Wednesday 21 September 2016


कृषि समुधी महामार्ग
शेतक-यांच्‍या मागण्‍यांवर शासन लवकरच निर्णय घेईल
-         किरण कुरंदकर
वर्धा,दि.21- नागपूर-मुंबई कृषि समृधी महामार्ग जिल्‍हातील शेतक-यांसाठी अतिशय फायदेशिर ठरणार आहे. शेतक-यांच्‍या या प्रकल्‍यापाबाबत असणा-या मागण्‍या शासनाला कळविण्‍यात आल्‍या असून त्‍यावर शासन लवकरच सकारात्‍मक निर्णय घेईल. जिल्‍ह्यातील काही शेतक-यांनी या महामार्गासाठी भूसंचयन करण्‍यास सहमती दर्शवली असून इतर शेतक-यांनीही यामध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन महाराष्‍ट्र रस्‍ते विकास मंहामडळाचे सह व्‍यवस्‍थापकीय संचालक किरण कुरंदकर  यांनी केले.
नागपूर-मुंबई कृषि समृधी महामार्गासाठी जिल्‍ह्यात येणा-या अडचणी संदर्भात अधिकारी आणि गावस्‍तरावर काम करणारे संवादक, निरिक्षक यांची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात घेण्‍यात आली. यावेळी मागदर्शक करतांना ते बोलत होते. या बैठकीला निवासी उप जिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अभियंता यु. जे. डाबे, वर्धा उपविभागीय अधिकारी जी. एच. भूगावकर, आर्वी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अभियंता श्रीमती अन्‍सारी, जिल्‍हा अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारी ए.ए.जोशी, वर्धा तहसिलदार एम. आर. चव्‍हाण, सेलू तहसिलदार रविंन्‍द्र होळी,  कम्‍युनिकेशन एजन्‍सीचे संचालक राजेश देशमुख उपस्थित होते.
शासनाच्‍या हा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प असून या प्रकल्‍पाकडे मुखमंत्र्याचे  विशेष लक्ष आहे. महाराष्‍ट्रात आतापर्यत झालेल्‍या विकास प्रकल्‍पामध्‍ये कुठेही शेतक-यांना भागीदार करुन घेतले नाही. शेतक-यांची जमीन घेवून त्‍यांना मोबदला देण्‍यात आला. पण एकमुस्‍त रक्‍कम देण्‍याचे तोटे आतापर्यंत झालेल्‍या प्रकल्‍पामधून समोर आले आहे. त्‍यामुळे यापुढे शेतक-यांच्‍या केवळ जमीनी न घेता त्‍यांना अशा प्रकारच्‍या विकास प्रकल्‍पात भागीदार करुन त्‍यांची प्रगती करण्‍याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
शेतक-यांच्‍या जमीनीच्‍या मोबदलात त्‍यांना विकसीत भूखंड देण्‍यात येणार आहे. याशिवाय शेतक-यांना वार्षिक सहाय्यक अनुदान देण्‍यात येईल. यासंदर्भात वेगवेगळ्या जिल्‍ह्यातून आलेल्‍या शेतक-यांच्‍या मागणीनुसार वार्षिक अनुदानात वाढ करणाचा विचार शासन करित आहे. लवकरच यावर निर्णय होईल. याशिवाय कोरडवाहु आणि बागायती अशी जमिनीची वर्गवारी आहे. यामध्‍ये शेतक-यांच्‍या  मागणीनुसार हंगामी सिंचन अशी वर्गवारी सुध्‍या करणाच्‍या विवार होत आहे. भूसंचयन करणा-या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना शासनाकडून मोफत कौशल्‍य विकासाचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. यात उच्‍च शिक्षणासाठी सुध्‍या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना सवलत द्यावी आणि शेतक-यांना प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून नोकरी देण्‍याची मागणी शासनाकडे करण्‍यात आली आहे. याबाबतीतही मुख्‍यमंत्री लवकरच निर्णय घेतील. असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
भूसंचयन केल्‍यास शेतक-यांना विकसित भूखंड मिळणार आहे ज्‍याची किंमत शेतीच्‍या आजच्‍या किंमतीपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. शेतक-यांना ही जमीन त्‍यांच्‍या नावे झाल्‍यावर कधीही विकता येईल. ज्‍याचा आर्थिक फायदा शेतक-यांना होईल. तसेच या भखंडावर शेतक-यांना कर्ज सुध्‍या काढता येईल. या सर्व बाबी शेतक-यांच्‍या कुंटुंबातील सर्व संदस्‍याना पारदर्शक पणे समजावून सागाव्‍यात, असे निर्देश श्री. कुरंदकर यांनी निरिक्षक आणि संवादक यांना दिलेत.
या प्रकल्‍पाबाबत अफबा पसरविण्‍या-या तसेच शेतक-यांना खोटी माहिती देणा-या व्‍यक्‍तीची  माहिती तात्‍काळ जिल्‍हाधिकारी यांना कळवावी, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

