वर्धा
दि.22- राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस दिनांक 26 जून हा सामाजिक न्याय
दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले
आहे.
जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालये,प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, शासन पुरस्कृत
महामंडळे आणि स्वयंसेवी संस्था यांनी मंगळवार दिनांक 26 जून,2012 रोजी राजश्री
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करावा तसेच
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व संस्थांनी मोठया उत्साहाने विविध
कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment