* प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन
उत्साहात साजरा
* गांधी फॉर टुमारो महत्वाकांक्षी प्रकल्पाची
अंमलबजावनी
* आधार नोंदणीमधे देशात आघाडी
* टंचाई परिस्थीतीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
वर्धा, दिनांक 26 – जिल्ह्याच्या सर्वांगीन
विकासासाठी वीज, पाणी , रस्ते,
सिंचन, आरोग्य आदी पायाभुत
सुविधांच्या विकासासोबतच विविध योजनांचे
प्रभावी अंमलबजावनी करताना सामान्य जनतेला
गतीमान व पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प असल्याचे
प्रतीपादन राज्याचे अर्थ व नियेाजन राज्यमंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
राजेंद्र मुळक यांनी
केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या 63 व्या
वर्धापन दिनानीमीत्त जिल्हा
स्टेडीयम येथे पालकमंत्री
राजेंद्र मुळक यांच्या
हस्ते मुख्य शासकीय
समारंभात ध्वजारोहण झाले त्यानंतर
पथ संचलनाची मानवंदना स्विकारल्यानंतर जनतेला उद्देशून केलेल्या
भाषणा प्रसंगी ते बोलत होते.
प्रजासत्ताक
दिनानीमीत्त सर्व नागरीकांचे अभिनंदन करताना पालकमंत्री
राजेंद्र मुळक म्हणाले
की, वर्धा जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून
भारतीय स्वातंत्रयासाठी त्याग
व बलीदान करणारा जिल्हा म्हणून
संपूर्ण भारतात ओळखल्या
जातो. महात्मा गांधी यांनी सेवाग्राम
येथून स्वातंत्रय लढ्याची
सुरुवात केली. या आश्रमाला 75 वर्षे
पूर्ण झाल्या निमीत्ताने
गांधीजींचे सर्व समावेशक
विचार जगात पोहचविणारा
गांधी फॉर
टुमारो हा महत्वकांक्षी प्रकल्प
राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार नोंदणी मध्ये
संपूर्ण देशात वर्धा
जिल्ह्याने केलेल्या कार्यामुळे
पथदर्शी जिल्हा म्हणून
केंद्र शासनाने डायरेक्ट
टु कॅश या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी
निवड केली आहे. रोजगार हमी योजनेच्या
अंमलबजावनी मध्येही वर्धा जिल्हा संपूर्ण
राज्यात आघाडीवर असून, पाणीटंचाईवर मात
करण्यासाठी राबविलेल्या योजनांच्या
धर्तीवर संपूर्ण राज्यात
वर्धा पॅटर्न राबविण्याचा निर्णय शासनाने
घेतला असल्याचे सांगतांना पालकमंत्री
राजेंद्र मुळक म्हणाले
की, विकासाच्या सर्वच क्षेत्रात
राज्यात वर्धा जिल्हा
आघाडीवर असून, ग्रामीण भागात मुलभूत
व पायाभुत सुविधाही बळकट
करण्यासाठी विशेष उपक्रम
राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षणाचा हक्क ,औद्योगिक
विकासाला चालना, मागासवर्गीयांच्या
कल्याणासाठी तसेच महिला व बालकांच्या
संरक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटीबध्द
असून, सामान्य जनतेला शासनाच्या
विविध योजनांचा लाभ मिळवून
देण्यासाठी माहिती
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
करण्याचा संकल्प असल्याचेही
पालकमंत्री राजेंद्र मुळक
यांनी जनतेला उद्देशून
केलेल्या भाषणात सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नविन सोना, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्हा होमगार्ड समादेशक मोहन गुजरकर
ध्वजारोहन व पथ संचलना प्रसंगी
उपस्थित होते.
पालकमंत्री
राजेंद्र मुळक यांनी
संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण
केल्यानंतर वर्धा
जिल्ह्याने विविध क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल
विविध पारितोषकांचे
वितरण केले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत सेलू
तालुक्यातील कोटंबा या गावच्या सरपंच
सौ. रेणूकाताई रविंद्र कोटंबकर
यांना पाच लक्ष
रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते
देण्यात आले. पेठ या गावच्या सरपंच
श्रीमती सावित्री मारोती
श्रीरामे यांना व्दितीय
तीन लक्ष रुपये तर बरबडी गावच्या
सरपंच सौ. दुर्गा गोडे यांना तृतीय
दोन लाखाचा धनादेश देण्यात आला.
साने गुरुजी स्वचछ प्राथमिक शाळेसाठी दहेगाव व कोटंबा
येथील स्वचछ आंगणवाडीचा पुरस्कारही
यावेळी देण्यात आला. आधार प्रकल्पाच्या प्रभावी
अंमलबजावनीसाठी जिल्हाधिकारी एन.नविन
सोना , माहिती तंत्रज्ञान विभागाचे
सल्लागार विठ्ठलदास प्रभू , लीड बँकेचे
सी.एम.बी.मशानकर , निवासी उपजिल्हाधिकारी
सुनिल
गाडे आदींना प्रशस्ती
पत्राने सन्मानीत करण्यात आले. यावेळी शाहू फुले व आंबेडकर दलीत वस्ती
सुधारणा अभियाना अंतर्गत तीन ग्रामपंचायतींना पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
तसेच क्रीडा, निर्मल भारत
अभियान आदी क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल
सन्मानीत करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या
वर्धापन दिन समारंभात पथ
संचलनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या पुलगाव येथील
मिलीटरी स्कुलला प्रथम , न्यु
गर्ल्स हायस्कुल व्दितीय तर बुलबुल ट्रॅप गार्डन शाळेला
तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्ररथामध्ये सामान्य
रुग्णालयाच्या जननी सुरक्षा योजने अंतर्गत आधार प्रकल्पाच्या स्त्रि अत्याचार विषयावरील
चित्ररथास व्दितीय तर वैयक्तिक
सौचालयाच्या चित्ररथास तृतीय पुरस्कार
देऊन गौरविण्यात आले.
प्रजासत्ताक
दिन सोहळ्याचे संचलन श्रीमती
ज्योती भगत , डॉ. अजय येते व स्वाती देशपांडे यांनी केले. यावेळी
विद्यार्थ्यांनी सामुहीक कवायत
तसेच विविध सांस्कृतीक
कार्यक्रम सादर केले.
यावेळी जिल्हा परिषद
अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, खासदार
दत्ता मेघे, नगराध्यक्ष आकाश
शेंडे, बांधकाम सभापती गोपालराव
कालोरकर, शेखर शेंडे, मुख्य कार्यपालन
अधिकारी शेखर चन्ने, अतिरीक्त
जिल्हाधिकारी संजय भागवत, अप्पर जिल्हा
पोलीस अधिक्षक श्री. गेडाम, जिल्ह्यातील विविध
विभागाचे वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश तसेच
ज्येष्ठ स्वातंत्र्य
संग्राम सेनानी, लोकप्रतीनिधी, जिल्ह्यातील गणमान्य
नागरीक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000