समृध्द महाराष्ट्रासाठी
जलयुक्त शिवार शिवाय पर्यांय नाही
प्रा. राम शिंदे
पुरस्कार वितरण
सोहळा संपन्न
वर्धा, दि 9 (जिमाका) समृध्द महाराष्ट्र
उभा करायचा असेल तर जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही असे
प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज केले.
वर्धा येथील विकास भवन येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी,
पत्रकार व ग्रामपंचायतींना बक्षिस वितरण सोहळयात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन
मडावी, आमदार समिर कुणावार, आमदार आशिष देशमुख,
जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त
अनूपकुमार, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
संकल्पनेतून जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या
माध्यमातून राज्य टंचाई मुक्त करण्याचा प्रयत्न
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागात यावर्षी 70 टक्के पर्जन्यमान
झाले असून विभागात निश्चितच टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही.
यासाठी जलयुक्त शिवाराचे महत्व सर्वांना पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामाची
माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी यशोगाथा, माहितीपट तयार करुन
त्यांची प्रचार व प्रसिध्दी करावी अशा सुचनाही त्यांनी दिल्यात.
यावेळी
जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम
केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार गांवाना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण
करण्यात आले. यात पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र प्रथम
पुरस्कार महाराष्ट्र टाईम्सचे प्रवीण लोणकर यांना रुपये 30 हजार व स्मृती चिन्ह ,
व्दितीय दैनिक पूण्यनगरी चंदपूरचे प्रशांत
देवतळे रुपये 20 हजार व स्मृती चिन्ह,
तृतीय दैनिक लोकमत गोंदियाचे नरेश रहिले यांना रुपये 15 हजार व स्मृती चिन्ह देऊन
गौरविण्यात आले.
जिल्हास्तरावर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नागपूर
येथील दैनिक हितवादचे कार्तिक लोंखंडे यांना रुपये 12 हजार स्मृतीचिन्ह, लोकशाही
वार्ता नागपूरचे अनिल इंगळे यांना रुपये 10 हजार स्मृतीचिन्ह, वर्धा येथील दैनिक तरुण भारतचे प्रफुल व्यास यांना प्रथम
रुपये 15 हजार व स्मृतीचिन्ह, भंडारा येथील दैनिक सकाळचे श्रीकांत पनकंटीवार यांना
प्रथम रुपये 15 हजार व स्मृतीचिनह, गोंदिया येथील दैनिक लोकमत समाचारचे व्दितीय मुकेश शर्मा यांना रुपये 12 हजार व स्मृतीचिन्ह , चंद्रपूर येथील
दैनिक सकाळचे व्दितीय संदिप रायपुरे यांना रुपये 12 हजार व स्मृतीचिनह देऊन गौरविण्यात आले.
राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम
गावस्तरीय गडचिरोली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर गावाला रुपये 7 लाख 50
हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय गोंदिया
जिल्हयातील गंगाझरी गावाला रुपये 5 लाख व स्मृतीचिन्ह, तालुकास्तरीय प्रथम नागपूर
जिल्हयातील काटोल तालुका रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह, व्दितीय चंद्रपूर जिल्हयातील
चिमूर रुपये 7 लाख 50 हजार स्मृतीचिन्ह व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर 15 लाख रुपये
व स्मृतीचिन्ह , व्दितीय गोंदिया जिल्हा रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच तालुका स्तरावर प्रथम 5 लाख रुपये व व्दितीय 3 लाख रुपयाचे पूण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस
, आमदार आशिष देशमूख , आमदार समिर कुणावार यांची समायोचित भाषणे झाली. 00000
प्र.प.654
दि.9 नोव्हेंबर 2017
कामे करण्यास
विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार - प्रा राम शिंदे
Ø पत्रकार परिषद संपन्न
वर्धा
दि 9 (जिमाका) :-जलयुक्त शिवार अभियानात
वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे, त्यांना काळ्या यादीत
टाकण्याचे अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले
आहेत. त्यामुळे यापुढे जास्त कामे घेऊन जाणीवपूर्वक काम
करण्यास विलंब करणाऱ्या आणि पावसाळ्यापूर्वी कार्यादेश दिला असतानाही काम वेळेत
पूर्ण न केल्यामुळे पाणीसाठा न होण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण
मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज
जलयुक्त शिवार बाबत नागपूर विभातील जिल्ह्यांची आढावा बैठक वर्धा येथे प्रा राम
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार
परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर
कुणावर, आमदार आशिष देशमुख, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी शैलेश
नवाल , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्या.
प्रा.
शिंदे यावेळी म्हणाले की, नागपूर विभागात समाधानकारक कामे झाली आहेत. त्यामुळे दोन
वर्षात 1789 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत हे या योजनेचे यश आहे. . ठरवून दिलेल्या
वेळेपूर्वी जिल्ह्यांनी कामे केलीत.चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नैसर्गिक
आपत्तीमुळे थोडे माघारले असले तरी ते सुद्धा 31 मार्च पर्यंत सर्व कामे पूर्ण
करतील. असेही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा घटक होता . पण यावर्षी 2017- 18
मध्ये पाणलोट क्षेत्र हा घटक ठरवून माथा ते पायथा काम करण्यात
येणार आहे. यामध्ये 70 टक्के कामे ही माथ्यावर क्षेत्र उपचाराची असून 30 टक्के काम
ही गावात होतील. यावर्षी 757 गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 21120 कामे प्रस्तावित केली
आहेत. यासाठी 146 कोटी 65 लक्ष रुपये निधी नागपूर विभागाला वर्ग करण्यात आला आहे.
नागपूर विभागात 2015 -16 मध्ये 1077 गावांमध्ये जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्णण झाला असून त्यातून 1 लक्ष 9 हजार 108 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी 494 कोटी 82 लक्ष रुपये खर्च झाला असून सर्व 1077 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.
नागपूर विभागात 2015 -16 मध्ये 1077 गावांमध्ये जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्णण झाला असून त्यातून 1 लक्ष 9 हजार 108 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी 494 कोटी 82 लक्ष रुपये खर्च झाला असून सर्व 1077 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.
तसेच
सन 2016-17 मध्ये एकूण 915 गावांपैकी 712 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण झाली
आहेत. यामुळे 60 हजार 185 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला
असून यातून 43 हजार 713 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. यासाठी 334
कोटी 96 लक्ष खर्च करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment