Sunday, 10 February 2013

सेवाग्राम आश्रमाला संपूर्ण मदत -आर.आर.पाटील


                                       सेवाग्राम येथील विविध प्रकल्‍पांची पाहणी
                           महात्‍मा गांधींचे विचार जगाला मार्गदर्शक 
वर्धा दि.10- सेवाग्राम येथील महात्‍मा गांधी आश्रम परिसराच्‍या संवर्धनासाठी तसेच त्‍यांच्‍या कार्याचा व गांधी विचारांचा प्रसार करण्‍यासाठी आवश्‍यक संपूर्ण मदत देण्‍याची ग्‍वाही गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेटी प्रसंगी दिली.
          सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अॅड. मा.म. गडकरी यांनी गृहमंत्र्यांचे सुतकताईच्‍या हाराने स्‍वागत केले तसेच सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे सुरु असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी आमदार सुरेश देशमुख त्‍यांच्‍या समवेत उपस्थित होते.
          गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महात्‍मा गांधी सर्वप्रथम सेवाग्राम येथे आले त्‍यावेळी ज्‍या विहीरीजवळ पहिल्‍यांदा मुक्‍काम केला त्‍याची पाहणी केली. तसेच सेवाग्राम येथील ऐतिहासीक भाषण अस्‍पृश्‍यता संपूर्णपणे दूर व्‍हावी याविचारांचा संदेश आदर्श गावके एकादश सिधांत ग्राम स्‍वाराज्‍य आदर्श गावाची संकल्‍पना आश्रम परिसरात सुरु असलेले गोपालन बेलापासून तयार करण्‍यात येणारे उत्‍पादन आदि बाबतही संपूर्ण माहिती घेतली.
          महात्‍मा गांधी यांची दिनचर्या काय होती  याबाबत अॅड. मा.म. गडकरी,सुमनताई पांडे, यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली व आश्रम परिसरात दररोज होणा-या प्रार्थनेबाबतही चौकशी केली.तसेच  सर्वधर्म प्राथनेतही सहभागी झाले.
          यावेळी आदिनिवास,बा कुटी, आखिरी निवास,बापू कुटी, गांधीजी का दप्‍तर  या वास्‍तुंची पाहणी केली. बापूकुटी मधील मिराबेन यांनी काढलेले भिंतीवरील चित्रांचीही माहिती घेतली. सेवाग्राम आश्रमासाठी केंद्र व राज्‍य शासनाकडून आवश्‍यक मदत देण्‍यासंदर्भातही गृहमंत्र्यांनी आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या पदाधिका-यासोबत चर्चा केली. यावेळी त्‍यांनी गांधीजींच्‍या जीवनावरील विविध पुस्‍तकांचीही खरेदी केली.
         
यावेळी सुनिल राऊत,माजी आमदार राजू तिमांडे, समीर देशमुखृ, शशांक घोडमारे, दादाराव खैरकर यांच्‍या सह  सेवाग्राम येथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
0000

जेष्‍ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग आयुष्‍यभर निरामय जीवण जगले - आर.आर.पाटील


                                             बंग कुटूंबियांचे गृहमंत्र्याकडून सांत्‍वन
             वर्धा दि.10- जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा.ठाकूरदास बंग यांनी आयुष्‍यभर गांधी विचाराला वाहून घेतानांच समाजसेवेच्‍या माध्‍यमातून निरामय जीवन जगले अशा भावना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चेतना विकास संस्‍थेच्‍या परिसरातील निवास्‍थानी श्रीमती सुमन बंग यांची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले.  त्‍याप्रसंगी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.
          जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच अलोडी येथील अशोक बंग यांच्‍या निवास्‍थानी निधन झाले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सकाळी बंग कुटूंबियांचे सांत्‍वन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवास्‍थानी भेट दिली.स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या फोटोस गुलाबपुष्‍प अर्पण करुन आपली भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 महात्‍मा गांधी यांचे विचार पुढे नेण्‍यामध्‍ये स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांचे महत्‍वाचे योगदान असून संपूर्ण आयुष्‍य समाजसेवेसाठी त्‍यांनी वाहिले असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त केली.
         स्‍वातंत्र्य चळवळी मध्‍ये सक्रीय सहभाग घेतांना आचार्य विनोबा भावे यांच्‍या भुदान चळवळीसोबत सर्वोदय कार्यासाठी  आपले जीवन वाहिले होते. संपूर्ण क्रांती आंदोलन,स्‍वातंत्र्य आंदोलन यामध्‍ये त्‍यांचा सक्रीय सहभाग होता.
        स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या पत्‍नी सुमनताई बंग यांचे आशिर्वाद घेतल्‍यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मृत्‍यूपूर्वी त्‍यांच्‍या प्रकृती स्‍वास्‍थाची माहिती घेतली. तब्‍बल पंचवीसवर्षे मधुमेहासारखा आजार असूनही समाजसेवेत कधीही खंडपडू दिला नाही. महिन्‍यापूर्वी पडल्‍यामुळे पायाला फ्याक्‍चर झाले होते त्‍यामुळे त्‍यांची हालचाल बंद झाली होती. शेवटी आठ दिवस बोलने बंद होते आणि झोपेतच त्‍यांचे निधन झाले. आयुष्‍यात कुठलिही इच्‍छा किंवा अपेक्षा त्‍यांची नव्‍हती असे यावेळी अशोक बंग यांनी सांगितले.
        यावेळी डॉ. आकाश बंग श्रीमती निरंजना बंग व संपूर्ण बंग कुटूंबीय उपस्थित होते. आमदार सुरेश देशमुख, सुनिल राऊत आदिनीही स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या प्रतिमेस गुलापुष्‍प अर्पण करुण आदरांजली वाहिली.
0000

