Saturday 3 November 2012

सर्वांगीन विकासाला चालना देणा-या योजनांचा समावेश जिल्‍हा वार्षिक योजनेत करा - एन.नविन सोना


                              

   *  पुढील वर्षासाठीच्‍या वार्षिक योजनेचा आराखडा तयार
   * बैठकींना अनुपस्थित अधिका-यांविरुध्‍द कडक कारवाई
   * विभाग प्रमुखांकडून 120 कोटी 13 लक्ष रुपयाचे प्रस्‍ताव सादर
   * लघु गटातर्फे जिल्‍हा वार्षिक योजनेला मान्‍यता  

          वर्धा, दि. 3- जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभुत ठरणा-या  तसेच वैयक्तिक लाभाच्‍या  योजनांसाठी  आवश्‍यक असलेल्‍या निधी मागणीचे प्रस्‍ताव विभाग प्रमुखांनी  तात्‍काळ  जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  समावेश करण्‍यासाठी  सादर करावेत. अशा सूचना जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी आज दिल्‍यात.
          जिल्‍हा वार्षिक योजनेसारख्‍या  महत्‍वाच्‍या  बैठकांना अनुपस्थित असलेल्‍या  अधिका-यांबद्दल  तीव्र  नाराजी व्‍यक्‍त करुन अशा अधिका-यांबाबतची माहिती  संबधीत विभागप्रमुख व सचिवांना  कळविण्‍याच्‍या  सुचनाही  जिल्‍हाधिकारी यांनी सुचना केली.
          जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात जिल्‍हा वार्षिक योजना 2013-14 साठी सर्व साधारण प्रारुप आराखड्याची  लघुगटाव्‍दारे  छाननी करण्‍यासाठीची बैठक  एन. नविन सोना यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  तसेच लघु गटाचे प्रमुख आमदार सुरेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आली होती.
          यावेळी  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प संचालक गिरीश सरोदे, जिल्‍हा  नियोजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच  सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  विभागप्रमुखांकडून  विविध विकासकामांबाबत प्रस्‍ताव  सादर करताना  लाभार्थ्‍यांना  होणारा वैयक्तिक लाभ तसेच जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभूत ठरणारे उपक्रमांचा समावेश  करतानाच या योजनांच्‍या  अंमलबजावणी  बाबतही    सविस्‍तर  अहवाल  तयार करण्‍याच्‍या  सूचना करतानाच उपलब्‍ध  झालेला निधी  निर्धारीत कालावधीत  खर्च करण्‍याचे  नियोजनही  करावे, असेही  जिल्‍हाधिका-याने यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
            120 कोटी  13 लक्ष रुपये खर्चाचे प्रस्‍ताव सादर
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  सर्वसाधारण योजनांसाठी  शासनाने  79 कोटी 19 लक्ष रुपायाच्‍या  कमाल आर्थिक  मर्यादेत निश्चित केली असून, अंमलबजावनी अधिका-यांनी  120 कोटी  13 लक्ष 94 हजार रुपयाच्‍या नियोजनाचे  प्रस्‍ताव  सादर केले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून प्राप्‍त   झालेल्‍या  प्रस्‍तावावर विभागनिहाय यावेळी  चर्चा करण्‍यात आली.  वार्षिक नियोजन आढावा बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याचा   अंतीम आराखडा निश्चित होणार आहे.                                               
       प्रारुप वार्षिक योजनेमध्‍ये  कृषी व संलग्‍न सेवेसाठी  10 कोटी 29 लक्ष 82 हजार रुपये  कमाल नियतव्‍यय  मंजूर आहे. ग्रामविकास कार्यक्रमासाठी  14 कोटी रुपये,पाटबंधारे विकासासाठी  5 कोटी 17 लक्ष 33 हजार रुपये  तसेच वाहतूक व दळणवळणासाठी  16 कोटी  11 लक्ष 72 हजार रुपये  याप्रमाणे  विविध विभागांसाठी  कमाल मर्यादेत निधी  मंजूर करण्‍यात आला आहे.  तसेच  अंमलबजावनी अधिका-यांकडून प्रस्‍तावित निधी  बाबतही  राज्‍यस्‍तरीय बैठकीसमोर सादरीकरण करण्‍यात येणार असलयाची माहिती  जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिली.
            अनुसूचित जाती उपाय योजने अंतर्गत सन 2013-14 साठी 28 कोटी  71 लक्ष रुपये कमाल आर्थिक मर्यादेत प्रस्‍ताव  मंजूर करण्‍यात आले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून 31 कोटी 59 लक्ष 65 हजार रुपये  खर्चाचे प्रस्‍ताव  सादर केले आहेत. आदिवासी उपययोजने अंतर्गत 22 कोटी 23 लक्ष रुपये  आर्थिक मर्यादा निश्चित केली असून, विविध यंत्रणांकडून  36 कोटी रुपयाचे प्रस्‍ताव सादर झालेले आहे. अतिरीक्‍त मागणी बाबत राज्‍य समिती समोर प्रस्‍ताव  ठेवण्‍यात येणार आहे.
प्रारंभी  जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी  स्‍वागत करुन  जिल्‍हा वार्षिक योजना  2013-14 साठीच्‍या  प्रारुप आराखड्याची  तसेच विविध विभागांकडून प्राप्‍त झालेल्‍या   अतिरीक्‍त प्रस्‍तावाची  माहिती दिली.  
आमदार सुरेश  देशमुख  यांनी  रस्‍ते, पाणी तसेच  कृ‍षी  विभागा संदर्भातील अपूर्ण  योजना प्राधान्‍याने  पूर्ण  करण्‍यावर  विशेष  भर विभागप्रमुखांनी द्यावा तसेच  नवीन कामांसाठी निधीची  मागणी करताना  वैयक्तिक लाभाच्‍या योजनांचा   प्राधान्‍याने  समावेश करावा, अशी सुचना केली.
 मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती  दिली. ग्रामीण भागात पिण्‍याचे पाणी ,दळणवळण,शाळांची  विशेष दुरुस्‍ती  व आरोग्‍य सेवेसाठी  अतिरीक्‍त  निधी  मंजूर करण्‍याची सुचना यावेळी केली.
जिल्‍ह्यातील  सर्व कार्यालयांचे हायर ऑडीट तात्‍काळ पूर्ण करुन त्‍या संबधीचा अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी नगर परिषदांनी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्‍यासाठी प्राधान्‍य देऊन महत्‍वाच्‍या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सज्ज  राहील यादृष्‍टीने खबरदारी घेण्‍यात  यावी. असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
बैठकीत जिल्‍ह्यातील विविध अंमलबजावनी यंत्रणांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
                                                     000000

