Monday 11 June 2018










सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबध दृढ होईल
                                                      -चांग झीयुन
वर्धा, दि 11 (जिमाका) :- चीन हा देश नेहमी महात्मा गांधी यांचे तत्व मानणारा देश आहे. त्यामुळे भारत आणि चीनचे संबध चांगले मैत्रीपूर्ण राहावे  तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतक-याचा विकास व्हावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  त्यांच्या पावन भूमीत शेतक-यांना  बारमाही  सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी   सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमाने येथील शेतक-यांनी बारमाही शेती करावी,  असे प्रतिपादन या प्रकल्पाचे हस्तांतरण आणि प्रकल्पाची पाहणी करतांना  चीन सरकारचे भारतातील मुबंई येथील दुतावास कार्यालयातील  अधिकारी( कॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी  ग्रामपंचायत पिंपळगाव (भोसले) येथे केले.
चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नवाचार आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमा अतंर्गत मुबंई आधारीत चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादित च्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आला. सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरण  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुबंई येथील दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सलर)  वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, श्री. वांग ली, श्रीमती अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जिवन राऊत, उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. चाँग म्हणाले, चीन हा देश नेहमी भारतसोबत मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्ररत असून आजचा दिवस योगायोगाने चांगला आहे. कारण भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी चीन दो-यावर भारताचे संबध चांगले राहावे यासाठी चर्चा करीत आहे. आणि इथे चीन सरकारच्या वतीने सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. चीन हा देश कृषी प्रधान देश असून चीन मध्ये सौर उर्जेवर तांत्रिक पध्दतीची शेती करण्यात येते त्याप्रमाणे येथील शेतक-यांनी सुध्दा तांत्रिक पध्दतीची शेती करावी. तसेच शेतीमध्ये बारमाही पिके घ्यावी याकरीता   शेतक-यांसाठी  हा सोलर सिंचन प्रकल्प मदत नसून  भारताला सहकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर सोलर सिंचन प्रकल्‍प सुरु करण्यात आला. अशाच प्रकारच्या योजना  चीन सरकारच्या वतीने सुरु करण्यात येईल असेही श्री चाँग म्हणाले.
चीनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास 50 शेतक-यांना बारमाही सिंचनाचा  लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील 22 हेक्टर शेती सोलर सिंचनखाली येणार आहे. तसेच 30 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याचे शैलेश नवाल म्हणाले. या प्रकल्पामध्ये शेतक-यांना समप्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळया ठिकाणी 5 पाणी वितरण नलिकेचे चेंबर बनविण्यात आले असून यामध्ये 10 उपनलिका तयार करण्यात आल्या आहे.  या प्रकल्पामुळे येथील शेतक-यांना बारमाही सिचनाची सुविधा होणार असल्याने शेतक-यांनी बारमाही शेती पिके घ्यावी, असेही आवाहन शैलेश नवाल यांनी केले.
भारतासोबतचे चीन सबंध मैत्री व सलोख्याचे राहावे, यासाठी चीन सरकारच्या वतीने भारतात विविध प्रकल्प उभारण्यासाठी प्ररत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्या वतीने  1 कोटी 60 हजार रुपये तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने 30 लाख खर्च झालेला  असून धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी 30 एच.पी. मोटर पंप बसविण्यात आलेआहे . या सोलस सिंचन प्रकल्पाचा येथील शेतक-यांनी लाभ घेऊन सिंचन करावे, असे आवाहन तानाजी सत्रे यांनी यावेळी शेतक-यांना केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी श्री. शिंदे,  उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभाभागाचे उपअभियंता श्री.साबळे, जिल्हा परिषदच्या लघु सिचन विभागाचे उपअभियंता श्री. लांडगे, श्री. ससाने, पोलिस पाटील सतिश इंगोले व नागरिक मोठया प्रमणावर उपस्थित होते.
यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
                                      0000