Friday 13 July 2012

आरोग्‍य केन्‍द्रात लावणार मुलांच्‍या जन्‍माचा तपशिल मुलगी वाचवा अभियानाचा शुभारंभ


            वर्धा,दि.13 – मुलींच्‍या जन्‍माचे  स्‍वागत करतानाच  मुलगा व मुलगी  एकसमान  आहेत. मुलींच्‍या  संगोपनाकडे  पालकांनी  विशेष  लक्ष  वेधन्‍यासाठी मुलगी वाचवा  अभियानाचा  शुभारंभ   जि.प.चे अध्‍यक्ष  नानाभाऊ ढगे यांच्‍या  हस्‍ते झाला.
            यावेळी  जिल्‍ह्यातील  सर्व आरोग्‍य केन्‍द्रामध्‍ये  मुले व मुलींच्‍या  महिन्‍यात झालेल्‍या  जन्‍माची  माहिती दर्शविणारा लिंग गुणोत्‍तर  तक्‍ता   लावण्‍यात येणार असून  या  अभिनव उपक्रमाचे  उद् घाटन  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांच्‍या हस्‍ते यावेळी  करण्‍यात आला.
            जागतिक लोकसंख्‍या  दिनानिमित्‍त  मुलगी वाचवा, मुलगा व मुलगी एकसमान या  घोषवाक्‍याचा प्रसार व्‍हावा  तसेच स्त्रिभृण हत्‍या हा अत्‍यंत  चिंतेचा व संवेदनशिल विषय असून  याबाबत  समाजामध्‍ये  जागृती  निर्माण करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी जनजागृती  रॅली काढली होती.
            यावेळी जि.प. अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक  डॉ. सोनाने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने, आरोग्‍य सभापती  उषाकिरण थुटे, सदस्‍य  श्री. मंगेकर आदि उपस्थित होते.
             जिल्‍ह्यातील सर्व आरोग्‍य केन्‍द्रामध्‍ये आरोग्‍य केन्‍द्राच्‍या परिसरात एकूण झालेल्‍या  बालकांचे जन्‍म त्‍यापैकी  मुलींची  व मुलांची  स्‍वतंत्र माहिती  ठळकपणे प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. समाजामध्‍ये  कमी होत असलेले मुलींचे प्रमाण  हे या बोर्डाच्‍या माध्‍यमातून  सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचावे तसेच  मुलगी वाचवा या अभियानामध्‍ये  सर्व जनतेचा सहभाग वाढावा  व मुलीच्‍या जन्‍माचे सर्वांनी स्‍वागत करावे हा संदेश जिल्‍ह्यातील प्रत्‍येक घरी पोहचावा अशी अपेक्षा या उपक्रमाची असल्‍याची  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी सांगितले.
            यावेळी  आरोग्‍य सेवेसाठी  उत्‍कृष्‍ठ कार्याबद्दल  डॉ. आनंदीबाई पुरस्‍काराने प्राथमिक आरोग्‍य केन्‍द्र साहूर, कन्‍नमवार ग्राम , कानगाव तसेच उपकेन्‍द्र पाणवाडी , तारासावंगा, सालदरा व पुलगाव ग्रामीण रुग्‍णालयास गौरविण्‍यात आले.
            यावेळी उत्‍कृष्‍ट काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचाही मानचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले. एकाच मुलीच्‍या जन्‍मानंतर कुटूंब नियोजन  शस्‍त्रक्रिया करणा-या 10 पतीपत्‍नींचा  विशेष सत्‍कार करण्‍यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन  श्री. चौधरी तर आभार प्रदर्शन डॉ. शयामसुंद निमगडे यांनी केले. डॉ. विलास आकरे, डॉ.संदीप नखाते, डॉ. नंदकिशोर कोल्‍हे आदी  यावेळी उपस्थित होते.
                                                     000000

कवच राष्‍ट्रीय कृषि पीक विमा योजनेचे


शेतक-याने  शेतात  पेरलेल्‍या पिकांना विम्‍याचे  संरक्षण मिळावे  यासाठी  राष्‍ट्रीय  कृषि पीक विमा योजनेतर्फे  जिल्‍ह्यातील खरीप ज्‍वारी , सोयाबीन, तुर व कपाशी  या पिकांचा पीक विमा योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.शेतक-यांनी  शेतात पेरलेल्‍या पिकांना विम्‍याचे  संरक्षण मिळावे यासाठी  31 जुलै पर्यंत  या योजनेमध्‍ये सहभागी होणे आवश्‍यक आहे.
          वर्धा जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय पीक विमा योजना  राबविण्‍यात येत असून  या योजनेमघ्‍ये वर्धा जिल्‍ह्याती ल  सुमारे  2 लक्ष 46 हजार 899 शेतक-यांनी    आतापर्यंत सहभाग घेतला आहे. पीक विमा योजनेसाठी  वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांना विशेष सवलतीचा विमा हप्‍ता  असून यामध्‍ये  अल्‍प व अत्‍यल्‍प शेतक-यांना  कापूस पिकासाठी  75 टक्‍के तर इतर शेतक-यांना 50 टक्‍के विशेष सुट देण्‍यात आली आहे. तसेच इतर सर्व पिकांमध्‍येही  विमा हप्‍ता  निश्चित  करण्‍यात आला आहे.
            जिल्‍ह्यातील खरीप ज्‍वारी , सोयाबीन, तुर व कपाशी पिकाकरीता राष्‍ट्रीय कृषि पीक विमा योजना सर्व तालुक्‍यासाठी  असून  आर्वी, आष्‍टी  व कारंजा या तीन तालुक्‍यातील  तर भुईमुंग पिकासाठी  ही योजना आहे. आर्वी, वर्धा, सेलू, देवळी  ऊसपूर्व हंगामी व ऊसखोडवा तसेच  चार तालुक्‍यांमध्‍ये  ऊस पिकाचा समावेश करण्‍यात आला आहे.  तालुका कृषि अधिका-यांकडे कृषि पीक योजनेमध्‍ये समावेश असलेल्‍या पिकांची माहिती  उपलब्‍ध आहे.  खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्‍यासाठी  31 जुलै  ही अंतीम  तारीख आहे.
            ऊस पिकासाठी  लावणीपासून एक महिना किंवा  31 डिसेंबर 2012  तसेच ऊस खोडवा करीता 31 मे 2013  व सुरु ऊसाकरीता  31 मार्च 2013 पर्यंत सहभागी व्‍हायचे आहे.  मागील वर्षी या योजनेमध्‍ये  17 हजार 316 हेक्‍टर क्षेत्रावर 13 हजार 98 शेतकरी  सहभागी  झाले आहेत. पीक विमा योजनेमध्‍ये  खरीप ज्‍वारीसाठी  60 टक्‍के जोखीमस्‍तर (संरक्षण)  असून  7 हजार 300 रुपये  ही संरक्षीत रक्‍कम असून शेतक-यांना केवळ 183 रुपये विम्‍याचा हप्‍ता भरावा लागणार आहेत. वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांना यामध्‍ये  50 ते 75 टक्‍के पर्यंत सवलत आहे.  सोयाबीन पिकासाठी  60 टक्‍के  जोखीम असून 11 हजार रुपये  विम्‍याचे  संरक्षण आहे. यासाठी  वर्धा जिल्‍ह्यातील अल्‍प व अत्‍यल्‍प शेतक-यांना 193 रुपये तर इतर शेतक-यांना 385 रुपये  हा सवलतीचा हप्‍ता  भरावा लागणार आहे.                                                                                                    पिकांना विम्‍याचे कवच 
पिकाचे नाव व जोखीम स्‍तर
विमा संरक्षीत रक्‍कम
शेतक-यांना पडणारा विमा हप्‍ता
वर्धा जिल्‍हयातील शेतक-यांसाठी
          सवलतीचा हप्‍ता
अल्‍प /अत्‍यल्‍प
इतर
ख.ज्‍वारी - 60 %
7300
183
92
183
तुर -60 %
14300
358
179
358
भुईमुंग-60 %
15600
546
273
546
सोयाबीन-60 %
11000
385
193
385
कापुस-80 %
20700
1149
287-75 %
575-50 %
ऊस पुर्व हंगामी -80 %
97000
6160
3080
6160
ऊस-सुरु -80 %
90500
6697
3349
6697
ऊस खोडवा -80 %
78100
6209
3105
6209

