Saturday, 23 June 2012

संचिका पाठविण्‍याबाबत मुख्‍य सचिवांचे आवाहन




                          वर्धा दि.23-  दिनांक 21 जून,2012 रोजी मंत्रालयीन इमारतीला लागलेल्‍या आगीत सोबतच्‍या परिशिष्‍ट 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या विभागातील बहुतांश संचिका नष्‍ट  झालेल्‍या आहेत त्‍या संचिंकाची प्रामुख्‍याने 3 वर्गीकरणे आहे.
संचिका  1 - नागरीकांनी मंत्रालयात केलेल्‍या अर्जावरुन उदभालेली प्रकरणे  
संचिका 2 – राज्‍य शासनाच्‍या अधिनस्‍त कार्यालयाकडून प्राप्‍त झालेली प्रकरणे
संचिका 3 – केंद्र शासन,इतर कार्यालये किंवा मंत्रालयीन स्‍तरावर उदभलेली प्रकरणाची  पुर्नबांधणी करण्‍याबाबत उपाययोजना करावयाची असल्‍याने सदर्हू माहिती तातडीने पाठविण्‍यात यावी असे आवाहन राज्‍याचे मुख्‍य सचिव जयंतकुमार बॉंठीया यांनी केले आहे.
            संचिका 1 सर्व जिल्‍हाधिकारी यांनी स्‍थानिक रित्‍या प्रसिध्‍दी देवून अशा अर्ज केलेल्‍या नागरीकांना त्‍यांचे जवळ असलेल्‍या प्रकरणाची पोच, अर्जाची प्रत व सलग्‍न कागदपत्रो त्‍या तालुक्‍याच्‍या तहसील कार्यालयात जमा करण्‍यास आवाहन करावे. त्‍यासाठी सेतू सेवा केंद्रामध्‍ये विशिष्‍ट कक्ष उघडून प्राप्‍त प्रकरणासाठी पोच पावती घ्‍यावी.व अशी सर्व प्रकरणे त्‍या मंत्रालयीन विभागास तात्‍काळ पोहचवावी या कार्यपध्‍दतीसाठी परिशिष्‍ट 1 मधील कार्यालयाचा उल्‍लेख करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिध्‍दी द्यावी.
संचिका 2 –शासनातील ज्‍या अधिनस्‍त कार्यालयानी मंत्रालयात प्रकरणे पाठविली आहे व त्‍यावर निर्णय प्रलंबीत आहे.अशी प्रकरणे त्‍या मंत्रालयीन कार्यालयास परिशिष्‍ट 1 मध्‍ये विभागापुर्ती पाठवावी. अशी सर्व प्रकरणे पुढील 15 दिवसात पाठविण्‍यात आली आहेत याची शहानिशा सर्व शासकीय कार्यालयानी करावी व त्‍यावर संपूर्ण नियंत्रण त्‍या त्‍या जिल्‍हाधिका-यांनी ठेवावे.
संचिका 3- मंत्रालयीन विभागात जी प्रकरणे उदभवलेली आहेत त्‍यासाठी डीजेएमएस करुन माहिती घेवून आणि जेथे अशी माहिती ही नस्‍ट झाली आहे. त्‍या प्रत्‍येक कर्मचा-याकडून पुढील एका आठवड्यात अशा संचिका पुन्‍हा स्‍थापीत कराव्‍यात, त्‍यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून काही माहिती आवश्‍यक असल्‍यास ती पुढील एका आठवड्यात प्राप्‍त करुन घ्‍यावी.
संनियंत्रण ः प्रत्‍येक विभागाच्‍या सचिवांनी वरील कार्यपध्‍दतीप्रमाणे सर्व नस्‍ट संचिकाची पुर्नबांधणीची कार्यवाही पुढील एका मण्यिात पूर्ण करावी .  डीजेएमएस किंवा कर्मचा-याकडून प्राप्‍त माहितीच्‍या आधारे तीनही वर्गीकरणा-या किती संचिकाची पुर्नबांधनी  आवश्‍यक आहे.त्‍याचे उदिष्‍ट निचित करावे व त्‍याची सद्यास्थिती,त्‍याची क्षेत्रीय व मंत्रालयीन कार्यालयाकडून माहिती घेवून प्रत्‍येक आठवड्यात सामान्‍य प्रशासन विभागाला सादर करावी. असे जारी केलेल्‍या परिपत्रकात नमूद केले आहे.
0000


Friday, 22 June 2012

शेतक-यांच्‍या बांधावर खत 37 गावात 480 मेट्रीक टन खत वाटप


-         श्रीमती जयश्री भोज

वर्धा दि.22- शेतक-यांना मागणी नुसार आपल्‍या गावात खत उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या योजने अंतर्गत 47 शेतकरी गटांनी 480 मेट्रीक टन खताची उचल केली आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
          जिल्‍हयातील 37 गावामध्‍ये 689 शेतक-यांनी एकत्र येवून 47 गट स्‍थपन केले व शेतक-यांच्‍या  बांधावर खत योजनेचा लाभ घेतला आहे.शेतक-यांना या योजने अंतर्गत युरीया गोणी 271 रुपये डीएपी गोणी 937 रुपये 50 पैसे व वीस वीस शुन्‍य 764 रुपये 50 पैसे या दराने पुरविण्‍यात आली आहे.
वर्धा जिल्‍हयासाठी 5 हजार मेट्रीक टन खत संरक्षित साठयातुन मुक्‍त करण्‍यात आले असून शेतक-यांनी आपले गट स्‍थापन करुन या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
         खरीप हंगामापासून शेतक-यांच्‍या बांधावर खत वाटपाची योजना सुरु केली आहे.कृषी निगडीत महिला व पुरुष गट व जे शेतकरी गटात नाही परंतु 10-12 शेतकरी एकत्र आल्‍यास त्‍यांच्‍या समुहाला या योजनेत त्‍यांच्‍या शेतीच्‍या आकारानुसार बांधावर खत उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. गटांच्‍या प्रमुखाने आवश्‍यकता असलेल्‍या रासायनिक खताची मागणी आपल्‍या गावच्‍या कृषी सहाय्यका कडे  करावी.
          या योजने अंतर्गत पुरवठा करण्‍यात येत असलेले सध्‍याचे खत जुन्‍या संरक्षीत साठयातील असल्‍यामुळे शेतक-यांना बाजारभावा पेक्षा कमी दरातच बांधावर उपलब्‍ध होणार आहे, बांधावर खत उपलब्‍ध होणार असल्‍यामुळे जास्‍त दराने किंवा टिल्‍लू सोबत घेण्‍याच्‍या खाजगी दुकानदारापासून शेतक-यांची सुटका होईल. जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना व शेतकरी गटांना योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
                                                                00000           

सामाजिक न्‍याय दिनाचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते उदघाटन


                                    ·        26 जुन सामाजिक न्‍याय दिन
·        राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्‍मदिन
·        शिष्‍यवृत्‍ती व घरकुलाचे वाटप

वर्धा दि.22- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्‍मदिवस सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे.पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांच्‍या हस्‍ते 26 जून रोजी सकाळी 9 वाजता सामाजिक न्‍याय दिनाचे उदघाटन  सेवाग्राम रोडवरील सामाजिक भवन येथे आयोजित करण्‍यात आले आहे. या  कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता तसेच सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजीत कांबळे,खासदार दत्‍ता मेघे, आमदार  सुरेश देशमुख, अशोक शिंदे, दादाराव केचे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार ,मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने आदी उपस्थित राहणार आहे.
            सामाजिक न्‍याय दिनानिमित्‍त लाभार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती,घरकुल आदी वाटप करण्‍यात येणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, महिला व बालकल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे,शिक्षण व आरोग्‍य समितीचे  सभापती प्रा. उषाकिरण थुटे,समाजकल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले आदि उपस्थित राहणार आहे.
            राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्‍मदिन व सामाजिक न्‍याय दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण किशोर भोयर व जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.
0000

26 जून न्‍याय दिन म्‍हणून साजरा करा जिल्‍हाधिका-यांचे आवाहन


       वर्धा दि.22- राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्‍मदिवस दिनांक 26 जून हा सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून साजरा करण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये,प्राथमिक शाळा,माध्‍यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, शासन पुरस्‍कृत महामंडळे आणि स्‍वयंसेवी संस्‍था यांनी मंगळवार दिनांक 26 जून,2012 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्‍मदिन सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून साजरा करावा तसेच या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने सर्व संस्‍थांनी मोठया उत्‍साहाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश सुरु 30 जून पर्यन्‍त अर्ज स्‍वीकारणार


        वर्धा दि.22- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था  व औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेतील सेंटर ऑफ एक्‍सलन्‍सच्‍या ब्रॉड बेस बेसीक ट्रेनिंगमध्‍ये प्रवेश  घेऊ इच्छिणा-या उमेदवारांना प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दिनांक 30 जून,2012 पर्यन्‍त स्विकारण्‍यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश घ्‍यावयाचा आहे.त्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये  अर्ज भरुन विहीत मुदतीत स्विकारण्‍यात येईल. उमेदवार ज्‍या संस्‍थेत सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स मधील ब्रॉड बेस बेसीक ट्रेनिंगची सोय उपलब्‍ध आहे. अशा संस्‍थेत प्रवेश अर्ज सादर करु शकतो.  
 शालांत प्रमाणपत्र परिक्षा इतर राज्‍यातून उतिर्ण झालेल्‍या उमेदवारांना  औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश घ्‍यावयाचा आहे त्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्‍या संबंधीत सहसंचालक, व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालयामध्‍ये 30 जून पर्यन्‍त  अर्ज करावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व  सेंट्रलऑफ एक्‍सलन्‍सच्‍या ब्रॉड बेस बेसीक ट्रेनिंग  माहिती पुस्तिकेची प्रवेश अर्जासह किंमत सर्वसाधारण उमेदवारासाठी 30 रुपये व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 20 रुपये तसेच सेंट्रल ऑफ एक्‍सलन्‍सच्‍या ब्रॉड बेस बेसीक ट्रेनिंग मध्‍ये प्रवेशासाठी राज्‍याबाहेरील उमेदवारासाठी अेक हजार रुपये आहे.
         प्रवेश संबंधी शैक्षणिक अर्हता अन्‍य अटी इत्‍यादी  बाबतची माहिती प्रवेश अर्जासोबत दिल्‍या जाणा-या माहिती पुस्तिकेत आहे.   
00000

