गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची आज जगाला गरज
- राजकुमार बडोले
• 5 कोटीच्या पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन
• सांस्कृतिक ठेवा जपण्याची गरज- मदन येरावार
• बोर धरण आणि केळझर येथील विकास कामांचा समावेश
वर्धा दि 5 (जिमाका) गौतम बुद्धांचा धम्म हा महासागरासारखा आहे.यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. आजच्या जागतिक दहशतवादाच्या, आक्रमकतेच्या, निराशेच्या आणि अनिशचिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
केळझर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि कार्तिक पोर्णिमेनिमित्त आयोजित स्वागत समारोह व धम्म परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे अशोक कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे, भन्ते सदानंद ,सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.
बोर धरण येथील बगीचा, केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीर बाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण 5 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते.पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही . असेही ते यावेळी म्हणाले.
मदन येरावार:- आजच्या नाविन पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे. केळझरच्या भूमीवरून मागील 40 वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार यावेळी म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा आपल्याला शांती चा संदेश देणाऱ्या बुद्धाची आठवण होते.आणि युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.
आपल्या पूर्वजानी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रुपात जतन केला आहे.त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात निर्माण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.
70 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खासदार रामदास तडस म्हणाले , बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने 5 हजार कोटी रुपयाचे काम सुरू झाले आहे. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांचे आभार मानले.
केळझरला तीनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केलझारला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार समीर कुणावर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
00000
प्र.प.644
दि.5 नोव्हेंबर 2017
मारुती सुझुकी इंडिया प्रशिक्षणार्थी
भरती मेळावा
Ø आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
वर्धा, दि 5 (जिमाका) कौशल्यप्राप्त युवकांना
रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी
कार्यालयाचे वतीने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
आयोजित करण्यात येत आहे. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता हिंगणघाट येथील शासकिय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सदर मेळावा पार पडणार आहे. यासाठी शासकीय औद्योगिक
संस्थेतुन 2016 मध्ये उत्तीर्ण आणि जुलै 2017 मध्ये परीक्षा दिलेले विद्यार्थी
पात्र ठरतील.
मारुती सुझुकी इंडीयाच्या गुरगाव, मानेसर, कार
प्लॉन्ट, मानेसर पावरटेन प्लांन्ट करीता
सदर भरती मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये विद्युत, फीटर, यंत्रकार, यांत्रिकी
मोटार वाहने, टुल ॲन्ड डाय मेकर, पेंटर, वेल्डर या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी या
मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवाराची निवड ही
लेखी व परीक्षा व मुलाखत घेऊन करण्यात येईल. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण
काळात प्रशिक्षणार्थ्याना दरमहा विद्यावेतन 9 हजार 238 रुपये आणि हजेरी बोनस 3 हजार 120 रुपये मिळणार आहेत. शिवाय
प्रशिक्षणादरम्यान जेवन व युनिफार्म कंपनीमार्फत पुरविण्यात येणार आहे. निवास व
प्रवास खर्च स्वत: प्रशिक्षणार्थींना करावा लागेल.
उमेदवारांनी मेळाव्यासाठी येतांना पासपोर्ट
आकाराचेही छायाचित्र, ओळखपत्र, आधारकार्ड , मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र दोन प्रतित
आणि आय टी आय प्रमाणपत्र दोन प्रतित सोबत ठेवावे. या भरती मेळाव्याचा लाभ
आय.टी.आय. उत्तीर्ण बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण अधिकारी यु.आर. खारोडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment