फॉडर कॅफेटेरियाचा प्रयोग राज्याला लागू
Ø नांदपूरच्या वैरण संग्राहणीत 27 प्रकारच्या
चा-याचे उत्पादन
Ø जिल्हा माहिती कार्यालयाची व्यापक प्रसिध्दी
मोहिम
वर्धा,दि
11 – पशुखाद्य चा-याच्या टंचाईमुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय प्रभावित होत असल्याचा
प्रश्न सोडविण्याकरिता जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत आर्वी
तालुक्यातील नांदपूर (ता.आर्वी) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचा-यांनी
केलेला यशस्वी प्रयोग शासनाने राज्यासाठी लागू केला आहे. नांदपूर येथील पशु रुग्णालयाच्या
पाऊण एकर जागेत वैरण संग्राहणी चारा बाग (फॉडर कॅफेटेरिया ) तयार करुन 27 प्रकारच्या
चा-यांचे उत्पादन घेण्याच्या या कार्यावर राज्य शासनाची मोहोर उमटली आहे.
या
प्रयोगाचे जिल्हयातील यश पाहता राज्य शासनाने शासन निर्णय काढून प्रत्येक जिल्हयात
प्रत्येकी दोन चारा बाग तयार करण्याचा तसेच पशुपालकांना वैरण उत्पादनाबाबत
प्रशिक्षण देण्याचा शासन निर्णय काढला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू
म्हणाले ,जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून गवळाऊ गायीकरिता आपल्याकडे
चराईक्षेत्र कमी आहे. परिणामी, व्यापक प्रसिध्दी मोहिम याबाबत राबविण्यात आले. पशुपालन आणि दुग्धोत्पादन व्यवसायात अपेक्षित
प्रगती साधली जात नाही. यावर पर्याय काढण्याकरिता विभागाच्या कार्यक्षेत्राबाहेर
विचार करुन तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या कार्यकाळात दोन
कर्मचा-यांना हैदराबाद येथील आयजीएफआरएस संस्थेत प्रशिक्षणाकरिता पाठविले.
नांदपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील पर्यवेक्षक भालचंद्र जाने , मेहबुब शेख
या कर्मचा-यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांना डॉ. अनिरुध्द पाठक यांची साथ मिळाली
आणि नांदपूरमध्ये चारा बाग तयार करण्यात आली. या बागेत 27 प्रकारचा चारा उपलब्ध आहे. या
बागेत विदर्भातीलच नव्हे तर बारामती ,बीड, जळगाव आदी ठिकाणच्या शेतक-यांनी भेटी
दिल्या. संकल्पना समजावून घेतली. तसेच वरिष्ठ
अधिकारी, सचिवस्तरावरील अधिका-यांनीही या कॅफेटेरियला भेट दिली आणि प्रकल्पाची
स्तुती केली.
या बहुपर्यायी चारा बागेतील 27 प्रकारच्या चा-यांमुळे
शेतक-यांना आपल्या शेतजमीनी पोत पाहून चा-याची निवड करणे सोपे झाले सध्या जिथे
बाग आहे. तिथे शेजा-यांच्या शेतातील विहिरीतून पाणी दिले जात आहे. पाणीपुरवठयाच्या
लिकेजेसचाही खुबीने वापर करुन या बागेला हिरवेकंच ठेवले जात असल्याचे यावेळी
डॉ.राजू यांनी सांगितले.
प्रमोद पवार म्हणाले, या चारा बागेतील प्रजातींमध्ये अन्नघटक
पोषण मुल्य अधिक असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ज्या शेतक-यांनी या चा-यांचे
बेणे नले, त्यांनी या चा-यामुळे जनावरांची प्रकृती सुधारल्याची माहिती दिली आहे.
वर्ध्याने पशु चा-यांची उपलब्धता करण्याकरिता काढलेला मार्ग राज्याने स्वीकारल्याचा
मनस्वी आनंद आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांचे आम्ही अभिनंदन करतो असे
गौरवोद्गार विलास कांबळे ,राणा रननवरे यांनी यावेळी काढले आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हयात राबविण्यात येणारी ही
योजना 2016-17 पासून तर 2019-20 पर्यंत जिल्हा वार्षिक योजयनेतर्गंत नावीन्यपूर्ण
योजना राबविण्याकरिता प्रत्येक जिल्हा नियोजन समितीस उपलब्ध असलेल्या पाच टक्के
निधीतून राबविण्यात यावी, असे शासन निर्णयात नमूद आहे.
अल्लीपूर ,पुलगाव आणि सिंदी
(रेल्वे) चाराबाग येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या जागेवर चारा बाग तयार केली
जाणार आहे. याकरिता शासनाकडून सहा लाख 40 हजार रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
अल्लीपूर येथील चारा बाग पावणेतीन एकरांत राहील. या बागेतून दरवर्षी जिल्हा
परिषदेला तीन लाखांचे उत्पन्न होईल. जिल्हयातील शेतक-यांना या चा-यांचे बेणे
निशुल्क, बाहेर जिल्हयातील शेतक-यांना कमी किमतीत उपलब्ध करुन दिल्या जाईल.
चा-यांच्या या 27 प्रजातीचे पहिले हे पिक 60 दिवसात येईल. त्यानंतरचे पीक 40
दिवसांत कापणीयोग्य होईल. असेही राजू यांनी सांगितले