Thursday 4 October 2012


                                निर्मल भारत यात्रेचा आज शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – निर्मल भारत अभियाना अंतर्गत  भारत स्‍वच्‍छता व दररोज साबुनने हात धुण्‍याची  सवय या संदर्भात जागृती  निर्माण करण्‍यासाठी  वाश युनायटेड आणि क्विकसैंड डिजाइन स्‍टूडिओ  यांच्‍या  सहाय्याने   निर्मल भारत यात्रा  सुरु होत असून,  उद्या  शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर पासून  सेवाग्राम येथून  या यात्रेचा शुभारंभ होत आहे.



          महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश आदी राज्‍यातून  दोन हजार किलोमीटरच्‍या प्रवासात विविध गावांमध्‍ये  शौचालय व  स्‍वच्‍छतेबाबत  याबाबत  जागृतता  निर्माण करण्‍यात  येणार आहे. या यात्रेचा समारोप  19 नोव्‍हेंबर रोजी विश्‍व शौचालय दिवशी  बिहार राज्‍यातील   बेतीया येथे होणार आहे. महाराष्‍ट्र  , राजस्‍थान, उत्‍तर प्रदेश, बिहार  या राज्‍यातील ग्रामीण भागात  शौचालय तसेच स्‍वच्‍छतेचा प्रसारासाठी  क्रीडापटू  व्‍हॉलीवुडच्‍या  नायिका तसेच प्रभावशाली व्‍यक्‍तींचाही यासाठी सहभाग राहणार आहे.  निर्मल भारत अभियानाव्‍दारे  जागरुकता निर्माण करण्‍यासोबतच  सुलभ शौचालय, शौचालयाचा उपयोग, प्रत्‍येक  घरामध्‍ये शौचालय, वैयक्तिक स्‍वच्‍छता   आदीबाबत विविध उपक्रमाव्‍दारे  माहिती देण्‍यात येणार आहे.
          निर्मल भारत  यात्रेचा शुभारंभ  केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश,  राज्‍याचे पाणी  पुरवठा व स्‍वच्‍छता  मंत्री प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे व पालकमंत्री  राजेंद्र मुळक, राज्‍यमंत्री रणजीत कांबळे आदींच्‍या प्रमुख उपस्थितीत  होत आहे.
          हा कार्यक्रम सेवाग्राम येथील हेलीपॅडवर  उभारण्‍यात आलेल्‍या  निर्मल भारत मेळाव्‍यात  होणार आहे.
                                                            0000000