डेंग्‍यू आजाराच्‍या नियंत्रणासाठी विशेष कक्ष सुरु - एन.नविन सोना




            * डास निर्मुलनासाठी  शहरात तसेच ग्रामीण भागात विशेष मोहीम
                     * डेंग्‍यू  प्रतीबंधात्‍मक उपाययोजना प्राधान्‍याने  राबवा
            * पाणी स्‍वच्‍छतेसाठी  प्रत्‍येकाने ड्रायडे सक्‍तीने पाळा
            * 54 गावांमध्‍ये  विशेष  तपासणी मोहीम    

            वर्धा,दि. 3- डेंग्‍यूसह  किटकजन्‍य आजाराच्‍या   प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  जिल्‍हा  आरोग्‍य  अधिकारी  यांच्‍या  नियंत्रणाखाली  विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून, प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  ग्रामीण व शहरी भागात  साचलेले पाणी , अस्‍वच्‍छता  निर्मूलनासह जनतेमध्‍ये  आरोग्‍याविषयी  जागृती निर्माण करण्‍यासाठी  विशेष  मोहीम  सुरु करण्‍यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी एन.नविन सोना यांनी आज दिली.
           डेंग्‍यूसह किटकजन्‍य  आजारामुळे  जिल्‍ह्यात  23 रुग्‍ण  बाधीत झाले असून, बाधीत रुग्‍णांवर  तात्‍काळ  औषधोपचारासह  इतर  उपाययोजनांचा  आढावा वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकीत जिल्‍हाधिका-यांनी घेतला. यावेळी  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.माने,  जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक मिलींद सोनवने , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी  आर.एम.भुयार, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी  यावेळी उपस्थित होते.
          शहरी व ग्रामीण भागात साचलेल्‍या  पाण्‍यामुळे  व अस्‍वच्‍छतेमुळे  डासांचा प्रादुर्भाव होत आहे. यावर नियंत्रणासाठी  फॉगिंग मशीनने तसेच फवारणी करुन डास निर्मूलनाची  मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी  अशी सुचना करताना  जिल्‍ह्यात  ज्‍या गावांमध्‍ये  डेंग्‍यूचे  रुग्‍ण  आढळून  आले त्‍या गावामधील  प्रत्‍येक  घरातील  सदस्‍यांची  आरोग्‍य  तपासणी करुन  आवश्‍यक  औषधोपचार  करावा अशा सुचना  करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना  म्‍हणाले की प्रत्‍येक   गावात तसेच नगर परिषद क्षेत्रात   पाणी  साठवूण राहणार नाही तसेच आठवडृयातून  एक  दिवस सक्‍तीने ड्रायडे पाळण्‍याबाबत  विशेष मोहीम राबवावी .
        जिल्‍हा स्‍तरावर नियंत्रण कक्ष   तयार करुन  जिल्‍हा आरोग्‍य  अधिकारी  व जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक यांनी  वैद्यकीय  संघटनांचे प्रतीनिधी  व खाजगी  रुग्‍णालयांचे  सहकार्य घेवून   ताप येणा-या  तसेच साथीची  लागण झालेल्‍या   प्रत्‍येक  रुग्‍णांची रक्‍त तपासणी होईल व त्‍याची  नोंद ठेवून औषधोपचार  नियमित मिळेल याची  खबरदारी घ्‍यावी.                                            
            साथ रोगाबाबत ज्‍या गावांमधून  रुग्‍ण  आढळले तसेच नवीन रुग्‍णांची  माहिती घेऊन खाजगी रुग्‍णालयात सुध्‍दा दाखल होणा-या  रुग्‍णांबाबतही  औषधोपचारावर नियंत्रण  ठेवावे तसेच  हातपंप, सार्वजनिक नळ येाजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे विविध स्‍त्रोत या परिसरात  पाणी साचणार नाही याची दक्षता घ्‍यावी. व स्‍वच्‍छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना द्यावे अश्‍या सुचनाही जिल्‍हाधिकारी यांनी केल्‍यात.
          हिंगणघाट येथे साथ रोगाचे सर्वाधिक रुग्‍ण आढळले असून इतर जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये फवारणी तसेच जनजागृती करीता विशेष ग्रामसभा घेऊन जनतेचा सहभागही घ्‍यावा. अशा सुचना करताना   वर्धा शहरामध्‍ये  विविध वस्‍त्‍यांमध्‍ये    फॉगिंग मशीनने धुरळणी करावी यासाठी  जिल्‍हा परिषदेकडे असणा-या मशीन उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशा सुचनाही यावेळी करण्‍यात आल्‍या.
          ग्रामीण भागात अस्‍वच्‍छ  वातावरणामुळे  डासांची उत्‍पत्‍ती   होते अशा ठिकाणी विशेष स्‍वच्‍छता  मोहीम राबवावी  अशा सुचनाही  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी ग्राम पंचायतींना दिल्‍यात. यासाठी ग्रामपंचायतींना जबाबदार धरण्‍यात येईल असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
           डेंग्‍यूसह साथीच्‍या आजारासाठी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हा  शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद  सोणवने यांनी दिली.
                                                00000000

शेतक-यांच्‍या प्रश्‍नासह महत्‍वाच्‍या योजना लोकांपर्यंत पोहचविण्‍यावर - एन.नविन सोना भर नव्‍या जिल्‍हाधिका-यांनी पदभार सांभाळला


