Saturday 15 September 2012

शेतकरी आत्‍महत्‍याची चार प्रकरणे पात्र' एक प्रकरण फेरचौकशीसाठी – अप्‍पर जिल्‍हाधिकारी


      वर्धा, दि. 15 – शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीची बैठक आज अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या  कक्षामध्‍ये संपन्‍न झाली. यावेळी समितीसमोर नऊ प्रकरणे विचारार्थ ठेवण्‍यात आली. त्‍यापैकी चार प्रकरणे पात्र व एक प्रकरण फेरचोकशीसाठी पाठविण्‍यात आल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
     याप्रसंगी स्‍वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी म्‍हणून डॉ. सोहम पंड्या, शेतकरी  भुषण पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे  व अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यावेळी   उपस्थित होते.
            शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीच्‍या बैठकीत सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या प्रकरणांमध्‍ये सेलू तालुक्‍यातील महाबळा येथील मानीक नेहारे, आर्वी तालुक्‍यातील मदना येथील महेश  झोटिंग, देवळी तालुक्‍यातील  इंझाळा येथील वर्षा बरडे व वर्धा तालुक्‍यातील पवनार येथील अंतकला हिवरे यांचा समावेश असून प्रकरणाच्‍या फेरचौकशीसाठी वर्धा तालुक्‍यातील पालोती येथील देविदास  उगेमुगे  यांचा समावेश आहे. तीन प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आलेली असून, एक प्रकरण आत्‍महत्‍याच्‍या प्रवर्गातून वगळण्‍यात आले आहे.
      यावेळी इतीवृत्‍ताचे वाचन शेतकरी आत्‍महत्‍या कक्षाचे श्री. श्रीवास्‍तव यांनी केले.
                                                              00000

वर्धा येथे राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्टबॉल स्‍पर्धेचे आयोजन


वर्धा, दि. 15- राष्‍ट्रीय स्‍पर्धा राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्टबॉल स्‍पर्धेचे आयोजन जिल्‍हा क्रिडा अधिकारी, वर्धा यांचे विद्यमाने  ऑक्‍टोंबर 2012 च्‍या दुस-या आठवड्यात होणार आहे.
 या स्‍पर्धेत भाग घेणा-या   14,17,19 वर्षे वयोगटातील मुलींसाठी  दिनांक 26 ते 28 सप्‍टेंबर या कालावधीत स्‍पर्धा होत आहे. स्‍पर्धेत सहभागी होणारे आठ विभागातील खेळाडू वर्धा येथे दिनांक 25 सप्‍टेंबर 2012 रेाजी उपस्थित होणार असून, राज्‍यस्‍तर स्‍पर्धेस दिनांक 26 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 7 वाजता सुरुवात होईल. राज्‍यस्‍तर स्‍पर्धेची निवड चाचणी दि. 27 ते 28 सप्‍टेंबर 2012 या कालावधीत आयोजीत होत आहे. दि. 28 सप्‍टेंबर 2012 रोजी महाराष्‍ट्राचा संघ घोषीत करण्‍यात येणार आहे.
 14,17,19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी   दिनांक 29 सप्‍टेंबर  ते 1 ऑक्‍टोंबर 2012 होणार असून स्‍पर्धेला 29 सप्‍टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सुरुवात  होणार आहे.दिनांक    1 ऑक्‍टोंबर 2012 रोजी महाराष्‍ट्राचा संघ घोषीत करण्‍यात येईल.
     या स्‍पर्धेचे आयोजन जी.एस.कॉमर्स कॉलेज, वर्धा चे क्रीडांगणावर करण्‍यात येणार असून खुहाडुंची निवास व्‍यवस्‍था बच्‍छराज धर्मशाळा तसेच  जिल्‍हा क्रीडा संकुलातील मुलामुलींचे वसतिगृह येथे  करण्‍यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंगेश गुडधे, राज्‍य क्रीडा मार्गदर्शक (सॉफ्टबॉल) तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांचेशी संपर्क साधावा.
                                                            000000

Friday 14 September 2012

महालोकअदालती समोर 8 हजार 930 प्रकरणे

16 पॅनलव्‍दारे प्रकरणांचा निपटारा
सामंजस्‍याने वाद सोडविण्‍यासाठी महालोकअदालत
  
     वर्धा,दि.14- जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रविवार दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी महा-लोकअदालतीचे आयोजन करण्‍यात आले असून, जिल्‍ह्यातील 8 हजार 930 प्रकरणांची सुनावणी  होणार आहे. महा-लोकअदालतचे काम व्‍यवस्‍थीत चालण्‍यासाठी 16 पॅनल तयार करण्‍यात आले असून, या पॅनलवर प्रमुख न्‍यायीक अधिकारी, पॅनल सदस्‍य अधिवक्‍ता व समाजसेवक तसेच न्‍यायीक कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असल्‍याची माहिती प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्‍यक्ष न्‍यायमुर्ती  अशोक शिवणकर यांनी केली.
      रविवारी  महा-लोकअदालतीचे  आयोजन जिल्‍हा व सत्र न्‍यायालयामध्‍ये तसेच प्रत्‍येक  तालुक्‍यामध्‍ये आयोजन करण्‍यात आले आहे. न्‍यायालयातील प्रलंबीत प्रकरणांचा  जलद गतीने निपटारा करण्‍यासाठी  जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महा-लोकअदालतचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये  प्रकरणातील वादी आणि प्रतीवादी  यांच्‍या आपसी सामंजस्‍याने  हा वाद कायदेशीररित्‍या  तडजोड घडवून आणने सुलभ होणार आहे.
       महा-लोकअदालती समोर  8 हजार 930 प्रकरणे  येणार असून, यामध्‍ये  दिवाणी स्‍वरुपातील 196 प्रकरणे, फौजदारी स्‍वरुपाची 524 प्रकरणे, मोटार वाहन अपघात संबंधी 49 पकरणे, भूसंपादनाची 263 प्रकरणे, कामगार न्‍ययालये व सहाय्यक धर्मदाय आयुक्‍तांकडील 45 प्रकरणे व इतर स्‍वरुपातील 1 हजार 915 प्रकरणांचा समावेश आहे. तसेच वाद दाखलपूर्व 5 हजार 633 प्रकरणेही  महालोअदालतीसमोर प्रकरणे येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणाचे सदस्‍य सचिव स.मायल्‍लट्टी यांनी दिली.                               
       वर्धा येथील जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या परिसरातील महा-लोकअदालती समोर 2 हजार 430 प्रकरणे तसेच तालुका स्‍तरावरील महा-लोकअदालतीसमोर येणा-या प्रकरणामध्‍ये हिंगणघाट – 1801, सेलू – 361, पुलगाव – 1590, आर्वी – 877, आष्‍टी – 592, कारंजा – 572 आणि समुद्रपूर तालुक्‍यातील महालोकअदालतीसमोर 760 प्रकरणांचा समावेश आहे.
         महालोकअदालतीसाठी  जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणातर्फे 14 पॅनल राहणार असून,पॅनल क्रमांक 1 समोर  मोटार वाहन अपघात  प्रकरणे, पॅनल 2 दिवाणी व फौजदारी अपिल व विदृयुत कायद्याची प्रकरणे,पॅनल 3 व 4 भुसंपादन प्रकरणे, पॅनल 5 हिंदु विवाह कायदा व दिवाणी दावे, पॅनल 6 फौजदारी व वैवाहिक प्रकरणे,पॅनल 7 ,8 व 9   कलम 138 एन.आय.अॅक्‍ट ची प्रकरणे, पॅनल 10 व 11 मोटार वाहन कायदा, पॅनल 12, 13 बँकाची प्रकरणे, पॅनल 14 बीएसएनएल संबंधी प्रकरणे, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त व कामगार न्‍यायालय यांचे दोन पॅनल स्‍वतंत्र राहणार आहेत.
       महा-लोकअदालतमध्‍ये न्‍यायालयात प्रलंबीत असलेली व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्‍याची संधी उपलब्‍ध आहे. या महालोकअदालतीचा जनतेने लाभ घ्‍यावा. असे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तसेच अध्‍यक्ष विधी सेवा प्राधिकरणचे न्‍यायाधीश अशोक शिवणकर यांनी केले आहे.
                                                            00000

ग्रामीण संस्‍कृती व परंपरांच्‍या संवर्धनासाठी सण व उत्‍सवाची परंपरा जोपासा - रणजित कांबळे




* पोळ्यातील बैलजोडी सजावट स्‍पर्धेतील शेतक-यांना बक्षीस
* रोठा येथील ऐतिहासीक देवस्‍थानाला पर्यटनाचा दर्जा
* गावांना  जोडणा-या  रस्‍त्‍यांची प्राधान्‍याने दुरुस्‍ती

         वर्धा, दि. 14- ग्रामीण भागात पोळ्यासह विविध उत्‍सव व सणांच्‍या माध्‍यमातून ग्रामीण संस्‍कृती  व परंपरा जोपासण्याचे काम होत असून, ही परंपरा कायम ठेवण्‍यासाठी  स्‍वंयसेवी  संस्‍थांच्‍या  माध्‍यमातून विविध उपक्रम  आयोजीत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी कले.
       रोठा येथे  पोळ्या निमित्‍त शेतक-यांसाठी आयोजित  सुदृढ बैलजोडी  व बैलांच्‍या सजावटीसाठी  विविध  पुरस्‍कारांचे  वितरण केले. त्‍याप्रसंगी आयेाजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
       अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वराव ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून सभापती धैर्यशिलराव जगताप, वर्धा लायन्‍स क्‍लबचे अनिल मिश्रा, सरपंच डॉ. विजय चौधरी, छोटू चांदूरकर, विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे,श्रीमती हेमलता मेघे आदी  उपस्थित होते.
          नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे  ग्रामीण भागातील सण व उत्‍सवाची परंपरा कमी होत असल्‍याचे सांगताना राज्‍यमंत्री रणजित कांबळे म्‍हणाले की, पोळ्यानिमीत्‍त वर्षभर  शेतक-यांसोबत  शेतीवर राबणा-या  बैलांची  आपण पुजा करतो तसेच गायीसह पशुधनाचेही  आपण पुजन करतो. शेती व शेतीवर राबणारा कष्‍टकरी  समृध्‍द व्‍हावा तसेच ग्रामीण भागातील संस्‍कृतीचे  संवर्धन व्‍हावे यासाठी  बैलजोडी सजावट स्‍पर्धासारखे विविध उपक्रम राबवावे. अशी सुचनाही त्‍यांनी यावेळी केली.
          रानूमाता देवस्‍थानला पर्यटनाचा दर्जा
      वर्धा जिल्‍ह्यातील रोठा येथील  सुप्रसिध्‍द  रानूमाता मंदीराच्‍या विकासाला प्राधान्‍य देण्‍यात येणार असून येथे येणा-या यात्रेकरुंना मुलभूत सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी क वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्‍यात येईल. तसेच जिल्‍हा नियेाजन विकास निधीमधून या देवस्‍थानाचा विकास करण्‍यात येईल अशी घेाषणाही रणजित कांबळे यांनी केली.
            रोठा ही ग्रामपंचायत 1960 मध्‍ये स्‍थापन झाली असून, ग्रामपंचायतीची ईमारत जिर्ण झाल्‍यामुळे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे, नागठाणा ते सिंदी मेघे तसेच वायफळ पर्यंतचा रस्‍ता तात्‍काळ दुरुस्‍त करण्‍यात येईल. पावसामुळे अंतर्गत खराब झालेल्‍या रस्‍त्‍यांची कामेही प्राधान्‍याने पूर्ण करण्‍यात येईल. अशी ग्‍वाही  सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी केली.                 
              जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांनी  वर्धा जिल्‍ह्यात  टंचाईग्रस्‍त  गावांमध्‍ये  पिण्‍याचे पाण्‍यासह रस्‍ते विकासाला प्राधान्‍य दिल्‍यामुळे  जिल्‍ह्याचा सर्वांगीन विकास झाला आहे.
      लायन्‍स, लॉयनेस लिओ क्‍लब  यांच्‍या वतीने  रोठा येथे  पोळ्याच्‍या दिवशी   शेतक-यांसाठी सुदृढ बैलजोडी व बैलजोडी सजावट स्‍पर्धा आयेाजीत करण्‍यात आली होती. या स्‍पर्धेमध्‍ये गावातील मोठ्या संख्‍येने शेतकरी कुटूंब सहभागी झाले होते. स्‍पर्धेमध्‍ये  प्रथम आलेल्‍या  हरीभाऊ एकनाथ सावळे या शेतक-यांचा शाल, श्रीफळ भेट वस्‍तू  तसेच बैलांच्‍या गळ्यातील आकर्षक घंट्याची माळा  राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आल्‍या.
     बैलजोडी सजावट स्‍पर्धेमध्‍ये  व्दितीय क्रमांक रामभाऊ सावळे, तृतीय महादेव लक्ष्‍मण जांभुळकर तसेच दिलीप गाडगे, नारायण पुरषोत्‍तम ढगे, महादेवराव पिटकुले, नरेंद्र काळे, या शेतक-यांनाही त्‍यांच्‍या बैलजोड्यासाठी केलेल्‍या उत्‍कृष्‍ट सजावटीसाठी शाल,श्रीफळ, भेट वस्‍तू देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. परिक्षक म्‍हणून  दिनकरराव लोखंडे यांनी काम बघितले.
       प्रारंभी लायन्‍स क्‍लबचे अनिल मिश्रा यांनी  प्रासताविकात स्‍पर्धा आयोजनाची भुमीका सांगितली.  सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी स्‍वागत करुन ऐतिहासीक रानुमाता देवस्‍थानला पर्यटनाचा दर्जा, ग्रामपंचायत भवन, गावात सिमेंट रस्‍ते, तसेच नागठाणा येथील रस्‍त्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍याची मागणी केली.
            यावेळी  हेमलता मेघे, महंमद अक्‍तार कुरैशी, श्रीमती गौतमी  मेश्राम, अंजुभाऊ वरडकर, महेन्‍द्र तेलरांधे, हरीष वाघ, मनिश गंगमवार, ग्रामसेवक संदीप भोसले, अक्‍तर कुरैशी आदी उपस्थित होते.
                                                               0000

नागठाणा व रोठा येथे राज्‍यमंत्री रणजित कांबळे


यांच्‍या हस्‍ते  विकासकामांचे भुमिपूजन       

वर्धा, दि. 14-नागठाणा  येथे सुमारे  5 लक्ष 50 हजार    खर्च करुन बांधण्‍यात येणा-या अंगणवाउी ईमारतीच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते  झाला.
13 व्‍या वित्‍त आयोगामधून  नागठाणा येथे  अंगणवाडी  बांधकामाला मंजूरी मिळाली असून, इमारतीच्‍या बांधकामासोबत  लहान मुलांसाठी आवश्‍यक सुविधाही येथे उपलब्‍ध  होणार आहेत.      
यावेळी  पंचायत समितीचे सभापती  धैर्यशिल जगताप, जि.प. सदस्‍य छोटूभाऊ चांदूरकर, पंचायत समिती सदस्‍य विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे, ग्रामसेवक संदीप भोसले आदी  उपस्थित होते.
सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी  स्‍वागत करुन  नागठाणा येथे बांधण्‍यात येत असलेल्‍या अंगणवाडी संदर्भात प्रास्‍ताविकात उल्‍लेख केला. अंगणवाडी भूमीपुजन समारंभा निमित्‍त बसविण्‍यात आलेल्‍या कोनशिलेचे अनावरण राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचे हस्‍ते झाले.
                           रोठा येथे दलित वस्‍ती  सुधार कामांचा शुभारंभ
रोठा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्‍त्‍यांमध्‍ये  सिमेंट रसत्‍यांच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांच्‍या हस्‍ते आज झाला.
      यावेळी  जि.प.चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वराव ढगे, सभापती  धैर्यशिलराव जगताप, सरपंच डॉ. विजय चौधरी आदी उपस्थित होते.
       दलित वस्‍ती सुधार कार्यक्रमा अंतर्गत रोठा या गावात सुमारे 1 लक्ष रुपये खर्च करुन सिमेंटच्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात येणार आहे.  सिमेंट रस्‍त्‍याच्‍या बांधकामाचा दर्जा उत्‍तम राहील याकडे लोकप्रतिनीधीनीही लक्ष देण्‍याची सुचना यावेळी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
                                              000000   

रोजगार हमी योजनेतून प्रत्‍येक गावात


जलसंधारणासह उत्‍पादक कामे घ्‍या-         शेखर चन्‍ने
       वर्धा, दि. 14- महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात जलसंधारणासह विविध उत्‍पादक  कामांची  निवड करताना गावांच्‍या स्‍थानिक गरजानुसार कामांचे नियेाजन करा. अशा सुचना जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी आज केले.
      विकास भवन येथे मग्रारोहयो  अंतर्गत जिल्‍ह्यात  कामांच्‍या नियोजपपूर्व तांत्रिक अधिकारी  यांचेसाठी आयोजीत कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
            अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी श्रीमती  भोज होत्‍या तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी  श्री. संगीतराव , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री. भुयार, उपविभागीय अभियंता सुनिल गहाणे, संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन आदी उपस्थित होते.
           केंद्र शासनाने  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गावांचे स्‍थानिक गरजेनुसार कामाची निवड करण्‍यासाठी  शिवारफेरी  हा उपक्रम सुरु केला आहे. वर्धा जिल्‍ह्यात या उपक्रमानुसार प्रत्‍येक  गावामध्‍ये  कामाचे नियेाजन करावे व गावांमध्‍ये स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करावी अशा सुचनाही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी अधिका-यांना दिलयात.
            रोजगार हमी योजने अंतर्गत कामाची निवड करताना स्‍थानिक दर्जा त्‍यानुसार उपलब्‍ध होणारा रोजगार  अशा कामांचे  अंदाजपत्रक तयार करुन  कामांची  प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करावी . मजूरांकडून झालेल्‍या   कामांचे मोजमाप घेऊन त्‍यांना लवकरात लवकर मजुरी प्रदान करण्‍याच्‍या दृष्‍टीने   प्रयत्‍न करावेत असेही त्‍यांनी सांगितले.
            उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगीतराव यांनी  मग्रारोहयो अंतर्गत  गुणवत्‍तापूर्ण  व स्‍थायी  मालमत्‍ता  तयार करण्‍यास प्राधान्‍य देत असल्‍याचे सांगताना सर्व अभियंत्‍यांनी  मार्गदर्शक सुचनानुसार   त्‍वरीत प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी , कामाचे नियोजन करताना  प्रशासकीय अडचणी अथवा  जेथे गरज भासेल तेथे  संपूर्ण मार्गदर्शन करण्‍यात येईल असेही त्‍यांनी  यावेळी स्‍पष्‍ट केले.
        या कार्यशाळेत 300 तांत्रिक अधिकारी  उपस्थित असून, त्‍यांना तज्ञ मार्गदर्शक श्री.मेघावत,श्री.कोरान्‍ने, श्री.भागवतकर, अभय तिजारे, सहायक लेखाधिकारी श्री. बोरकर आदींनी मार्गदर्शन केले.
      उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल रोहयोचे उपविभागीय अभियंता सुनील रहाणे, उपअभियंता संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन, शाखा अभियंता अभय क-हाडे, सहायक उपवनसंरक्षक विनोद देशमुख यांना प्रशस्‍ती पत्र देऊन गौरविण्‍यात आले.
            उपमुख्‍यकार्यपालन अधिकारी श्री. भुयार यांनी स्‍वागत करुन प्रास्‍तावी केले. तर कार्यक्रमाचे संचलन अजय धर्माधिकारी यांनी केले.
                                                              00000

Thursday 13 September 2012

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे मंगळवारी आगमण


          वर्धा दि.13- केंद्रीय कृषी व अन्‍न प्रक्रीया, उद्योग मंत्री शरद पवार यांचे मंगळवार दिनांक 18 सप्‍टेंबर रोजी रात्रौ 8 वाजता अमरावती येथून मोटारीने आगमण होईल. व वर्धा येथे मुक्‍काम राहील.
         बुधवार दिनांक 19 सप्‍टेंबर रोजी सकाळी 10 वाजता यंशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या सुवर्ण महोत्‍सवी कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री उपस्थित राहतील. दुपारी 12.15 ते 2 वाजेपर्यन्‍तचा वेळ राखीव असून दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने नागपूरसाठी प्रयाण करतील.
0000

                             श्री.शिवाजीराव मोघे

         वर्धा दि.13- राज्‍याचे सामाजिक न्‍यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे शनिवार  दिनांक 15 सप्‍टेंबर रोजी  सकाळी 10 वाजता यवतमाळ येथून भिडी (देवळी) येथे आगमण होईल.    
        भिडी येथील बाल विकास प्रशिक्षण शिबीराचे सामाजिक न्‍याय मंत्री शिवाजीराव मोघे उद्घाटन करतील व सकाळी 11 वाजता वरोरा साठी मोटारीने प्रयाण करतील.
0000

बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल सायन्‍स रेल्‍वे एक्‍स्‍प्रेस वर्धेला येणार


             * समृध्‍द जैवविविधतेचे अनोखे दर्शन
* विदर्भातील अभ्‍यासकांना सुवर्ण संधी
* विशेष वातानूकुलीत रेल्‍वेचे ऑक्‍टोंबरमध्‍ये आगमण
* राज्‍यात केवळ पांच रेल्‍वे स्‍थानकावरच प्रदर्शन पाहण्‍याची संधी

