Saturday, 30 July 2016

1 ऑगस्‍ट पासुन प्रशासनातर्फे  टोल फ्री क्रमांक सरु  
   वर्धा,दि 30-शासनाच्‍या विविध योजना  सामान्‍य जनतेपर्यंत पोहोचविण्‍यासाठी तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण करण्‍यासाठी आणि नागरिकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी टोल फ्री नंबर  जिल्‍हा प्रशासनामार्फत जिल्‍हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्‍ट पासुन करण्‍यात येणार आहे.
 शासनाच्‍या विविध योजना जिल्‍हाधिकारी प्रशासनामार्फत राबविण्‍यात येतात यामध्‍ये समाजातील दुर्लभ घटक, शेतकरी, शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त कुंटूबीय, निराधार महिला, वृध्‍द  , बेरोजगार यांच्‍यासाठीच्‍या योजनांव्‍यतिरिक्‍त नैसर्गिक आपत्‍ती व निवडणूकीसंबंधी सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी या दृष्‍टीकोणातून प्रशासनातर्फे सर्वसामान्‍यांकरिता 1800 233 2383 22 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्‍या सेवेत येत्‍या महसूल दिनी म्‍हणजेच 1 ऑगस्‍ट पासुन उपलब्‍ध होणार आहेत. नागरिकांनी जिल्‍हा प्रशानामार्फत जे विविध उपक्रम राबविले जातात त्‍याबाबतच्‍या प्रतिक्रिया तसेच त्‍यांच्‍या समस्‍या या माध्‍यमातून उपलब्‍ध होतील हे मागचा हेतू आहे. तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण तत्‍परतेने व्‍हावे याकरिता जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत यासाठी दोन कर्मचा-यांना स्‍वतंत्र काम सोपविण्‍यात येणार असल्‍याचे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.
                                      0000



1 ऑगस्‍ट पासुन प्रशासनातर्फे  टोल फ्री क्रमांक सरु  
   वर्धा,दि 30-शासनाच्‍या विविध योजना  सामान्‍य जनतेपर्यंत पोहोचविण्‍यासाठी तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण करण्‍यासाठी आणि नागरिकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी टोल फ्री नंबर  जिल्‍हा प्रशासनामार्फत जिल्‍हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्‍ट पासुन करण्‍यात येणार आहे.
 शासनाच्‍या विविध योजना जिल्‍हाधिकारी प्रशासनामार्फत राबविण्‍यात येतात यामध्‍ये समाजातील दुर्लभ घटक, शेतकरी, शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त कुंटूबीय, निराधार महिला, वृध्‍द  , बेरोजगार यांच्‍यासाठीच्‍या योजनांव्‍यतिरिक्‍त नैसर्गिक आपत्‍ती व निवडणूकीसंबंधी सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी या दृष्‍टीकोणातून प्रशासनातर्फे सर्वसामान्‍यांकरिता 1800 233 2383 22 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्‍या सेवेत येत्‍या महसूल दिनी म्‍हणजेच 1 ऑगस्‍ट पासुन उपलब्‍ध होणार आहेत. नागरिकांनी जिल्‍हा प्रशानामार्फत जे विविध उपक्रम राबविले जातात त्‍याबाबतच्‍या प्रतिक्रिया तसेच त्‍यांच्‍या समस्‍या या माध्‍यमातून उपलब्‍ध होतील हे मागचा हेतू आहे. तसेच नागरिकांच्‍या समस्‍याचे निराकरण तत्‍परतेने व्‍हावे याकरिता जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत यासाठी दोन कर्मचा-यांना स्‍वतंत्र काम सोपविण्‍यात येणार असल्‍याचे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.
                                      0000



प्रधानमंत्री पिक विमा योजनेला 2 ऑगस्‍ट  पर्यंत मुदत वाढ
 वर्धा,दि 30- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2016 मध्‍ये राबविण्‍यात येत आहे. या योजने अंतर्गत खरिप हंगामाकरिता शेतक-यांना सहभागी होण्‍यासाठी 2 ऑगस्‍ट पर्यंत मुदत वाढ देण्‍यात आली आहे.

पुर्वी खरीप हंगामाकरिता शेतक-यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्‍याची अंतिम दि.31 जुलै  होती. केंद्र शासनाने ही अंतिम मुदत वाढवून 2 ऑगस्‍ट केलेली आहे. याचा इच्‍छुक शेतक-यांनी लाभ घेवून आपला सहभाग नोंदवावा असे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी कळविले आहे. 

Thursday, 28 July 2016

                    बचत गटानी गृह उद्योगातून बाहेर पडावे
                                      -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø लघु उद्योग देशातील दुस-या क्रमांकाचे रोजगार निर्मीती क्षेत्र  

            वर्धा, दि.20-महि‍ला बचत गटांनी लोणचे- पापड यासारख्‍या गृहउद्योगातून बाहेर पडून कृषी आधारित प्रक्रियाउद्योग उभारण्‍यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. तुमच्‍या पुढाकारातूनच गावात उद्योगाचे वातावरण तयार करुन तुम्‍ही गावाला नवा मार्ग दाखवू शकता. यासाठी प्रशासनाच्‍या वतीने सर्व सहकार्य देण्‍याची हमी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
            सुक्ष्‍म,लघु व मध्‍यम मंत्रालयालयाअतंर्गत येणा-या एमएसएमई – विकास संस्‍था नागपूर, जिल्‍हा उद्योग केंद्र आणि महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ उद्योजक असोशियशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हॉटेल विद्यादिप रिजन्‍सी येथे गुणवत्‍ता प्रबंधन मानके आणि प्रोद्योगिक उपकरण यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी उदघाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. नवाल बोलत होते. या कार्यक्रमाला एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार , एमआयएचे अध्‍यक्ष प्रविण हिवरे, जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यावस्‍थापक संदिप पाटील, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक प्रमोद पवार, विषयतंज्ञ सुरेद्र चोप्रा, डॉ. प्रो. विनोद गोरंटीवार, एमएसएमईचे सहायक संचालक व्‍ही.जी. निखाडे, खादी ग्रामोद्योगचे व्‍यवस्‍थापक  उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, ही कार्यशाळा जिल्‍हयातील लघुउद्योजक आणि बचत गटामार्फत चालविण्‍यात येणारे गृहउद्योग यांच्‍या  गुणवत्‍ता वाढीसाठी आवश्‍यक असणारे तांत्रिक बाबी माहिती होण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आली आहे. ज्‍यांना उद्योग सुरु करावयाचा आहे त्‍यांनी आपल्‍या सर्व शंकाचे निरसन विषयतज्ञांकडून करुन घ्‍यावे. ही कार्यशाळा आयोजित करण्‍याबद्दल त्‍यांनी एमएसएमईच्‍या संचालकाचे अभिनंदन केले.
            यावेळी बोलतांना श्री. पार्लेवार म्‍हणाले, लघु उद्योग क्षेत्र हे देशातील दुस-या क्रमांकाचे रोजगार निर्मिैती क्षेत्र आहे. जपान, चिन यासारखे देश लघु उद्योगामुळे विकसित झाले. म्‍हुणुनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग क्षेत्राला विकसित करण्‍यासाठी स्‍टार्टअप इंडिया , स्‍टॅडंअप इंडिया , कौशल्‍य भारत, मुद्रा लोन यासारख्‍या योजना सुरु केल्‍या. कोणताही उद्योग सुरु करण्‍यासाठी सुक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योग विकास संस्‍था मदत करु शकते. नागपूर मध्‍ये समुहविकास योजनेअंतर्गत रेडीमेट गारमेंन्‍ट  आणि दालमिल असे दोन समुह तयार केले आहेत. आपल्‍या जिल्‍हयातही अशा प्रकारचे समुह किंवा इतर योजनाच्‍या माध्‍यमातून उद्योग उभारण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न करण्‍यात येतील अशी हमी त्‍यांनी दिली.
            यावेळी प्रविण हिवरे यांनी उपस्थितांना बॅकेंचे कर्ज वेळेत परतफेड तरच यशस्‍वी उद्योजक होता येते. तसेच बॅकेचे कर्ज घेतांना अटी व शर्ती वाचूनच सही करावी आणि नवा उद्योग सुरु करतांना सर्वेक्षण करुनच सुरु करावा अशा सुचना केल्‍यात.
अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक विजय जांगडा यांनी जिल्‍हयात आतापर्यंत 2 हजार 569 लोकांना मुद्रा लोन वाटप केलेअसून मुद्रा लोन स्‍टार्टअप इंडिया, स्‍टॅंडअप इंडिया यासारख्‍या कर्ज योजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाला लघुउद्योजक, आत्‍माचे प्रकल्‍प उपसंचालक दिपक पटेल, शेतकरी उत्‍पादक कंपनीचे संचालक , बचत गटाच्‍या महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्‍या. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्‍ही. जे. निखाडे          यांनी केले.
                                                                              00000

                                      शासकिय वसतिगृहातील ऑन लाईन
                                             प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक
          वर्धा, दि.20- मागासवर्गीय मुला- मुलींच्‍या सर्व शासकिय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सन 2016-17 करीता समाजकल्‍याण आयुक्‍तालयाने ऑन लाईन प्रवेश अर्जासाठी सुधारित वेळपत्रक जाहिर केले आहे. शासकिय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्‍यांनी http://mahaeschol.gov.in या संकेतस्‍थळावरील वसतिगृह या लिंक वर ऑनलाईन अर्ज भरावे. असे आवाहन सहायक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
          सदर चे ऑनलाईन अर्ज वसतिगृहानिहाय संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्‍या कडे online पाठवावे व ऑनलाईन अर्ज भरल्‍याची एक प्रिंटआऊट संबंधित वसतिगृहामध्‍ये देण्‍यात यावी .
            शालेय विद्यार्थ्‍यांनी व 10 वी नंतर चे अभ्‍यासक्रममाध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी ( व्‍यवसायीक अभ्‍यासक्रम वगळून)  31 जुलै पर्यंत. 12 वी नंतर पदविका ,पदवी, पदव्‍युत्‍तर पदवी (वयावसायिक अभ्‍यासक्रम वगळून) इत्‍यादी अभ्‍यासक्रमासाठी 20 जुलै ते 8 ऑगस्‍ट दरम्‍यान अर्ज भरावे. तसेच व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी 3 ते 15 ऑगस्‍ट या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा असे श्री. देशमुख यांनी कळविले आहे.                                                            
                                                                        00000
           


     पोषण आहार योग्‍य  प्रकारे मिळाल्‍यास
मानवाचा विकास शक्‍य
-         अशोक पावडे  
वर्धा,दि 22 – सकस पोषण आहार अभावी  मानवाचा विकास शक्‍य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्‍यक आहे. गावपातळीवर प्रत्‍येक घरी शासकिय कार्यालय परीसरात  परसबागे मधे   शास्‍त्रशुध्‍द सेंद्रीय पध्‍दतीने भाजीपाला व फळझाडाची  लागवड करणे गरजे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्‍य व पोषण मिशन उपसंचालक अशोक पावडे यांनी केले.

            आज जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात  राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्‍य व पोषण मिशन अंतर्गत पोषण  आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण  कार्याशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्‍या उद्घाटन प्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्‍यवस्‍थापक उल्‍हास खळेगावकर, महिला बाल कल्‍याण चे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, रिलायन्‍स फॉउन्‍डेशन च्‍या आश्विनी पाटील उपस्थित होत्‍या. 
            पुढे बोलतांना पावडे म्‍हणाले, गावपातळीवर असलेल्‍या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, प्राथामिक शाळा , ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीचा अवलंब करुन सेद्रीय खताचा वापर करुन भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्‍या बाजारात येणा-या रासायनिक पध्‍दतीच्‍या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्‍यात आलेल्‍या पोषणामुळे गर्भवती महिला, बालके यांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यास मदत होर्इल. पोषण आहार चळवळीसाठी राज्‍यातील 6 जिल्‍हयाचा समावेश असून वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या पूढाकराने येथे सुध्‍दा प्रायोगिक तत्‍वावर पोषण चळवळ सुरु करण्‍यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्‍याचे आवाहनही यावेळी त्‍यांनी केलेत.
            यावेळी श्री.खळेगावकर यांनी  सुध्‍दा पोषण आहार चळवळी विषयी मार्गदर्शन केले. तर रिलायन्‍स फाऊन्‍डेशनच्‍या आश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेद्रिय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले.
            कार्यशाळेला जिल्‍हा परिषदचे सर्व विभागाचे विस्‍तार अधिकारी , एकात्मिक बाल विकास अधिकारी , अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका  उपस्थित होत्‍या.
                                         0000