          वर्धा, दिनांक 2 – वर्धा जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासासाठी  आवश्‍यक असलेल्‍या  सर्व योजना प्रभावीपणे  राबविण्‍यासोबतच शेतक-यांच्‍या  प्रश्‍नाला  प्राधान्‍य देवून महत्‍वाच्‍या योजना  जनतेपर्यंत  पोहचविण्‍यासाठी  अग्रक्रम राहणार असल्‍याची  ग्‍वाही  वर्धा जिल्‍ह्याचे  नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी  जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  दिली.
       भारतीय  प्रशासकीय सेवेतील 2000 बॅचचे  असलेले एन.नविन सोना हे अभियांत्रीकी शाखेतील पदवीधर असून, ते चेन्‍न्‍ई येथील रहिवाशी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत पदार्पण केल्‍यानंतर  उपविभागीय अधिकारी रत्‍नागीरी  येथून  शासकीय सेवेला सुरुवात केली असून, औरंगाबाद येथे  विक्रीकर विभागाचे  सहआयुक्‍त , औरंगाबादचे अपर आयुक्‍त काम केल्‍यानंतर  2009 मध्‍ये त्‍यांची  अमरावती येथे  अपर आयुक्‍त या पदावर नियुक्‍ती  करण्‍यात आली.  अमरावती येथे  विभागीय आयुक्‍त तसेच जिल्‍हाधिकारी या पदाचाही अतिरीक्‍त कार्यभार सांभाळला असून, अमरावती  महानगरपालीकेचे आयुक्‍त पदावरही त्‍यांनी  काम केले आहे. नुकतेच नागपूर येथे संचालक वस्‍त्रोद्योग या पदावर  एन.नविन सोना यांची शासनाने नियुक्‍ती  केली होती.   
            जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांची  उत्‍तर प्रदेश प्रशासनामध्‍ये  प्रतीनियुक्‍तीवर  बदली झाल्‍यामुळे  एन.नविन सोना यांनी  वर्धाचे जिल्‍हाधिकारी पदाचा आज कार्यभार स्विकारला आहे.
           जिल्‍हाधिकारी पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  वर्धा जिल्‍ह्याचे  विशेष प्रश्‍न समजावून घेवून  ते सोडवून घेण्‍यासाठी  माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्‍यावर विशेष भर राहणार असल्‍याचे सांगितले. जीआयएस बेस या आधुनिक तंत्राचा वापर करण्‍यात   येणार असल्‍याचे सांगतांना  एन.नविन सोना म्‍हणाले की, वर्धा जिल्‍ह्यात  औद्योगिक विकासाला चालना देणे तसेच शासनाच्‍या  विविध योजनांसाठी  शासनाकडून  जास्‍तीत जास्‍त  निधी उपलब्‍ध  होईल या दृष्‍टीने प्रयत्‍न असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
             वर्धा जिल्‍ह्यात  आधार कार्ड नोंदणी  राज्‍यात  सर्वाधिक झाली असून, ई-सेवेच्‍या माध्‍यमातून शेतकरी  व सामान्‍य जनतेला जलद व प्रभावी सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विशेष भर असल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना यांनी  यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
           मावळत्‍या जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज  यांनी  एन.नविन सोना यांना जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे प्रदान केली तसेच त्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ  देवून  स्‍वागत केले. व नव्‍या पदासाठी  शुभेच्‍छा दिल्‍यात.
                                                            00000

Wednesday 31 October 2012

शेतक-याची फसवणूक टाळण्‍यासाठी शेती साहित्‍यांची किंमत निश्चित करणार - राधाकृष्‍ण विखे पाटील


        वर्धा दि.31- शेतीसाठी लागणा-या  साहित्‍याची किंमत निश्चित नसल्‍यामुळे शेतक-यांना अवास्‍तव किंमत देवून शेती हंगामासाठी साहित्‍य खरेदी करावे लागते यामध्‍ये शेतक-यांची फसवणूक होत असल्‍यामुळे शेतीसाठी लागणा-या सर्व साहित्‍यांची किंमत निश्चित करण्‍यात येणार असल्‍याची घोषणा कृषी व पणनमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली .
           बोरगांव मेघे येथील औषधशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या प्रांगणात  दत्‍ता मेघे आयुर्विज्ञाण संस्‍थांन अभिमत विद्यापिठाच्‍या गुलगुरुपदी डॉ. दिलीप गोडे यांची नियुक्‍ती झाल्‍याबद्दल आयोजित अभिनंदन सोहळा तसेच कृषी विभागातर्फे ठिंबक तृषार योजनेतील लाभार्थ्‍यांना धनादेश व कृषी तारण योजनेच्‍या  भिंतीचित्राचे प्रकाशण राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
         यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नागपूर सुधार प्रन्‍यासचे विश्‍वस्‍त अंनंतराव घरड, राधिकाबाई मेमोरीयल ट्रसचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, माजी आमदार डॉ.राजेंद्र गोडे, डॉ.शिरीष गोडे, प्रा. डॉ. भरत मेघे, कुलगुरु डॉ. दिलीप संतोषराव गोडे, डॉ.सौ. सुरिंदर गोडे, युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे, बबणराव तायवाडे, शेखर देशमुख आदि व्‍यासपिठावर उपस्थित होते.
          डॉ.दिलीप संतोषराव गोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करुण मिळविलेले ज्ञानाचा  समाजातील अत्‍यंत गरीब व्‍यक्‍तींसाठी लाभ होणार असून सामाजिक जाणीव व शेतकरी व शेतमजूरांबद्दल त्‍यांची बांधिलकी असल्‍याचे सांगतांना कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञाणाचा लाभ शेतक-यांना करुण देण्‍यासाठी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊण प्रात्‍याक्षिक करण्‍याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली.
          शेतक-यांना शेती संदर्भात मार्गदर्शन करतांनाच शेतक-यांना बीयाणे, खत व शेतीसाहित्‍य योग्‍य दरात उपलब्‍ध करुण देण्‍यासाठी नवीन धोरण आखण्‍यात येत असून या धोरणामध्‍ये शेतक-यांची कुठेही फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्‍यात येणार आहे.
कृषी व पणन  हे दोन्‍ही विभाग एकत्र असल्‍यामुळे कृषी उत्‍पादनाला प्रोत्‍साहन देण्‍यासोबतच कृषी मालाला योग भाव मिळण्‍यासाठी मदत होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले कृषी व पणन विभागातील अधिका-यांनी पारदर्शकपणे काम करावे तसेच प्रत्‍यक्ष फिल्‍डवर जावून पाहणी करावी व त्‍यानुसार शेतक-यांना मदत करावी अशी सूचनाही कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी यावेळी केली                                 
दत्‍ता मेघे आयुविज्ञाण अभिमत विद्यापिठाच्‍या कुलगुरुपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल दिलीप संतोषराव गोडे यांचा शाल श्रीफळ, व भेट वस्‍तू देवून कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी गौरव केला. यावेळी डॉ. श्रीमती सुरिंदर गोडे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
नागपूर सुधार प्रन्‍याचे विश्‍वस्‍त अनंतराव घारड,राधाकीबाई मेमोरीयलचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, आमदार विजय वडट्टीवार, डॉ.राजेंद्र गोडे, यांचे यावेळी डॉ. दिलीप गोडे यांची गुलगुरुपदी निवड झाल्‍याबद्दल अभिनंदनपर भाषणे झाली.
युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे यांनी  स्‍वागत करुण प्रास्‍ताविक भाषणात डॉ. दिलीप गोडे यांच्‍या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी पाहुण्‍यांचा परिचय करुण दिला.
जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाडे यांनी शेतक-यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या कृषी तारण योजनेच्‍या पुस्तिकेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदिप मेघे तर आभार प्रदर्शन डॉ. शिरीष गोडे यांनी मानले. यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,बोरगांव मेघे ग्रामपंचायतचे सरपंच देवानंदजी दखणे, अविनाश देशमुख, राजेश तरारे, सौ.भारती गोडे, प्रदिप मेघे, अर्चनाताई मेघे, अरुणभाऊ वसू तसेच विविध क्षेत्रातील गणमान्‍य व्‍यक्‍ती विविध संस्‍थांचे पदाधिकारी ,लोप्रतिनिधी,शेतकरी मोठयासंखेने उपस्थित होते.
00000                  

Tuesday 30 October 2012

पंचायत युवा क्रीडा स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍तरावर संधी


                          * जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धामध्‍ये 450 खेळाडूंचा सहभाग
वर्धा दि.30- पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूसाठी   आयोजित जिल्‍हास्‍तरीय विविध क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये 450 विद्यार्थ्‍यांने सहभाग घेतला असून कुस्‍ती, वेठलिप्‍टींग, टायक्‍योदो,फुटबॉल कबड्डी, आदि स्‍पर्धामधून आपले नैपूण्‍य सिध्‍द केले.
            वर्धा जिल्‍हा स्‍टेडियमवर जिल्‍हा स्‍तरीय पायका स्‍पर्धांचा शुभारंभ झाला.या स्‍पर्धांमध्‍ये आठ तालुक्‍यातून ग्रामीण भागातील विविध शाळातील 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. क्रीडा स्‍पर्धांचे उदघाटन जिल्‍हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य यॅथेलॅटिक्‍स असोशिएशनचे अध्‍यक्ष रमेश कटे, वर्धा जिलहा कुस्‍तीगीर परिषदेचे चंद्रशेखर महाजन, पायकांदो असोशिएशनचे अध्‍यक्ष उल्‍हास वाघ ,जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटेय उपस्थित होते.
            ग्रामीण भागात प्राथमिक स्‍वरुपाच्‍या क्रीडा सुविधा निर्माण करुण ग्रामीण युवकांना विविध खेळांच्‍या माध्‍यमातून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरापर्यंतच्‍या स्‍पर्धामध्‍ये संधी उपलब्‍ध करुण देण्‍यासाठी पायका मार्फत ग्रामीण,तालुका व जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धांचा लाभ ग्रामीण खेळाडूंना उपलब्‍ध होत असल्‍याचे सांगतांना उदघाटनपर भाषणात जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अभ्‍यासासोबतच क्रीडास्‍पर्धांमध्‍येही हिरेरीने भाग घेवून आपले नैपुण्‍य सिध्‍द करावे असे सांगितले.
            पायका क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये मुलांपेक्षा मुलींचा सहभाग लक्षणिय असून वर्धा जिल्‍हा विविध क्रीडा प्रकारामध्‍ये राज्‍यस्‍तरावर उल्‍लेखनिय योगदान राहील असा विश्‍वासही अनिल गडेकर यांनी व्‍यक्‍त केला.
            जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविक भाषणात पायका जिल्‍हा क्रीडा स्‍पर्धांच्‍या आयोजनाची माहिती दिली. या स्‍पर्धांमध्‍ये पाच क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्‍यात आले असून 16 वर्षाखालील मुले व मुली सहभागी झाली आहे.जिल्‍हा  स्‍तरावर तालुकास्‍तरावरुन निवड झालेल्‍या खेळाडूसाठी स्‍पर्धा घेण्‍यात येत असून सर्व ग्रामपंचायतीने या क्रीडा स्‍पर्धात व उपक्रमात सहभागी व्‍हावे असेही त्‍यांनी सांगितले. दोन गटात आयोजित या स्‍पर्धामध्‍ये पहिल्‍या गटात मैदानी स्‍पर्धा,कुस्‍ती,वेटलिप्‍टींग,तायक्‍योंडो व फुटबॉल या खेळासाठी 16 वर्षाखालील मुला-मुलींचा सहभाग असून दुस-या गटात कबड्डी,खोखो, हॉलीबॉल, धर्नुविद्या,सायकलींग, आदि खेळांचा समावेश आहे.
            कार्यक्रमाचे संचालन चारुदत्‍त नाकट यांनी केले.यावेळी तालुका संयोजक ईश्‍वर वानकर,सुरेश चामचोर, सुधाकर वाघमारे, घनशाम वरारकर, अनिल बोरवार विविध गावांचे सरपंच,ग्रामस्‍थ व खेळाडू आदि उपस्थित होते.
0000
              

धान्‍य हमी योजना आता राष्‍ट्रीयस्‍तरावर -अनिल देशमुख


           *  10 हजार गावांमध्‍ये योजनेची अंमलबजावणी सुरु
                 *  3 महिन्‍याचे धान्‍य एकाचवेळी
                 *  प्रत्‍येक महिन्‍याची 7 तारीख अन्‍न दिवस
वर्धा दि.30- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत वितरीत करण्‍यात येणारे धान्‍य कार्ड धारकांना थेट गावात उपलब्‍ध करुण देणारा धान्‍य हमी योजना हा  महत्‍वकांक्षी उपक्रम केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात राबविला जाणार असल्‍याची माहिती राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
          कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत वितरीत करण्‍यात येणारे धान्‍य कमी मिळणे तसेच इतर प्रकारच्‍या तक्रारी नेहमी प्राप्‍त होत असल्‍यामुळे धान्‍य हमी योजना हा अभिनव उपक्रम प्रायोजिक तत्‍वावर 400 गावामध्‍ये राबविण्‍यात आला होता या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्‍यामुळे राज्‍यातील 10 हजार गावामध्‍ये धान्‍य हमी योजना राबविण्‍यात आली. आता ही योजना संपूर्ण राज्‍यामध्‍ये राबविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिली.
          राज्‍य शासन राबवित असलेल्‍या धान्‍य हमी योजनाचे सादरीकरण केंद्रीयमंत्री व संबंधित विभागांच्‍या वरिष्‍ठ अधिका-यासमोर करण्‍यात आले असून या योजनेची उपयुक्‍तता लक्षात घेवून ही योजना संपूर्ण देशात राबविण्‍याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
          सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत तालुका व ग्रामीण भागातील गोदामापर्यंत धान्‍याची वाहतूक करण्‍यात येते परंतु तालुक्‍यातील गोदामापासून रास्‍तभाव दुकानापर्यंत ची वाहतूक होत असतांना धान्‍य इतर ठिकाणी वळविणे,संपूर्ण धान्‍यसाठा अपेक्षीत ठिकाणी न पोहचणे आदि तक्रारींवर धान्‍य हमी योजना राबविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
          या योजनेच्‍या कार्उधारकांना 3 महिन्‍याचे  धान्‍य एकाचवेळी वितरीत करणे,प्रत्‍येक महिन्‍याच्‍या 7 तारखेस अन्‍न दिवस पाळणे 8 ते 15 तारखेपर्यंत अन्‍न सप्‍ताह अंतर्गत अन्‍न महामंडळाचे गोदाम ते गावाच्‍या चावडीपर्यंत धान्‍य वाहतूक करणे व चावडीवरच कार्ड धारकांना धान्‍याचे वाटप करणे धान्‍य वाटपाची पूर्ण सूचना म्‍हणून गावातील कमीत कमी 25 व्‍यक्‍तींना एसएमएस करण्‍यासोबतच धान्‍य वातूक करणा-या ट्रकला हिरवा रंग देण्‍याचा निर्णयही घेण्‍यात आला असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
0000

