Friday 9 July 2021

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हा अपघातमुक्त करावा

                                   - खासदार रामदास तडस

       वर्धा जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय  महामार्गाच्या माध्यमातुन  अनेक  मोठे प्रकल्प  प्रगतीपथावर  आहे. वर्धा-आर्वी , आर्वी –तळेगाव,  वर्धा हिंगणघाट हॅव्रीट ॲनेवीटी  अंतर्गत  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कामे सुरु आहे.  या कामामध्ये  रस्ता सुरक्षा  विषयक बाबीची पुर्तता करण्यात येते किंवा नाही  याचे मुल्यांकन करुन अहवाल सादर करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या सुचना  खासदार रामदास तडस  यांनी दिल्यात.

          केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार  गठण झालेल्या संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीची  बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकिला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे  कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, आर्वी कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर राजन पाला, अमरावतीचे एम.एच.राठोड,यवतमाळचे चंदनसिंह बायस, अशोक वनकर, वसंत नाल्हे, अंकुश  केने, औरंगाबादचे बी.एस.कसबे, वाहतुक पोलिस निरिक्षक राजेश कडू, महामार्ग जामचे वाहतुक पोलिस निरिक्षक, अशासकिय सदस्य किरण उरकांदे,  प्रणव जोशी,  शिरिष  भांगे आदी उपस्थित होते.

           संसद सदस्य  रस्ता सुरक्षा समितीच्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार   वर्धा जिल्हयात  स्वतंत्र वाहतुक पार्कची निर्मिती  करावी, युवकांमध्ये  अपघात  टाळण्याकरीता   जनजागृती करावी  व नव्याने  घोषित करण्यात आलेल्या जालना ते पुलगाव  महामार्गाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  आडिट करुन  उपाययोजना  कराव्या याबाबत श्री. तडस यांनी सुचना केल्या केल्या. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी  जाहिर सभेत  घोषित केलेल्या  हिंगणघाट  शहरातून  जाणा-या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर (जुना) उडान पुल बांधण्याकरीता  समितीमध्ये एक मताने ठराव करुन कलोडे चौक व  अशोक हॉस्पीटल चौक या स्थळाची  तातडीने  दुरुस्ती करण्याबाबत  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरण नागपूर यांचे ठराव पाठविण्यात आले व सोबतच  जिल्हयातील 32 ब्लॅक स्पॉट  दुरस्तीबाबत  एक मताने  निर्णय घेण्यात आला.

          रस्ते अपघात टाळण्याकरीता  सर्व विभागांनी समन्वयाने  कार्य करुन   रस्ते सुरक्षा उपाययोजनाचे तंतोतंत पालन करावे याबाबत  व विशेष करुन  पावसाच्या दिवसात विशेष काळजी  घेण्याच्या सुचना  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अधिकारी वर्गांना दिल्यात.

          यावेळी  अशासकिय सदस्य  किरण उरकांदे व प्रणय जोशी यांनी सुध्दा रस्ता सुरक्षाबात आपल्या समस्या मांडल्या.

          बैठकिला शिक्षण विभागाचे  सुनिल कोहळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया यांची उपस्थिती होती.

                                                0000

 




उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बापूकुटीला दिली भेट

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  सेवाग्राम येथील बापूकुटीला  भेट देऊन आश्रमाची  पाहणी केली व प्रार्थनेत सहभागी झाले. यावेळी त्याचे सोबत माजी खासदार अनंत गुढे,  शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे आदी उपस्थित होते.   सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमप्रतिष्ठानचे मंत्री मुंकुद मस्के यांनी  उदय सामंत यांचे सुतमालेने स्वागत केले.

 




प.क्र-505                                                                     दि.09.07.2021

व्हेंटिलेटर्सचा आरोग्य यंत्रणेने योग्य उपयोग करावा

                                -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

Ø जिल्ह्याला मिळाले तीन व्हेंटिलेटर्स

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या व्हेंटिलेटर्सचा योग्य उपयोग करावा, कोणत्याही इतर खाजगी रुग्णालयांना ते हस्तांतरित करू नये  अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटिलेटर्स लोकार्पण प्रसंगी दिल्यात. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ सचिन तडस यांना  मंत्री उदय सामंत यांनी 3 व्हेंटिलेटर्स वितरित केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिवतारे, प्रशांत शहागडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नाईक उपस्थित होते.

          यावेळी श्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य ठेऊन कोरोनाचा लढा देत आहेत. वर्धा जिल्ह्याचा कोरोनाच्या काळातील पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा पुढे गेला होता. तो आता 5 टक्क्यांच्या आत आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ नये यासाठीच डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जसा आपण सामना केलात तशीच तयारी तिसरी लाट येणारच नाही यासाठी केली पाहिजे. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त बाधित करणार आहे असे तज्ञांचे मत आहे.  याला प्रतिबंध करताना आपण पूर्वीपासूनच तयारीत असले पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासनसोबत काम करताहेत.

वैद्यकीय सेवा केवळ मेट्रो सिटी मध्ये पोहचुन उपयोगाची नाही तर ती राज्यात सर्व जिल्ह्यात पोहचली पाहिजे हा उद्देश मुख्यमंत्री महोदयांचा आहे.  त्यासाठी पक्ष म्हणून आम्हीही प्रयत्न करीत आहोत असेही श्री सामंत यांनी सांगितले. 

                                                          0000000000

Thursday 8 July 2021

 







प.क्र-505                                                                     दि.08.07.2021

मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यात 240 प्रशिक्षणार्थींना मिळणार प्रशिक्षण

आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध

     वर्धा, दि 8 जुलै (जिमाका):- राज्यामध्ये कोविड १९ या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणा-या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधणाची तीव्र कमतरता जाणवत असुन या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले.

जिल्ह्यात विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ध आणि उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी सावंगी येथे दीप प्रज्वलन आणि प्रशिक्षणार्थींना किट वाटप करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे व्यवस्थापक   अभ्युदय मेघे, डॉ महाकाळकर, भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे होम हेल्थ एड, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी मेघे, येथे इमरजेंसी मेडिकल टेक्निशिएन या प्रशिक्षणासाठी  एकुण ६० उमेदवार उपस्थित होते.

जिल्ह्यात ४५० उमेदवारांनी विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून यामध्ये 12 अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत. यात होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, फ्लेबोटोमिस्ट, हॉस्पिटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, जनरल ड्युटी असिस्टंट, रुग्णवाहिका चालक, मेडिकल ड्रेसर, डायबेटीस असिस्टंट, इत्यादी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयासहित  एकूण 11 रुग्णालयांची प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू, भिडी, देवळी, पुलगाव, आष्टी, समुद्रपूर, वडनेर आणि कारंजा रुग्णालयाचा समावेश आहे.

          या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आवश्यक असे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात इतर क्षेत्रात रोजगार कमी झाले असताना  आरोग्य क्षेत्रात तरुणाना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत.

        यावेळी मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करुन सर्वांना मार्गदर्शन केले. सदरउद्घाटनीय कार्यक्रमास मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास रोजगार वउद्योजकता मंत्री  नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे,वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख,  कौशल्यविकास रोजगार व उद्योजकता  राज्यमंत्री शंभुराज देसाई,  सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री  राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

                                                00000