     आर्वी नगरपरिषद निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत 26 जुलै ला
वर्धा,दि 22 –जिल्‍हयातील आर्वी नगरपरिषदेच्‍या सन 2016-17 मध्‍ये होणा-या सार्वत्रिक निवडनुकीसाठी प्रभागाचे फेर आरक्षण 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता निश्चित करण्‍यात येणार आहे.
            आरक्षण सोडतीमध्‍ये अनुसुचित जाती , अुनसुचित जमाती मधील स्त्रियासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा, नागरिकांच्‍या मागासवर्गीसाठी (स्‍त्री आरक्षणासह) राखीव ठेवावयाच्‍या जागा व उर्वरित स्त्रियासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा यांचे आरक्षण निश्चित करण्‍यांत येईल.
            आर्वी येथील नगरपरिषद गांधी विद्यालय (ड्राईंग हॉल) येथे 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आरक्षण सोडत होणार असून यासाठी प्राधिकृत अधिकारी म्‍हणुन हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्‍ती जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली  असल्‍याचे जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्‍यात आले आहे.
                                                            00000
      
                        अपंगाना निःशुल्‍क साहित्‍य वितरणासाठी
                        मोजमाप शिबिराचे आयोजन
  वर्धा, दि.22- देवळी येथील पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेट यांच्‍या सामाजिक दायीत्‍व निधीतून कानपूर येथील  अलिम्‍कोभारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम तसेच जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने अपंग व्‍यक्‍तींना कृत्रिम अवयव व साहित्‍य वाटप करण्‍याकरिता तालुकास्‍तरावर शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे.
            वर्धा, देवळी व सेलू तालुक्‍यासाठी सामाजिक न्‍याय भवन वर्धा येथे दि.26 जुलै रोजी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यासाठी ग्रामिण रुग्‍णालय ,हिंगणघाट येथे दि. 28 जुलै, व आष्‍टी ,आर्वी व कारंजा तालुक्‍यासाठी ग्रामिण रुग्‍णालय आष्‍टी येथे दि.30 जुलै रोजी सदर शिबिर 10 ते 5 दरम्‍यान आयोजित होणार आहे. या शिबिरामध्‍ये अस्थिव्‍यंगांना व्‍हील चेअर, ट्रायसिकल,कॅलीपर, रोलेटर, क्रचेस, वॉकींग स्‍टीक,एडीएल कीट अंध व्‍यक्‍तींना अंधकाठी, ब्रेल स्‍लेट, ब्रेलकिंट, स्‍मार्ट काठी व वॉकींग स्‍टीक , कर्णबधिरांना श्रवणयंत्र  व मतीमंद  व बहुविकलांग व्‍यक्‍तींना सीपीचेअर, एम आर.किट अपंग व्‍यक्‍तींना  निःशुल्‍क पुरविण्‍यात येणार आहे.
शिबिरात येतांना अंपग व्‍यक्‍तींजवळ वैद्यकीय मंडळाचे अपंग प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्राचा दाखला, अपंग लाभार्थ्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न 1 लाख 80 हजार च्‍या आत असल्‍याबाबतचे तलाठी ,तहसिलदार यांचा उत्‍पन्‍नाचा दाखला, अपंग जर पालकांवर अवलंबून असल्‍यास त्‍यांचे उत्‍पन्‍न 2 लाख 40 हजार च्‍या आत असल्‍याचा दाखला, आधार कार्ड किंवा निवडणुक ओळखपत्रे असणे आवश्‍यक.  हा लाभ घेण्‍यसाठी वयाची अट  नसून मागील तीन वर्षात कोणत्‍याही योजनेचा लाभ घेतला नसावा, अंपग दर्शविणारे रंगित पासपोर्ट साईज दोन फोटो व नुकताच काढलेला ऑडिओग्राम (फक्‍त कर्णबधिरासाठी) असणे आवश्‍यक आहे.
अधिक माहितीसाठी  0761 -2334717 , संजय मंडल 8828252181,संकेत राऊत 8093940270, पावर ग्रिड दुरध्‍वनी क्र. 011-26560112,26560121, सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या दुरध्‍वनी क्रंमाक 07152-230772 , जिल्‍हा समाज कल्‍याण विभागाच्‍या या 07152-242783 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी , जिल्‍हा परिषद यांनी केले आहे.
                                                0000

