वर्धा दि.30 – माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती
रविवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
कृषी
विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11
वाजता विकास भवन येथे राज्याचे पाणी पुरवठा,स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम
मंत्री रणजित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले
आहे.
राष्ट्रीय
फलोत्पादन वर्षानिमित्त कृषी मेळावा तसेच कृषी दिन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुरेश
देशमुख,आमदार सर्वश्री अशोक शिंदे,दादाराव केचे,ना.गो.गाणार, मितेश भांगडीया ,जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष संजय मानकापूरे,महिला व बालकल्याण सभापती श्रीमती निर्मलताई
बिजवे, शिक्षण सभापती प्रा. उषाकिरण थुटे,अर्थ व बांधकाम सभापती गोपालराव कालोरकर,
समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले,पंचायत समिती सभापती धैर्यशिल जगताप ,उपसभापती
संदेश किटे आदी उपस्थित राहणार आहेत.
विशेष
उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने उपस्थित
राहणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच कृषीतज्ञासमवेत शेतीविषयक मार्गदर्शन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी
दिन कार्यक्रमात शेतकरी बांधव व जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आर.के.
गायकवाड यांनी केले आहे.
0000