Saturday 11 November 2017



माणुसकीच्या जाणिवा जागृत  ठेऊन काम करावे लागते
                                                                -परिवहन मंत्री दिवाकर रावते
·        वर्धा बसस्थानकाचे 7 कोटी 7 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन
·        4 लक्ष 50 हजार रोजगार निर्मिती
·        भरतीमध्ये पारदर्शकता
·        ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार
·        वर्धेतुन तीन शिवशाही बस लवकरच सुरू
वर्धा दि 11 (जिमाका ) एक सामान्य माणूस म्हणून राज्य परिवाहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास केला आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा  बसस्थानक आणि बसच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी होत आहे. पण त्याचबरोबर महामंडळाचे  पुरुष व महिला कर्मचारी, आणि प्रवासी यांच्यासाठी काम करताना माणुसकीच्या जाणिवा जागृत ठेवून काम केले तरच होणारा  बदल महत्वाचा  ठरेल असे प्रतिपादन राज्याचे  परिवहन व खारविकास मंत्री दिवाकर रावते यांनी केले.आज वर्धा बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
वर्धा बसस्थानक येथे बसस्थानकाचे पुनर्बांधणी ,आधुनिकीकरण आणि नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते झाले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार अनिल सोले, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख , वर्धा विभाग नियंत्रक राजेश आडोकार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री  रावते म्हणाले, परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या गावातच नियुक्ती  देण्याची गरज आहे. जेणेकरून  त्यांची ओढाताण कमी होऊन कुटुंबाला वेळ देण्यासोबतच त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील.  पालकत्वाच्या भूमिकेतून काम करतो असे सांगताना ते म्हणाले महिला कर्मचाऱ्यांच्या  सुरक्षेचाही विचार केला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. .
राज्यातील बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने होणारे बस्थानकाचे बांधकाम आता बंद केले आहे. राज्य परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानक बांधणार आहे हे सांगताना ते म्हणाले 85 कोटीचे बस स्थानक राज्यात  बांधणार असून त्यामध्ये 48 कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. हा सर्व खर्च भांडवली खर्चातुन करण्यात येणार आहे.  याशिवाय विदर्भातील सर्व  जुने बसस्थानक रंगरंगोटी करून प्रवाशाना सुखद वाटतील असे  करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 15 लक्ष 60 हजार रुपये निधीचे नियोजन केले आहे. याशिवाय 3 हजार प्रवाशी निवारे बांधण्यात येणार आहेत.तसेच सर्व बसस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
परिवहन महामंडळाची भरती आता पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. 4 लाख 50 हजार लोकांना रोजगार दिला असून आणखी 16 लाख बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ लेखी परीक्षा घेऊन लगेच त्यांना निकाल देण्यात येत आहे. अनुकंपा तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या महिलांची  शारीरिक चाचणी न बघता  केवळ त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
योजना ह्या जनता व कर्मचा-यांच्या हिताच्या असल्या पाहिजेत हे सागतांना ते म्हणाले त्याचा फायदा 50 टक्के या पिढीला  आणि 50 टक्के पुढच्या पिढीला मिळेल असा दुरदृष्टीकोन ठेवून नियोजन करण्यात आले आहे. कर्मच-यांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, तेव्हाच तो  चांगल्या मानसिकतेने  काम करेल. म्हणून रात्र पाळीत काम करणाऱ्या चालक व वाहकांसाठी बस स्थानकावर वातानुकूलित निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.
परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सांगूण ते म्हणाले,त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल.  तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा 25 टक्के जागा ठेवणार आहे. कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. मुंबईतील कर्मच-यांसाठी 1 हजार घरे बांधून देण्याचे काम सुरू असल्याचे श्री रावते यांनी सांगितले.
प्रवाशांचा  लांबचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून काही जिल्ह्यात  शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. वर्धेतही लवकरच वर्धा - पुणे, वर्धा- औरंगाबाद, हिंगणघाट- शिर्डी अशा तीन शिवशाही बस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बसला प्रवाशानी चांगला प्रतिसाद दिल्यास 10 बसेस सुरू करण्यात येतील. वर्धा जिल्ह्यातील  सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करू अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
खासदार रामदास तडस यावेळी बोलताना म्हणाले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे आज वर्धेत आधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे.  पण गावोगावी प्रवाशांसाठी प्रवाशी बस निवारे सुद्धा बांधून देण्यात यावेत अशी मागणी केली. देवळीलाही  नवीन बस स्थानक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी श्री रावते यांचेप्रति आभार व्यक्त केले.