घरात शौचालय, दारात पाणी ही संकल्‍पना प्रत्‍येक गावात पोहचवा - शेखर चन्‍ने


 पाणी  स्‍वच्‍छता मिशन जागृती  मोहीमेचा शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – घरात शौचालय, दारात पाणी  ही संकल्‍पना प्रत्‍येक कुटूंबापर्यंत पोहचविण्‍यासाठी  प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबवा अश्‍या सुचना  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज दिल्‍यात.
          देवळी  तालुक्‍यातील डिकडोह या गावापासून  निर्मल भारत अभियान व जिल्‍हा पाणी स्‍वच्‍छता मिशन जागृती मोहीमेचा  शुभारंभ मुख्‍य कार्यपालन अधिकारी यांच्‍या हस्‍ते  झाला.  त्‍याप्रसंगी  मार्गदर्शन करताना ते बोलत होत.
           कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ  ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, पंचायत समिती सभापती  श्री. धांडे , जिल्‍हा परिषद सदस्‍य सर्वश्री कोरके, श्री. ताडाम, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आर.एम.भुयार उपस्थित होते.
            वर्धा जिल्‍हा निर्मल भारत अभियाना अंतर्गत हागणदारी मुक्‍त  करण्‍यासाठी  जनजागृती मोहीम राबविण्‍यात येत असून, पाण्‍याची  स्‍वच्‍छता  राखण्‍यासाठी प्रतयेक गावात  शंभर टक्‍क्‍े   शौचालयाचे  बांधकाम करण्‍यासाठी  विविध योजनेमधून   सहाय्य  व मार्गदर्शन देण्‍यात येत आहे. निर्मल अभियानामध्‍ये  महिलांनी  जागृतपणे  आपला सहभाग वाढवावा असे आवाहनही त्‍यांनी  यावेळी  केले.
       अध्‍यक्ष भाषणात जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष   नाना ढगे यांनी  भारत हा कृषीप्रधान देश असल्‍यामुळे  खेड्यातच भारत वसला आहे. परंतू  मुलभूत सुविधांच्‍या अभावी अस्‍वच्‍छतेचा    अभाव  असून  ग्रामस्‍थांनी      लोकसहभागातून  आपल्‍या गावांचा विकास करावा आणि  प्रत्‍येक   घरात   शौचालय बांधावे  असे आवाहनही  त्‍यांनी यावेळी केले.
            महिलांचा  स्‍वयंस्‍फूर्त  सहभाग  असल्‍यामुळे  हागणदारी मुक्‍तीचा संकल्‍प सहज शक्‍य  असल्‍याची  ग्‍वाही यावेळी लोकप्रतीनीधी व ग्रामस्‍थांनी   दिली. गुरुदेव सेवा मंडळाच्‍या सहभागाने  प्रभातफेरी काढून  किर्तनाच्‍या   माध्‍यमातून स्‍वच्‍छतेसंबधी   प्रबोधन करण्‍यात आले.  
            प्रारंभी  राष्‍ट्रसंत  तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतीमेस पुष्‍पहार अर्पण करुन निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ झाला.
            यावेळी  उपविभागीय अभियंता  श्री. बेले , श्री. शेंडे, बढीये, गायकवाड, गजघाटे, बिडवाईकर,गटसंशोधन केन्‍द्राचे कर्मचारी सर्वश्री राहूल चावके,अतुल भांदककर, अभिषेक सावळकर, श्री. गायधने व श्री. पाटील यांनी निर्मल भारत  अभियान यशस्‍वी   करण्‍यासाठी   सहकार्य केले.
            कार्यक्रमाचे संचलन सचिन हुंगे यांनी  तर आभार ग्रामसचिव श्री.रुद्रकार  यांनी मानले.
                                                  000000 

जयराम रमेश यांचे आज आगमण निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ


      
              

             वर्धा, दिनांक  4 – केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश  यांचे शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  9 वाजता  वर्धा येथे आगमण होत असून,  सकाळी 10 वाजता निर्मल भारत  यात्रेचा  शुभारंभ करतील.
         निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील  हेलीपॅड ग्राऊंड येथे आयोजीत   समारंभात  होणार आहे. केन्‍द्रीय ग्राम विकास मंत्री  दुपारी  4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील  व  रात्रौ  8.05 वाजता विमानाने  दिल्‍लीला जातील.
                                                             00000

प्रा. लक्ष्‍मण ढोबळे


                             

      वर्धा दिनांक 4 -पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे  मंत्री प्रा. लक्ष्‍मण ढोबळे यांचे शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 9.20 वाजता नागपूर येथून  आगमण होईल.
          सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथील निर्मल भारत यात्रा कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी 5 वाजता येथून कारने  नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                000

पालकमंत्री राजेंद्र मुळक



     वर्धा, दिनांक  4 - राज्‍याचे वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री  तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांची शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून आगमण होईल. 
    सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथे आयोजीत  निर्मल भारत  यात्रेस उपस्थित राहतील व सकाळी 11 वाजता येथून वणीकडे प्रयाण करतील.
                                                000000

Wednesday 3 October 2012

जयराम रमेश यांचे उपस्थितीत निर्मल भारत यात्रेला शुक्रवार पासून शुभारंभ



          

             वर्धा, दिनांक  3 – केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश  यांचे शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  9 वाजता  वर्धा येथे आगमण होत असून,  सकाळी 10 वाजता निर्मल भारत  यात्रेचा  शुभारंभ करतील.
         निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील  हेलीपॅड ग्राऊंड येथे आयोजीत   समारंभात  होणार आहे. केन्‍द्रीय ग्राम विकास मंत्री  दुपारी  4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील  व  रात्रौ  8.05 वाजता विमानाने  दिल्‍लीला जातील.
                                                             00000


ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 5 ऑक्‍टोंबर पर्यंत जाती पडताळणी- जयश्री भोज





वर्धा दिनांक 3 – वर्धा जिल्‍ह्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या  राखीव प्रभागातील निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय ऊमेदवारांच्‍या जाती दावा पडताळणी बाबत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऊमेदवारांची  जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत स्विकारल्‍या जातील. अशी माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
           इच्‍छूक  मागासवर्गीय  ऊमेदवारांची जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक            5 ऑक्‍टोंबर  2012 पर्यंत  जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारण्‍यात येणार आहेत.
                                                              00000


प्रत्‍येक शाळांमध्‍ये शौचालय व पिण्‍याचे पाणी ; शिक्षणाधिका-यांकडून अहवाल मागविणार - प्रा.लक्ष्‍मणराव ढोबळे


              ·        भारत निर्मल योजनेचा आढावा
·        नारा योजनेचे काम तात्‍काळ पूर्ण करणार  
वर्धा दि. 3 – शाळा  व अंगणवाड्यामध्‍ये शौचालय व पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा तात्‍काळ उपलब्‍ध करुन यासंबंधीचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडून घेण्‍याच्‍या सूचना राज्‍याचे पाणी पुरवठा   व  स्‍वच्‍छता मंत्री प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे यांनी आज दिल्‍यात.
     शासकीय विश्राम गृह येथे वर्धा जिल्‍ह्यातील पाणी पुरवठा योजना, भारत निर्माण योजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई,शौचालय योजना आदी योजनांचा आढावा प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे यांनी घेतला त्‍यावेळी  अधिका-यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
 कारंजा तालुक्‍यात उन्‍हाळ्यात पाणी टंचाई असलेल्‍या गावांचा आढावा घेतांना प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे म्‍हणाले की, नारा-22 ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे.परंतु या योजनेमधून  शेवटच्‍या गावापर्यंत पाणी पोहचू शकत नाही  अशी ग्रामस्‍थांची तक्रार आहे त्‍यामुळे  या योजनेचा सुधारीत प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या  सुचना दिल्‍यात.  
यावेळी जिल्‍हा परिषदेचे  अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे, मुख्‍य कार्यकारी  अधिकारी शेखर चन्‍ने,उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले, ग्राम विकास विज्ञान केंद्र दत्‍तपुरचे समिर कुर्वे, सुनिल राऊत, माजी आमदार वसंतराव कार्लेकर, अनिल मेघे, कार्यकारी अभियंता विजय जगतारे, डी.एल. बोरकर, कनिष्‍ठ भुवैज्ञानिक महाजन उपस्थित होते.
बोरधरण  परिसरातील गावात  उन्‍हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी तेथे पाण्‍याच्‍या टाकीचे बांधकाम करण्‍यात  येईल. तसेच कोरा, मांडगांव व डोंगरगांव येथील पाणी पुरवठ्याच्‍या समस्‍ये बाबत तातडीने प्रस्‍ताव सादर  करा. अश्‍या सुचना यावेळी त्‍यांनी  दिल्‍यात.
यावेळी शिवकालीन पाणी पुरवठा, सौर ऊर्जा, सिमेंट बंधारे, दारिद्रय  रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील  लोकांना  सौचालय बांधण्‍यासाठी  मिळणारे अनुदान तसेच भारत निर्मल अभियान योजनेचा आढावा घेण्‍यात आला. महाराष्‍ट्रात  15 ऑक्‍टोंबर पासून ही योजना सुरु होत असून, योजनेचा आराखडा तयार करण्‍याची जबाबदारी समिर कर्वे यांच्‍याकडे  सोपविण्‍यात आली आहे.
वर्धा जिल्‍ह्यातील ग्रामीण पाणी टंचाई आराखडा व अंमलबजावणी बाबतची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी दिली.
  यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.    
                                            0000000                       

Tuesday 2 October 2012

अंतरराष्‍ट्रीय अहिंसा दिवस निमित्‍त पदयात्रेचे आयोजन


 वर्धा दि.2- राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती दिनी जागतिक अहिंसा दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्‍या सहकार्याने महात्‍मा गांधी पुतळा ते सेवाग्राम येथील आश्रमापर्यंत पदयात्रा काढण्‍यात आली.
          शांती एकता व कृतीशील नागरिकांची चळवळ निर्माण करणे हा मुख्‍य हेतू पदयात्रेच्‍या आयोजनाचा आहे. नेहरु युवा केंद्रातर्फे पदयात्रा काढण्‍यात आली होती.
          महात्‍मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्‍या ह्या पदयात्रेत ज्‍येष्‍ठ नागरिक,स्‍वतंत्रा संग्राम सैनिक,विविध संघटनांचे पदाधिकारी व तरुण-तरुणी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
या पदयात्रोच्‍या आयोजनात गांधी विचार परिषद,नेहरु युवा केंद्र,वर्धा होमगार्डस्, निसर्ग सेवा समिती,लॉयन्‍स क्‍लब, गायत्री परिवार,प्रजापती ब्रम्‍हकुमारी,शिक्षा मंडळ,महिलाश्रम, प्रहार समाज जागृती संस्‍था,राष्‍ट्रीय सेवा योजना गो.से.वाणिज्‍य महाविद्यालय, प्रियदर्शनी महिला विद्यालय, एन.सी.सी. कॅडेट्स मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
सेवाग्राम आश्रमात बापुकूटी परिसरात संमेलन आयोजित करुन ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्‍यात आला. ह्यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय,पवनार आश्रमाचे गौतमभाई बजाज, अरुण लेले,नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा  युवा समन्‍वयक संजय माटे,लॉयन्‍स क्‍लबचे नरेडी, होमगार्डचे मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलेखोडे,एन.एस.एस.चे जिल्‍हा समन्‍वयक रफीक शेख आदि प्रामुख्‍याने उपस्थित होते.
00000

पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री प्रा. लक्ष्‍मण ढोबळे यांचे आज आगमण


वर्धा दि.2 – राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री  प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे यांचे बुधवार दिनांक दिनांक 3 ऑक्‍टोंबर, 2012 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथे आगमण होईल व राखीव. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यन्‍त वर्धा येथील निर्मल भारत यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता वर्धा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
0000

केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांचे आज आगमण


       वर्धा दि. 2- केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांचे बुधवार दिनांक 3 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 8.45 वाजता नागपूर येथून आगमण होईल सकाळी 10 वाजता निर्मल भारत यात्रेचा सेवाग्राम हेलिपॅड येथू शुभारंभ होत असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्‍हणून ते सहभागी होतील व दुपारी 4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
00000

अंतरराष्‍ट्रीय अहिंसा दिवस निमित्‍त पदयात्रेचे आयोजन


  वर्धा दि.2- राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती दिनी जागतिक अहिंसा दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्‍या सहकार्याने महात्‍मा गांधी पुतळा ते सेवाग्राम येथील आश्रमापर्यंत पदयात्रा काढण्‍यात आली.
          शांती एकता व कृतीशील नागरिकांची चळवळ निर्माण करणे हा मुख्‍य हेतू पदयात्रेच्‍या आयोजनाचा आहे. नेहरु युवा केंद्रातर्फे पदयात्रा काढण्‍यात आली होती.
          महात्‍मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्‍या ह्या पदयात्रेत ज्‍येष्‍ठ नागरिक,स्‍वतंत्रा संग्राम सैनिक,विविध संघटनांचे पदाधिकारी व तरुण-तरुणी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
या पदयात्रोच्‍या आयोजनात गांधी विचार परिषद,नेहरु युवा केंद्र,वर्धा होमगार्डस्, निसर्ग सेवा समिती,लॉयन्‍स क्‍लब, गायत्री परिवार,प्रजापती ब्रम्‍हकुमारी,शिक्षा मंडळ,महिलाश्रम, प्रहार समाज जागृती संस्‍था,राष्‍ट्रीय सेवा योजना गो.से.वाणिज्‍य महाविद्यालय, प्रियदर्शनी महिला विद्यालय, एन.सी.सी. कॅडेट्स मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
सेवाग्राम आश्रमात बापुकूटी परिसरात संमेलन आयोजित करुन ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्‍यात आला. ह्यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय,पवनार आश्रमाचे गौतमभाई बजाज, अरुण लेले,नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा  युवा समन्‍वयक संजय माटे,लॉयन्‍स क्‍लबचे नरेडी, होमगार्डचे मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलेखोडे,एन.एस.एस.चे जिल्‍हा समन्‍वयक रफीक शेख आदि प्रामुख्‍याने उपस्थित होते.
00000
          

गांधीजींचे विचार आजही प्रेरणादायी -राजेंद्र मुळक


                 * गांधीजयंती निमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन
           वर्धा दि. 2-  महात्‍मा गांधी यांनी भारताला स्‍वातंत्र्य मिळून देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या चळवळीचे मुख्‍य केंद्र सेवाग्राम असून गांधीजींचे  विचार आजही जगाला प्रेरणा देणारे असून युवा पिढीने गांधीजींच्‍या आदर्शाचे पालन करण्‍याची आवशकता असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे अर्थ व नियोजन राज्‍यमंत्री तसेच वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज सेवाग्राम येथील बापू कुटी परिसरात सर्वधर्म सामुहिक प्रार्थना सभेत केले.
             सेवाग्राम येथील बापू कुटी व आश्रम परिसरात गांधी जयंती निमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी सर्वधर्म प्रार्थनाही आयोजित करण्‍यात आली होती. वैष्‍णव जनते....  या महात्‍मा गांधींच्‍या  भजनाने गांधी जयंतीच्‍या कार्यक्रमाचे सुरुवात झाली.  
            पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजीत कांबळे,महाराष्‍ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, आदिंनी बापू कुटीस भेट देवून महात्‍मा गांधी यांच्‍या स्‍मृतीस अभिवादन केले.तसेच त्‍यांच्‍या स्‍मृतीपुढे नतमस्‍तक झाले.
            यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे  अध्‍यक्ष मा.म. गडकरी यांनी  स्‍वागत करुन सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित प्रार्थनेमध्‍येसुध्‍दा पालकमंत्र्यासह सर्व प्रमुख पाहुने सहभागी झाले होते. वैष्‍णव जनते....  हे भजन सामुहिकपणे गायण्‍यात आले.
            गांधीजींच्‍या विचारानेच देशाचा विकास शक्‍य आहे तसेच बंधुभाव प्रेम व एकता  वृध्‍दीगत व्‍हावी यासाठी गांधीजयंती दिनी सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहनही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
            गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश सेवाग्राम येथूनच दिला आहे ग्रामीण जनतेच्‍या सर्वांगिण विकासाठी रचनात्‍मक कार्याची सुरवातही वर्धेपासून सुरु झाली यामध्‍ये खादी उत्‍पादन, ग्रामोद्योग,नईतालीम,कृष्‍टरोग्‍यांची सेवा आदि महत्‍वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.त्‍यामुळे गांधीजींच्‍या विचारांचा प्रसार येथून संपूर्ण जगभर होत असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आली.
            यावेळी विविध संघटना व संस्‍थातर्फे महात्‍मागांधी जयंती निमित्‍त प्रभातफेरी,सर्वधर्म प्रार्थना,सुतकमाई, पदयात्रा आदि कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते. नेहरु युवा केंद्रातर्फे महात्‍मा गांधी पुतळयापासून प्रभातफेरी सेवाग्राम आश्रमापर्यन्‍त काढण्‍यात आली होती.युवक बिरादरीतर्फे सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.नईतालीमच्‍या विद्यार्थ्‍यांनीही यावेळी विविध कार्यक्रम सादर करुन सर्वधर्म प्रार्थना केली.                                                 
            यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, किरण उरकांदे, शेखर शेंडे, संजय चौपाणे, राजेंद्र शर्मा, प्रविण हिवरे, इकराम हुसेन, संजय कोल्‍हे, नगरसेवक इकबाल,प्रशांत गुजर आदि यावेळी उपस्थित होते.
       गांधींच्‍या पुतळ्यास पुषहार अर्पण  

          पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे राज्‍यमंत्री रणजीत कांबळे,महाराष्‍ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे आदिंनी  सेवाग्राम रोडवरील गांधी चौकातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुण अभिवादन केले.तसेच सामुहिक प्रार्थनेतही सहभाग घेतला.
            महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे बापूकुटी परिसरात आयोजित कार्यक्रमास सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय, पवनास आश्रमचे गौतमभाई बजाज, सेवाग्राम आश्रमाचे श्रीमती कुसूमताई, बिहारच्‍या गांधीवादी लेखिका श्रीमती सुजाता बहन सिंन्‍हा, उषा बहण, नेहरुयुवा केंद्राचे समन्‍वयक संजय माटे आदि सहभागी झाले होते.
                                    हुतात्‍मास्‍मारक परिसरात वृक्षारोपण

       गांधी जयंती निमित्‍त कस्‍तुरबा गांधी स्‍मृति हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या परिसरात पालकमंत्री राजेंद्र मुळक,पाणी पुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे तसेच महाराष्‍ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले.
            निसर्ग सेवा समितीतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर हुतात्‍मा स्‍मारकाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच हा परिसर अधिक सुंदर करण्‍यासाठी तसेच हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या सौंदयीकरणासाठी प्रयत्‍नशिल असल्‍याची माहिती पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
            प्रारंभी निसर्ग सेवासमितीचे प्रमुख मुरलीधर बेलखोडे यांनी स्‍वागत केले. तसेच बाळकृष्‍ण हांडे यांनी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुहिक प्रार्थना म्‍हटली.
00000

Monday 1 October 2012

पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री प्रा. लक्ष्‍मण ढोबळे यांचा दौरा कार्यक्रम


   वर्धा, दि. 1 -  राज्‍याचे  पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री  प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे  हे  वर्धा जिल्‍ह्याचे दौ-यावर येत असून, त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
        दिनांक 3 ऑक्‍टोंबर 2012 रोजी   सकाळी  8 वाजता चंद्रपूर येथून  जाम, सेवाग्राम मार्गे  वर्धाकडे प्रयाण करतील. सकाळी  10 वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथे  आगमन व राखीव.  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धा येथील  निर्मल भारत यात्रा  कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता वर्धा  येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे  प्रयाण करतील.
                                                000000

नवीन मतदार नोंदनी कार्यक्रम सुरु 31 ऑक्‍टोंबर पर्यंत नांव नोंदवा - जयश्री भोज


      वर्धा, दिनांक 1 -  नवीन मतदार नोंदणी  व छायाचित्र ओळख पत्र काढण्‍यासाठी  जिल्‍ह्यात  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, नवीन मतदार नोंदणी साठी    31 ऑक्‍टोंबर पर्यंत   संबधित मतदार  नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात  विहीत नमुन्‍यात अर्ज सादर करण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री  भोज यांनी केले आहे.
       नवीन  मतदार नोंदणी  व छायाचित्र ओळख पत्रासाठी  उपविभागीय अधिकारी आवी, हिंगणघाट व वर्धा यांचे कार्यालयात विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून,  मतदारांनी   नाव नोंदणीसाठी व छायाचित्र ओळख पत्रासाठी नमुना 6 व नमुना 8  विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी  यांचे कार्यालयात 31 ऑक्‍टोंबर पर्यंत सादर करावयाचे आहे.
           नवीन मतदार नोंदणी करण्‍यासाठी   नमुना 6  मध्‍ये संपूर्ण माहिती भरुन व दोन रंगीत छायाचित्र जोडून  अर्ज सादर करावे. तसेच छायाचित्र ओळख पत्रासाठी नमुना 8 मध्‍ये संपूर्ण माहिती भरुन  रंगीत छायाचित्र जोडून  अर्ज सादर करावयाचे आहे. या संदर्भात  काही अडचण आल्‍यास  जिल्‍हा निवडणूक अधिकारी दूरध्‍वनी क्रमांक 07152- 249776  यांचेशी संपर्क साधावा.
       मतदार नोंदणी  व  ओळख पत्रासाठी  विधानसभा मतदार संघ निहाय  विशेष कक्ष  44-आर्वी, उपविभागीय अधिकारी  दूरध्‍वनी 07157-223028.       45- देवळी व पुलगाव विधान सभा मतदार संघ , उपविभागीय अधिकारी वर्धा  07152-242561.  हिंगणघाट  विधान सभा मतदार संघ   उपविभागीय अधिकारी  हिंगणघाट दूरध्‍वनी  07153-244080.
                                                00000000

