महिलांनी उद्योग उभारुन आर्थिक परिस्थिती बदलावी
-
जिल्हाधिकारी शैलेश नवाल
Ø वर्धिनी स्नेह
संम्मेलन कार्यक्रम
वर्धा,दि.4 – महिलांनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभाआहे. त्या
सर्व प्रकारचे कामे सहज करु शकतात. बचतगटाच्या माध्यमातून वर्धेतील महिला इतर
जिल्ह्यात मास्टर ट्रेनर म्हणून काम करित आहेत. त्यामुळे महिलांनी आता
बचतगटाच्या माध्यमातून उद्योग सुरु करुन स्वःताची व गावाची आर्थिक परिस्थिती
बदलवावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अर्तगत वर्धीनी स्नेह समेलन कार्यक्रम
विकास भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.
नवाल बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे,
राजेद्र बरडे वर्धीनी कक्ष प्रमुख अमोलसिंग रोटेल उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, नैसर्गिकरिता पैशाचे
अधिकार महिलांना दिले आहे. जिल्ह्यात एक लाख महिलांचे संघटन आहे. त्यामुळे महिला
बचत गटानी तयार केलेली वस्तू या संघटनाच्या माध्यमातून विक्री केल्यास मोठी
बाजारपेठ जिल्ह्यातच उपलब्ध होईल. त्यामुळे महिलांनी मिशन म्हणून आव्हान
स्विकारुन आपला गावातील प्रत्येक महिला सदस्या मध्ये उद्योग उभारण्यासाठी अग्नी
प्रज्वलीत करावा, असे आवाहन त्यांनी
यावेळी केले.
यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे म्हणाल्या,
बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन तयार झाले आहे. ज्याप्रमाणे महिला आपल्या
जिल्ह्यातील बचटगटाच्या महिला काम करित आहेत तसे काम इतरत्र कोणत्याच जिल्ह्यात
पाहयला मिळत नाही. महिलांवर स्वच्छतेची आणखी एक जबाबदारी द्यायची आहे. बचतगटातील
प्रत्येक महिलेने गांवातील पाच कुंटुबाना शौचालय बाधणे आणि वापरण्यासाठी प्रात्साहित
करावे आणि आपल्या जिल्ह्याला उघड्यावरील शौचापासून मुक्ती देण्यासाठी या
अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी महिला बचट गटामधील कृषीसखी, पशुसखी, बॅकसखी तसेच
संघटिका आणिवर्धीनी म्हणून काम करणा-या महिलांनी त्यांचे अनुभव कथन केले. वर्धा
जिल्ह्यातील बचट गटाच्या माध्यमातून पुढे आलेल्या आणि वर्धीनी म्हणून उत्कृष्ट
काम करित असलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
करताना देवकुमार कांबळे यांनी वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियाना अर्तगत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष येथे प्रायोगिक तत्वावर
वर्धीनीचे कक्ष उघडण्यात आलेले आहे. या कक्षा मार्फत वर्धीनीचे समूह संसाधन असे
कॅडर तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 240 वरिष्ठ आणि 140 कनिष्ठ वर्धीनी
तयार झाल्या असून इतर जिल्ह्यात या वर्धीनी मास्टर ट्रेनर म्हणून सामाजीक
समावेशन व संस्थामक बांधनी करिता प्रशिक्षण देण्याकरिता जातात. आतापर्यंत
यवतमाळ, गोंदिया, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यामध्ये
वर्धिनीनी प्रशिक्षण दिले आहे.
या कार्यक्रमाचे संचालन मिनाश्री अटकुलवार तर आभार अमोल
सिंग रोटेल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वर्धीनी आणि त्याच्या
परिवारातील सदस्य उपस्थित होते.
00000000