            कापूस पिकासाठी 80 टक्‍के  संरक्षण असून  20 हजार 700 रुपये विमा संरक्षीत रक्‍कम आहे. वर्धा जिल्‍ह्यासाठी अल्‍प व अत्‍यल्‍प  शेतक-यांना 75 टक्‍के म्‍हणजे  287 रुपये  विम्‍याचा हप्‍ता  असून इतर शेतक-यांना 50 टक्‍के  म्‍हणजे 575 रुपये  सवलतीचा विमा हप्‍ता  राहणार आहे.  याचप्रमाणे तूर, भुईमुंग, सोयाबीन, ऊस आदी पिकांनाही   पिक विमा योजनेचे कवच  मिळणार आहे.
            पिक विमा योजना पिक कापनी प्रयोगाच्‍या  उत्‍पन्‍नावर आधारीत असून हवामान आधारीत  पिक विमा योजनेचा या योजनेशी  संबधीत नाही. कर्जदार  व बिगर कर्जदार दोन्‍ही शेतकरी  कृषि  पिक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात.  त्‍यामुळे  शेतक-यांच्‍या संरक्षणासाठी असलेल्‍या या योजनेचा लाभ  जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांना घेणे आवश्‍यक आहे.  कृषि विभागातर्फे  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे तसेच जिल्‍हा कृषि अधिकारी, व तालुका कृषि अधिकारी यांच्‍या कार्यालयामध्‍ये राष्‍ट्रीय कृषि पिक योजने बाबतीची संपूर्ण माहिती उपलब्‍ध आहे. शेतक-यांना पिकाच्‍या संरक्षणासाठी असलेल्‍या  या राष्‍ट्रीय पिक विमा योजनेत सहभागी होऊन शेतातील पिकांना विम्‍याचे कवच  मिळवून देणारी ही योजना शेतक-यांसाठी  निश्चितच उपयुक्‍त आहे.

-          अनिल गडेकर

                                                   000000000 

Thursday 12 July 2012

कुंडी गणासाठी पोट निवडणूक 12 ऑगस्‍ट रोजी मतदान


             वर्धा,दि.12- कारंजा पंचायत समितीमधील गण क्रमांक 12 कुंडी  येथील  रिक्‍त पदासाठी 12 ऑगस्‍ट रोजी निवडणूक घेण्‍यात येणार आहे.
राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यामधील  रिक्‍त पदासाठी पोट निवडणूकीसाठी  निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, कुंडी या निर्वाचक गणाच्‍या क्षेत्रात पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
पोट निवडणूकीच्‍या  आचार संहितेच्‍या काळात आचार संहिता भंग होणार नाही  याची दक्षता घ्‍यावी अशा सुचनाही जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी  संबधित विभागांना दिल्‍या आहेत.
                                                    0000000