निर्मल भारत अभियान 56 गावांचा समावेश - शेखर चन्‍ने


                              आजपासून  शुभारंभ
       वर्धा, दि. 1 -  निर्मल भारत अभियान  कार्यक्रमांमध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा  समावेश झाला असून, अभियानाचा शुभारंभ उद्या मंगळवार दिनांक  2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  8 वाजता   देवळी तालुक्‍यातील   डिगडोह ग्रामपंचायतीपासून  होत असल्‍याची  माहिती  मुख्‍य  कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिली.      
         निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  नानाभाऊ ढगे यांच्‍या हस्‍ते  होणार असून यावेळी   उपाध्‍यक्ष  संजय कामनापुरे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, उपमुख्‍य कार्यकारी  अधिकारी  आर.एम.भुयार , कार्यकारी अभियंता बी.एल. बोरकर आदी उपस्थित  राहणार आहेत.
        निर्मल भारत  अभियानामध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा समावेश असून, यामध्‍ये  आर्वी तालुक्‍यातील  6, हिंगणघाट 16, समुद्रपूर 11, वर्धा 7, कारंजा 3, देवळी 7,  सेलू 5 , आर्वी 6 व आष्‍टी  तालुक्‍यातील  1 ग्रामपंचायतीचा  समावेश आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण संतूलन, हागणदारी मुक्‍त गाव,  सौचालयाचा वापर, शुध्‍द पाणी, स्‍वचछता व पाण्‍याची साठवणूक या ठळक मुद्दयावर  जनजागृतीपर मोहीम राबविण्‍यात येणार आहे.  
       निर्मल भारत अभियान कार्यक्रम जिल्‍हा पाणी  स्‍वचछता मिशन , पाणी पुरवठा विभाग, निर्मल भारत अभियान व गट संसाधन केन्‍द्र यांच्‍यातर्फे  राबविण्‍यात येणार आहे. यावेळी जनजागृतीसाठी  प्रभातफेरी , पथनाट्य , कलापथक या माध्‍यमातून  वातावरण निर्मिती करुन गावक-यांना मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्‍याची   माहितीही   मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
                                                00000

रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात गुणवत्‍तापूर्ण,स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करणार


                           
·        पालकमंत्र्याच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा समन्‍वय समिती
·        आज सर्व गावांमध्‍ये ग्रामसभेचे आयोजन
·        मुख्‍यमंत्र्यांनी घेतला नरेगा कामाचा आढावा  
·        60 हजार 235 मजुरांना 12 कोटी 19 लाख मजुरी वाटप