निवृत्‍ती वेतन धारकांनी कोषागारात


        वर्धा दि.-30 वर्धा कोषागार कार्यालया अंतर्गत सर्व निवृत्‍ती वेतन व कुटूंब निवृत्‍ती वेतन धारकांनी सन 2012-13  करीता हयातीचे, पुर्नविवाह व पुनर्नियुक्‍ती बाबत प्रमाणपत्र संबंधित बँक शाखा व्‍यवस्‍थापक यांच्‍या स्‍वाक्षरीने माहे 15 नोव्‍हेंबर, 2012 पर्यन्‍त वर्धा कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्‍यक आहे.पुनर्नियुक्‍ती निवृत्‍ती वेतन धारकांनी प्रमाणपत्र स्‍वतंत्र विहित नमून्‍यात भरुन सादर करावे.
   शासन निर्णय दिनांक 18 ऑगष्‍ट,2008 नुसार ज्‍या निवृत्‍ती वेतन, कुटूंब निवृत्‍ती वेतन धारकांचा हयातीचा, पुर्नविवाह व पुनर्नियुक्‍ती बाबत दाखला विहित मुदतीत प्राप्‍त होणार नाही त्‍यांचे मासिक निवृत्‍ती वेतन, कुटूंब निवृत्‍ती वेतन डिसेंबर देय जानेवारी पासून स्‍थगित ठेवले जाईल. त्‍यामुळे सर्व दाखले किंवा प्रमाणपत्र कोषागारास विनाविलंब प्राप्‍त होतील या बाबतची दक्षता घ्‍यावी असे कोषागार अधिकारी वर्धा कळवितात.
0000

एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मेळावा संपन्‍न


        वर्धा दि.30- स्‍थानिक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र तथा कनिष्‍ठ महाविद्यालय, वर्धा येथे एच.एस.सी.व्‍होकेशनल 11 वी व 12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांकरीता 18 ऑक्‍टोंबर,2012 रोजी एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्‍न झाले.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्ष्‍ण अधिकारी आर.डी.भोयर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धाचे गणराज यांनी विद्यार्थ्‍यांना रोजगार व स्‍वयंरोजगार तसेच व्‍यक्‍तीमत्‍व विकास याबाबत मार्गदर्शन केले. शिबीरास एकूण 90 विद्यार्थी उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे प्रास्‍तविक व संचालन एस.एस.जगताप ह्यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन व्‍ही.डी.भगत ह्यांनी मानले. कार्यक्रमाकरीता टी.एस.भोयर, सौ.एम.एस.ठाकरे, पी.एन.चवडे, एस.एस.जगताप, पाटणकर,कामडी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
          कार्यक्रमाकरीता संस्‍थेतील वर्ग 11 वी व 12 वी चे ऑटो इंजिनिअरींग टेक्‍नीशियन, मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, मेंन्‍टेनंन्‍स अॅण्‍ड स्‍पेअर्स ऑफ इलेक्टि्कल डोमेस्टिक अप्‍लॉयन्‍सेस या अभ्‍यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
0000

यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेबर रोजी


         वर्धा दि. 30- यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍था, वर्धा या संस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेंबर,2012 रोजी एकनाथ मंदिर काळा मारोती जवळ शिवाजी चौक येथे रविवारी  सकाळी 10 वाजता घेण्‍याचे ठरविले आहे.
          या सभेला सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थाचे  प्रशासक डी.एस.रोहणकर यांनी केले आहे.
0000

Monday 29 October 2012

110 ग्रामपंचायती व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका 26 नोव्‍हेंबर रोजी आचार संहिता आजपासून लागू


         वर्धा दि.29- वर्धा जिल्‍ह्यात माहे डिसेंबर,2012 या कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूकीसाठी आयुक्‍त, राज्‍य निवडणूक आयोग,मुंबई यांचे पत्र दिनांक 29/10/2012 नुसार जाहिर केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे वर्धा जिल्‍ह्यात 110 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका दिनांक 26 नोव्‍हेंबर,2012 रोजी होऊ घातलेल्‍या आहेत.
          सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या संबंधित ग्रामपंचायतीच्‍या संपूर्ण क्षेत्रात व पोट निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित प्रभागाच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात येत आहे. ही आचार संहिता  निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. व आचारसंहितेचा भंग होणार नाही.याची दक्षता घेण्‍यात यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
                                          00000       

