वर्धाः
दि.9- राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आज दिनांक 10 फेब्रुवारी,2013 रोजी वर्धेत
सकाळी 9 वाजून 45 मि. नागपूर येथून शासकीय विश्रामगृह वर्धा येथे मोटारीने आगमन
होईल. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी ग्रेस
पार्टी पदाधिकारी व कार्यकत्यांच्या
भेटी घेतील. सकाळी 11 वाजून 15 मि. वा नागरी सुरक्षा जनजागृती अभियान सोहळ्याचे उदघाटन
कार्यक्रमाला उपस्थित राहतील स्थळ होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र,वर्धा
दूपारी 12.30 वाजता सेवाग्राम आश्रम वर्धा येथे भेट, दुपारी 1.30 राखीव,
दूपारी 2.45 मि. राष्ट्रभाषा प्रचार
समिती कार्यालय,वर्धा कडे ते मोटारीने प्रयाण करतील दुपारी 3.00 वाजता 23 वे अखिल भारतीय राष्ट्रभाषा
प्रचार समितीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.सायंकाळी 5.15 मि. मोटारीने नागपूरकडे
प्रयाण करतील.
Saturday 9 February 2013
Wednesday 6 February 2013
मेळघाटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सुसज्ज हॉस्पीटल बांधणार - डॉ. श्रीमती एस.छाबडा
उतावली
येथे रोगनिदान व उपचार शिबीर
वर्धा, दिनांक 6 – कस्तुरबा हेल्थ
सोसायटी तर्फे महात्मा गांधी आदिवासी
दवाखाना तसेच माता व शिशु
रुग्णालयाच्या माध्यमातून मेळघाटातील
रुग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा
एकत्र उपलब्ध करुन
देण्यासाठी उतावली येथे
सुसज्ज रुग्णालय बांधण्यात
येत असल्याची माहिती वर्धा
येथील कस्तुरबा हेल्थ
सोसायटीच्या प्रकल्प प्रमुख
डॉ. श्रीमती एस.छाबडा यांनी
आज दिली.
मेळघाटातील अतीदुर्गम
भागात राहणा-या आदीवासींना
तसेच महिला व बालकांना चांगल्या
वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात
यासाठी महात्मा गांधी
आदीवासी दवाखाना व शिशु रुग्णालय सुरु करण्यात आले असून, उतावली
येथे पंचेवीस खाटांचे
सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी
साडेसात एकर जमीन खरेदी करण्यात
आली आहे. भविष्यात शंभर
खाटांचे सुसज्ज रुग्णालय
कस्तुरबा हेल्थ सोसायटी तर्फे
बांधण्याचा मानस असल्याचेही डॉ. श्रीमती
एस.छाबरा यांनी सांगितले.
मेळघाटातील
अतिदुर्गम अशा गावातील बाल आरोग्यासोबत कुपोषण
दूर करण्यासाठी बावन
गांवे दत्तक घेण्यात येणार असून, वर्धा येथील कस्तुरबा हेल्थ
सोसायटी रुग्णालयातील बारा
तज्ञ डॉक्टरांची चमू
उतावली येथील रुग्णालयात
सेवा देत असल्याचेही त्यांनी
यावेळी सांगितले.
भव्य रोगनिदान व
उपचार शिबीर
महात्मा गांधी
आदीवासी दवाखाना उतावली येथे
दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रेाजी सकाळी 8
वाजतापासून रोगनिदान
व उपचार तसेच शसत्रक्रिया शिबीराचे
आयेाजन करण्यता आले आहे. या शिबीरासाठी
कस्तुरबा सोसायटी हेल्थचे अध्यक्ष
धिरुभाई मेहता , उपाध्यक्ष श्रीपत
हलबे विशेष उपस्थित
राहणार आहेत.
मेळघाटातील
आदिवासींना वैद्यकीय
उपचारासाठी उतावली येथे बांधण्यात येणा-या रुगणालायासाठी मुंबईच्या
ब्रृहत भारतीय समाज या स्वंयसेवी
संस्थेव्दारे तीन कोटी
रुपयाची मदत देण्यात
आली आहे. ब्रृहत भारतीय समाज संस्थेचे
पदाधिकारीही दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रेाजी उपस्थित
राहणार असलयाचे माहिती कस्तुरबा
हेल्थ सोसायटीच्या प्रकल्प
प्रमुख डॉ. एस. छाबडा यांनी दिली.
000000
शास्वत पाणी पुरवठा योजनेमुळे कारंजा तालुका टँकर मुक्त
नारा बावीस प्रादेशिक योजना गुरुत्वा तत्वावर सुरु.
