Wednesday 8 September 2021

 




.प्र..क्र- 643                                                                                                                              दि.8.9.202

                  पीक कर्ज वितरण, शेतकरी आत्महत्या व इतर योजनांचा अध्यक्षांकडून आढावा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत

                                                       - किशोर तिवारी

Ø  आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा

वर्धा, दि. 8 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना शेत मालाचा योग्य हमीभाव व बँकांनी पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रे न मागता सुलभतेने पीक कर्जाचे वितरण होणे आवश्यक आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर अनेक संकटांचे आभाळ कोसळले असते. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना, सुलभरित्या पीक कर्ज अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे सांगितले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्री. तिवारी यांनी शेतकरी आत्महत्या, पीक कर्जाचे वितरण, कोरोना आजार व इतर बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे मॅनेजर वैभव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभरित्या पीक कर्जाचे वाटप, आरोग्य सुविधेंचा लाभ, बी बियाण्यांची उपलब्धता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, अत्योंदय योजनेचा लाभ, विविध शासकीय योजनांचा लाभातून उत्पादन वाढीस मदत, कृषी तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन, शेत मालाला हमीभाव, कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरित्या होणे गरजेचे आहे. या गोष्टी त्यांना नियमितपणे सुरळीतरित्या मिळाल्या तर आत्महत्या सारख्या घटना घडणारच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेत मालाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. पीक कर्ज, कर्जाचे पुर्नगठन बँकानी आगाऊ कागदपत्रांची मागणी न करता सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱी कुटुबांना संजय गांधी निराधार योजना, अत्योंदय योजना यासारख्या अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पीक कर्जाच्या अनुषंगाने श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वितरणाचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ज्यादा कागदपत्रांचा तगादा न लावता सुलभरित्या कर्ज वितरीत करावे. मुद्रा योजने अंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांना मान्यता द्यावी. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत होते. आदिवासी बांधवांची उपासमार न होता त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी खावटी कर्जाचे लक्षांक पूर्ण करावे. प्रलंबित प्रकरणांचाही येत्या पंधरा दिवसात निपटारा करुन संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यास आवश्यकता असणाऱ्या वस्तू भारत सरकारच्या जेम पोर्टलवरुन खरेदी कराव्यात. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा योजनेचा लाभ द्यावा, विमा कंपनींचे अंकेशन करुन ज्यादा पैसे उकळणाऱ्यांकडून वसूली करण्यात यावी. संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत पीककर्ज वाटप, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजना व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ, अवैध गौण खनिज माफियांची यादी व त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई, शासकीय ठेकेदारांना धमक्या व कामांत अडथळे आणणाऱ्या समाजसेवका विरुध्द प्रशासनाकडून कारवाई, भारत सरकारच्या जेम ई पोर्टलवरुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी न करता खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या वस्तू, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भेटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी भारतीय घटनेच्या कलम 19 व 21 मधील तरतुदीनुसार नागरिकांचे अधिकारी गोठविल्याच्या तक्रारींची समिक्षा व त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात झालेला फायदा, शासनाने कोविड महामारीच्या काळात लावलेले कडक निर्बंध व सलवती, आरोग्य सुविधांचा अभाव, सहकारी मजूर संस्थांचे लेखापरीक्षण, मजूरांची नामावली व त्यांनी केलेल्या कामांचा तपशील आदी संदर्भात श्री. तिवारी यांनी सविस्तर आढावा घेतला.

0000

 

 

 

Tuesday 7 September 2021

 

                                जिल्ह्यात समूह उद्योग स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे

                                                                        -जिल्हाधिकारी

       वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, उमेद अभियान, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, नाबार्ड आणि एम गिरी यांनी प्रशिक्षणा सोबतच समूह उद्योग स्थापन करण्यासाठी काम करावे.जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आणि मागणी असणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समूह उद्योग विकास बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री मुद्देमवार, लीड बँक व्यवस्थापक वैभव लहाने, एमगिरीचे व्यंकट राव,  नाबार्डचे व्यवस्थापक, मविमच्या जिल्हा समन्वयक  अस्मिता भोंगाडे, तसेच उमेदच्या स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.

       बैठकीत उद्योगासाठी लागणारी विविध कौशल्ये आणि वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षकांची चमू तयार करायची आहे. यासाठी एम गिरी, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या संस्था प्रशिक्षण आयोजित करेल. एमगिरीने राज्य किंवा केंद्र कौशल्य विकास प्राधिकरणासोबत करार करून घ्यावा. तसेच प्रशिक्षणासाठी डायटचे इमारत वापरावी. यासोबतच खादी ग्रामोद्योग महामंडळाने शेतकऱ्यांना मध संकलनासाठी सुद्धा प्रशिक्षण द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        उमेदच्या महिलांचे  चार समूह प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात सेलूमध्ये -डेअरी क्लस्टर, सिंधी मेघे येथे  बॅग आणि टेराकोटा ज्वेलरी क्लस्टर, नाचनगाव येथे गारमेंट स्टिचिंग क्लस्टर विकसित केले जाईल. यासाठी खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडे असलेल्या स्फूर्ती योजनेमध्ये  या प्रकल्पाना अनुदान मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

                                                                        0000

 

                  डेंग्यु रुग्णाचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्या

                                                                   -जिल्हाधिकारी

Ø  महिन्यातील प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा

Ø  डेंग्युच्या रुग्णांना ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभ दयावा

वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका) जिल्हयात डेग्युच्या आजाराच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सावंगी मेघे व सेवाग्राम येथे 300 डेंग्यु आजाराचे रुग्ण दाखल असून इतर खाजगी रुग्णालयात सुध्दा मोठया प्रमाणात रुग्ण दाखल होतांना दिसत आहे. सामान्य रुग्णालया दाखल होणा-या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरोसिस मशीन खरेदी करावी. ज्यामुळे  रुग्णांना प्लेटलेट देण्याची सुविधा उपलब्ध होऊन  रुग्णांना चांगले उपचार देता येईल त्याच बरोबर खाजगीरित्या प्लेटलेट खरेदी करण्याची आवश्यक भासल्यास  खरेदी करुन   सदर महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत   रुग्णांवर  उपचार करावा  अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी  डेंग्यू आजार आढावा बैठकित दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी वेदप्रकाश पाठक,सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. देवळीकर, आर्वी , हिंगणघाट, सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नगर पालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील ज्या परिसरात डेंग्यु आजाराचे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळून  येत आहे. अशा परिसराला  नगर पालिका अधिकारी व नगर सेवकांनी स्वत: प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करुन लोंकामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करावी.  यासाठी सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयाकडून डेंग्यु आजाराच्या रुग्णाची पत्त्यासह यादी मागवून घ्यावी. सर्व नगर पालिका ग्रामपंचायत क्षेत्रात कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर  साचलेले गटार, नाल्या व घरामध्ये फवारणी करावी अशा, सूचना श्रीमती देशभ्रतार यांनी दिल्यात.

नागपूर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हयात डेल्टाचे रुग्ण आढळले असून  कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही त्यामुळे   नगर पालिकांनी कोविडची चाचणी वाढवावी त्याचबरोबर नगर पालिकाच्या शाळा  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण कक्ष तयार करुन ठेवावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑक्सीजन पुरवठा , पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध करुन ठेवावे. ऑक्सजीजन व व्हेंटीलेटरसहित बाल कोविड कक्ष तयार करुन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

00000