विदर्भातील ग्रामीण खेळाडूंनी राष्‍ट्रीय स्‍पर्धांची तयारी करावी - रणजित कांबळे


            *  39 वा विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेतून विदर्भ संघाची निवड
       *  कुमारगट मुलांचे अमरावती तर मुलींमध्‍ये नागपूर जिल्‍हा अजिंक्‍य

           वर्धा दि. 29 - विदर्भातील ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍पर्धासाठी तयार करण्‍यासाठी प्रत्‍येक तालुका स्‍तरावर आवश्‍यक सुविधा निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने संपूर्ण सहकार्य करण्‍यात येईल अशी ग्‍वाही राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
          पुलगाव येथे आयोजित 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धाच्‍या उदघाटन  समारंभाप्रसंगी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्‍छा देवून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करुन प्रतिनिधीत्‍व करा असेही त्‍यांनी सांगितले.
 स्‍वर्गिय प्रभाताई राव स्‍मृती प्रित्‍यर्थ नगर स्‍पोटींग क्‍लब,पुलगांव-नाचणगाव यांच्‍या वतीने 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन  येथील आर.के. हायस्‍कुलच्‍या प्रांगणात  आयोजित करण्‍यात आले होते.
या स्‍पर्धेत विदर्भातील कुमार गटातील 22 संघांनी सहभाग घेतला. यामध्‍ये मुलांचे 11 तर मुलींच्‍या 11 संघांचा सहभाग होता.उदघाटन समारंभात इंडियन मिलटरी स्‍कूलच्‍या जवानांनी व खेळाडूंनी मानवंदना दिली. स्‍पर्धेचे उदघाटन राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते दिप प्रज्‍वलनाने झाले.  कुमारगटातील  यवतमाळ- अमरावती या जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलांच्‍या अंतिम सामन्‍यात    अमरावतीच्‍या चमूने अजिंक्‍यपद पटकाविले.तर यवतमाळ व नागपूर जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलींच्‍या अंतिम सामण्‍यात नागपूर विभाग अजिंक्‍य ठरला.
विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेमधून  विदर्भाचा संघ निवडला जाणार असल्‍याचे विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले यांनी यावेळी सांगितले.
          विदर्भातील ग्रामीण भागातून खेळाडू तयार होऊन तो  राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर भरारी मारुन त्‍या खेळाडूने ऑलंपिकमध्‍ये देशाचे प्रतिनिधीत्‍व करावे,असा संदेश राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिला.
कबड्डी खेळामुळे प्रत्‍येक जण मातीशी जुळतो.कबड्डी हा खेळ कमी खर्चात कमी जागेत उत्‍कृष्‍टरित्‍या   खेळता येतो.प्रत्‍येक खेळ हा खेळाडूंच्‍या भावनेशी निगडीत असून,कबड्डी खेळाकरीता खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍याची गरज राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केली.                                       
          सुरवातीला माता सरस्‍वती,हिमाचल प्रदेशच्‍या माजी राज्‍यपाल स्‍व. प्रभा राव यांच्‍या प्रतीमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. त्‍यानंतर तीन दिवसीय कबड्डी स्‍पर्धेचे उद्घाटन  करण्‍यात आले. शनिवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत मुलींच्‍या गटाचे तर मुलांच्‍या गटाचे प्रत्‍येकी तीन असे  6 सामने खेळविण्‍यात आले.
         जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा  श्रीमती चारुताई राव टोकस यांनी अध्‍यक्षीय भाषणात विदर्भस्‍तरीय स्‍पर्धेच्‍या आयोजनासाठी संपूर्ण मदत करण्‍यात येईल व स्‍पर्धकांना प्रोत्‍साहनासाठी सदैव तत्‍पर असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.     जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, श्रीमती चारुताई राव टोकस,वर्धा जिल्‍हा कॉग्रेस कमेटीचे अध्‍यक्ष किरणभाऊ उरकांदे यांच्‍या हस्‍ते विजयी संघांना बक्षिस देण्‍यात आले.
यावेळी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले, सचिव, सुभाष पिसे,पुलगांव नगर परिषदेचे अध्‍यक्ष भगवानसिंग ठाकूर,उपाध्‍यक्ष,सुनिल ब्राम्‍हणकर, राजूभाऊ कोचर, रमेश सावरकर,आर.के. महाविद्यालयाचे बालकिसन टिबडीवाल,नाचणगावचे सरपंच शेकर राऊत विदर्भ कबड्डी असोसिएशन चेआयोजक आर.एस.साहू तसेच विदर्भातील क्रीडाप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होती.  
000