       वर्धा, दि. 13- भारतातील समृध्‍द जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या  दृष्‍टीने   जैवविविधते संबंधी  परिपूर्ण माहिती असलेले  अनोखे प्रदर्शन  सायन्‍स एक्‍स्‍पेस –     बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल  ही  सोळा वातानुकूलीत  डब्‍बे असलेल्‍या  रेल्‍वे गाडीचे आगमण  20 ऑक्‍टोंबर रोजी    सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर  होत आहे.
         राज्‍यात  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  ही स्‍पेशल रेल्‍वे गाडी केवळ पाच  रेल्‍वे स्‍थानकावरच थांबणार असून, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला जिल्‍ह्यातील  पर्यावरण प्रेमी , शिक्षक तसेच विद्यार्थ्‍यांनाही  देशातील समृध्‍द जैवविविधतेची माहिती जाणून घेण्‍याची  सुवर्ण संधी उपलब्‍ध होणार आहे. सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर या विशेष  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  दिनांक 20 ऑक्‍टोंबर ते 22 ऑक्‍टोंबर पर्यंत थांबणार असून, सोळा  वातानुकूलीत  रेल्‍वे  कोचमध्‍ये  असलेले  प्रदर्शन सकाळी  10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धेकरांना व विदर्भातील पर्यावरण प्रेमींना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन निःशुल्‍क राहणार असल्‍याची   माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे  यांनी दिली.
      देशातील   22 राज्‍यामधील  निवडक आणि महत्‍वाच्‍या  52 रेल्‍वे स्‍थानकावर जैवविविधते संदर्भात प्रदर्शन पाहण्‍याची संधी मिळणार असून, यामध्‍ये राज्‍यातील खडकी (पुणे ), मुंबई (सीएसटी), नागपूर  आणि सेवाग्राम (वर्धा) या रेल्‍वेस्‍थानकावर  विशेष  सायन्‍स  एक्‍स्‍प्रेस  रेल्‍वे  थांबणार आहे. 11 व्‍या कॉन्‍फरन्‍स   ऑफ  पार्टीजचे यजमान पद  भारताने  स्विकारले असून, या निमित्‍याचे  औचित्‍य साधून   समृध्‍द  जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने  व जैवविविधतेची माहिती पोहचविण्‍यासाठी  16 वातानूकुलीत डब्‍बे असलेली  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस बायोडायव्‍हरसिटी   ही रेल्‍वे जून ते डिसेंबर  या दरम्‍यान संपूर्ण भारतात भ्रमंती करणार आहे.
        विदर्भातील विशेषतः वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनीही   या प्रदर्शनीस भेट द्यावी, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचाकल प्रविणकुमार बडगे  यांनी केले आहे. 
                                               00000

झुडपी जंगलाच्‍या जमिनीवर वृक्षारोपन करा -रणजित कांबळे


                     *    जिल्‍हा परिषदेमार्फत वृक्षारोपण
                *  ग्रामपंचायतीला वृक्षारोपन व संगोपनाची जबाबदारी

वर्धा दि.13- ग्रामीण भागात झुडपी जंगल म्‍हणून नोंद असलेल्‍या जमिनीवर शतकोटी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्‍यासाठी वन विभागाने जिल्‍हा परिषदेला जागा उपलब्‍ध करुन देण्‍याची अशी सूचना पाणीपुरवठा व स्‍वच्‍ठता विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी आज केली.
            विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण तसेच वरिष्‍ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           ग्रामीण भागात वनविभागातर्फे  झुडपी जंगल म्‍हणून नोंद असलेली मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे.या जागेवर अतिक्रमण होवू नये यादृष्‍टीने अशा जागा जिल्‍हा परिषदेला वृक्षारोपणासाठी उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशी सूचना राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिल्‍यात.
          ग्रामपंचायत स्‍तरावर वृक्षारोपण केल्‍यास ग्रामपंचायत वृक्षारोपणासोबत संवर्धनाचेही काम करेल तसेच या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींना उत्‍पन्‍न सुध्‍दा होईल.वृक्षारोपण करतांना सुबाभुळ सारख्‍या झाडांचे वृक्षारोपन मोठ्याप्रमाणात करावे अशी सूचनाही त्‍यांनी केली.
           जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी शतकोटी वृक्षारोपन मोहिमे अंतर्गत जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिम जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्‍यात येणार आहे.वृक्षारोपणासाठी वनविभागातर्फे झुडपी जंगलाची जागा जेथे वृक्षारोपण करणे शक्‍य आहे अशी सर्व जागा उपलब्‍ध करुन द्यावी असेही बैठकीत त्‍यांनी यावेळी सांगितले.
                              वनविभागातर्फे 14 लाख रोपे
         वनविभागातर्फे शतकोटी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन मोहिम राबविण्‍यात येत असून वन विभागाच्‍या नर्सरीमध्‍ये सुमारे 14 लाख रोपे तयार असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण यांनी दिली.
          जिल्‍ह्यात वर्धा शहराच्‍या सभोवताल तसेच ग्रामीण भागात झुडपी जंगल अशी नोंद असलेली वनविभागाचह जमिण आहे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण शक्‍य आहे.वृक्षारोपणासाठी जिल्‍हापरिषद,ग्रामपंचायत तसेच स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेवून वृक्षारोपन करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनास सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण यांनी दिली.
0000

निम्‍न वर्धा प्रकल्‍पा अंतर्गतच्‍या पुनर्वसन गावांना नागरी सुविधा -रणजित कांबळे



                         *    बोरगांवसह चार गावांसाठी ग्रामपंचायत
                 *   पुनर्वसन गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा

          वर्धा दि.13- निम्‍न वर्धा प्रकल्‍पा अंतर्गत येणा-या बोरगांव,हरिसवाडा,भादोड आदी गावांचे पुनर्वसन करतांना ग्रामस्‍थांच्‍या सुचनेनुसार पूनर्वसन झालेल्‍या क्षेत्रासाठी  स्‍वतंत्र ग्रामपंचायत स्‍थापन करुन त्‍यांना सर्व नागरी सुविधा पुरविण्‍याबाबत तात्‍काळ कार्यवाही करा अशा सूचना पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी आज दिल्‍यात.
          विश्रामगृह सभागृहात निम्‍न वर्धा प्रकल्‍पग्रस्‍त संघर्ष समिती देवळी-सालोड येथील प्रतिनिधी मंडळासोबत अधिका-यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्‍यमंत्री श्री.कांबळे बोलत होते.
            जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने,अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक,उपजिल्‍हाधिकारी शैलेन्‍द्र मेश्राम,रमन जैन,प्रकल्‍पग्रस्‍त संघर्ष समितीचे उपाध्‍यक्ष  मोरेश्‍वर पिंगळे,सचिव विनोद कदम,श्री.नाखले,गवळी आदी उपस्थित होते.
          बोरगांव पुनर्वसन अंतर्गत चार गावांचे पुनर्वसन देवळी येथे झाले असून देवळी नगर परिषदेच्‍या सिमेत झाल्‍यामुळे पुनर्वसन झालेल्‍या गावांचा समावेश न करता स्‍वतंत्र ग्रामपंचायत असावी ह्या संघर्ष समितीच्‍या मागणीनुसार पुनर्वसनासंदर्भात या गावांच्‍या जनतेचाही प्राधान्‍याने विचार करावा अशी सूचनाही श्री. रणजित कांबळे यांनी केली.
          दिघी बोपापूर व अजनावती या पुनर्वसन झालेल्‍या गावांना सर्व नागरी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासोबत पिण्‍याच्‍या पाण्‍याची योजनेची दुरुस्‍ती करण्‍यासोबत या गावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न तात्‍काळ सोडवावा असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
          पुनर्वसन करतांना बेघर कुटूंबांनाही भुखंड वाटप करावे.हनुमान मंदिर तसेच सामाजिक उपयोगाच्‍या जागा याबाबतही तात्‍काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही राज्‍यमंत्र्यांनी यावेळी दिल्‍यात.
                                  आदिवासींना घरकुलाचे कायम पट्टे  

          पळसगांव येथील आदिवासी कुटूंबांना वनहक्‍क कायद्या अंतर्गत सध्‍या राहत असलेल्‍या जागेवरच मालकी हक्‍क मिळावे यासाठी ग्रामवनहक्‍क समितीची बैठक घेवून तात्‍काळ कार्यवाही  करावी अशी सूचनाही पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी केली.                                            
यावेळी बोरगांव पुनर्वसन अंतर्गत देवळी –सालोड येथील निम्‍न वर्धा प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्‍यात आली.
          मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी पुनर्वसन गावांना मुलभूत सुविधा देण्‍याबाबत प्राधान्‍य असल्‍याचेही यावेळी सांगितले.
          अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी देवळी सालोड येथील पुनर्वसन गावातील विविध सोयी सुविधा तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍नासह ग्रामपंचायत गठण करण्‍याबाबतच्‍या  प्रश्‍नासंदर्भात माहिती दिली.
                                                         0000

अनु.जाती,जमाती आयोगाचे सदस्‍य सी.एल. थूल 17 सप्‍टेंबर रोजी वर्धेत


      वर्धा दि.13- महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचित जाती  आणि जमाती आयोगाचे सदस्‍य सी.एल. थूल यांचे दिनांक 17 सप्‍टेंबर,2012 रोजी दुपारी 3.30 वाजता नागपूर येथून वर्धा येथे आगमण होईल त्‍यानंतर सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अधिका-यांशी चर्चा करतील व रात्री वर्धा येथे मुक्‍काम राहील.दिनांक 18 सप्‍टेंबर,2012 रोजी सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियाना अंतर्गत 28 शेतक-यांना पांच दिवसाचे प्रशिक्षण


         वर्धा दि.13-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, वर्धा यांच्‍या वतीने वर्धा, सेलु, देवळी या तालुक्‍यातील 28 शेतक-यांना ट्रेनिंग सेंटर, तळेगांव दाभाडे जिल्‍हा पुणे येथे पांच दिवसाचे प्रशिक्षणउदेण्‍याम आले. त्‍यामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊसमधील भाजीपाला व फुलपिके उत्‍पादन तंत्रज्ञान अवगत करणे करीता प्रशिक्षणासाठी पाठविण्‍यात आले. सदर प्रशिक्षणामध्‍ये उच्‍च तंत्रज्ञान आधारीत शेडनेट हाऊसमधील ठिंबक संचाव्‍दारे खत व्‍यवस्‍थापन, काकडी, ढोबळी मिरची, टोमॅटो, कारली, जरबेरा, गुलाब, कार्नेशन इत्‍यादी नगदी पिके व त्‍यांचे लागवड तंत्रज्ञान एकात्‍मीक किड व्‍यवस्‍थापन, नविन नविन जातीचा शेडनेट हाऊस, पॉली हाऊस मध्‍ये लागवड करुन जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन व उत्‍पादनात वाढ करुन निव्‍वळ नफा घडवून आणणे हा हेतू असून या प्रशिक्षणातून शेत-यांना प्रोत्‍साहीत करण्‍यात येत आहे. सोबतच मुल्‍यवर्धीत व विक्री व्‍यवस्‍था सामुहिक पध्‍दतीने करणे या करीता शेतक-यांना पाच दिवस प्रशिक्षण देण्‍यात आले.
सदर प्रशिक्षणाचा लाभ घेवून शेतकरी उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत भाजीपाला, व फुल पिके घेण्‍यास इच्‍छुक आहे. व पारंपारीक पिकाला भर देवून कमी दिवसात व सुरक्षीत अशा वातावरणात जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन काढणे व उत्‍पन्‍नात वाढ घडवून आणणे हा प्रशिक्षणा मागचा हेतू आहे. सदर प्रशिक्षणा करीता उपविभागीय कृषी अधिकारी, संतोष डाबरे व किसान अधिकारी अभीयानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी शेतक-यांना प्रशिक्षण घेण्‍यासाठी मोलाचे सहकार्य केले.
                                      000000000

हिंगणघाट येथे शुक्रवारी स्‍वंयरोजगार मेळावा


वर्धा दि. 13 – हिंगणघाट येथे बेरोजगार युवक - युवतींसाठी स्‍वंय रोजगार मार्गदर्शन मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवार दिनांक 14 सप्‍टेंबर रोजी सकाळी 11.30 ते 1.30 पर्यंत शासकिय आय. टी. आय. हिंगणघाट येथे करण्‍यात आला आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांना या मेळाव्‍यामध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यांना ट्रेंनिगची आवश्‍यक्‍ता, स्‍वंय रोजगार विषयी मार्गदर्शन, विविध रोजगार विषयक माहिती देण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन जिल्‍हा उद्योग केंद्र वर्धा एम. सी. ई. डी. वर्धा मिटकॉन आणि डी. व्‍ही. टी. ओ. वर्धा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहे.
          गरजु व इच्‍छुक उमेदवारांनी सदर कार्यक्रमाचा लाभ्‍ घ्‍यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.
                                                00000

जिल्‍हास्‍तरीय महीला गट क्रीडा स्‍पर्धेच्‍या वेळापत्रकात बदल


वर्धा दि.13- जिल्‍हा क्रीडा परीषद वर्धा व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने आयोजित जिल्‍हास्‍तरीय महिला गट क्र.4 (व्‍हॉलिबॉल,कबड्डी,खो-खो) क्रीडा स्‍पर्धाचे आयोजन दिनांक 27 ते 28 सप्‍टेंबर,2012 या कालावधीत करण्‍यात येणार होते. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे सदर स्‍पर्धेचे आयोजन उपरोक्‍त कालावधीत न होता दिनांक 3 ते 4 आक्‍टोंबर,2012 या कालावधीत करण्‍यात येत आहे.
          सदर बदलाची नोंद वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शैक्षणिक संस्‍था,खेळाडूंनी,क्रीडा मंडळांनी  घ्‍यावी व आपला संघ दिनांक 3 ते 4 ऑक्‍टोंबर,2012 या कालावधीत होणा-या जिल्‍हास्‍तरीय महीला गट क्र.4 (व्‍हॉलिबॉल,कबड्डी,खो-खो) स्‍पर्धेत सहभागी व्‍हावे असे जिल्‍हा  क्रीडा अधिकारी  प्रदिप शेटिये यांनी कळविले आहे.
000000

