Sunday 24 February 2013

मृतक परिवाराच्‍या वारसदारांना एक लाखाचे सानुग्रह अनुदान -पालकमंत्री


वर्धा दि.14- वर्धा जिल्‍ह्यात काल संध्‍याकाळी वादळी वारे व पाऊसाने थैमान घातले होते.यामध्‍ये वर्धा तालुक्‍यातील बोरगांव (मेघे) येथे राहणारा राजेंद्र ठाकरे वय 50 वर्षे या इसमावर झाड कोसळून तर  वायफड येथे राहणारा वेदांत ढोंबरे वय 6 वर्षे यांचा भींत कोसळून दुदैवी  मृत्‍यू झाला. या मृतक परिवारांच्‍या वारसदारांना प्रत्‍येकी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान तातडीने प्रदान करावे असे निर्देश वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिले.
          वायगांव निपाणी व वायफड येथे नैसर्गीक आपत्‍तीमुळे मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या परिवारांचे मंत्रीमहोदयांनी त्‍यांचे घरी जावून सात्‍वन केले. यावेळी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,निवासी उपजिलहाधिकारी  सुनिल गाडे,उपजिल्‍हाधिकारी  बी.एस.मेश्राम, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी उमेश काळे,आर्वी उपविभागीय अधिकारी सुनिल कोरर्डे,वर्धा तहसीलदार, माजी नगराध्‍यक्ष शेखर शेंडे,माजी गृहरक्षकदल अधिकारी प्रविण हिवरे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात वादळी पाऊस  व गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार तीन हजार 650 हेक्‍टर क्षेत्रातील गहू, हरभरा व संत्रा  पिकांचे नुकसान  झाले  असून   त्‍यामध्‍ये आर्वी व कारंजा तालुक्‍यातील पिकांचा समावेश नाही असे सांगून पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, सर्वात जास्‍त गाराचा पाऊस समुद्रपूर तालुक्‍यात झाला आहे.या तालुक्‍यातील शेतक-यांना शासकीय नियमानुसार शेतीच्‍या पिकांचे नुकसान भरपाई शासन देईल.वर्धा तालुक्‍यातील 20 गावातील 41 घरांचे अंशतः 9 घरांचे पूर्णतः अंदाजे 3.25 लाखाचे नुकसान झाले आहे. 94 गावातील 452 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्‍याचे आत झाले आहे.   
          समुद्रपूर तालुक्‍यातील गापपीटीमुळे 17 गावे बाधित झाले असून 270.20 हेक्‍टर आर शेती  क्षेत्राचे नुकसान झाले आहे.यामध्‍ये 498 शेतकरी बाधित झाले आहे. 50 टक्‍याचे आतील 265.20 हेक्‍टर आर क्षेत्र व 50 टक्‍याचे वर 5 हेक्‍टर आरक्षेत्र हिरडी या मौजातील आहे. 22 घराचे अंशतः नुकसान झाले असून नुकसानीचा प्राथमिक अंदाज 15 हजार रुपये एवढा आहे. शासनाच्‍या निकषानुसार आपत्‍तीग्रस्‍तांना सहायता निधी दिली जाणार आहे.
                                                     
          वादळी पावसामुळे ज्‍या गावामध्‍ये विद्युत सेवा खंडीत झाली असेल अशा गावांना आजच विद्युत सेवा प्रदान करावी काही तांत्रीक कारणाने विद्युत सेवा पूर्ववत करण्‍यासाठी अडचणी असल्‍यास त्‍या गावातील विद्युत सेवा इतर गावांच्‍या फिडरवरुन घेवून विद्युतसेवा पूर्ववत करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. ज्‍याचा घरचा कर्ता पुरुष गेला असेल अशा कुटूंबांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरुन घेण्‍यात यावे. तसेच ते अर्ज तातडीने मंजुर करण्‍यात यावे. नैसर्गीक आपत्‍ती ग्रस्‍तांना शासकीय मदत तातडीने प्रशासनाने पूरविण्‍यात यावी असे निर्देश देवून वादळी पावसामुळे पाच व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाल्‍या असून त्‍यांना  रुग्‍णालयात दाखल केले आहे.त्‍यांच्‍यावर  औषोधोपचार करणे सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य, संबंधित गावातील सरपंच, पदाधिकारी अधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते.
00000