. कोळी, सहाय्यक दुय्यम निरिक्षक दिलीप वलके तसेच जवान एच.एस. सुरजुसे, अमीत नागमोते वाहन चालक बंन्डु घाटुरले, राजेन्द्र महेस्कर यांनी सहभाग घेतला.
0000000