Saturday 7 July 2012

तलाठी रिक्‍त पदे सरळसेवेने भरती 24 जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जातील


         वर्धा दि.7- तलाठी रिक्‍त पदांची सरळ सेवेने भरती होणार असून दिनांक 12 जुलै पर्यन्‍त अर्ज मागविण्‍यात आले होते..आता अर्ज स्विकारण्‍यास मुदतवाढ  दिली असल्‍यामुळे उमेदवारांनी 16 जुलै,2012 पर्यन्‍त अर्ज विहीत नमून्‍यात सादर करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी केले आहे.
         ज्‍या उमेदवारांना तलाठी पदाकरीता घेण्‍यात येणा-या लेखी परिक्षेसाठी नामनिर्देशन करावयाचे आहे.त्‍यांनी hptt://colwardha.applyjobz.com या संकेत स्‍थळावर शर्ती व अटी पाहाव्‍या..अर्ज स्विकारण्‍याचे तारखेत वाढ करण्‍यात येवून ऑन लाईन अर्ज दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त उपलब्‍ध राहतील.तसेच स्विकारण्‍यात येतील.  त्‍यानंतर प्राप्‍त होणा-या अर्जचा विचार केला जाणार नाही. संकेत स्‍थळावरुन अर्जाची घेलेल्‍या प्रिंटची प्रत तसेच  डी.डी.सह अर्ज या कार्यालयास दिनांक 24 जुलै,2012 पर्यन्‍त स्विकारले जातील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्‍यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
00000

No comments:

Post a Comment