          वर्धा, दिनांक, 1 – महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्‍ह्यातील गरजू शेतकरी व शेतमजूरांना त्‍यांच्‍या  मागणीनुसार   काम उपलब्‍ध करुन देण्‍यासोबतच योजनेची माहिती  व अधिकाराची जाणीव निर्माण करुन देण्‍यासाठी गांधी जयंती पासून महात्‍मा गांधी  नरेगा जागृती विशेष अभियान प्रत्‍येक गावात  प्रभावीपणे राबविण्‍यात येणार आहे.  
        या विशेष अभियानाच्‍या  अंमलबजावणीसाठी  पालकमंत्री राजेंन्‍द्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  जिल्‍हा समन्‍वयक समिती गठित करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी आज दिली.
          ग्रामीण भागात  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  गुणवत्‍तापूर्ण व स्‍थायी मालमत्‍ता  निर्माण करण्‍यासाठी   ग्रामीण जनतेचा सहभाग वाढवून  ग्रामपंचायत स्‍तरावर  मोठ्या प्रमाणात  कामे सुरु करा अशा सुचनाही  आज व्हिडीओ कॉन्‍फरसींगव्‍दारा  मुख्‍यमंत्री  पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी जिल्‍हाधिका-यांना दिल्‍यात.
         विशेष जागृती अभियाना अंतर्गत  2 ऑक्‍टोंबर ते 31 ऑक्‍टोंबर   या कालावधीत  प्रत्‍येक  ग्रामपंचायत स्‍तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यासाठी  पालकमंत्री  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत करण्‍यात आलेल्‍या  समितीमध्‍ये  खासदार , जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष, सर्व आमदार , जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष , जिल्‍हाधिकारी , मुख्‍य कार्यपालन अधिकारी,  कार्यकारी अभियंते, कृ‍षी, वन , भूजल सर्व्‍हेक्षण  आदींचा समावेश असून,  रोजगार हमी योजनेचे उपजिल्‍हाधिकारी   जगदीश  संगीतराव हे सदस्‍य सचिव म्‍हणून  राहणार आहेत.
         रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  ग्रामपंचायत स्‍तरावर स्‍थायी  मालमत्‍ता व विकासाची कामांचे नियोजन करण्‍यासाठी  2 ऑक्‍टोंबर रोजी विशेष ग्रामसभा घेऊन यामध्‍ये  जागृती  अभियानाची  संकल्‍पना  ग्रामस्‍थांसमोर  मांडण्‍यात येईल. या योजने अंतर्गत   पूर्वी  10 प्रकारची कामे घेण्‍यात येत होती. परंतू आता नव्‍याने  6 कामांचा यामध्‍ये  समावेश  करण्‍यात आला आहे.
          रोजगार हमी योजनेमधून  नवीन 6 कामांमध्‍ये  आता प्रामुख्‍याने   पशुधन विकासाची कामे  यामध्‍ये  कुक्‍कुट पालनासाठी  शेड तयार करणे, बकरी पालनासाठी  गोठ्याचे पक्‍के बांधकाम, जनावरांसाठी   गोठ्यांसह  कोल्‍डर टूफ , जनावरांच्‍या पुरक  चा-यांसाठी अझोलाचे निर्माण करणे , सार्वजनिक जागेवरील जलसाठ्यामध्‍ये  मासेमारी विषयक  मत्‍स्‍य विकासाची कामे , ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी  पुनर्भरणाची  कामे तसेच   ग्रामीण स्‍वचछते संबधी  कुटूंब निहाय संडास , शाळा व अंगणवाडीतील संडास, घन व जलस्‍वरुपातील  घाणीचे व्‍यवस्‍थापन , कंपोष्‍ट खत, वर्मी कंपोष्‍टींग , गांडूळ खत निर्मीती, अमृतपाणी        (अजिवक) आदी कामेही आता नव्‍याने घेण्‍यात येणार आहेत.
                             12 कोटी  29 लाख मजुरीचे वाटप
      महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात 60 हजार 235 मजूरांच्‍या   खात्‍यांमध्‍ये  सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांची  मजुरी जमा करण्‍यात आली आहे. मजुरांना  मजूरीचे पैसे सुलभ व सहजपणे उपलब्‍ध  व्‍हावे यासाठी  पोष्‍टामार्फत   तसेच बँकाव्‍दारे वितरीत करण्‍याची व्‍यवस्‍था सुरु करण्‍यात आली आहे.
        जिल्‍ह्यात  6 लक्ष 98 हजार 419  मनुष्‍यदिन रोजगार निर्माण झाला असून यामध्‍ये  2 लक्ष 51 हजार 899 महिलांचा समावेश आहे. जिल्‍ह्यात  ग्रामीण रोजगार हमी योजनांच्‍या कामावर सुमारे 23 हजार  315 कुटूंबांना  रोजगार उपलब्‍ध   करुन देण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिली.
        महात्‍मा गांधी नरेगा जागृती  अभियान प्रभावीपणे राबविण्‍यासाठी लोकप्रतीनीधी, पदाधिकारी व सर्व  ग्रामपंचायतींनी सहभागी  व्‍हावे , असे आवाहनही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                               000000