Saturday 7 July 2012

उपविभागीय दंडाधिका-या मार्फत स्‍पोटाची चौकशी


     वर्धा दि.7- मेसर्स अरावली एक्‍सफलोझिव्‍ह अॅण्‍ड केमीकल कंपनी,तळेगांव रघुजी ता.आर्वी येथे दिनांक 23 मे,2012 रोजी स्‍पोट होवून 2 मजुर मृत्‍यू पावले असून 5 मजुर गंभीर जखमी झालेले आहे.सदर प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आर्वी यांची नियुक्‍ती केलेली आहे.
          सदर प्रकरणाची चौकशी उपविभागीय कार्यालयात सुरु आहे.या घटनेविषयी कोणाला काही माहिती किंवा पुरावे द्यायचे असल्‍यास त्‍यांनी दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त कार्यालयीन वेळेत द्यावे असे उपविभागीय दंडाधिकारी,आर्वी यांनी कळविले आहे.
0000

तलाठी रिक्‍त पदे सरळसेवेने भरती 24 जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जातील


         वर्धा दि.7- तलाठी रिक्‍त पदांची सरळ सेवेने भरती होणार असून दिनांक 12 जुलै पर्यन्‍त अर्ज मागविण्‍यात आले होते..आता अर्ज स्विकारण्‍यास मुदतवाढ  दिली असल्‍यामुळे उमेदवारांनी 16 जुलै,2012 पर्यन्‍त अर्ज विहीत नमून्‍यात सादर करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी केले आहे.
         ज्‍या उमेदवारांना तलाठी पदाकरीता घेण्‍यात येणा-या लेखी परिक्षेसाठी नामनिर्देशन करावयाचे आहे.त्‍यांनी hptt://colwardha.applyjobz.com या संकेत स्‍थळावर शर्ती व अटी पाहाव्‍या..अर्ज स्विकारण्‍याचे तारखेत वाढ करण्‍यात येवून ऑन लाईन अर्ज दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त उपलब्‍ध राहतील.तसेच स्विकारण्‍यात येतील.  त्‍यानंतर प्राप्‍त होणा-या अर्जचा विचार केला जाणार नाही. संकेत स्‍थळावरुन अर्जाची घेलेल्‍या प्रिंटची प्रत तसेच  डी.डी.सह अर्ज या कार्यालयास दिनांक 24 जुलै,2012 पर्यन्‍त स्विकारले जातील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्‍यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
00000

जिल्‍ह्यांतील पर्जनमान समुद्रपूर येथे 51 मि.मी. पावसाची नोंद


         वर्धा, दि. 7- जिल्‍हयामध्‍ये सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्‍यात झाली असून तेथे 51 मि.मी.पाऊस पडला आहे.   आतापर्यंत जिल्‍ह्यातील एकूण पावसाची सरासरी 177.2 मि.मि.नोंद झाली आहे.
       तालूका निहाय पडलेला पावसाचे आकडे कंसा बाहेर असून कंसामधील आकडे हे एकून पडलेल्‍या पावसाचे आहे.
            वर्धा 38.6 (172.4) मि.मि., सेलू 9.00 (75) मि.मि.,देवळी 8.2 (139.8) मि.मि.,हिंगणघाट 17.1 (230.4) मि.मि.,आर्वी 16 (267.) आष्‍टी 3.8 (111.8) समुद्रपूर 51 (260.) कारंजा 19 (160) मि.मि. पावसाची नोंद करण्‍यात आली आहे.. आज पडलेला एकूण पाऊस 162.7 ( 1416.7) मि.मि. असून  पावसाची प्रत्‍यक्ष सरासरी 20.4 मि.मि. असून एकूण पावसाची सरासरी 177.2 एवढी नोंद करण्‍यात आली आहे.
0000

Friday 6 July 2012

कुंडी गावाच्‍या मतदार याद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहिर


         वर्धा दि.6- पंचायत समितीमधील रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीसाठी  मतदार याद्या तयार करण्‍याच्‍या कार्यक्रम जाहिर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे.
         वर्धा जिल्‍ह्यात पंचायत समिती कारंजा निर्वाचन गन क्रमांक 12- कुंडी हे पद रिक्‍त आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्‍याचा दिनांक 1 जून,2012 शुक्रवार असून  राज्‍य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्‍या तारखेस अस्तिवात असलेल्‍या विधानसभेच्‍या  मतदार यादीवरुन जिल्‍हा परिषद,पंचायत समिती निवडणूका करीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्‍याकरीता प्रसिध्‍दी करण्‍याचा दिनांक 6 जुलै,2012 आहे.
         मतदार यादी संदर्भात हरकती व सूचना दाखक करण्‍याचा अंतिम दिनांक 10 जुलै,2012 मंगळवार राहणार असून निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या छापील मतदार याद्या अधिनियमाच्‍या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्‍याचा दिनांक 16 जुलै,2012 सोमवार असेल.
         निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या मतदार याद्या  लोकांच्‍या माहितीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत.याबाबतची सूचना प्रसिध्‍द करण्‍याची तारीख 16 जुलै,2012 सोमवार राहील. असे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

जिल्‍ह्यांतील पर्जनमान


         वर्धा, दि. 6- जिल्‍हयामध्‍ये  आतापर्यंत 156.8 मि.मि.सरासरी एवढा पाऊस पडला आहे. तालूका निहाय पडलेला पावसाचे आकडे कंसा बाहेर असून कंसामधील आकडे हे एकून पडलेल्‍या पावसाचे आहे.
          वर्धा 5.2 (133.8) मि.मि., सेलू 3.00 (66) मि.मि.,देवळी 8.00 (131.6) मि.मि.,हिंगणघाट 11 (113.3) मि.मि.,आर्वी 3.00(251) मि.मि.,आष्‍टी 3.00(108) मि.मि.,समुद्रपूर 17 (209) मि.मि., कारंजा 4.2 (141.3) मि.मि.,असा आज पडलेला एकून पाऊस 54.2 (1254) मि.मि.असून आज पडलेल्‍या पावसाची प्रत्‍यक्ष सरासरी 6.8 मि.मि.असून एकून पावसाची सरासरी 156.8 एवढी नोंद करण्‍यात आली आहे.
                       00000               

ग्रामीण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर -रणजित कांबळे


                                  
                                       वर्धा दि. 6 – गेल्‍या अनेक वर्षापासून तरोडा व परिसरांत विकासाचे कामे संथ गतीने सुरु होते. हे ग्रामिण क्षेत्र देवळी-पुलगांव मतदार संघात समाविष्‍ट झाल्‍यामुळे या क्षेत्राच्‍या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्‍यात येणार असून ग्रामिण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर देण्‍यात येईल असे आश्‍वासन पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता,सार्वजनिक बांधकात विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिले.
                                    काल वर्धा तालुक्‍यातील मदनी व तरोड येथे ग्रामपंचायत भवन आंगणवाडीच्‍या जागेचे व रस्‍त्‍याचे भुमिपुजन त्‍यांचे हस्‍ते संपन्‍न झाले त्‍यावेळी तरोडा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,पं.स. सभापती धैर्यशिल जगताप,पं.स.सदस्‍य निताताई शिंदे,सरपंच सुभाष चांभारे,तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, माजी जि.प. सदस्‍य देवराव पाटील, मदनीच्‍या सरपंच निर्मलाताई कोवे,उपसरपंच मनिष मेहत्रे आदि उपस्थित होते.
                                     गेल्‍या  अनेक वर्षापासून हे क्षेत्र हिंगणघाट मतदार क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ट असल्‍याचे मनूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की मतदार संघाच्‍या पूर्नविभाजनामुळे हे क्षेत्र आता पुलगांव –देवळी मतदार संघात आले आहे. त्‍यामुळे या क्षेत्राचा विकास करणे हे माझे प्राथमिक कर्तव्‍य समजतो. तरोडा ग्रामपंचायत भवनाच्‍या बांधकामासाठी 17 लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून त्‍यामधे साडे आठ लाख  जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून साडे पांच लाख आमदार निधीतून व 3 लाख ग्रा.प. अनुदानातून खर्च होतील. गावांचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी माझया मतदार संघातून दोन गावे निवडून  प्रस्‍तावित केले असून  त्‍यातील एक गांव  तरोडा व दूसरे विजयगोपाल आहे.या गावांतील  रस्‍ते ,नालीबांधकाम व सौंदर्यिकरणासाठी 3 कोटीचा प्रस्‍ताव विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडे पाठविण्‍यात आला असून तो प्रस्‍ताव शासन स्‍तरावर मंजूर करण्‍यांत येईल. एरनगांव ते सावली हा प्रस्‍तावित असलेल्‍या रस्‍त्‍याला मान्‍यता प्रदान करण्‍यात आली आहे. गांवातील सरपंच धडाडीचा असल्‍यास कामांचा पाठपुरावा करतो त्‍यामुळे   गावांतील प्रस्‍तावित विकासाचे कामे तातडीने पूर्ण होत असतात.या परिसरातील विकासाचे कार्य प्रामाणिकपणे पूर्णत्‍वास नेणार असून जाम ते तरोडा पर्यन्‍तचा रस्‍ता येत्‍या कालखंडामध्‍ये दुरुस्‍त करुन त्‍या रस्‍त्‍याचे  डांबरीकरण केल्‍या  जाईल. तसेच प्रस्‍तावित पांधनरस्‍ते माती व मुरमाचा थर देवून रस्‍ता मजबूत करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
                                     याप्रसंगी बोलतांना जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, अल्‍लीपूर येथील पाण्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी राज्‍यमंत्र्यांनी मोलाची मदत करुन ग्रामिण पाणीपुरवठा योजनेत साडे नऊ कोटीची योजना मंजुर केली.त्‍यामुळे ग्रामस्‍थांना दिलासा मिळाला आहे. आमदार  निधीतून अनेक विकास कामे राबविण्‍यात येत आहे असेही ते म्‍हणाले.
       यावेळी आपत्‍ती व्‍यवस्‍थापण अंतर्गत विहीरीत पडून मृत्‍यू पावलेले अमोल धनविज यांच्‍या पत्‍नी छबिनाताई यांना 1 लाखाचा धनादेश मंत्रीमहोदयांचे हस्‍ते प्रदान  करण्‍यात आला.
       याप्रसंगी मदनी व तरोडा येथील ग्रामपंचायत भवन,आंगणवाडी इमारतीच्‍या जागेचे तसेच ग्रामपंचायती अंतर्गत रस्‍त्‍याचे भुमिपुजन मंत्रीमहोदयांच्‍या  हस्‍ते करण्‍यात आले.
                                      यावेळी जगताप यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन सुभाष चांभारे  व आभार प्रदर्शन संदिप तिमांडे यांनी मानले.यावेळी मोठया संखेत जिल्‍हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                                                  000000

जिल्‍हयातील तिर्थस्‍थळाच्‍या विकासासाठी कटिबध्‍द -रणजित कांबळे



        वर्धा दि. 6 – जिल्‍हयात अनेक पौराणिक मंदीरे असून  त्‍यांचा संबध अनेक भाविकांशी जुळलेला आहे. ही मंदीरे त्‍यांचे श्रध्‍दास्‍थान म्‍हणून गणले गेले आहे. भाविकांना देण्‍यात येणा-या मूलभूत सोयीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून जिल्‍ह्यातील तिर्थस्‍थळांच्‍या  विकासासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याची भावना पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभाग व पर्यटन विकास विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
         काल तिर्थक्षेत्राच्‍या क वर्ग अंतर्गत देवळी तालूक्‍यातील श्रीक्षेत्र एकपाळ येथील हनुमान मंदीर देवस्‍थानच्‍या सभामंडपाचा लाकार्पन सोहळा  व शिलाण्‍यासाचे  उदघाटन  त्‍यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, पं.सं. देवळीचे सभापती दिनेश धांदे, उपसभपती मंगलाताई इंगळे,जि.प.सदस्‍य मोरेश्‍वर खोडके एकपाळा देवस्‍थानचे अध्‍यक्ष प्रकाश कादोरकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.  
        एकपाळा देवस्‍थानासोबत 20 ते 25 गावे जुळलेली असल्‍यामुळे या ठिकाणी शनिवारी व रविवारी मोठया संखेने भावीकांचे आगमण होत असल्‍याचे सांगून राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की भाविकांना उन,वारा व पाणी या ऋतूपासून संरक्षण मिळावे यासाठी आमदार निधीतून सभामंडपाचे  बांधकाम करण्‍यात आले. भाविकांना स्‍वयंपाकाच्‍या सोयीसाठी पुरकअनुदान मंजुर करण्‍यात येणार आहे.जिल्‍हा नियोजन समिती  विकासा अंतर्गत तिर्थक्षेत्राच्‍या विकासा अंतर्गत नांदोरा देवस्‍थानासाठी  15 लक्ष वायगांव येथील देवस्‍थानासाठी 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात आले असून  हनुमान मंदिराच्‍या देवस्‍थानात भाविकांच्‍या सोयी सुविधेसाठी 40 लक्ष मंजुर करण्‍यात आले. कापसी देवस्‍थान येथील भाविकांच्‍या सोयी व सुविधेसाठी 10 लक्ष रुपये याआधी देण्‍यात आले असून आता 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात येणार आहे. जिल्‍हयामध्‍ये हिंगणघाट तालूक्‍यातील आजणसरा येथील देवस्‍थानावर  मोठ्या प्रमाणावर श्रध्‍दा ठेवणारा वर्ग आहे. त्‍या ठिकाणी  हजारो भाविक येत असतात. या ठिकाणाला  शासनाने पर्यटन स्‍थळाचा दर्जा दिला असून भाविकांच्‍या सोयी व सुविधेत वाढ करण्‍यासाठी तीन कोटी रुपये मंजुर करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील  अनेक तिर्थक्षेत्र दुर्लक्षित राहणार नाही याकडे लक्ष देण्‍याची गरज असून विस्‍वस्‍त मंडळाने शासनाकडे विकासाबाबत प्रस्‍ताव दिल्‍यास त्‍यांना टप्‍या टप्‍याने अनुदान मंजुर करुन देण्‍यात  येईल. त्‍यामुळे भाविकांना  सोयी  सुविधा  पुरविल्‍या जातील. जिल्‍ह्यात पाऊस कमी झाल्‍याची चिंता व्‍यक्‍त करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, येत्‍या काही दिवसात पाऊसमाणात वाढ होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे हवालदिल झालेल्‍या शेतक-यांना दिलासा मिळेल. पावसावर पिकाचे नियोजन करणे हे शेतक-यासाठी आवश्‍यक असलेली बाब आहे. सिंचनाशिवाय शेती परवडण्‍यासारखी नसल्‍याचे नमूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, देवळी तालुक्‍यातील सिंचन प्रकल्‍प पूर्ण होण्‍यास 4 ते 5 वर्षाचा कालावधी                      लागणार आहे. येत्‍या वर्षापासून टप्‍या टप्‍याने 5 हजार हेक्‍टरवर सिंचनाची सोय निर्माण करण्‍यात येईल. असे त्‍यांनी सांगितले. वर्धा नदीवर  पुलगांव परिसरात बॅरेक्‍स बांधण्‍याच्‍या कामाला वेग आला असून खर्डा येथीही  बॅरेक्‍स बांधकाम होणार आहे.त्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍यासोबत शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्‍ध होणार आहे.त्‍यामुळे येत्‍या दोन तीन वर्षात देवळी तालुक्‍याचे चित्र पालटणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
        जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, तिर्थस्‍थळाच्‍या विकासामुळे भाविकांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले  असून भाविकांना मिळणा-या मुलभूत सोईमध्‍ये वाढ झाली असल्‍याचे ते म्‍हणाले.
        याप्रसंगी सभापती धांदे , गफ्फार शेख व प्रकाश कादोरकर, यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य मोरेश्‍वर खोडके यांनी केले. संचलन मनिष खोडके व आभार गुलाब डफरे यांनी मानले.यावेळी जिल्‍हा परिषद व पंचायत समितीचे सदस्‍य व परिसरातील ग्रामस्‍थ मोठया संखेने उपस्थित होते.
0000

Wednesday 4 July 2012

गेल्‍या वर्षीपेक्षा 16 मि. मि. पाऊस अधिक सर्वाधिक पाऊस वर्धा तालूक्‍यात पूरामूळे दोघांचा मत्‍यू


         
वर्धा दि. 4- पावसाच्‍या विलबामुळे शेतक-यासोबत सामान्‍य लोकांमध्‍ये चिंतेचे वातावरण असले तरी गेल्‍या वर्षातील आजच्‍या तारखेपर्यंत जिल्‍ह्यात सरासरी 134.8 मि. मि. पाउस पडला असून यावर्षी आजपर्यत 150 मि. मि. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.गेल्‍या वर्षापेक्षा 15 मि. मि. पाऊस अधिक झाला असल्‍याची नोंद आहे.
      समूद्रपूर तालूक्‍यात काल झालेल्‍या पावसामूळे कांढळी नदीला पूर आला होता. नागपूर येथील तीन व्‍यक्‍ती नागपूर वरून गिरडकडे जात असतांना कांढळी येथील वणा नदीच्‍या काठावर सौचालयाला व अंघोळी बसले असतांना वणा नदीला अचानक पूर आला पुराचे पाणी वाढल्‍यामूळे तिघापैकी एक व्‍यक्‍ती वाहून गेला आहे. त्‍याचे नांव बबलू शेख असून तो नागपूर येथील राहणारा आहे.
      दुसरी घटना आर्वी येथे घडली असून आर्वी येथील जनता नगर येथे राहणारा 55 वर्षीय दिलीप रेवतकर हा व्‍यक्‍ती गांव नदीच्‍या पुलावरुन घसरुन नदीच्‍या पात्रात पडला व तो पुराने वाहून गेला त्‍याचा मृतदेह सापडला आहे.
      वर्धा तालुक्‍यात सर्वाधिेक 31 मि. मि. पावसाची नोंद झालेली असून मालूका निहाय व एकूण पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसामध्‍ये दर्शविलेले आकडे एकूण पावसाचे असून कंसाबाहेरील आकडे आज पडलेल्‍या पावसाचे आहे.
      वर्धा 31.0 ( 128.6) मि. मि., सेलु 5 (63) मि. मि., देवळी 4.6 (123.6) मि.मि., हिंगणघाट ५ (२०२) मि.मि.,आर्वी 21.5 (248.0) मि.मि.,आष्‍टी 30.2(105) मि.मि.,समुद्रपूर 20 (192.0) मि.मि., कारंजा 20.4 (137.1) मि.मि. पाऊस पडला जिल्‍ह्यात आज झालेला एकून पाऊस 137.4 मि.मि. असून आतापर्यंत एकून पडलेला पाऊस 1200.2 मि.मि.एवढा आहे. जिल्‍ह्यातील आज पडलेला पाऊसाची प्रत्‍यक्ष एकुन सरासरी 17.3 मि.मि. असून एकून पावसाची सरासरी 150.1 मि.मि.नोंद करण्‍यांत आली आहे.
00000