     अरविंद टेंभुर्णे जिल्‍हा नियोजन अधिकारी म्‍हणुन रुजू
वर्धा,दि 22 – जिल्‍हा नियोजन कार्यालय येथे जिल्‍हा नियोजन अधिकारी म्‍हणुन अरविंद रामभाऊ टेंभुर्णे नुकतेच  रुजू झालेले आहेत. त्‍यांनी यापुर्वी चंद्रपूर येथील ग्रामिण विकास यत्रंणा येथे सहायक प्रकल्‍प अधिकारी , गडचिरोली येथे सहायक जिल्‍हा नियोजन अधिकारी व नागपूर येथील ग्रामिण विकास यंत्रणा येथे सहायक प्रकल्‍प अधिकारी म्‍हणुन काम केलें आहे. 
                                                000

     उपोषणकर्त्‍या गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाला
    महासमादेशकाचे चर्चेचे  आवाहन  
वर्धा,दि 22 –राज्‍य शासनानी गृहरक्षकाच्‍या सेवा समाप्‍ती आणि पुर्ननोदंणीच्‍या घेतलेल्‍या निर्णयावर मागील सात दिवसापासुन गृहरक्षकाचे उपोषण सुरु आहे. गृहरक्षकाच्‍या मागण्‍यासंदर्भात तोडगा काढण्‍यासाठी उपोषण करणा-या गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाला होमगार्ड महासमादेशक राकेश मारिया यांनी 25 जुलै रोजी मुंबई येथील त्‍यांच्‍या कार्यालयात चर्चा करण्‍यासाठी आमंत्रित केले आहे.
महासमादेशक यांनी दुपारी 3 वाजता चर्चेसाठी वेळ दिली असून न्‍यायप्रविष्‍ट बाबीच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर बाबीवर चर्चा करण्‍यास तयार असल्‍याचे कळविले आहे. याशिवाय 8 जुलै रोजी गृहरक्षकाच्‍या शिष्‍टमंडळाने महासमादेशक यांची भेट घेतली होती त्‍यावेळी शिष्‍ट मंडळाच्‍या विनंती नुसार महासमादेशक यांनी 12 वर्षाच्‍या शासननिर्णयाच्‍या अमलबजावणी व पुर्ननोंदणीच्‍या  अटीबाबतही स्‍थगिती दिली असल्‍याचे कळविले आहे.
                                                            0000



