वर्धा,
दि. 10- वर्धा तालुक्यातील चितोडा
येथील दोन व धोत्रा येथील एका गुन्हेगाराला
दोन वर्षासाठी वर्धा ,यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश
उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी एका आदेशान्वये आज दिले आहे.
गुन्हेगारी स्वरुपाचे
तीनही व्यक्तींची नावे रणधिर चंद्रबल गौतम रा. चितोडा त.जि.वर्धा, संजय रामकृष्णाजी मांदाडे रा. चितोडा त.जि.वर्धा व विष्णू
काशिनाथ मलीये रा. धोत्रा (रे.) त.जि.वर्धा असून त्यांना दोन वर्षासाठी तीन जिल्हयामधून तडीपार करण्याचे आदेश बजावण्यात
आले आहे.
No comments:
Post a Comment