Monday 2 July 2012

कृषि दिन मोठ्या उत्‍साहाने साजरा कृषी विकासाच्‍या योजना शेतक-यापर्यंत पोहचवा - जि.प.अध्‍यक्ष


      वर्धा दि.2- कृषि क्षेत्रामध्‍ये नवनविन तंत्रज्ञान येत असून या बाबतची संपूर्ण माहिती गावातील शेतक-यांना मिळत नाही. तसेच कृषी विभागाच्‍या नवनविन योजना बाबत शेतकरी अनभिज्ञ असतात यासाठी कृषि विभागाने गांव, शहर व जिल्‍हा पातळीवर मेळावे व कार्यशाळा घेवून कृषि विकासाच्‍या इतंभूत योजना शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात याव्‍या असे आवाहन जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
     येथील विकास भवनात काल महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्‍म दिवस म्‍हणून कृषि दिन म्‍हणून कृषि विभागाकडून साजरा करण्‍यात आला त्‍याप्रसंगी उदृधाटक म्‍हणून ते बोलत होते.
     यावेळी मंचावर जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जि.प.उपाध्‍यक्ष संजय कामनापूरे, सभापती प्रा. उषाकिरण थुटे, सभापती नंदश्‍किशोर कंगाली, सभापती निर्मलाताई बिजवे, वर्धा पं.स. सभापती धर्मशिल जगताप, उपसभापती संदेश किटे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     राज्‍यातील दुष्‍काळी परिस्थितीवर मात करण्‍यासाठी स्‍व. वसंतराव नाईक यांनी बहुमोलाचे कार्य करुन कृषि क्षेत्रामध्‍ये हरित क्रांती घउविली असल्‍याचे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की यंदा पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीसाठी उपयेागी पडणारे बि-बियाणे व रासायनिक खतेसुध्‍दा महाग झाली आहे. त्‍यामुळे शेतकरी अस्‍वस्‍थ झाला आहे. शेतकरी सुखी समृध्‍द व्‍हावा यासाठी शेतक-याच्‍या शेतीच्‍या उत्‍पादन खर्चाच्‍या आधारावर  भाव मिळावा अशी मागणी करुन ते म्‍हणाले की कृषी विभागाच्‍या येाजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी  प्रयत्‍न करावा असे  आवाहन  त्‍यांनी केले. 
     यावेळी बोलतांना उपाध्‍यक्ष  कामनापुरे म्‍हणाले की, वसंतराव नाईक यांना आजही हरितक्रांतीचे प्रणेते म्‍हणून संबोधिल्‍या जाते. त्‍यांनी केलेले कार्य शेतीसाठी नवि दिशादर्शक म्‍हणून समजण्‍यात येत असून, त्‍यांनी केलेल्‍या  कार्याची  प्रेरणा शेतक-यांनी अंगिकारावी अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  
 याप्रसंगी बोलताना जि.प.चे मुख्‍य काय्रकारी अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की आपला देश कृषि प्रधान असून, 50 टक्‍के पेक्षा अधिक सकल उत्‍पन्‍न हे कृषि क्षेत्रापासून येत होते. आता मात्र कृषि क्षेत्रावर अवलंबून असलेल्‍या लोकसंख्‍येचे प्रमाण कमी होत आहे. कृषीवर आधारीत सेवा क्षेत्र व उद्योगाच्‍या विस्‍तारीकणामुळे देशाची प्रगती साधली जात आहे. शेतीमध्‍ये सुधारणा करण्‍यास बराच वाव असून शेतक-यांनी शासनाने कार्यान्वित केलेल्‍या कृषी क्षेत्रासाठीच्‍या योजना स्विकारुन शेतक-यांनी आपले जिवनमान उंचावले पाहीजे. पावसाने दडी मारल्‍यामुळे शेतकरी विंवचनेत सापडला आहे. शेतीच्‍या सिंचनासाठी गेल्‍यावर्षी एक हजार पाचशे विहीरी मंजूर करण्‍यता आलेल्‍या होत्‍या. पुढील वर्षी सिंचनासाइी दुप्‍पट विहीरीचे नियेाजन प्रस्‍तावित आहे. या विहीरीमुळे शेतीची  सिंचन क्षमता वाढून अधिक उत्‍पन्‍न शेतक-यांना घेता येईल. शेततळे, शेताजवळील नाल्‍याचे खोलीकरण तसेच नदी व नाल्‍याचे पाणी अडवून जलसंधारणाचा कार्यक्रम तसेच पउीक जमीनीवर व बांधावर झाडे लावण्‍याचा व फळबागाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येणार आहे. असेही ते म्‍हणाले.
      तत्‍पूर्वी महाराष्‍ट्रचे माजी मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण , वसंतराव नाईक व पंजाबराव देशमुख यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पन करुन अभिवादन केले तसेच मान्‍यवरांचया हस्‍ते दिप प्रजवलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचलन कडू यांनी तर प्रास्‍ताविक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.के. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला जि.प. सदस्‍य, पं.स.सदस्‍य व शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                             000000