शेतक-यांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्‍यावे
                                     -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø जिल्‍हयात 80 टक्‍के पिक कर्ज वितरित
Ø 100 टक्‍के उद्दिष्‍ट साध्‍य करा
 वर्धा,दि 21- जिल्‍हयात राष्‍ट्रीयकृत बँकांनी खरीप हंगामासाठी शेतक-यांना 80 टक्‍के पेक्षा जास्‍त कर्ज वाटप केले आहे. ज्‍या शेतक-यांना कर्ज हवे आहे, त्‍या शेतक-यांनी त्‍वरीत जिल्‍हाधिकारी कार्यालय किंवा जिल्‍हा अ्ग्रणी बँक व्‍यवस्‍थापक यांचेशी संपर्क करावा तसेच 2015-16 साठी कर्जाचे पूनर्गठन करण्‍याची प्रक्रिया सुरु आहे.शेतक-यांनी त्‍वरीत कर्जाचे पूनर्गठन करुन घ्‍यावे  असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाच्‍या अधिका-यांची बैठक जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षेतेखाली पार पडली .यामध्‍ये आंध्र बँक, देना बँक, स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद, युको बँक, या बँकांनी दिलेल्‍या उद्दिष्‍टापेक्षा अतिशय कमी कर्ज वितरण केल्‍यामुळे  याबँकाना नोटीस बजावण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍यात. तसेच स्‍टेट बँक आफ इंडिया, अलाहाबाद बॅक , बॅक ऑफ महाराष्‍ट्र , सेट़ल बॅक , युनियन बँक, यांनी 100 टक्‍के उद्ष्टि साध्‍य केल्‍याबाबत त्‍याचे अभिंनदन केले. 31 जुलै पर्यंत उर्वरित सर्व बँकांना 100 टकके उद्ष्टि पूर्ण करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी यांनी दिलेत.
1 लाख रुपयांपेक्षा अधिक  पिक कर्ज घेण्‍यासाठी सर्च रिपोर्ट साठी बँकानी एकसमान रक्‍कम आकारावी. तसेच शेतक-यांनी एकमुस्‍त कर्जाची रक्‍कम भरल्‍यानंतरही त्‍यांना कर्ज देण्‍यास बँकानी नकार दिला. या प्रश्‍नासदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाशी चर्चा करण्‍यात येईल. असे त्‍यांनी यावेळी सांगितले.
त्‍याचबरोबर मुद्रा लोन चा आढावा यावेळी घेण्‍यात आला. महिलांना उद्योजक म्‍हुणन पुढे आणण्‍यासाठी  बँकानी मुद्रा लोन उपलब्‍ध करुन दयावे जुन्‍या उद्योगांसोबतच नव्‍या उद्योजकांना सुध्‍दा मुद्रा लोन दयावे. तसेच बचत गटांना सुध्‍दा लोन देतांना प्राथमिकता दयावी, अशा सुचना त्‍यांनी या बैठकीत दिल्‍या. यावेळी जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक विजय जांगडा, नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोड, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, तसेच सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
००००ुन्‍या  ी ात आला. बँकानी महिला



     हिंदी विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी आज दुरदर्शनवर 
  वर्धा,दि 21 – माहिती व जनसंपर्क विभागाच्‍या वतीने सहयाद्री वाहिनीवर प्रसारित होणा-या जय महाराष्‍ट्र या लोकप्रिय कार्यक्रमामध्‍ये महात्‍मा गांधी हिंदी विश्‍वविद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे विद्यापिठाच्‍या अभ्‍यासक्रमाविषयी माहिती देणार आहे. हा कार्यक्रम  22 जुलै रोजी सायंकाळी 7.25 वाजता सहयाद्री वाहिनीवरुन प्रसारित होईल.
हिंदी विद्यापिठातील अभ्‍यासक्रमविविषयी महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांना माहिती व्‍हावी आणि येथे उपलब्‍ध असलेल्‍या गुणवत्‍तापुर्ण शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्‍यांना घेता यावा यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी कार्यक्रमासाठी  पुढाकार घेतला. नुतकेच या कार्यक्रमाचे रेकार्डिंग मुंबई येथे झाले असून सुप्रसिध्‍द निवेदक प्रदिप भिडे यांनी श्री मिरगे यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी माहिती विभागाचे वरिष्‍ठ सहायक संचालक मिनल जोगळेकर, अर्चना शंभरकर, संध्‍या गरवारे ,सुनंदा भोर हिंदी विद्यापिठाचे  प्रा.राजेश लेहकपुरे, अतुल पांडे उपस्थित होते.

महाराष्‍ट्रातील सर्व विद्यार्थ्‍यांनी या कार्यकमाच्‍या माध्‍यमातून हिंदी विद्यापिठाच्‍या अभ्‍यासक्रमाविषयी माहिती करुन घेण्‍याचे आवाहन माहिती संचालक मोहन राठोड यांनी केले.
                        पोषण चळवळ राबवितांना लोकसहभाग घ्‍यावा
                                                           -अशोक पावडे
Ø जिल्‍हयात परसबागेची योजना प्रायोगिक तत्‍वावर राबविणार
            वर्धा, दि.19-आमचा गाव आमचा विकास या ध्‍येयानुसार काम करतांना गावात केवळ भौतिक सुविधाचा विकास करुन उपयोग नाही तर मनुष्‍याचा सर्वागण विकासाचे ध्‍येय ठेऊन नियोजन करावे. गावात गर्भवर्ती महिला व बालकांना चौरस व भरपूर आहार मिळण्‍यासाठी अक्षयपात्र आणि डोहाळजेवनाचा सार्वजनिक उपक्रम राबवावा. तसेच  पोषण चळवळ राबवितांना लोकसहभागावर भर दयावा असे प्रतिपादन  राजमाता जिजाऊ माता बाल  आरोग्‍य व  पोषण मिशन चे उपसंचालक अशेाक पावडे यांनी केले.
            जिल्‍हा परिषद सभागृहामध्‍ये राजमाता जिजाऊ मिशन आणि जिल्‍हा परिषद व महिला व बाल कल्‍याण विभाग यांच्‍या वतीने आयोजित पोषण  चळवळ या विषयावरील जिल्‍हा स्‍तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, राजमाता जिजाऊ मिशनचे एम.आय.एस. व्‍यवस्‍थापक उल्‍हास खळेगावकर, माहिती ,शिक्षण व संवाद तंज्ञ प्रफुल रंगारी, महिला व बाल कल्‍याण सभापती चंदाताई मानमोडे, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर, उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे,  जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, सर्व पंयायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना श्री. पावडे म्‍हणाले प्रत्‍येक गावामध्‍ये सेंद्रिय भाजीपाला व फळे मिळण्‍यासाठी वर्धा जिल्‍हयामध्‍ये परसबागेची योजना प्रायोगिक स्‍वरुपात राबविण्‍यात येईल. गावातील गर्भवती महिला व बालकाची जबाबदारी ही गावाची जबाबदारी आहे आणि त्‍यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्‍यात यावे. यामध्‍ये प्रत्‍येक महिना एका घटकावर केंद्रीत करावा. 20 जुलै ला प्रत्‍येक अंगणवाडी मध्‍ये गर्भवती महिलासांठी डोहाळ जेवण, 29 जुलै ला अतिरिक्‍त जेवण, ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या सप्‍ताहात स्‍तनपान सप्‍ताह, सप्‍टेंबर मध्‍ये आहाराचे नियोजनावर भर दयावा. या सर्व उपक्रमामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा असून तो मिळविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या. राजमाता जिजाऊ माता –बाल आरोग्‍य कुपोषण मिशन अंतर्गत जिल्‍हयात होत असलेली ही कार्यशाळा येथील पुढील येणा-या  पिढीचा कायापालट करेल. याचा महत्‍वाचा दुवा बाल विकास अधिकारी असणार आहे. एक संपूर्ण पिढी शारीरीक व बौध्दिक दृष्‍टया विकसित करण्‍याचे श्रेय बाल विकास अधिका-यांना मिळेल. त्‍यामुळे एक ध्‍येय ठेवुन पोषण चळवळ राब‍वावी असे आवाहन त्‍यांनी सर्व अधिका-यांना केले.
खळेगावकर यांनी मुलांच्‍या वयानुसार त्‍यांची उंची आणि वजन वाढते की नाही, यासाठी प्रत्‍येक अंगणवाडी ,शाळा आणि प्रत्‍येक मुलाच्‍या घरी वय, उंची आणि वजनाचा तक्‍ता दयावा. पालकांना वय, उंची आणि वजन यांच्‍या समिकरणाचा बौध्दिक आणि शारिरीक वाढीवर कसा परिणाम होतो हे प्रात्‍याक्षिकाव्‍दारे समजावून सांगावे. मुलांच्‍या पोषणामध्‍ये आई- वडील आणि गावकरी यांचा प्रत्‍यक्ष सहभाग आवश्‍यक आहे. असेही त्‍यांनी सांगितले. तसेच यावेळी  पोषण मुल्‍य आणि आहार याविषयी थोडक्‍यात माहिती देऊन रिलायन्‍स फाऊडेंशन तर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या परसबागेच्‍या उपक्रमाची चित्रफीत दाखविली.
यावेळी प्रफुल रंगारी यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमध्‍ये बोला तरी .... महिलांचे आरोग्‍य व पोषण प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.
                                                                         0000
           
             




जिवनावश्‍यक वस्‍तूच्‍या साठेबाजीवर  आळा घालण्‍यासाठी पथकाची निर्मिती
          वर्धा, दि.18-  सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍ह्यातील सर्व रास्‍त भाव  दुकानदार, केरोसीन परवानाधारक, पेट्रोलीयम पदार्थ विक्री परवानाधारक, होलसेल धान्‍य, साखर  व तेलबिया, दाळीचे परवानाधारक इत्‍यादी परवाने तसेच त्‍यांचे कडील साठयाची तपासणी करण्‍याचे दृष्‍टीने व साठेबाजीस  आळा घालण्‍याचे दृष्‍टीने जिल्‍ह्यामध्‍ये   जिल्‍हाधिकारी यांचे निर्देशानुसार पथक निर्माण करण्‍यात आलेले आहे.
         जिल्‍ह्यातील सर्व व्‍यापारी वर्ग तसेच इतर नागरिकांना  आवाहन करण्‍यात येते की, सदर पथकामध्‍ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकारानुसार त्‍यांना नेमुण दिलेल्‍या कामाकरीता सहकार्य करावे असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        0000
6                                                                                                                                                          
थकबाकीदार शेतक-यांना मिळणार मोफत कापूस बियाणे

          वर्धा, दि.18- राज्‍य शासनानच्‍या वतीने  इंडियन मर्चंट्स चेंबर पुरस्‍कृत बियाणे कंपणीच्‍या सहकार्याने पीक कर्ज घेतलेल्‍या व सद्या थकबाकीदार असलेल्‍या शेतक-यांना एक विशेष बाब म्‍हणून कापूस बियाण्‍याचे मोफत वाटप करण्‍यात येणार आहे.
            जिल्‍हयातील सन 2012-13 व 2013-14 मध्‍ये पीक कर्ज घेतलेल्‍या व सद्या थकबाकीदार असलेल्‍या शेतक-यांना एक विशेष बाब म्‍हणून महाराष्‍ट्र शासन व इंडियन मर्चंट्स चेंबर पुरस्‍कृत बियाणे कंपणीच्‍या सहकार्याने कापूस बियाण्‍याचे वाटप मोफत करण्‍यात येत आहे. यासाठी शेतकरी हा सन 2012-13 व 2013-14 या वर्षात पीक कर्ज घेतलेला परंतु कर्जाची परतफेड न करु शकल्‍यामुळे थकबाकीदार असाव, तसेच खरीप हंगाम 2016 करीता पिक कर्ज मिळण्‍यास अपात्र असलेला असावा. तसेच शेतक-याने अद्याप पर्यत पेरणी केलेली नसावी. अशा शेतक-यांना 20 आर.क्षेत्र मर्यादेसाठी 2 पॉकीटाच्‍या मर्यादेत बीजी-2 कापूस व 40 आर क्षेत्र मर्यादेसाठी 2 पॉकीटाच्‍या बीजी-2 कापूस बियाण्‍याचे मोफत वाटप कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे.
            पात्र शेतक-यांच्‍या यादया संबंधित बॅकेमार्फत सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. सदरचे बियाणे तालुकास्‍तरावर सर्व तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत.
            गरुजु व पात्र शेतक-यांनी आपल्‍या गावच्‍या कृषी सहाय्यकाशी अथवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी  केले आहे.
                                                                        00000