आमदार पंकज भोयर यांनी नवीन बस स्थानकांमध्ये पूर्वीच्या दुकानदारांना गाळे वाटप करताना प्राधान्य द्यावे.सेलू बस स्थानकाचा विकास आराखड्यास मान्यता द्यावी आणि वर्धेत शिवशाही बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी केली.  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे जिल्ह्यात विविध चांगल्या वास्तु बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे सुनिल गफाट यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शुभसंदेश यावेळी वाचून दाखवला.
वर्धा विभागाचे विभाग नियंत्रक राजेश आडोकार यांनी प्रास्ताविक केले. श्री बाभरे  यांनी संचालन केले तर आभार वाहतूक अधिकारी श्रीमती सुतोने यांनी मानले.


समृध्द महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार शिवाय पर्यांय नाही
                                 प्रा. राम शिंदे
पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
वर्धा, दि 9 (जिमाका)  समृध्द महाराष्ट्र उभा करायचा असेल तर जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज केले.
वर्धा येथील विकास भवन येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त  शिवार  कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व ग्रामपंचायतींना बक्षिस वितरण सोहळयात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,  आमदार समिर कुणावार, आमदार आशिष देशमुख, जलसंधारण सचिव  एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनूपकुमार, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य टंचाई मुक्त करण्याचा प्रयत्न  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागात यावर्षी 70 टक्के पर्जन्यमान झाले असून विभागात निश्चितच टंचाईची परिस्थिती  निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही. यासाठी जलयुक्त शिवाराचे महत्व सर्वांना पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवारमध्ये  झालेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचविण्यासाठी  संबंधित यंत्रणांनी यशोगाथा, माहितीपट तयार करुन त्यांची प्रचार व प्रसिध्दी करावी अशा सुचनाही त्यांनी दिल्यात.
यावेळी जलयुक्त शिवार  अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार गांवाना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यात पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाईम्सचे प्रवीण लोणकर यांना रुपये 30 हजार व स्मृती चिन्ह , व्दितीय  दैनिक पूण्यनगरी चंदपूरचे प्रशांत देवतळे  रुपये 20 हजार व स्मृती चिन्ह, तृतीय दैनिक लोकमत गोंदियाचे नरेश रहिले यांना रुपये 15 हजार व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
          जिल्हास्तरावर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नागपूर येथील दैनिक हितवादचे कार्तिक लोंखंडे यांना रुपये 12 हजार स्मृतीचिन्ह, लोकशाही वार्ता नागपूरचे अनिल इंगळे यांना रुपये 10 हजार स्मृतीचिन्ह, वर्धा येथील    दैनिक तरुण भारतचे प्रफुल व्यास यांना प्रथम रुपये 15 हजार व स्मृतीचिन्ह, भंडारा येथील दैनिक सकाळचे श्रीकांत पनकंटीवार यांना प्रथम रुपये 15 हजार व स्मृतीचिनह, गोंदिया येथील दैनिक लोकमत समाचारचे व्दितीय  मुकेश शर्मा यांना  रुपये 12 हजार व स्मृतीचिन्ह , चंद्रपूर येथील दैनिक सकाळचे ‍व्दितीय संदिप रायपुरे यांना रुपये 12 हजार व स्मृतीचिनह  देऊन गौरविण्यात आले.
        राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम गावस्तरीय गडचिरोली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर गावाला रुपये 7 लाख 50 हजार व स्मृतीचिन्ह,  व्दितीय गोंदिया जिल्हयातील गंगाझरी गावाला रुपये 5 लाख व स्मृतीचिन्ह, तालुकास्तरीय प्रथम नागपूर जिल्हयातील काटोल तालुका रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह, व्दितीय चंद्रपूर जिल्हयातील चिमूर रुपये 7 लाख 50 हजार स्मृतीचिन्ह व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर 15 लाख रुपये व स्मृतीचिन्ह ,   व्दितीय गोंदिया  जिल्हा रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.
          तसेच तालुका स्तरावर प्रथम 5 लाख  रुपये व व्दितीय 3 लाख रुपयाचे पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस , आमदार आशिष देशमूख , आमदार समिर कुणावार यांची समायोचित भाषणे झाली.