Tuesday, 19 June 2012

वृक्षारोपण व संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार


·         31 ऑगष्‍ट पर्यन्‍त प्रस्‍ताव स्‍वीकारणार
·         वनश्री पुरस्‍कार आता शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार
·         राज्‍य विभागीय स्‍तरावर तसेच पुरस्‍कार

वर्धा दि.18 -  वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या संस्‍थाना  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात येणार आहे. राज्‍य व विभागीय स्‍तरावरील पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव 31 ऑगष्‍ट पर्यन्‍त उपसंचालक,सामाजिक वनीकरण विभागात स्विकारण्‍यात येणार आहेत.
          वनेत्‍तर क्षेत्रावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कामात कार्यरत असलेल्‍या व्‍यक्‍ती व संस्‍था यांचेकडून सन 2011 करीता छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव स्‍वीकारण्‍यात येणार आहेत.यापूर्वी हा वनश्री पुरस्‍कार 1988 पासून देवून गौरविण्‍यात येत होते.
         पुरस्‍कार विभागीय  स्‍तर आणि राज्‍यस्‍तर अशा दोन वेगवेगळया स्‍तरावर देण्‍यात येतात.व्‍यक्‍ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था, सेवाभावी संस्‍था, ग्राम विभाग अथवा जिल्‍हा अशा पाच वेगवेगळया संवर्गात पुरस्‍कार देण्‍यात येतात. विभागीय स्‍तरावर 2 पुरस्‍कार देण्‍याची तरतुद असून प्रथम पुरस्‍कार रुपये 25 हजार तर व्दितीय पुरस्‍कार 15 हजार आहे. राज्‍यस्‍तरावरील तीन पुरस्‍कार  असून प्रथम पुरस्‍कार 50 हजार रुपये व्दितीय पुरस्‍कार 40 हजार रुपये तर तृतीय पुरस्‍कार 30 हजार  रुपये असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.
        पुरस्‍कार मिळण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या  व्‍यक्‍ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था  व  सेवाभावी संस्‍था यांनी रोपवाटीका व रोपनिर्मितीचे काम केलेले असावे, त्‍यांनी शासकीय, सामुहिक अथवा खाजगी जमिनिवर सरपन,वैरण देणा-या झाडांची लागवड केलेली असावी. त्‍यांनी वृक्षलागवडीचे कार्यक्रमात ग्रामीण दुर्बल घटकांचा तसेच महिलांचा सहभाग घेतलेला असावा.त्‍यांनी वनीकरणाच्‍या माध्‍यमातून शाळकरी विद्यार्थी व महिला  यांचे कल्‍यानार्थ कार्य केलेले असावे,अपारंपारीक उर्जा स्‍त्रोतांचा वापर करणेसाठी जनतेला प्रोत्‍साहीत तसे प्रवृत्‍त करणारे त्‍यांचे काम असावे. वनीकरणाच्‍या संबंधात जनजागृती,प्रसिध्‍दी व प्रेरणा देणेबाबत सुध्‍दा काम त्‍यांनी केलेले असावे.
         वर्धा जिल्‍हयात वनेत्‍तर क्षेत्रात वृक्षारोपन आणि वृक्षसंवर्धनाच्‍या कार्यात दिनांक 31 डिसेंबर,2011 पर्यन्‍त मागील 3 वर्षापासून कार्यरत असणा-या आणि या पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यास इच्‍छुक असणा-या व्‍यक्‍ती,ग्रामपंचायत,शैक्षणिक संस्‍था व सेवाभावी संस्‍था यांनी जास्‍तीत जास्‍त संखेत प्रस्‍ताव सादर करावे असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक मिलींद बडगे यांनी केले आहे.     
परिपूर्ण प्रस्‍ताव  सादर करणेसाठी प्रस्‍तावाचा नमुना आणि त्‍या अनुषंगाने आवश्‍यक माहिती प्राप्‍त  करुन  घेण्‍यासाठी वर्धा जिल्‍हयातील व्‍यक्‍ती, शैक्षणिक संस्‍था,सेवाभावी संस्‍था, ग्रामपंचायत इत्‍यादिंनी उपसंचालक,सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचे बॅचलर रोड स्थित कार्यालय आणि तालुक्‍याचे मुख्‍यालयी असलेल्‍या लागवड अधिकारी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्‍ध आहेत.
                                                                0000