पंचेवीस गावांना एकत्र पाणी पुरवठा.
कार्यकारी
अभियंता डी.एल.बोरकर यांचा गौरव.
वर्धा,
दिनांक 6 – कारंजा तालुक्यातील टँकरग्रस्त
असलेल्या पंचेवीस
गावांसाठी नारा बावीस या
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणींवर मात करुन
गुरुत्वाकर्षण तत्वावर आधारीत जिल्ह्यातील
पहिली योजना यशस्वीपणे कार्यान्वीत
झाल्यामुळे कारंजा तालुका हा टँकरमुक्त
झाला आहे.
कारंजा तालुका पिण्याच्या
पाण्याकरीता भूशास्त्रीय व भौतीकदृष्ट्या अती
कठीण असून, तालुक्यात भूजलावर आधारीत कुठेही शास्वत उदभव नसल्यामुळे ब-याच
गावांना टँकरने पाणी पुरवठा
करावा लागत होता. ग्रामीण पाणी पुरवठा
विभागातर्फे कार सिंचन प्रकल्पावरुन भुपृष्ठावरील
पाणी हा उदभव निवडून पंचेवीस
गावांसाठी नारा-बावीस ही योजना
सुरु करण्यात आली होती. परंतू या
योजनेमधील अडचणी दूर करुन
तसेच तांत्रीक बदल करुन तालुक्यात सतत व शास्वत
पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे टँकरमुक्त
तालुका झाला असल्याची माहिती
कार्यकारी अभियंता डी.एल. बोरकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेकडून विशेष गौरव
गुरुत्वाकर्षण तत्वावर
आधारीत बिनापंप नारा-बावीस
योजने अंतर्गत बोटोना व
बोरगांव (ढोले) या टँकरग्रस्त
असलेल्या गावांना या योजनेव्दारे पाणी पुरवठा
सुरु करण्यासोबतच कारंजा तालुका
टँकरमुक्त करण्यासाठी विशेष
योगदानाबद्दल ग्रामीण पाणी
पुरवठा विभागाचे कार्यकारी
अभियंता डी.एल. बोरकर यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर
ढगे व मुख्य
कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांच्या हस्ते
त्यांचा गौरव करण्यात आला.
कारंजा
तालुकयातील पंचेवीस गावांसाठी
प्रादेशिक पाणी पुरवठा
योजना कार्यान्वीत करण्यात
आली होती. परंतू या योजनेमध्ये तांत्रिक
त्त्रुट्या राहील्यामुळे पाणी पुरवठा
होण्यास अडचण निर्माण होत
होती. जानेवारी पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने
पाणी पुरवठा करावा लागत होता.
नारा-बावीस या प्रादेशिक
पुरवठा येाजनेच्या प्रत्येक
बाबीचा सखोल तांत्रीक
अभ्यास करुन अस्तीत्वात असलेल्या
योजनेमधील त्रुट्या
दूर करुन व विशीष्ट तांत्रीक
बदल करुन ही योजना
दोन भागांमध्ये
विभागण्यात आली. तसेच
योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल
कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आला. तसेच बोरगाव ढोले
या भागात सुध्दा तांत्रिक बदल
करुन पाणी पुरवठा
नियमीत करण्यात आला.
गुरुत्वाकर्षण तत्वावर जिल्ह्यातील दोन गावांना
जलशुध्दीकरण केन्द्रामधील साठवण टाकीतून
सरळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे या योजनेवरील
विदृयुत खर्चात व देखभाल व दुरुस्ती खर्चावरही फार मोठी बचत होणार आहे. या योजनेच्या
पुर्नरुज्जीवनाचे काम
प्रगतीपथावर असून, एकोनवीस
टंचाईग्रस्त गावांना सुध्दा शासक
पाणी पुरवठा सुरु होईल. असेही
यावेळी कार्यकारी अभियंता
डी.एल. बोरकर यांनी सांगितले. ही
योजना यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे
उपविभागीय अधिकारी संजय बढीये यांचेही
महत्वपूर्ण योगदान आहे.
नारा-बावीस या
योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण
पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांचा विशेष
गौरव करण्यात आला असून, यावेळी जलव्यवस्थापन व स्वच्छता
समिती तसेच बांधकाम सभापती गोपाळराव कालोरकार , सभापती नंदकिशोर
कंगाले , श्रीमती निर्मलाताई बिजवे, गजानन निकम, सौ. वैशाली गोमासे , मंदाताई चौधरी, आदी यावेळी
उपस्थित होते.
000000000
Subscribe to:
Posts (Atom)