वर्धा दि. 4- पावसाच्या विलबामुळे शेतक-यासोबत
सामान्य लोकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी गेल्या वर्षातील आजच्या तारखेपर्यंत
जिल्ह्यात सरासरी 134.8 मि. मि. पाउस पडला असून यावर्षी आजपर्यत 150 मि. मि.
सरासरी एवढा पाऊस झाला आहे.गेल्या वर्षापेक्षा 15 मि. मि. पाऊस अधिक झाला असल्याची
नोंद आहे.
समूद्रपूर तालूक्यात
काल झालेल्या पावसामूळे कांढळी नदीला पूर आला होता. नागपूर येथील तीन व्यक्ती
नागपूर वरून गिरडकडे जात असतांना कांढळी येथील वणा नदीच्या काठावर सौचालयाला व
अंघोळी बसले असतांना वणा नदीला अचानक पूर आला पुराचे पाणी वाढल्यामूळे तिघापैकी
एक व्यक्ती वाहून गेला आहे. त्याचे नांव बबलू शेख असून तो नागपूर येथील राहणारा
आहे.
दुसरी घटना
आर्वी येथे घडली असून आर्वी येथील जनता नगर येथे राहणारा 55 वर्षीय दिलीप रेवतकर
हा व्यक्ती गांव नदीच्या पुलावरुन घसरुन नदीच्या पात्रात पडला व तो पुराने
वाहून गेला त्याचा मृतदेह सापडला आहे.
वर्धा तालुक्यात
सर्वाधिेक 31 मि. मि. पावसाची नोंद झालेली असून मालूका निहाय व एकूण पावसाची
आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसामध्ये दर्शविलेले आकडे एकूण पावसाचे असून
कंसाबाहेरील आकडे आज पडलेल्या पावसाचे आहे.
वर्धा 31.0 (
128.6) मि. मि., सेलु 5 (63) मि. मि., देवळी 4.6 (123.6) मि.मि., हिंगणघाट ५ (२०२)
मि.मि.,आर्वी 21.5 (248.0) मि.मि.,आष्टी 30.2(105) मि.मि.,समुद्रपूर 20 (192.0)
मि.मि., कारंजा 20.4 (137.1) मि.मि. पाऊस पडला जिल्ह्यात आज झालेला एकून पाऊस 137.4
मि.मि. असून आतापर्यंत एकून पडलेला पाऊस 1200.2 मि.मि.एवढा आहे. जिल्ह्यातील आज
पडलेला पाऊसाची प्रत्यक्ष एकुन सरासरी 17.3 मि.मि. असून एकून पावसाची सरासरी
150.1 मि.मि.नोंद करण्यांत आली आहे.
00000
No comments:
Post a Comment