Friday, 27 January 2012

62 वा प्रजासत्‍ताकदिन उत्‍साहात साजरा पालकमंत्र्याचे हस्‍ते ध्‍वजारोहन


               
    वर्धा, दि.26- भारतीय प्रजासत्‍ताक दिनाच्‍या 62 व्‍या वर्धापणदिना निमित्‍त आज येथील जिल्‍हा क्रीडा स्‍टेडीयमच्‍या प्रागंणात वित्‍त व नियोजन तथा वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी ध्‍वजारोहन करुन मानवंदना दिली.
     या प्रसंगी खासदार दत्‍ताजी मेघे, न.पा. अध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.
     यावेळी पालकमंत्री मुळक संदेश देतांना म्‍हणाले की, इंग्रजांनी देशातील सत्‍ता सोडल्‍यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून 26 नोव्‍हेंबर 1949 रोजी भारताने स्विकृत केले व 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी झाली.
     विविध भाषा, विभिन्‍न  राज्‍यांनी नटलेला हा आपला भारत देश  विकासाच्‍या  शिखरावर आरुढ होऊन नेत्रदीपक प्रगती साधली आहे.
    भारतीय संविधान हा मौलीक ठेवा असून, देशाने सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाहीचे मुल्‍ये स्विकारलेली आहेत. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक, न्‍याय, विचार अभिव्‍यक्‍ती, विश्‍वास, श्रध्‍दा व उपासना यांचे स्‍वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्‍त करुन देण्‍याचा आणि त्‍या सर्वांमध्‍ये व्‍यक्‍तींची प्रतिष्‍ठा व राष्‍ट्राची आणि एकात्‍मता यांचे आश्‍वासन देणारी, बंधूता प्रवर्धित करण्‍याचा संकल्‍पपूर्ण निर्धार करण्‍याचे मुल्‍य भारताच्‍या संविधानामध्‍ये समाविष्‍ट  आहे.
    या संविधानाच्‍या  मुळ उद्देशावर आज अखंड देश एकसंघ उभा आहे. राज्‍याच्‍या जडणघडणीत पुरातन काळापासून अनेक समाज सुधारकांनी आपले आयुष्‍य खर्च करुन समाजाला दिशा देण्‍याचे कार्य केले. तसेच राष्‍ट्रपिता महात्‍मागांधी याच्‍या पावन स्‍मृतीने तसेच भुदान चळवळीचे प्रणेते यांचे मोलाचे योगदान व स्‍वातंत्र्य सैनिकांनी दिलेले बलिदान देश विसरु शकत नाही. या पावन दिवशी त्‍यांचे स्‍मरण करुन व अभिवादन करतो तसेच देशाच्‍या प्रगतीत अनेक मान्‍यवरांनी बहूमोल वाटा उचलल्‍या बद्दल त्‍यांचे आभार मानतो. देशाच्‍या प्रगतीत गौरवपूर्ण वाटचाल सुरु असून, त्‍यासाठी कटिबध्‍द होण्‍यासाठी आपण प्रतिज्ञा घेवूया असेही ते पूढे म्‍हणाले.
     या प्रसंगी पूरुष व महिला पोलीस दल तसेच गृहरक्षक दलाचे जवान देवळी येथील जावधिया हायस्‍‍कुल वर्धा येथील न्‍यू इग्लिश हायस्‍कूल, स्‍वावलंबी विद्यालय, मॅाडेल हायस्‍कुल, भारत ज्ञान मंदीरम चे विद्यार्थी व विद्यार्थीनी नेत्रदिपक पथसंचलन करुन मानवंदना दिली.
     यावेळी कमला नेहरु शाळा, केसरीमल कन्‍या शाळा, बि.डी.एस.कॅानव्‍हेंट शाळा वर्धा, पोलीस नियंत्रक पथक, पोलीस शिघ्र कृतीदल व सामान्‍य रुग्‍णालयाचे वतीने वाहनावर रथचित्र व देखावे प्रदर्शित करण्‍यात आले होते.
     यावेळी अनेक महाविद्यालयाने देशभक्‍तीवर गिते व रंगारंग कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांच्‍या डोळयाचे पारने फेडले. यामध्‍ये लोकविद्यालय, भारत ज्ञान मंदिरम, केसरीमल कन्‍या शाळा, सुशिल हिमंतसिंगका विद्यालय, न्‍यू इग्लिश हायस्‍कूल, रत्‍नीबाई विद्यालय व जगजीवनराम विद्यालय, आनंदराव मेघे विद्यालय व अग्रगामी विद्यालयातील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.
     यावेळी मोठयासंख्‍येने अधिकारी, कर्मचारी नागरीक विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.