वर्धा जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करा - पालकमंत्री राजेंद्र मुळक




·        कुपोषणमुक्‍त 77 गावातील लोकप्रतिनिधींचा गौरव
·        77 लाख 76 हजार बालके सर्वसाधारण श्रेणीत
·        बालकांना व मातांना पोषण आहार
·        शंभर नविन आंगणवाड्यांसाठी 1 कोटी अनुदान

वर्धा, दि. 2- माता व बालकांना पुरेशा पोषण आहार मिळत नसल्‍यामुळे बालके कुपोषणाच्‍या विळख्‍यात अडकतात. याला सामा‍जिक, आर्थिक व आरोग्‍य हे पूर्णपणे जबाबदार असून समाजात गंभिर समस्‍या निर्माण झाली आहे. कुपोषण मुक्‍त गाव अभियाना अंतर्गत 75 गावांना परीतोषिके देण्‍यात आली असून यापुढील लक्ष संपूर्ण वर्धा जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करण्‍यासाठी लोकप्रतिनिधी सोबत शासकीय कर्मचा-यांनी आपल्‍या स्‍तरावर प्रयत्‍न करावे असे आवाहन वित्‍त व नियेाजन विभागाचे उराज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले आहे.
     आज येथील विकास भवनात राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियाना अंतर्गत 100 टक्‍के कुपोषणमुक्‍त 77 गावांच्‍या लोकप्रतिनिधी व आंगणवाडी सेविकांचा  पालकमंत्री मुळक यांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देवून सन्‍मान पत्राचे वितरण करण्‍यता आले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा,स्‍वच्‍छता विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे, जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, मुख्‍य काय्रपालन अधिकारी शेखर चन्‍ने, महिला व बालकलयाण सभापती निर्मला बिजवे, शिक्षण व आरोग्‍य  सभापती उषाताई थुटे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
कुपोषणाची कारणे वेगवेगळी असली तरीपण अद्यापही जिल्‍ह्यामध्‍ये 9 हजार बालके कुपोषीत असल्‍याचे  सांगुन पालकमंत्री मुळक म्‍हणाले की कुपोषणमुक्‍त जिल्‍हा करण्‍यासाठी आवश्‍यक ती मदत करण्‍यात येईल. गेल्‍यावर्षी  3 कोटी 75 लक्ष रुपयाची तरतूद आंगणवाडीच्‍या इमारती बांधकामावर व तसेच बालक व माता यांच्‍यापोषण आहारावर खर्च करण्‍यात आला होता. जिल्‍हा कुपोषणमुक्‍त करण्‍यासाठी अतिरीक्‍त शंभर आंगणवाड्या सुरु करण्‍यतायेणार असूनयावषी्र जिल्‍हा नियेाजन विकास समितीने 1 कोटीचे अनुदानप्रस्‍तावित केले आहे. लोकप्रतिधिीच्‍या व कर्मचा-याच्‍या समन्‍वयाने वर्धा जिल्‍हा येत्‍या काळात कुपाषणमुक्‍त करु या असा आशावाद त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त  केला.
        याप्रसंगी बोलतांना राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की राज्‍यात कुपोष्‍ण मुक्‍त अभियान 2001
मध्‍ये सुरु झाले त्‍या अभियानाचे आयुक्‍त रमणी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती.
         औरंगाबाद विभागामध्‍ये त्‍यांनी  उत्‍कृष्‍टपणे  कार्य करुन अनेक गावे कुपोषणमुक्‍त केली होती. त्‍यावेळी कुपोषीत बालके  ग्रेड तीन व ग्रेड चार या श्रेणीमध्‍ये मध्‍ये विभागणी करण्‍यात आली होती. आता मात्र जागतिक आरोग्‍य  संघटनेच्‍या नव्‍या निकषानुसार या बालकांना आता कुपोषणामध्‍ये तिव्र कमी वजन तथा मध्‍यम कमी वजनअशी  वर्गवारी करण्‍यात आली आहे. कुपोषणासाठी सामाजिक बाबी जाबाबदार असून यामध्‍ये कमी वयामध्‍ये मुलींचा विवाह करणे, मातांना पोषक आहार न मिळणे तसेच  दोन मुलामध्‍ये अंतर ठेवणे,आदीं बाबींचा समावेश आहे..यासाठी शासनाने बालके कुपोषण होऊ नये यासाठी अनेक योजना राबवित येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, कुपोषण ही सामाजिक समस्‍या असून समाजाला कलंकीत करणारी बाब आहे.शासनाने राबविलेल्‍या योजनाचा पुरेपुर लाभ घेवून तसेच मार्गदर्शक तत्‍वे पाळून आपले गांव व संपूर्ण जिल्‍हा कुपोषण मुक्‍त करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी चन्‍ने यांनी राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्‍त ग्राम अभियानाची माहिती विषद  करुन ते म्‍हणाले की, जिल्‍हयात 0 ते 6 वर्षातील 78240 बालके असून वजन घेतलेली बालके 77 हजार 472 आहेत. साधारण बालके 68 हजार  109 असून मध्‍यम वजनाची बालके 8 हजार 097 एवढी बालके आहेत.यामध्‍ये 77 गावातील 86 आंगणवाड्या कुपोषण मुक्‍त झाल्‍या असून वेळोवेळी शासनाचे निर्देशानुसार  कुपोषीत माता व बालकांना पोषण आहार देण्‍यात येत असल्‍याचे ते म्‍हणाले.
        77 गावातील लोकप्रतिनिधी आंगणवाडी सेविकांचा पुष्‍पगुच्‍छ ,प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. यावेळी सरपंच,अंगणवाडी सेविका,वैद्यकीय अधिकारी,आरोग्‍य सेवक मोठया संखेने उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे संचालन अजय येते व अर्चना धानोरकर यांनी केले तर आभार राजेंद्र मुळक यांनी मानले.
                                           000000