होमगार्डना आवश्‍यक सुविधा व माणधनात भरीव वाढ -आर.आर.पाटील


                                       नागरी सुरक्षा जागृती अभियानाचे उदघाटन
वर्धा दि.10- राज्‍यातील 40 हजार होमगार्ड यांना अत्‍यंत कमी मानधन मिळत असून त्‍यांना मिळणा-या सुविधा व मानधनात भरीव वाढ करण्‍यात येईल अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज केली.
          वर्धा गृहरक्षक दलातर्फे नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाचे उदघाटन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          वर्धा येथील होमगार्ड जिल्‍हा प्रशिक्षण केंद्राच्‍या  परिसरात आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. यावेळी प्रहारचे कर्णल सुनिल देशपांडे,सुनिल राऊत, स‍मीर देशमुख, जिलहा समादेशक प्रा. मोहन गुजरकर, किशोर माथनकर, रामभाऊ सातव,विजय मुळे आदि उपस्थित होते.
          नैसर्गीक आपत्‍ती,कायदा व सुव्‍यवस्‍था आदि आपत्‍ती निवारणासाठी होमगार्ड सदैव पोलीसांच्‍या मदतीसाठी तत्‍पर असल्‍याचे सांगतांना गृहमंत्री आर.आर.पाटील म्‍हणाले की, होमगार्डना दिले जाणारे मानधन अत्‍यंत अपूरे असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मानधनात व सुविधेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून लवकरच त्‍याला शासनाची मान्‍यता घेण्‍यात येईल. होमगार्डना पोलीस भरतीसाठी प्राधान्‍य असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.
          जनतेच्‍या जीवनाचे व मालमत्‍तेचे रक्षण करण्‍यासोबतच अतिरेकी हल्‍ल्‍्यासारख्‍या प्रसंगामध्‍येही सतर्कपणे पोलीसांना मदत करतांनाच वृध्‍द नागरीकांनाही सहाय्य करण्‍याचे धोरण स्विकारण्‍याचे आवाहन करतांना गृहमंत्री म्‍हणाले की, वृध्‍द व्‍यक्‍तींच्‍या असहायतेचा लाभ घेवून मुंबईसह मोठ्या शहरामध्‍ये
मालमत्‍तेच्‍या लुटीसोबत खून करण्‍याचेही प्रकरण होत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या संरक्षणासाठी व त्‍यांना विश्‍वास देण्‍यासाठी मुंबई प्रमाणे महिन्‍यातून एक दिवस अशा वृध्‍दांची भेट घेवून त्‍यांना मदतीचा उपक्रम राबवावा अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.                                        
          प्रारंभी नागरीसुरक्षा जागृती अभियाना अंतर्गत पथसंचलनाची मानवंदना स्विकारुन नैसर्गीक आपत्‍ती बॉम्‍बस्‍पोट आदि परिस्थिती हाताळतांना होमगार्डची भूमिका या विषयाच्‍या अनुषंगाने सादर केलेल्‍या प्रात्‍यक्षिकाची माहिती घेतली.तसेच समाज प्रहरी या स्‍मरणिकेचेही गृहमंत्र्यांनी विमोचन केले.
          होमगार्ड मधून उत्‍तम सेवा बजावणा-या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. तसेच निसर्ग सेवा समितीतर्फे स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ लावण्‍यात आलेल्‍या वृक्षाचे रोपनही गृहमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
          प्रारंभी जिल्‍हा समादेशक मोहन गुजरकर यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाची माहिती दिली. गृहरक्षक दलात सातशे नागरीकांना भर्ती करण्‍यात आले असून त्‍यांना प्रशिक्षणही देण्‍यात आले आहे. बालगृह रक्षक दल,गृह रक्षक मैत्रीनी आदि उपक्रम राबवून नागरी चळवळ उभारण्‍याची संकल्‍पनाही त्‍यांनी यावेळी सांगितली. यावेळी मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.
00000