Wednesday, 25 January 2012

लोकशाही प्रणाली मजबूत करण्‍यासाठी प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मतदान करावे - जिल्‍हाधिकारी


    वर्धा,दि.25- भारतीय संविधानाने लोकशाही प्रणाली स्विकारल्‍यानंतर  गरीब व श्रीमंत असा भेदाभेद न करता प्रत्‍येक व्‍यक्‍तीला एका मतदानाचा हक्‍क दिलेला आहे. परंतू गेल्‍या दशकापासून मतदारांमध्‍ये मतदानाची अनास्‍था निर्माण झाली असून   अनेक निवडणूकांमध्‍ये मतदानाची टक्‍केवारी घटताना दिसत आहे. मतदार हा सुजान नागरिक असून, लोकशाही प्रणाली मजबूत करण्‍यासाठी प्रत्‍येक व्‍यक्तिने मतदान करावे. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.

    येथील विकास भवनात राष्‍ट्रीय मतदान दिवस मोठ्या उत्‍साहाने आज साजरा करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जि.प. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बि.एम.मोहन, उपजिल्‍हाधिकारी शैलेश मेश्राम, उपजिल्‍हाधिकारी आर.बि. खजांची व तहसिलदार शुसांत बन्‍सोडे आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
     निवडणूकीत घटत असलेले मतदानाचे प्रमाण हा चिंतेचा विषय असून मतदान शतप्रतिशत व्‍हावे यासाठी शासनाने राष्‍ट्रीय मतदान दिवसा निमित्‍त अनेक उपक्रम हाती घेण्‍यात आले असल्‍याचे सांगून जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, ज्‍या  तरुणांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहेत त्‍यांना मतदानाचा हक्‍का सोबत त्‍यांना त्‍यांच्‍या कर्तव्‍याप्रती जाणीव निर्माण व्‍हावी यासाठी महाविद्यालयीन स्‍तरांवर निबंध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍या तसेच पथनाट्य सादर करण्‍यात आली. प्रत्‍येक मतदारांनी सुजाण नागरिकांचा परिचय देवून त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍याप्रती जागरुक  झाले पाहीजे. लोकशाही प्रणालीत शतः  प्रतिशत लोकांनी मतदान करुन लोकप्रतिनिधी निवडून दिल्‍यास  देशाच्‍या विकासात फार मोठे योगदान ठरु शकेल. तसेच दिशा देण्‍याचे कार्य  करता येईल. संपूर्ण जगांमध्‍ये भारत असा देश आहे की या देशामध्‍ये लोकसंख्‍या मोठी असली तरीपण येथे लोकशाहीची मुल्‍ये जतन होत आहे. मतदानाच्‍या दिवशी सुट्टी जाहीर करण्‍यात येत असते. परंतु अनेक नागरीक मतदानाबाबत विविध कारणांनी अनास्‍था दाखवून मतदान करीत नाही. त्‍या मतदारांना मतदानाविषयी महत्‍व पटवून दिले पाहिजे. मतदारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी न पडता आपले अमुल्‍य  मत मत पेटीत टाकून मतदानाचा हक्‍क निर्धास्‍तपणे बजवावा असेही आवाहन त्‍यांनी केले.
    प्रास्‍ताविक करताना उपजिल्‍हाधिकारी  शैलेश मेश्राम यांनी राष्‍ट्रीय मतदान दिवसाचे महत्‍व विषद केले तसेच  या कालावधीत घेण्‍यात आलेल्‍या उपक्रमाची माहिती सांगितली.
   यावेळी भारत निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन करणारा संदेश क्लिपच्‍या माध्‍यमातून सांगण्‍यात  आला तसेच उपस्थित मतदारांना जिल्‍हाधिकारी भोज यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी 18 वर्षावरील मतदारांना ओळखपत्राचे वितरण करण्‍यात आले. तसेच मतदार राजा जागृत हो या विषयावरील पथनाट्य सादर करण्‍यता आले.
     कार्यक्रमाचे संचलन लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन शुसांत बन्‍सोडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने अधिकारी, कर्मचारी, नव्‍याने झालेले मतदार व नागरिक उपस्थित होते.
                               0000

वर्धा जिल्हा कुपोषणमुक्त ग्राम अभियान..


      ज्या महात्म्याने वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातून जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभिनाचा शुभारंभ केला बालकदिनाचे औचित्य साधून हे अभियान दिनांक 14 नोव्हेंबर 2011 (बालकदिन) पासून प्रत्यक्ष कार्यान्विय करण्यात आले असून, ते दिनांक 7 एप्रिल 2012 (आरोग्य दिन) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यांत येणार आहे. राज्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके सुदृढ व्हावीत असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याचा कालावधीत वर्धा जिलह्यात संबंधित सर्व विभागाच्या समन्वयातून लोक सहभागाव्दारे उपक्रम राबविण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
      वर्धा जिलहा कुपोषण मुक्त करण्याची ग्राम चळवळ उभी करुन कुपोषणचा जटील प्रश्न सोडविणे काळाची गरज आहे. आजही बालकांमध्ये कुपोषण ही समस्या पूर्णपणे संपलेली नाही. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून कालबध्द व नियोजन पूर्वक अभियान स्वरुपात राबविल्यास जिल्हा कुपोषण मुक्त होवु शकतो. तेव्‍हा ह्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे व जिल्ह्याला कुपोषण मुक्‍त करण्‍यासही सहकार्य करावे.
     सन 2005-2006 या वर्षात राष्‍ट्रीय कुटुंब व आरोग्‍य सर्व्‍हेक्षणानुसार (NFHS-3) महाराष्‍ट्रात कमी वजनाच्‍या बालाकचे प्रमाण 40 टक्‍के होते. बालकाचे वजन त्‍यांच्‍या लांबी व उंचीच्‍या प्रमाणात मर्यादेपेक्षा कमी असते. अशा गंभीर तीव्र कुपोषित सॅम बालकांना साधारण बालकाच्‍या तुलनेत मृत्‍यूचा धोका 10 पटीने जास्‍त असतो. म्‍हणून अशा बालकांना विशेष आरोग्‍य व आहार सेवा प्राधान्‍यक्रमाने देऊन बाल मृत्‍यूदर कमी करता येतो.
    जिल्‍ह्यातील आरोग्‍य विभाग व एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्‍प  योजने अंतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती स्‍त्रीया, स्‍तनदामाता आणि किशोरवयीन मुलीच्‍या आरोग्‍य व पोषणाचे काळजी घेतली जाते. कुपोषण म्‍हणजे केवळ सकस अन्‍न न मिळाल्‍याने होणारी मुलांची आबाळ नव्‍हे तर सकस अन्‍नाची अनुपलब्‍धता हे अनेकातले एक कारण आहे. सर्व अन्‍न घटक योग्‍य प्रमाणात, योग्‍य प्रकारे आणि योग्‍य वेळी न मिळणे म्‍हणजे कुपोषण आहे.कुपोषणाची कारणे – कुपोषण होण्‍याचे मुख्‍यतः चार कारणे आहेत. कमी वजनाची मुले जन्‍माला येणे, बाळ आहार व संगोपनाच्‍या देण्‍याच्‍या चुकीच्‍या पध्‍दती, अतिसार आणि पाण्‍याने होणारे अन्‍य आजार व न्‍युमोनिया.त्‍याशिवाय कुपोषणास अन्‍यही दर्शविलेल्‍या  सहा बाबी कारणीभूत आहे. लोहाची कमतरता, आयेाडिनची कमतरता, जीवनसत्‍व अ ची कमतरता, सर्व लसिकरण न होणे, झिंकची कमतरता व मुलांना जंत होणे.
     कुपोषणावर उपाय योजना – किशोरवयीन मुली व लग्‍न न झालेल्‍या महिला, गरोदर महिला यांचे BMI-Body mass Index  वाढविणे म्‍हणजेचे त्‍यांचे वजन उंचीच्‍या मानाने योग्‍य ठरणे. महिलांचा BMI- 18.5 पेक्षा कमी असू नये. Hb   11 ग्रॅमपेक्षा कमी असेल (रक्‍तक्षय) त्‍यांनी दररोज 2 याप्रमाणे सतत 100 दिवस लोहयुक्‍त (रक्‍तवर्धक) गोळ्या द्याव्‍यात. गरोदर स्त्रिया व किशोरवयीन मुलींना एक जेवन अतिरीक्‍त देणे.
  तसेच अन्‍यत्र बाबीसाठी खालील दर्शविलेली दशपदी पाळणे जरुरी आहे.मातेचे चिकाचे दुध जन्‍मानंतर एक तासाने पाजावे. जन्‍मा सहा महिनेपर्यंत फक्‍त आईचे दुध पाजणे. सहा महिने झाल्‍यावर आईच्‍या दुधासह पुरक आहार सुरु करणे. पोषण आहारामध्‍ये सर्व मुख्‍य आणि सुक्ष्‍म तत्‍वे उपलब्‍ध करणे, पोषण आहाराची वारंवारीता   6 ते 8 वेळा ठेवणे. रक्‍तातील लोहाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी गोळी किंवा पिंकल देणे. मुले 9 महिने पुर्ण झाल्‍यावर जीवनसत्‍वे अ दर सहा महिण्‍यांनी देणे. आयोडिनयुक्‍त मिठाचे सेवन करणे. सर्व लसिकरण. मलमुत्राची योग्‍य विल्‍हेवाट लावणे. 24 महिने वर्यापर्यंत बाळाला उकळून थंड केलेलंच पाणी देणे. एक वर्षापासून पुढे दर सहा महिण्‍याने जंत नाशक औषण देणे. बाळाला औषध-पाणी देण्‍यापूर्वी हात साबून व पाण्‍याने स्‍वच्‍छ धुणे.
कुपोषण संपविण्‍यासाठीचा हा पहिला टप्‍पा आहे. मुलासाठी वरील दशपदी पाळलयाने ते मुल कमी वजनाचे किंवा कुपोषित होणार नाही.
बाळाचे आदर्श वजन खालील दर्शविलेल्‍या  तक्‍त्‍याप्रमाणे असावे.
वय
जन्‍मतः
0 ते 1
1 ते 2
2 ते 3
3 ते 4
4 ते 5
5 ते 6
आदर्श वजन
3 कि.ग्रॅ.
9 कि.ग्रॅ.
12कि.ग्रॅ.
15कि.ग्रॅ.
17 कि.ग्रॅ.
19 कि.ग्रॅ.
20कि.ग्रॅ.
  कुपोषण निर्मुलनासाठी जिल्‍ह्यातील आरोग्‍य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाडी मार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्‍न सुरु केलेले आहेत.आजचा बालक उद्याचा देशाचा नागरिक आहे. तेव्‍हा तो सुदृढ व निरोगी असणे जरुरी आहे.
    कुपोषणाची मोठी समस्‍या  कमी शिक्षित आणि आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या  समाजामध्‍ये अधिक आहे. तेव्‍हा या अभियानाच्‍या यशस्‍वीतेकरिता प्रशासना सोबतच समाजाने लोक सहभागीतेच्‍या दृष्‍टीने कार्य केल्‍यास किमान जिल्‍ह्यातील कुपोषणाची समस्‍या  सोडविणे सहज शक्‍य होईल. या अभियानाच्‍या माध्‍यमातून बालआर, आरोग्‍य आणि संगोपनाच्‍या  संदर्भाने मातांचे, कुटुंबाचे व समाजाचे सक्षमीकरण होईल अशी आशा करु या ..!
                                                              0000000

