* गांधीजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा दि. 2- महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य
मिळून देण्यासाठी सुरु केलेल्या चळवळीचे मुख्य केंद्र सेवाग्राम असून गांधीजींचे विचार आजही जगाला प्रेरणा देणारे असून युवा
पिढीने गांधीजींच्या आदर्शाचे पालन करण्याची आवशकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे
अर्थ व नियोजन राज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक
यांनी आज सेवाग्राम येथील बापू कुटी परिसरात सर्वधर्म सामुहिक प्रार्थना सभेत
केले.
सेवाग्राम येथील
बापू कुटी व आश्रम परिसरात गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी सर्वधर्म प्रार्थनाही आयोजित करण्यात आली होती. वैष्णव जनते....
या महात्मा गांधींच्या भजनाने गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचे सुरुवात
झाली.
पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री
रणजीत कांबळे,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाधिकारी
जयश्री भोज, आदिंनी बापू कुटीस भेट देवून महात्मा गांधी यांच्या स्मृतीस
अभिवादन केले.तसेच त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक झाले.
यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म. गडकरी यांनी स्वागत करुन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे
राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित
प्रार्थनेमध्येसुध्दा पालकमंत्र्यासह सर्व प्रमुख पाहुने सहभागी झाले होते. वैष्णव
जनते.... हे भजन सामुहिकपणे गायण्यात
आले.
गांधीजींच्या विचारानेच देशाचा विकास शक्य आहे तसेच
बंधुभाव प्रेम व एकता वृध्दीगत व्हावी
यासाठी गांधीजयंती दिनी सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहनही पालकमंत्री राजेंद्र
मुळक यांनी केले.
गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश सेवाग्राम येथूनच दिला
आहे ग्रामीण जनतेच्या सर्वांगिण विकासाठी रचनात्मक कार्याची सुरवातही वर्धेपासून
सुरु झाली यामध्ये खादी उत्पादन, ग्रामोद्योग,नईतालीम,कृष्टरोग्यांची सेवा आदि
महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.त्यामुळे गांधीजींच्या विचारांचा प्रसार
येथून संपूर्ण जगभर होत असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी विविध संघटना व संस्थातर्फे महात्मागांधी जयंती
निमित्त प्रभातफेरी,सर्वधर्म प्रार्थना,सुतकमाई, पदयात्रा आदि कार्यक्रम आयोजित
करण्यात आले होते. नेहरु युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी पुतळयापासून
प्रभातफेरी सेवाग्राम आश्रमापर्यन्त काढण्यात आली होती.युवक बिरादरीतर्फे सांस्कृतिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.नईतालीमच्या विद्यार्थ्यांनीही यावेळी
विविध कार्यक्रम सादर करुन सर्वधर्म प्रार्थना केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, नगराध्यक्ष आकाश
शेंडे, किरण उरकांदे, शेखर शेंडे, संजय चौपाणे, राजेंद्र शर्मा, प्रविण हिवरे, इकराम
हुसेन, संजय कोल्हे, नगरसेवक इकबाल,प्रशांत गुजर आदि यावेळी उपस्थित होते.
गांधींच्या पुतळ्यास पुषहार अर्पण
पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्वच्छता
विभागाचे राज्यमंत्री रणजीत कांबळे,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष माणिकराव
ठाकरे आदिंनी सेवाग्राम रोडवरील गांधी
चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले.तसेच
सामुहिक प्रार्थनेतही सहभाग घेतला.
महात्मा गांधी जयंती निमित्त सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे
बापूकुटी परिसरात आयोजित कार्यक्रमास सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष
मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय, पवनास आश्रमचे गौतमभाई बजाज,
सेवाग्राम आश्रमाचे श्रीमती कुसूमताई, बिहारच्या गांधीवादी लेखिका श्रीमती सुजाता
बहन सिंन्हा, उषा बहण, नेहरुयुवा केंद्राचे समन्वयक संजय माटे आदि सहभागी झाले
होते.
हुतात्मास्मारक
परिसरात वृक्षारोपण
गांधी
जयंती निमित्त कस्तुरबा गांधी स्मृति हुतात्मा स्मारकाच्या परिसरात पालकमंत्री
राजेंद्र मुळक,पाणी पुरवठा राज्यमंत्री रणजीत कांबळे तसेच महाराष्ट्र प्रदेश
कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्ग सेवा समितीतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर
हुतात्मा स्मारकाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच हा परिसर अधिक सुंदर करण्यासाठी
तसेच हुतात्मा स्मारकाच्या सौंदयीकरणासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती
पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
प्रारंभी निसर्ग सेवासमितीचे प्रमुख मुरलीधर बेलखोडे यांनी
स्वागत केले. तसेच बाळकृष्ण हांडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुहिक
प्रार्थना म्हटली.
00000