0000000


         शेतक-यांना तुती लागवडीचे बेणे उपलब्‍ध
            वर्धा दि. 21- तुती लागवडीस जिल्‍हयात वातावरणपोषक असून  तुती बेणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे शेतक-यांनी तुती बेणे जिल्‍हा रेशीम कार्यालय तसेच संबंधित तालुक्‍यातील रेशीम कर्मचा-यांकडे तुती बेण्‍याची मागणी करावी व तुतीची लागवड करावी. चालू वर्षापासुन तुती लागवड कार्यक्रम मनरेगा अंतर्गत करण्‍यात येत असून त्‍यानुसार आवश्‍यक कागदपत्र जिल्‍हा रेशीम कार्यालयाकडे जमा करावे असे रेशीम विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            0000000
प्र.प.क्र-659                                                                                 21 सप्‍टेंबर, 2016
         ग्रंथालयाच्या योजनेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन
वर्धा,दि.21- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान, कलकत्‍ता अंतर्गत  येणा-या समान व असमान अर्थसहाय्याच्‍या विविध योजनांच्‍या  व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्‍यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती सार्वजनिक ग्रंथालयांना होण्‍यासाठी 23 सप्‍टेंबर रोजी विकास भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

            कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांचे हस्‍ते ग्रंथालय उपसंचालक सु.हि.राठोड यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न होणार आहे. कार्यक्रमाला कलकत्‍त्याच्‍या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान चे सहाय्यक संचालक दिपांजन चॅटर्जी , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, प्र. सहाय्यक ग्रंथालय , संचालक वि.मु.डांगे , जिल्‍हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे , राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ नागपूरच्‍या ग्रंथालय व माहितीशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला हिरवाडे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे , विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक डॉ. गजानन कोटेवार व जिल्‍हा ग्रंथालय संघाचे अध्‍यक्ष मदन मोहता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेला सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या पदाधिका-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा ग्रंथालय अस्मिता मंडपे यांनी केले आहे. 

Tuesday 20 September 2016

जलयुक्‍त शिवार अभियान अंमलबजावणीत
               वर्धा जिल्‍हा विभागात आघाडीवर
Ø 25 हजार हेक्‍टर सिंचन क्षमता
Ø 37 हजार द.श.ल.क्ष. घनमीटर पाणीसाठा निर्मीती
वर्धा,दि.20-पावसाच्‍या पाण्‍यावरील शेतक-यांचे अवलंबित्‍व कमी करुन शेत-शिवारात विकेंद्रीत जलसाठे निर्माण व्‍हावेत या उद्देशाने राज्‍यशासनामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या अंमलबजावणीत वर्धा जिल्‍हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहा जिल्‍हयांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्‍हयात निर्माण झाली असुन यामुळे 25 हजार हेक्‍टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्‍ध झाली आहे.
            जिल्‍हयात 4 लाख 48 हजार 285 हेक्‍टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्‍यामध्‍ये केवळ 27 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली असुन उर्वरित 73 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्‍यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्‍पादकता यांचा थेट संबंध आपल्‍या जिल्‍हयात पहायला मिळतो. यावर्षी सुध्‍दा शेतक-यांना हा अनुभव आलाच. पण ज्‍या गावांमध्‍ये जलयुक्‍त शिवारची कामे झालीत तेथील शेतक-यांना मात्र तिथे साठलेल्‍या पाण्‍याने तारले. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागलीत तेव्‍हा सिमेंट बंधारा, शेततळे  नाल्‍यातील पाण्‍यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली .
            जलयुक्‍त शिवार अभियानात 2015-16 मध्‍ये 214 गावांची निवड करण्‍यात आली होती. त्‍यापैकी 115 गावांमध्‍ये 100 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर 44 गावांमध्‍ये 80 टक्‍के पेक्षा जास्‍त काम झाले आहे. या 159 गावांमधील शेतक-यांनी खंड काळात नाल्‍यामध्‍ये व सिमेंट बंधा-यामुळे साठलेल्‍या पाण्‍याचा उपयोग डिझेल पंप लावून पिके वाचविण्‍यासाठी केला.
            मागील वर्षी 214 गावांमध्‍ये 3206 कामे घेण्‍यात आली होती. यापैकी 2896  कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्‍हयात 37 हजार 459 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्‍याचा उपयोग कापुस पिकासाठी एकदा पाणी दिल्‍यास 24 हजार 972 हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्‍यास 12 हजार 486 हेक्‍टर सिंचन होवू शकते. त्‍यामुळे यावर्षी जिल्‍हयातील किमान 25 हजार हेक्‍टरवरील शेतक-यांना तरी पावसाच्‍या लहरीपणाचा फटका बसणार नाही.
            याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्‍या पाणी पातळीत दीड ते 2 मिटरने वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतक-यांना पावसाच्‍या खंड काळात तसेच रब्‍बी पिकासाठी होणार आहे. त्‍यामुळे एका धरणामुळे जे शक्‍य झाले नसते ते जलयुक्‍त शिवारमध्‍ये झालेल्‍या विकेंद्रीत जलसाठयामुळे साध्‍य झाले आहे.
>