प्रजासत्‍ताक दिना निमित्‍ताने पालकमंत्र्याचे हस्‍ते ध्‍वजारोहन


    वर्धा, दि.25- भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिन 26 जानेवारी 2012 रोजी सकाळी 9.15 वाजता येथील जिल्‍हा क्रीडा स्‍टेडीयमवर ध्‍वजरोहनाचा शासकीय समारंभ वित्‍त व नियेाजन राज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते संपन्‍न होणार आहे.
     याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                 00000

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागोन टाकलेल्‍या धाड्यात 48 हजाराचा माल जप्‍त


      वर्धा, दि.24- येथील राज्‍य उत्‍पादन शुल्‍क  विभागाने नुकत्‍याच (दि.22ते 23 जानेवारी 2012) या कालावधीत बोरगाव सावळी व बाभुळंगाव (बाळापूर) येथे टाकलेल्‍या धाडीत 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.
     मुंबई दारुबंदी कायद्या अंतर्गत झाडगाव शिवार  येथे चालू हातभट्टी दारु निर्मिती करीत असताना धाड टाकून भाऊराव शालीक टेकाम रा. बोरगांव सावळी तसेच बाभुळगांव बाबापूर शिवारात केशव तुकारामजी निकर व सागर शामरावजी चाहांदे यांचेकडून मध्‍यप्रदेश निर्मित विदेशी दारुच्‍या 136 बॉटल जप्‍त  करुन त्‍यांचेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला तसेच शिवारात रविंद्र शांतराम वादाफळे यांच्‍या कडून 35 लिटर गावठी दारु जप्‍ती करुन गुन्‍हा नोंदविण्‍यात आला.
    या धाडीचे कार्यवाही राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे निरिक्षक के.जी. आकरे तसेच कर्मचारी डि.डि. बल्‍के, एम.डी.पाटील, एस.बी. लांबाडे, एच.एस.सुरजुसे, जी.एस.बावणे व आर.एस.म्‍हैसकर यांनी केली असे राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, वर्धा कळवितात.
                           000000