Wednesday 11 July 2012

लोकसंख्‍येला आळा घालण्‍यासाठी प्रयत्‍नाची गरज - जि.प.अध्‍यक्ष


              वर्धा,दि.11- लोकसंख्‍या वाढीचे दुष्‍परिणाम अन्‍न, वस्‍त्र व निवारा या माणसाच्‍या मुलभूत सोयी व सुविधांवर होतांना दिसत आहे. यासाठी समाजाने सकारात्‍मक दृष्‍टी ठेवून लोकसंख्‍येला आळा घालण्‍यासाठी  समाजातील प्रत्‍येकांनी पुढाकार घेण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन जि.प. अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे यांनी केले.
एका मुलीवर शस्‍त्रक्रिया करणा-या दाम्‍पत्‍याचासत्‍कार करताना जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे बाजूला
प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने 
            आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने आज जागतिक लोकसंख्‍या दिन व डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार वितरण सोहळा येथील विकास भवन येथे संपन्‍न झाला त्‍यावेळी ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते. यावेळी जि.प. उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने, आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे, जि.प. सदस्‍य काशिनाथ मंगेकर, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनोने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्‍हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एस.डी. निमगडे, डॉ. प्रविण धाकटे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
           जागतिक लोकसंख्‍या वाढी बरोबर देशाची व राज्‍याची लोकसंख्‍या वाढत असल्‍याचे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की या लोकसंख्‍येच्‍या वाढीमुळे अनेक विकासाची कामे पूर्ण न होता ती अपूर्ण राहतात. लोकसंख्‍येचे वाढीमुळे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असून, विकास कामाचे केलेले नियेाजन कोलमडून पडत असते. वंशाचा दिवा म्‍हणून पुत्र प्राप्‍तीसाठी कुटूंबाची संख्‍या वाढत जाते परिणामी कुटूंबाच्‍या पालन पोषनाकडे  कुटूंब प्रमुखाचे दूर्लक्ष होत असते. मुलांप्रमाणे आज मुलींना बरोबरीचा सवैधानिक अधिकार दिलेला असल्‍यामुळे मुलगा व मुलीमध्‍ये भेदाभेद  न करता कुटूंबसंख्‍या सीमीत ठेवल्‍यास लोकसंख्‍येला निश्चित आळा बसू शकेल असेही ते म्‍हणाले.
          यावेळी बोलतांना आरोग्‍य सभापती श्रीमती थुटे म्‍हणाल्‍या की, ग्रामीण क्षेत्रात आरोग्‍याच्‍या सर्व सोयी शासनाने उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत त्‍याचा उपयोग ग्रामस्‍थांनी केला पाहीजे. देशाची तथा राज्‍याची लोकसंख्‍या दर दहा वर्षानी वाढत आहे. याला आळा घालण्‍यासाठी जनजागृती सोबत प्रभावी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अलिकडील काळात शासनाने आरोग्‍य संवर्धनासाठी विविध योजना कार्यान्वित केल्‍या आहेत त्‍याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील लोकांनी घेतला पाहीजे. स्त्रिभृण हत्‍या हा सामाजिक अपराध असून, त्‍यासाठी समाजात जागृती करणे आवश्‍यक आहे. कुटूंब सिमीत ठेवणे हे प्रत्‍येक पालकाचे कर्तव्‍य आहे. आरोग्‍य यंत्रणेने उत्‍कृष्‍ठ व गौरवपूर्ण कार्य केलेले असून, आरोग्‍य विभागाने ध्‍येय समोर ठेवून असेच गौरवपूर्ण कार्य करुन राज्‍यात जिल्‍ह्याचे नाव लौकीक करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