Tuesday 11 September 2012

वर्धा जिल्‍ह्यात सरासरी 73.60 टक्‍के पाऊस; आर्वी व हिंगणघाट सर्वाधिक पाऊस


6 प्रकल्‍पात 100 टक्‍के तर 4 प्रकल्‍पात सरासरी 98 टक्‍के जलसाठा
      वर्धा, दि. 11- वर्धा जिल्‍ह्यात सरासरी  782.3 टक्‍के  पाऊस पडला असून, जिल्‍ह्यात एकूण 73.7 टक्‍के  पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत  85.4 टक्‍के  प्रत्‍यक्ष पावसाची नोंद झाली  होती.
            जिल्‍ह्यात काल वर्धा तालुक्‍यात  सर्वाधिक 71.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, देवळी 55 मि.मी., कारंजा 35 मि.मी. , आष्‍टी व आर्वी 22 मि.मी., समुद्रपूर 24 मि.मी., हिंगणघाट 36 मि.मी. तर सेलू तालुक्‍यात 20.5 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात  एकूण 286.3 मि.मी. पाऊस पडला असून, सरासरी 35.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
             मागील आठवड्यात सतत पाऊस पडल्‍यामुळे  जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यात   सेलू वगळता  सर्व तालुक्‍यात अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे  सर्व नदी व नाल्‍यांना पुर आला असून, प्रमुख सिंचन प्रकल्‍पांना पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.
       जिल्‍ह्यात सरासरी  782.3 मि.मी. म्‍हणजे  73.7 टक्‍के  पाऊस पडला आहे. आर्वी तालुक्‍यात सरासरी पेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पडलेला  एकूण पाऊस पुढील प्रमाणे आहे. वर्धा 804.6 मि.मी., सेलू 419 मि.मी., देवळी 708.3 मि.मी., हिंगणघाट 894,3 मि.मी., समुद्रपूर 877.4 मि.मी., आर्वी 1074 मि.मी., आष्‍टी  704मि.मी., कारंजा 776.4 मि.मी. एकूण सरासरी 782.3 मि.मी.. मागिल वर्षी  याच कालावधीत 906.3 मि.मी. पावसाची नोंद झाली होती म्‍हणजेच सरासरी 85.4  टक्‍के पाऊस जिल्‍ह्यात झाला होता.
                                    10 प्रकल्‍प ओव्‍हर फ्लो
            वर्धा जिल्‍ह्यातील   प्रमुख   15 सिंचन प्रकल्‍पापैकी  10 प्रकल्‍पांमध्‍ये   क्षमतेपेक्षा जास्‍त  जलसाठा निर्माण झाल्‍यामुळे  या प्रकल्‍पातून  विसर्ग सुरु झाला आहे. निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे  23 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्‍यात आले असून, उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍पाचे 9 दरवाजे 21 सेंटीमीटरने उघडण्‍यात आले आहे.
         जिल्‍ह्यातील 10 प्रकल्‍पामधून विसर्ग सुरु असून, यामध्‍ये धाम प्रकल्‍प महाकाली 100 टक्‍के  भरला असून, 119.52 क्‍युसेक पाणी  नदीत सोडण्‍यात येत आहे. पोथरा प्रकल्‍प  100 टक्‍के भरला असून, 23.18 क्‍युसेक  पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. पंचधारा प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 5.54 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. मदन उन्‍नई  प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 16.20 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. सुकळी लघु प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 12.21 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.
         वडगाव प्रकल्‍प 97.43 टक्‍क्‍े  भरला असून, या प्रकल्‍पाची  3 दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्‍यात आल्‍यामुळे 72.47 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.  उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍प   98.69 टक्‍क्‍े भरला असून, 308 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. वर्धा कारनदी प्रकलप  100 टक्‍के  भरला असून, 19.55 क्‍युसेक पाणी सोडण्‍यात येत आहे. निम्‍न वर्धा प्रकल्‍पातून 472, बेंबळा प्रकल्‍पातून 415 क्‍युसेक पाणी सोडण्‍यात येत आहे.
                                                            0000000

लेक वाचवा अभियाना अंतर्गत लिंगोत्‍तर प्रमाणाबातच्‍या फलकाचे उदघाटन


        वर्धा, दि. 11- स्त्रिभ्रृण हत्‍या होणे हा विषय समाजासाठी चिंतणाचा असून, स्त्रिभ्रृण हत्‍येला आळा बसावा यासाठी लेक वाचवा अभियाना अंतर्गत समाजात  जनजागृती करणे आवश्‍यक आहे. या अभियानाचा एक भाग म्‍हणून लक्ष्‍मी  आली घरा लिंगोत्‍तर प्रमाणा बाबतच्‍या फलकाचे उदघाटन  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांचे शुभहस्‍ते करण्‍यात आले.
      जिल्‍हा परिषद येथील आरोग्‍य विभागाच्‍या आरोग्‍य समितीच्‍या वतीने नुकतेच दिनांक (7 सप्‍टें.) रोजी फलकाचे उदघाटन  उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे , आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे, जि. सदस्‍य मोरश्‍वर खोडके, मनिषाताई वरकड, उज्‍वलाताई राऊत, व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने, महिला बालकल्‍याण अधिकारी डॉ.एस.जे. निमगडे यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.
                                                000000

मोफत आयुष निदान व उपचार शिबीर 14 सप्‍टेंबर रोजी


        वर्धा, दि. 11- राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान आयुष कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हा सामान्‍य वर्धा येथे दिनांक 14 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 9 वाजता मोफत आयुष निदान व उपचार शिबीरोच आयेाजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनवने यांनी दिली.
            या शिबीरामध्‍ये आयुर्वेदिक, होमीऑपॅथीक  व युनानी व योग निसर्ग उपचारावर तज्ञ डॉक्‍टर उपस्थित राहणार असून जुनाट आजार, वातव्‍याधी, स्त्रियांचे आजार, केसांच्‍यासमस्‍या, मुत्ररोग, पाटाचे विकास व मुत्रखडा, तारुण्‍यपिटीका, जुनाट सर्दी, भगंदर , त्‍वचारोग व इतर आजारावर दिनान व उपचार करण्‍यात येणार आहे.
           या शिबीरामध्‍ये आयुर्वेद बालरोग तज्ञ डॉ. रेणू राठी, शल्‍यचिकित्‍सक डॉ. सुभाषचंद्र वर्षने, स्त्रिरोग तज्ञ सोनाली चलाख, कार्य चिकित्‍सक डॉ. अर्चना गुंफेवार, युनानी तज्ञ डॉ. शेख , इब्राहीम वाफीक, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अनिल लोणारे व डॉ. किशोर टाले, योगतज्ञ डॉ. सुनिता वांगे, रुग्‍णांना तपासून निदान व उपचाराचा सल्‍ला देणार आहेत.
     या  शिबीराला जनतेनी मोठ्या संख्‍येने लाभ घ्‍यावा,असे आवाहन राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य सेवेचे वैद्यकीय अधिकारी संदिप नखाते यांनी केले आहे.
                                                            000000

संजय गांधी समितीची सभा 15 सप्‍टेंबर रोजी


वर्धा, दि.11- संजय गांधी  शहर विभागामध्‍ये अर्जाचे मुजंरीबाबत  समितीची सभा दि. 15 सप्‍टेंबर 2012 रोजी  सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, वर्धा येथे आयोजित केली आहे. या सभेत येताना  अर्जदारांनी सादर केलेल्‍या कागदपत्राच्‍या  मुळ प्रती घेऊन प्रत्‍यक्ष मुलाखतीकरीता हजर रहावे.
      या कामात नगरसेवक व समाजसेवक यांनी त्‍यांच्‍या प्रभागात राहणा-या लाभार्थ्‍यांना आपल्‍या स्‍तरावरुन  आवाहन करावे. असे संजय गांधी शहर विभाग समितीचे अध्‍यक्ष सुधिर पांगूळ यांनी केले आहे. असे नायब तहसिलदार शहर विभाग, वर्धा कळवितात.
                                                            0000000

पोलीस विभागातर्फे पुरस्‍कार योजना जाहीर एक गांव- एक गणपती , एक वार्ड एक गणपती


वर्धा, दि. 11- जातीय सलोखा योजना अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात एक गांव एक गणपती व ज्‍या गणेश उत्‍सव मंडळानी उत्‍कृष्‍ट देखावे तयार केले अशा संस्‍थांना पोलीस विभागातर्फे  शासनहित कार्यक्रम व जनतेच्‍या हिताचे कार्यक्रम राबविणे, जनजागरण, प्रबोधन, गांव स्‍वच्‍छतेबाबत कार्यक्रम घेवून गणेश उत्‍सव दरम्‍यान शहरात, गावांत शांतता व सुव्‍यवस्‍था राखेणेकरीता मदत करावी. सर्व गणेश उत्‍सव मंडळांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राब‍वून प्रशासनाला मदत करावी.
       त्‍याकरीता आपआपल्‍या पोलीस स्‍टेशन स्‍तरावर शांतता समिती, तंटामुक्‍ती, सामाजिक कार्यकर्ता व सर्व धर्माचे प्रतिष्ठित नागरिक यांना घेवून जातीय सलोखा समिती गठीत करण्‍यात येत आहे.
       समितीतर्फे सर्व गणेश उत्‍सव मंडळाची पाहणी करुन जातीय सलोखा येाजना अंतर्गत क्रमांक 1 व 2 क्रमांकचे गणेश उत्‍सव मंडळाना बक्षीस देवून मंडळाचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. तरी निरीक्षणा करीता येणा-या समितीला सर्वोतोपरी मदत करुन व जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राखावी असे  पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक टी.एस.गेडाम यांनी आवाहन केले आहे. 
                                                              00000