जिल्‍हा विकास योजने अंतर्गत मंजूर कामांचे तात्‍काळ नियोजन करा - राजेंद्र मुळक विकास योजनांसाठी 78 कोटी 65 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त


   वर्धा, दि. 2- जिल्‍हा नियोजन  समितीने सुचविलेल्‍या जिल्‍ह्यातील विविध विकास कामांसाठी  78 कोटी 65 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त झाला असून, विभाग प्रमुखांनी विकास कामांचे नियोजन , प्रशासकीय मान्‍यता  आदि प्रक्रिया पूर्ण करुन  तात्‍काळ प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी अश्‍या सुचना  पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांनी आज दिल्‍या.
जिल्‍ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना पालकमंत्री 
            जिल्‍हा विकास योजने अंतर्गत 2012-13 या वर्षासाठी  सर्व साधारण योजनेमध्‍ये 62 कोटी 47 लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत  तर 5 कोटी रुपये  तर आदिवासी उपयोजने अंतर्गत 11 कोटी 13 लक्ष रुपयाचा निधी उपलब्‍ध झालेला आहे. हा निधी एकूण मंजूर नियतव्‍ययाच्‍या 75 टक्‍के असल्‍याची  माहितीही  पालकमंत्र्यांनी  यावेळी दिली.
      विकास भवन येथे जिल्‍हयात  राबविण्‍यात  येत असलेल्‍या  विविध विकास कामांचा आढावा तसेच जिल्‍हा विकास नियोजना  अंतर्गत  मंजूर केलेल्‍या योजनांची  प्रगतीचा आढावा
पालकमंत्र्यांनी  घेतला. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी  पाणी पुरवठा,स्‍वच्‍छता व  सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे, आमदार व  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष सुरेश देशमुख , अशोक शिंदे, दादाराव केचे, नितेश भांगडिया, जि.प. चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे,  जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य शेखर  शेंडे, जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने , आदि व्‍यासयपिठावर उपस्थित होते.
            जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत  या वर्षीसाठी 80 कोटी रुपये  खर्चाचा  वार्षिक आराखडा   मंजूर करण्‍यात आला असून, यापैकी  75 टक्‍के  निधी  एकूण 62 कोटी 47 लक्ष 61 हजार रुपये  प्राप्‍त झाले आहे. यामध्‍ये  सामाजिक व सामुहिक सेवा योजने अंतर्गत 18 कोटी, वाहतूक व दळणवळण  15 कोटी  33 लाख, ग्रामीण विकासासाठी 11 कोटी 86 लाख , कृषि व संलग्‍न सेवेसाठी 8 कोटी 36 लाख व विद्युत विकासासाठी 1 कोटी 60 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे. विभाग प्रमुखांनी  विकास योजने अंतर्गत सुचविलेल्‍या कामांचे आराखडे व जागेची उपलब्‍धता  आदि प्रक्रिया  पूर्ण करुन  त्‍यानंतर प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी अशा सुचना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी दिल्‍या.
                                    58 टक्‍के पेरण्‍या पूर्ण
            जिल्‍ह्यात सुरुवातीला पाऊस पडल्‍यामुळे काही तालुक्‍यात शेतक-यांनी  पेरण्‍यांना सुरुवात केली आहे.  मागील दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्‍ह्यात 58 टक्‍के क्षेत्रात शेतक-याने  पेरण्‍या  केल्‍या असल्‍याची माहिती देताना पालकमंत्री म्‍हणाले की     1 लक्ष 29 हजार क्षेत्रात  कापूस तर 89 हजार क्षेत्रात सोयाबीन तसेच इतर पिकांखाली 2 लाख 51 हजार हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
