15 ते 30 जुलै दरम्यान राबविणार अतिसार पंधरवाडा
अतिसारामुळे
मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
वर्धा, दि 15 (जिमाका):- जिल्हयामध्ये
2014 पासुन अतिसारामुळे (डायरिया)
एकही मृत्यु झालेला नाही जिल्हयातील
मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी आरोग्य
विभागाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा 1 ते 5 वर्षाआतील बालकांच्या घरी गृहभेटी देऊन
सर्वेक्षण करणार आहे. त्याचबरोबर ओआरएस व झिंक गोळयाचे वितरणही करणार आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य विभाग व आशांना सहकार्य करावे असे आवाहन
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
15
ते 30 जुलै या कालावधित अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या
पधंरवाडयाचा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे हस्ते जिल्हा सामान्य
रुग्णालयात करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
प्रविण वेदपाठक, माता व बाल संगोपण
अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय
मेघे, रुग्ण कल्याण समितीच्या हेमलता
मेघे, डॉ. शुभदा जाजू, डॉ. मोना सुने यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अतिसार नियंत्रणाकरीता 15 ते 30 जुलै या कालावधित
अतिसार नियंत्रण पंधरवाडा साजरा
करण्यात येत आहे. या दरम्यान ग्रामीण व शहरी
भागात आरोग्य कर्मचा-यामार्फत आशा
कार्यकर्ती 1 ते 5 वर्षा आतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करुन
लाभार्थ्यांना ओआरएस व झिंग गोळयाचे वितरण करणार आहे. त्याचबरोबर
गोळयाचा वापर कसा करायचा, ओआरएसचे द्रावण बनविण्याचे प्रात्याक्षिक, कुपोषित
बालकावर उपचार, स्तनपान व बालकांचे पोषण यावर माहिती देण्यात येणार आहे.
0000