परिक्षेच्‍या कालावधीत परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


वर्धा, दि. 11- राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ, नागपूर  , विभागीय मंडळ यांचेमार्फत  दिनांक 4  ते 23 ऑक्‍टोंबर 2012 या कालावधीत उच्‍च माध्‍यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( 12 वी ची परिक्षा ) आणि दिनांक 4 ते 17 ऑक्‍टोंबर 2012 या कालावधीत माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ( 10 वी ची परिक्षा) आयोजित करण्‍यात आलेली आहे.
     सदर परिक्षांचे संचालन सुयोग्‍य प्रकारे व्‍हावे, परिक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये यासाठी परिक्षा कालावधीत वर्धा जिल्‍ह्यातील परिक्षा केंद्राचे परिसरात फौजदार प्रक्रिया स‍ंहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्‍यात आले आहे.
       जिल्‍हादंडाधिकारी  जयश्री भोज यांनी  आपल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍ह्यात होणा-या उच्‍च माध्‍यमिक व माध्‍यमिक परिक्षांसाठी दिनांक 4 ऑक्‍टोंबर ते 23 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत  परिक्षांच्‍या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात जिल्‍ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात फौजदारी  प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्‍याचा प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले आहे. सदर परिक्षांकरीता वर्धा जिल्‍हयातील  सर्व परिक्षा केंद्रांचे 100 मीटरचे परिसरात  सर्व झोरॉक्‍स, मोबाईल, एसटीडी किंवा आयएसडी, फॅक्‍स, संगणक, ई-मेल इंटरनेट इत्‍यादी ईलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी सुविधा व उपकरणांचे वापरावर व सदरबाबतची केंद्रे सुरु राहण्‍यांवर निर्ब्‍ंध , प्रतिबंध लावण्‍यात आले आहे. सदर आदेशाची  कोटेकारेपणे अंमलबजावणी करण्‍याकरीता सर्व संबंधीतांनी कटाक्षाने दक्षता घ्‍यावी. असे जिल्‍हा दंडाधिकारी यांनी काढलेल्‍या आदेशात नमुद आहे.
                                                           00000 

माजी सैनिक / पत्‍नी तसेच त्‍यांच्‍या पाल्‍यांना विशेष गौरव पुरस्‍कार


       वर्धा, दि.11- जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयातर्फे माजी सैनिक / पत्‍नी  तसेच त्‍यांच्‍या पाल्‍यांना विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्यासाठी विशेष गौरव पुरस्‍कार  योजने अतर्गत राज्‍यातून 40 पाल्‍यांना  गुणवत्‍ता यादीनुसार  पुरस्‍कृत करण्‍याची तरतूद आहे.
          ज्‍या माजी सैनिकांची पाल्‍ये वर्ष 2011-12 सत्रात  इयत्‍ता दहावी मध्‍ये 90 टक्‍के  किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण प्राप्‍त  करणे, ईयत्‍ता बारावी मध्‍ये 90 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण प्राप्‍त करणे, विविध खेळ, साहित्‍य, संगित, गायन, वादन व नृत्‍य यामध्‍ये राष्‍ट्रीय किंवा आंतरराष्‍ट्रीय पातळीवर पुरस्‍कार प्राप्‍त करणे, नैसर्गीक आपततीमध्‍ये बहुमोल कामगीरी करणे व सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्‍कार मिळविणे, कृषी क्षेत्रात भरघोस उत्‍पादन काढणा-या शेतक-यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र पुरसकाराने सन्‍मानीत करण्‍यात  येते.
            अधिक माहितीसाठी  व अर्जदारांनी कागदपत्रासह दिनांक 20 सप्‍टेंबर 2012 पर्यंत
जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात संपर्क करावे.
                                                            000000

स्‍टार स्‍वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींगचे निःशुल्‍क प्रशिक्षण


 वर्धा, दि. 11- सुशिक्षित बेरोजगार युवकांना  रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात  तसेच त्‍यांना  विविध विषयाचे प्रशिक्षण देण्‍यासाठी  ग्रामविकास मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन तसेच बँक ऑफ इंडिया यांच्‍या संयुक्‍त विदृयमाने डेरीफार्मी फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच खाद्य उद्योगा संदर्भात  निःशुल्‍क प्रशिक्षण  आयोजित करण्‍यात आले आहे.
       बँक ऑफ इंडियाच्‍या नालवाडी येथे प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये  दिनांक 21 नोव्‍हेंबर पासून या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. फोटोग्राफी  व व्हिडीओ शुटींग या संदर्भातील तीन आठवड्याचे प्रशिक्षण असून दिनांक 21 सप्‍टेंबरपासून  प्रशिक्षण सत्राला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षणासाठी   दहावी पास अथवा नापास , ग्रामीण भागातील युवकांची निवड करण्‍यात  येणार असून, उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थिची निवड प्राथमिक चर्चा करुन करण्‍यात येणार असून, प्रवेश अर्ज निःशुल्‍क असून, सात  दिवस आधी प्रशिक्षणासाठी  अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे.
       प्रशिक्षण कालावधी , निवास व्‍यवस्‍था, तसेच चहा, नास्‍ता  व भोजन विनामुल्‍य असून प्रशिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर  स्‍वःताचा   व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी बँकेत कर्ज प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
      प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करताना शाळा सोडल्‍याचा  दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्‍यास  तसे प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट छायाचित्र सादर करावे.
           खाद्यपदार्थ व प्रक्रिया उद्योगाचेही दोन आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दि. 10 ऑक्‍टोंबर पासून सुरु होत आहे. प्रशिक्षण निशुल्‍क असून निवास व भोजनाची व्‍यवस्‍था संस्‍थेतर्फे विनामुल्‍य आहे.  वर्धा जिल्‍ह्यातील युवक व युवतींनी  या प्रशिक्षण सत्रामध्‍ये सहभागी होऊन आपला उद्योग सुरु करावा. प्रभारी अधिकारी , स्‍टार स्‍वरोजगार प्रशिक्षण संस्‍था,न्‍यु आर्टस कॉमर्स कॉलेज , गर्ल्‍स हॉस्‍टेल, नालवाडी, वर्धा येथे स्विकारण्‍यात येतील. अधिक माहितीसाठी दूरध्‍वनी क्रमांक  07152- 250250 वर संपर्क साधता येतील.
                                                                      0000

Monday 10 September 2012

जिल्‍हा वार्षिक योजनेतील कामे प्राधान्‍याने पुर्ण करा - जयश्री भोज



* जिल्‍ह्यातील विकास कामासाठी 53 कोटी 92 लाख रुपये प्राप्‍त  
* विविध विकास योजनांवर 32 टक्‍के खर्च