            शेतक-यांना त्‍यांच्‍या मागणीनुसार बियाणांची व खतांची उपलब्‍धता करुन द्या तसेच जिल्‍ह्यात बियाणांचा व खतांचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेण्‍याची सुचनाही  पालकमंत्र्यांनी  कृषि विभागाच्‍या अधिका-यांना दिली. जिल्‍ह्यात अपु-या पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्‍याची  शक्‍यता  लोकप्रतिनिधींनी  व्‍यक्‍त केली असता, अधिका-यांनी  प्रत्‍यक्ष गावांना भेटी देऊन पाहणी करावी अश्‍या सुचनाही  यावेळी त्‍यांनी दिल्‍या.
            तुषार व ठिंबक सिंचनाच्‍या  वाढीसाठी  जिल्‍ह्यात जाणिवपूर्वक प्रयत्‍न करण्‍याची सुचना करताना पालकमंत्री म्‍हणाले की, तुषार सिंचनासाठी  4 हजार 110 प्रकरणे प्राप्‍त झाली असून, या प्रकरणांवर त्‍वरीत निर्णय घ्‍यावा तसेच ठिंबक सिंचनासाठी  आवश्‍यक प्रशिक्षण शेतक-यांना देण्‍यासोबतच माती व खतांचे व्‍यवस्‍थापन,  कोणते पिक  घ्‍यावे यासंदर्भात शेतक-यांना प्रथम मार्गदर्शन करावे अशा सुचनाही  पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता खात्‍याचे राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी यावेळी दिल्‍यात .
                        142 शेततळ्यांचा कार्यक्रम
            वर्धा जिल्‍ह्यात शेतीला संरक्षित पाणी देण्‍यासाठी   शेततळ्यांचा कार्यक्रम राबविण्‍याच्‍या सुचना देतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की 142  शेततळ्यापैकी  112 शेततळे पूर्ण झाले असून अपूर्ण शेततळ्यांचे कामही सुरु करावे तसेच शेततळ्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्‍यासाठी शेतक-यांमध्‍ये जागृती निर्माण करावी अशी सुचनाही त्‍यांनी  यावेळी केली.
            जिल्‍ह्यात पाणी टंचाई  निवारण्‍यासाठी  राबविण्‍यात येणा-या कार्यक्रमासाठी  15 जुलै पर्यंत मुदत वाढवून देण्‍यात आली  असून टंचाई आराखड्यानुसार जी कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण करावी असे सांगतांना  राजेंद्र मुळक म्‍हणाले की पाणी टंचाई  आराखड्यामध्‍ये  81 विंधन विहरी मंजूर करण्‍यात आल्‍या असून त्‍या तातडीने पूर्ण कराव्‍यात तसेच ज्‍या विंधन विहरींना दूषीत व पिण्‍यास  अयोग्‍य पाणी आहे अशा 248 विंधन विहरी कायम स्‍वरुपी बंद करावे व तयामध्‍ये काळी माती टाकावी  तसेच ज्‍या गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई आहे तेथे नवीन विंधन विहरींचे प्रस्‍ताव तयार करावे. अशा सुचनाही  त्‍यांनी यावेळी दिल्‍यात .
       पावसाळ्यात साथीचे आजार उदभवणार नाही याची दक्षता घ्‍यावी.  तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याचे स्‍त्रोत आहेत त्‍या गावातील आजूबाजूला असलेले  शेणखत व इतर साहित्‍य तेथून काढावे व हा परिसर स्‍वच्‍छ  ठेवावा. अश्‍या सुचनाही यावेळी अधिका-यांना देण्‍यात आल्‍या.
                        31  ऑगस्‍ट पर्यंत पुरेल एवढा जलसाठा  उपलब्‍ध
            जिल्‍ह्यात  पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई भासणार नाही यादृष्‍टीने  सिंचन प्रकल्‍पामध्‍ये  असलेला जलसाठा राखीव ठेवावा अशा सुचना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी दिल्‍यात तसेच सिंचन प्रकल्‍पामध्‍ये  उपलब्‍ध असलेल्‍या  पाण्‍याचा आढावाही त्‍यांनी यावेळी घेतला.
जिल्‍ह्यात महाकाली , लोअर वर्धा, मदन ,वडगाव , निम्‍नवर्धा  आदी प्रकल्‍पामध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी 31 ऑगस्‍ट पर्यंत पाणी  पुरेल एवढे  उपलब्‍ध असल्‍याची माहिती  अधिका-यांनी बैठकीत दिली.
       प्रारंभी जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकात  जिल्‍ह्यातील विविध विकास योजनांचे व प्रत्‍यक्ष सुरु असलेल्‍या   कामांची  माहिती दिली.
            कार्यक्रमाचे संचालन  व आभार नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी केले.
                                                            000000