                                    00000

प्र.प.654                                                              दि.9 नोव्हेंबर 2017
  कामे करण्यास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार
                                                          - प्रा राम शिंदे

Ø पत्रकार परिषद संपन्न
वर्धा दि 9 (जिमाका)  :-जलयुक्त शिवार अभियानात वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे,  त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे  यापुढे  जास्त कामे  घेऊन जाणीवपूर्वक काम करण्यास विलंब करणाऱ्या आणि पावसाळ्यापूर्वी कार्यादेश दिला असतानाही काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पाणीसाठा न होण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांवर  कारवाई  करण्यात येईल,  अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज जलयुक्त शिवार बाबत नागपूर विभातील जिल्ह्यांची आढावा बैठक वर्धा येथे प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना  ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार आशिष देशमुख, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्या.
प्रा. शिंदे यावेळी म्हणाले की, नागपूर विभागात समाधानकारक कामे झाली आहेत. त्यामुळे दोन वर्षात 1789 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत हे या योजनेचे यश आहे. . ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी जिल्ह्यांनी कामे केलीत.चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नैसर्गिक आपत्तीमुळे थोडे माघारले असले तरी ते सुद्धा 31 मार्च पर्यंत सर्व कामे पूर्ण करतील. असेही ते यावेळी म्हणाले.  यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा घटक होता . पण यावर्षी 2017- 18 मध्ये  पाणलोट क्षेत्र  हा घटक ठरवून  माथा ते पायथा काम करण्यात येणार आहे. यामध्ये 70 टक्के कामे ही माथ्यावर क्षेत्र उपचाराची असून 30 टक्के काम ही गावात होतील. यावर्षी 757 गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये  21120 कामे प्रस्तावित केली आहेत. यासाठी 146 कोटी 65 लक्ष रुपये निधी नागपूर विभागाला वर्ग करण्यात आला आहे.
नागपूर विभागात 2015 -16
  मध्ये 1077 गावांमध्ये जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्णण झाला असून त्यातून 1 लक्ष 9 हजार 108 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी 494 कोटी 82 लक्ष रुपये खर्च झाला असून सर्व 1077 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.
तसेच सन 2016-17 मध्ये एकूण 915 गावांपैकी 712 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.  यामुळे  60 हजार 185 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून यातून 43 हजार 713 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. यासाठी 334 कोटी 96 लक्ष खर्च करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
                                     



Thursday 9 November 2017



जलयुक्त शिवारची कामे जुन पर्यंत पूर्ण करा
                                          प्रा. राम शिंदे
Ø जलयुक्त शिवार विभागीय आढावा बैठक संपन्न
Ø यशोगाथाचे संकलन करुन ठेवावे
Ø टंचाईग्रस्त गावांचा प्राधान्याने समावेश करा
वर्धा, दि 9 (जिमाका)  जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नागपूर विभागात चांगली कामे झाली असून त्याचा फायदा शेतकरी व लोकांना  होतो आहे,  ही समाधानाची बाब आहे. 2016-17 मधील कामे 31 मार्च पर्यंत तसेच सन 2017-18 मधून प्रस्तावित आराखडयातील कामे जुन 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
आज विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्हयांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तीन वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समिर कुणावार, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनुपकुमार, रोहयो उपायुक्त पराग सोमन, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूर चे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडाराचे सुहास दिवसे , गोंदियाचे अभिमन्यू काळे,  गडचिरोलीचे एस.आर.नायक, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले कि, जलयुक्त  शिवार ही लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कमी पाऊस असतांनाही त्याची झळ फारशी बसलेली नाही. अभियानाचे हे तिसरे वर्ष असून या योजनेविषयी लोकांचे अभिप्राय घेऊन त्यानुसार योजनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. सन 2015-16 आणि 2016-17 मध्ये झालेल्या कामांमुळे अनेक यशोगाथा तयार झाल्या आहे. गोंदिया जिल्हयात जलयुक्त शिवारमुळे जसे धानाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढले तसेच इतर जिल्हयातही अशाच प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या सर्व यशोगाथा प्रत्येक जिल्हयांने माहितीपट, छायाचित्र पुस्तिका, यशकथा पुस्तिका स्वरुपात तयार करुन त्या प्रसारमाध्यमातून व चित्ररथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. यामुळे निराशावादी लोकांनाही यातून प्रेरणा मिळून चांगले काम होत राहील.