          वर्धा, दि. 10 – वर्धा जिल्‍ह्याच्‍या सर्वांगिन विकासासाठी  जिल्‍हा वार्षिक योजनेसाठी  125 कोटी 40 लक्ष रुपये अर्थसंकल्‍पीय तरतूद करण्‍यात आली असून, त्‍यापैकी 83 कोटी 92 लाख रुपये प्राप्‍त झाले आहे. जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  प्राप्‍त झालेल्‍या  निधींचा विनीयोग विविध विकास कामासाठी  प्राधान्‍याने  करा अशा सुचना  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  आज विभाग प्रमुखांना दिल्‍यात.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे  सभागृहात वर्धा जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या  विभागनिहाय खर्चाचा आढावा जिल्‍हाधिका-यांनी घेतला त्‍याप्रसंगी  विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना त्‍या बोलत होत्‍या.
          जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत 83 कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी बीडीएस प्रणालीव्‍दारे   विभागप्रमुखांना उपलब्‍ध करुन दिला आहे. विभागप्रमुखांनी वार्षिक योजनेतील मंजूर कामे  त्‍वरीत सुरु करावी  व विभागांना मिळालेला 75 टक्‍के निधीमधून  विकासकामे  त्‍वरीत सुरु करुन मंजूर निधी  निर्धारीत कालावधीत खर्च होईल यादृष्‍टीने प्रयत्‍न करावेत अशा सुचनाही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी यावेळी दिल्‍यात.
            जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये सर्वसाधारण योजनांसाठी  62 कोटी 47 लक्ष 64 हजार रुपये  तरतूद प्राप्‍त झाली असून, बीडीएस प्रणालीव्‍दारे  विभागप्रमुखांना वितरीत करण्‍यात आली आहे.  ऑगस्‍ट अखेर पर्यंत 16 कोटी 20 लक्ष रुपये खर्च झाले असून, विभागप्रमुखांनी  मंजूर झालेला निधी  खर्च करण्‍याच्‍या दृष्‍टीने नियोजन करावे, अशा सुचनाही  श्रीमती जयश्री भोज यांनी अधिका-यांना दिल्‍यात.
      अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत   5 कोटी  86 लक्ष 70 हजार रुपये निधी प्राप्‍त झाला आहे तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजने अंतर्गत  15 कोटी 57 लक्ष 85 हजार रुपयाचा निधी प्राप्‍त झाला असून यापैकी  8 कोटी 62 लक्ष 86 हजार  रुपये विभागप्रमुखांना वितरीत करण्‍यात आला आहे.
          जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगिन विकासासाठी  जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये    प्राधान्‍यक्रमाने कृषी व संलग्‍न सेवेसाठी  16 कोटी 16 लक्ष 60 हजार रुपये , ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत 20 कोटी  25 लक्ष 97 हजार रुपये, वाहतूक व दळणवळण योजने अंतर्गत 22 कोटी  60 लक्ष 2 हजार  रुपये तसेच  सामाजिक व सामुहिक सेवासाठी 52 कोटी 97 लक्ष 94 हजार रुपये, तसेच पाटबंधारे विकास,  विदृयूत विकास, उद्योग विकास, सर्वसाधारण आर्थिक सेवा आदि विभांगासाठी  125 कोटी 40 लक्ष रुपयाचा अर्थसंकल्‍पीय तरतूदीपैकी 83 कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी  प्राप्‍त झाला असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज  यांनी सांगितले.
          विभागप्रमुखांना बिडीएस व्‍दारे जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधी वितरीत करण्‍यात आला असून, विभाग प्रमुखांनी  वार्षिक खर्चानुसार कॅशफ्लो प्रमाणे उपलब्‍ध होणारा निधी त्‍याच महिन्‍यात  खर्च करावा अशा सुचना करताना  प्रत्‍येक कामांना  तांत्रिक  तसेच प्रशासकीय मंजूरी  घेवूनच खर्चाचे नियोजन करावे, असेही  यावेळी जिल्‍हाधिकारी श्रीमती  भोज यांनी स्‍पष्‍ट  केले.
       प्रारंभी जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी  स्‍वागत करुन वर्धा जिल्‍हा  वार्षिक योजनांसाठी अर्थसंकल्‍पीय तरतूद  तसेच या निधीच्‍या 80 टक्‍के    निधी  विभागप्रमुखांना बिडीएस व्‍दारे वितरीत करण्‍यात आला असला तरी एकूण उपलब्‍ध  झालेल्‍या निधीपैकी  विभागप्रमुखांनी 75 टक्‍के मर्यादेपर्यंतच खर्च करण्‍याचे निर्देश वित्‍त विभागाने दिले असल्‍याचे यावेळी सांगितले.
      यावेळी विभागातील सर्व वरिष्‍ठ अधिकारी  उपस्थित होते.
                                        0000000

बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल सायन्‍स रेल्‍वे एक्‍स्‍प्रेस वर्धेला येणार


     
* समृध्‍द जैवविविधतेचे अनोखे दर्शन
* विदर्भातील अभ्‍यासकांना सुवर्ण संधी
* विशेष वातानूकुलीत रेल्‍वेचे ऑक्‍टोंबरमध्‍ये आगमण
* राज्‍यात केवळ पांच रेल्‍वे स्‍थानकावरच प्रदर्शन पाहण्‍याची संधी

       वर्धा, दि. 10- भारतातील समृध्‍द जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या  दृष्‍टीने   जैवविविधते संबंधी  परिपूर्ण माहिती असलेले  अनोखे प्रदर्शन  सायन्‍स एक्‍स्‍पेस –     बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल  ही  सोळा वातानुकूलीत  डब्‍बे असलेल्‍या  रेल्‍वे गाडीचे आगमण  20 ऑक्‍टोंबर रोजी    सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर  होत आहे.
         राज्‍यात  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  ही स्‍पेशल रेल्‍वे गाडी केवळ पाच  रेल्‍वे स्‍थानकावरच थांबणार असून, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला जिल्‍ह्यातील  पर्यावरण प्रेमी , शिक्षक तसेच विद्यार्थ्‍यांनाही  देशातील समृध्‍द जैवविविधतेची माहिती जाणून घेण्‍याची  सुवर्ण संधी उपलब्‍ध होणार आहे. सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर या विशेष  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  दिनांक 20 ऑक्‍टोंबर ते 22 ऑक्‍टोंबर पर्यंत थांबणार असून, सोळा  वातानुकूलीत  रेल्‍वे  कोचमध्‍ये  असलेले  प्रदर्शन सकाळी  10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धेकरांना व विदर्भातील पर्यावरण प्रेमींना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन निःशुल्‍क राहणार असल्‍याची   माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे  यांनी दिली.
      देशातील   22 राज्‍यामधील  निवडक आणि महत्‍वाच्‍या  52 रेल्‍वे स्‍थानकावर जैवविविधते संदर्भात प्रदर्शन पाहण्‍याची संधी मिळणार असून, यामध्‍ये राज्‍यातील खडकी (पुणे ), मुंबई (सीएसटी), नागपूर  आणि सेवाग्राम (वर्धा) या रेल्‍वेस्‍थानकावर  विशेष  सायन्‍स  एक्‍स्‍प्रेस  रेल्‍वे  थांबणार आहे. 11 व्‍या कॉन्‍फरन्‍स   ऑफ  पार्टीजचे यजमान पद  भारताने  स्विकारले असून, या निमित्‍याचे  औचित्‍य साधून   समृध्‍द  जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने  व जैवविविधतेची माहिती पोहचविण्‍यासाठी  16 वातानूकुलीत डब्‍बे असलेली  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस बायोडायव्‍हरसिटी   ही रेल्‍वे जून ते डिसेंबर  या दरम्‍यान संपूर्ण भारतात भ्रमंती करणार आहे.
          विदर्भातील विशेषतः वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनीही   या प्रदर्शनीस भेट द्यावी, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचाकल प्रविणकुमार बडगे  यांनी केले आहे. 
                                                00000