            यावेळी प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, स्‍वातंत्र्यपूर्व काळात जागतिक व देशाची लोकसंख्‍या नियंत्रणात होती मात्र देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर देशाची लोकसंख्‍या दर दहा वर्षानी वाढत आहे. हा चिंताजनक विषय आहे. लोकसंख्‍या वाढीचे दुष्‍परीणाम सर्वांना या ना त्‍या कारणांनी सहन करावे लागत असते. अलिकडे मुलाच्‍या हव्‍यासापोटी स्त्रिभृण हत्‍येचे प्रमाण वाढत असून, मुलाच्‍या तुलनेत मुलीचे प्रमाण कमी होत आहे. स्त्रि- पुरुषाच्‍या  असमानतेमुळे भविष्‍यात समाजामध्‍ये विपरीत परिणाम होण्‍याची शक्‍यता दृष्‍टीपथास येत आहे. लिंग परिक्षण चाचणी करणा-यामध्‍ये शिक्षित व श्रीमंत लोकांचा अधिक समावेश आहे. समाजातील या शिक्षित व आर्थिक समृध्‍द लोकांनी मुलगी व मुलगा यांच्‍यामध्‍ये फरक न ठेवता प्रत्‍येकाला त्‍यांच्‍या बुध्‍दीमत्‍तेनुसार शिक्षण देण्‍यात यावे. अलिकडे राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य सेवा तसेच शासनाच्‍या  अनेक योजनामुळे प्रत्‍येकाच्‍या  आरोग्‍यामध्‍ये सुधारणा होत असून मनुष्‍याचे आर्युमान वाढविण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. असेही ते म्‍हणाले.
        जागतिक लोकसंख्‍या दिना निमित्‍ताने सुखाचा आधार छोटा परिवार हे घोष वाक्‍य देण्‍यात आले असून, लेक वाचवा अभियानाला सुध्‍दा यावेळी प्रारंभ करण्‍यात आला.
      आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार अंतर्गत प्रथम पुरस्‍काराचे मानकरी पुलगाव येथील ग्रामीण रुग्‍णालय ठरले असून, त्‍यांना  50 हजाराचे पारितोषिक, सन्‍मानपत्र व स्‍मृतीचिन्‍ह तसेच प्राथमिक आरोग्‍य  केंद्राअंतर्गत प्रथम पारितोषिक साहूर प्रा. आरोग्‍य केन्‍द्र यांना 25 हजार रुपये, व्दितीय क्रमांकाचे 15 हजार रुपयाचे पारितोषिक प्रा. आरोग्‍य केंद्र कन्‍न्‍मवार ग्राम व तृतीय क्रमांकाचे 10 हजाराचे पारितोषिक प्रा. आरोग्‍य केंद्रकानगांवला, आरोग्‍य उपकेंद्रा अंतर्गत प्रथम क्रमांकाचे 15 हजाराचे पारितोषिक पानवाडी, व्दितीय कमांकाचे 10 हजाराचे पारितोषिक तारासावंगा व तृतीय क्रमांकाचे  5 हजार रुपये पारितोषिक सालदरा यांना मिहाला असून,उपकेंद्राला पुष्‍पगुच्‍छ  व सन्‍मान पत्र देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करुन गौरव करण्‍यात  आला.
     तसेच एक मुलीवर शस्‍त्रक्रिया करणारे एकूण 10 जोडप्‍यांचा शाल, साडी व चोळी तसेच सावित्रीबाई फुले कन्‍या कल्‍याण योजने अंतर्गत 10 हजाराचे पारितोषिक मान्‍यवरांचे हस्‍ते प्रदान करण्‍यात आले.
            यावेळी  देवळी, हिंगणघाट व आष्‍टी येथील सर्जन,आरोग्‍य मित्र यपुरस्‍कारा अंतर्गत तालुका आरोग्‍य अधिकारी, कुटूंब कल्‍याण कार्यक्रमात सर्वोत्‍कृष्‍ट काम करणारे कर्मचारी , प्राथमिक आरोग्‍य केंद्र तसेच उपकेंद्रातील आरोग्‍य कर्मचारी, आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सैनिक व इतर कम्रचारी यांना प्रशसती पत्र देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला.
     कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने यांनी केले तर संचलन चौधरी व आभार प्रदर्शन डॉ. निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाला जि.प. सदस्‍य तसेच आरोग्‍य  विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                                                            0000000

Tuesday 10 July 2012

मादगी व मादिगा या समाजाचा समावेश अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळात


          वर्धा, दि. 10 – अनुसूचित जातीमधील मादगी व मादिगा या दोन पोट जातींना महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत लाभ देण्‍यात येत होता. शासन निर्णय दिनांक 22 मे 2012 नुसार या दोन जातीचा समावेश लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळामध्‍ये करण्‍यात आला आहे. या दोन जातींना दि. 22 मे 2012 पासून लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लाभ देण्‍यात येईल.
            इच्‍छूकांनी  जिल्‍हा व्‍यवस्‍थापक लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब सामाजिक न्‍याय विभाग इमारत, सेवाग्राम स्‍टेशन  रोड, वर्धा येथे संपर्क साधून वित्‍तीय प्रस्‍ताव सादर करण्‍याचे आवाहन जिल्‍हा व्‍यवस्‍थापक लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळ ,वर्धा यांनी केले आहे.
                                                     0000000

14 वर्षावरील सर्व सहभागीसाठी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम


        वर्धा,दि. 10 – शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा, हिंगणघाट येथील संस्‍थेत 14 वर्षावरील सर्व सहभागीसाठी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम अंतर्गत निरनिराळे सेक्‍टर  अंतर्गत उमेदवारांना ऑटोमोबाईल, इलेक्‍ट्रीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉरमेशन अॅन्‍ड कम्‍युनिकेशन टेक्‍नॉलॉजी यामध्‍ये प्रशिक्षण देण्‍यात येईल. हे कमीत कमी कालावधीसाठी  प्रशिक्षण असुन, लवचिक माध्‍यमातुन प्रशिक्षण तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्‍यांना 100 टक्‍के प्रशिक्षण शुल्‍कात सुट, प्रशिक्षणाअंती इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग दिल्‍ली तर्फे परिक्षा घेण्‍यात येवून व उत्‍तीर्ण झाल्‍यावर भारत सरकारचे प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येईल.
        वरील अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेण्‍यास प्रशिक्षणार्थ्‍यांनी संस्‍थेमध्‍ये प्रत्‍यक्ष संपर्क साधुन प्रवेश निश्‍चीत करुन घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍याध्‍यापक, शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र, कनिष्‍ठ महाविद्यालय, हिंगणघाट  कळवितात.
                                                            00000

तीन गुन्‍हेगारांवर तडीपाराचा आदेश


          वर्धा, दि. 10-  वर्धा तालुक्‍यातील चितोडा येथील  दोन व धोत्रा येथील एका गुन्‍हेगाराला दोन वर्षासाठी वर्धा ,यवतमाळ व अमरावती जिल्‍ह्यातून तडीपार करण्‍याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी एका आदेशान्‍वये आज दिले आहे.
         गुन्‍हेगारी  स्‍वरुपाचे तीनही व्‍यक्‍तींची नावे रणधिर चंद्रबल गौतम रा. चितोडा त.जि.वर्धा, संजय रामकृष्‍णाजी  मांदाडे रा. चितोडा त.जि.वर्धा व  विष्‍णू  काशिनाथ मलीये रा. धोत्रा (रे.) त.जि.वर्धा   असून त्‍यांना दोन वर्षासाठी  तीन जिल्‍हयामधून तडीपार करण्‍याचे आदेश बजावण्‍यात आले आहे.

                                                            00000

अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण


       वर्धा, दि.10- सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक , युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र श्री. हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळ, अनुमान व्‍यायाम नगर, अमरावती येथे आयोजित केलेले आहे. सैन्‍य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्गातील दुसरी बॅच दि. 1 ऑगस्‍ट 2012 पासुन सुरु करण्‍यता येत आहे.याकरीता विहीत नमुण्‍यात अर्ज मागविण्‍यता येत आहे.
     सदर प्रशिक्षणाचाकालावधी हा तीन महिन्‍याचा असून, सदर प्रशिक्षण हे निवासी स्‍वरुपाचे राहणार आहे. संबंधीत संस्‍थेमध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यास  स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. त्‍यासाठी कोणतही प्रवास भत्‍ता देण्‍यात येणार नाही.
     सदर प्रशिक्षणाकरीता शेक्षणिक पात्रता व शारीरिक क्षमता पुढील प्रमाणे असावी.  शैक्षणिक पात्रता सैन्‍य भरतीसाठी  10 वी पास, शारीरिक क्षमता, उंची 168 से.मी. च्‍या पुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो, वयोमर्यादा 18-23 वर्ष, पोलिस भरतीसाठी  शैक्षणिक पात्रता 12 वी पास, उंची 165 से.मी. च्‍यापुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो आणि वयोमर्यादा 18-23 वर्ष असेल.
     सदर प्रशिक्षण पूर्ण करण्‍याबाबतचे व प्रशिक्षण अर्धवट सोडल्‍यास त्‍याच्‍यावर खर्च करण्‍यात  आलेली रक्‍कम वसुल करण्‍यात  येईल अशा खर्चाचे हमीपत्रक रु. 100 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून घेण्‍यात येईल. अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता इच्‍छुक  युवक युवतींनी आपले अर्ज सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सेवाग्राम रेल्‍वे सटेशन रोड, वर्धा येथे दिनांक 27 जुलै 2012 पर्यंत सादर करावेत. असे सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण, वर्धा कळवितात.
                                                              00000