सन 2017-18 मध्ये निवडलेल्या गावांचा माथा ते पायथा या परिमानानुसार  आराखडा तयार करुन त्याला विभागीय आयुक्तांकडून तातडिने मान्यता घ्यावी. तसेच ही कामे 15 जुन पर्यंत पूर्ण करण्यासाठी  नियोजन पध्दतीने अंमलबजावणी करावी. अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. नालाखोलीकरण करतांना पाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घेतांना मध्येमध्ये अडथळे करावे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजुला पिचींग करावी. म्हणजे माती पुन्हा नाल्यात वाहून येणार नाही. कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण न करणा-या कत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी. मागील दोन वर्षात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये टंचाईग्रस्त  गावे सुटली असल्यास त्यांना प्रथम प्राधान्याने घेण्यात यावे. प्रत्येक गावात काम सुरु करतांनाच कामाचा फलक लावण्यात यावा.
ज्या जिल्हयांमध्ये जलयुक्त  शिवारचे कामासाठी यंत्राची आवश्यकता आहे. तिथे जिल्हा नियोजन आराखडयातून खरेदी करावी. तसेच 15 टक्के निधी  जलयुक्त शिवार कामासाठी राखून ठेवावा,  अशा सुचना सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या.
प्रास्ताविक करतांना विभागीय आयुक्त यांनी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विभागात  झालेल्या कामाबाबत सविस्तर  माहिती दिली. विभागात सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानात 1077 गावांमध्ये 23 हजार 379 विविध जलसंधारणाची  कामे पूर्ण झाली असून 156 कामे प्रगतीपथावर आहे. लोकसहभाग व शासकिय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यामधून 75.23 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. या सन 2015-16 मध्ये सर्व गावे जलपरिपूर्ण झालेली असून यातून 1 लाख 9 हजार 108 हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.
सन 2016-17 मध्ये 915 गावांमध्ये 22 हजार 95 विविध जलसंधाराणाच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आज अखेंर 19 हजार 732 कामे पूर्ण झाले असून 843 कामे प्रगतीपथावर आहे. 915 पैकी 712 गावे जलपरिपूर्ण झाली असून यामुळे 43 हजार 713 हेक्टर संरक्षित सिंचनाखाली आले आहे. सन 2017-18 मध्ये 757 गावाची निवड करण्यात आली असुन यामध्ये 21 हजार 120 काम प्रस्तावित केली आहे. यापैकी 955 कामे सुरु झाली असून शासनाकडून 146 कोटी 65 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागपूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांदबरी भगत ,चंद्रपूरचे  जितेंद्र पापळकर, भंडाराचे मनोजकुमार सुर्यंवंशी, गडचिरोलीचे शंतुन गोयल, गोंदियाचे आर.एच.ठाकरे, वर्धेच्या नयना गुंडे तसेच जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करणा-या यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल  राजपायले  यांनी केले.
प्रारंभी जलयुक्त शिवार अभियान 2017-18 मधील गावामध्ये जनजागृती करणा-या चित्ररथाचा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी फीत कापून शुभारंभ  केला. दरम्यान सकाळी पुलगाव येथील दारुगोळा भांडार यांच्या अखत्यारित असलेल्या नाचनगाव येथील दर्गा टेकडीवरील जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथे वृक्षरोपन करुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी सहकार्य करणारे दारुगोळा भंडारचे सर्व प्रशासकिय अधिकां-याचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच  कवठा रेल्वे येथील जलयुक्त शिवार अभियान कामाचीही पाहणी केली.   
                                      0000







जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे आज वर्धा  दौऱ्यावर
     * जलयुक्त शिवार योजनेबाबत नागपूर  विभागीय आढावा बैठक
* जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध पुरस्कार
  वितरण सोहळा
     वर्धा दि. 8 :---  राज्याचे  जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे  हे गुरूवार, दि. 9 नोव्हेंबर 2017 रोजी वर्धा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  2015 16, 2016-17 मध्ये झालेल्या कामाची पाहणी करून  विकास भवन येथे नागपूर  विभागातील 6 जिल्ह्यांचा  आढावा घेतील. 
    या बैठकीला 6  जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार,  जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.
*जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा*
          राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकार यांना 9 नोव्हेंबर 2017 रोजी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विकास भवन
  सभागृहात दुपारी 4  वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सर्व पुरस्कार्थीना  पुरस्कार वितरण होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांची माहिती अशी आहे.      
राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम गावस्तरीय गडचिरोली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, व्दितीय गोंदिया जिल्हयातील गंगाझरी, तालुकास्तरीय प्रथम नागपूर जिल्हयातील काटोल तालुका, व्दितीय चंद्रपूर जिल्हयातील चिमूर व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर व व्दितीय गोंदिया  जिल्हयांना देण्यात येणार आहे.
   
पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम प्रवीण लोणकर नागपूर, द्वितीय प्रशांत देवतळे चंद्रपूर, तृतीय नरेश रहिले
  गोंदिया यांना देण्यात येणार आहे.
अहिल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार  तालुकास्तरीय वर्धा जिल्हयातील प्रथम सेलू, व्दितीय , हिंगणघाट , नागपूर जिल्हयातील प्रथम काटोल, व्दितीय नरखेड, भंडारा जिल्हयातील प्रथम मोहाडी, व्दितीय तूमसर, गोदिंया जिल्हयातील प्रथम गोरेगाव व व्दितीय सालेकसा, चंद्रपूर जिल्हयातील प्रथम चिमुर व व्दितीय गोंडपिपरी, गडचिरेाली जिल्हयातील प्रथम ऐटापल्ली व व्दितीय अहेरी  यांना तर गाव स्तरीय वर्धा जिल्हयातील देवळी तालुक्यातील प्रथम मलकापूर, व्दितीय सेलू तालुक्यातील मदनी, तृतीय कारंजा तालुक्यातील मरकसूर, चतुर्थ हिंगणघाट तालुक्यातील उमरी येंडे तर पाचवा वर्धा तालुक्यातील तळेगाव ,  नागपूर जिल्हयातील प्रथम  काटोल तालुक्यातील सोनखांब , व्दितीय नरखेड तालुक्यातील आंबांडा , तृतीय काटोल तालुक्यातील डोंगरगाव , चौथा सावनेर तालुक्यातील जैतापूर, पाचवा उमरेड तालुक्यातील मुरादपुर , भंडारा जिल्हयातील प्रथम मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव, व्दितीय करडी, तृतीय नरसिहटोला, चतुर्थ तुमसर तालुक्यातील पवनारखारी , पाचवा मेहेगाव, गोदिंया जिल्हयातील प्रथम गोंदिया तालुक्यातील गंगाझरी , व्दितीय गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला, तृतीय देवरी तालुक्यातील एडमागोंदी , चौथा सडकअर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी, पाचवा मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोळदे , चंद्रपूर जिल्हयातील प्रथम चिमूर तालुक्यातील इरव्हा, व्दितीय टेकेपार, तृतीय रेंगाबोडी, चर्तुथ भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, पाचवा चिमुर तालुक्यातील शिवरा , गडचिरोली जिल्हयातील प्रथम अहेरी तालुक्यातील मुत्तापुर, व्दितीय धानोरा तालुक्यातील जप्पी , तृतीय भामरागड तालुक्यातील कोठी, चर्तुथ एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी, पाचवा गुरुपल्ली या गावाला प्रदान करण्यात येणार आहे.
        पत्रकारांना देण्यात येणा-या  पुरस्कारांमध्ये वर्धा जिल्हा - प्रफुल व्यास  (प्रथम), नागपूर जिल्हयातील प्रथम श्रीराम लोणकर, व्दितीय   -कार्तिक लोखंडे,  तृतीय अनिल इंगळे ,भंडारा जिल्हयातील  - प्रथम श्रीकांत पनकंटीवार गोंदिया  जिल्हयातील  -  नरेश राहिले (प्रथम), मुकेश शर्मा  (द्वितीय), चंद्रपूर जिल्हयातील  प्रशांत रामदास देवतळे(प्रथम), संदिप महादेव रायपुरे(व्दितीय)  यांना प्रदान करण्यात येईल.
           अधिकारी कर्मचा-यांमध्ये प्रथम पुरस्कार वर्धा जिल्हयातील रविंद्र तुकाराम तुपकर, नागपूर जिल्हयातील अविनाश कातडे, भंडारा जिल्हयातील किशोर गोंविदराव पात्रिकर, गोंदिया जिल्हयातील नंदकिशोर नयनवाड, चंद्रपूर जिल्हयातील शिवरचरण रजवाडे, व गडचिरोली जिल्हयातील दिलीप आत्माराम राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे राहील.                                                        0000