Saturday 20 August 2016

दिव्‍यांगांसाठी नागपूरला होणार
संयुक्‍त पुर्नवास केंद्र
                                           -केंद्रीय मंत्री  थावरचंद्र गेहलोत
Ø 532 दिव्‍यांगांना साहित्‍याचे वितरण
वर्धा, दि.20 :-दिव्‍यांगांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्‍यांची आरोग्‍य तपासणी, प्रशिक्षण, स्‍वंयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा योजना, यासारख्‍या  सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्‍हणुन नागपूरला संयुक्‍त पुर्नवास केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कर्मचा-यांची नियुक्‍ती झाल्‍यावर तीन महिन्‍यात हे केंद्र अंपगासाठी कार्यान्वित होईल.  अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.
दिव्‍यागांसाठी निःशुल्‍क साहित्‍य वितरणाचा कार्यक्रम आज सावंगी मेघे येथील दंत महाविद्यालयाचे सभागृहात सामाजिक न्‍याय आणि अधिकारि‍ता मंत्रालय ,एलिम्‍को कंपनी आणि जिल्‍हा प्रशासनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने घेण्‍यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री गेहलोत बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी , जिल्‍हाधिकारी  शैलेश नवाल, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर उपस्थित होते.
यावेळी श्री गेहलोत यांचे हस्‍ते अपंगांना तीन चाकी सायकल, व्‍हील  चेअर, श्रवणयंत्र, एमएसआयईडी कीट, ब्रेलकाठी, ब्रेलकीट इत्‍यादी साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. यावेळी बोलतांना ते म्‍हणाले, आतापर्यंत दिव्‍यागांना शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात येत नव्‍हती. मात्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिव्‍यांगांच्‍या सर्वांगिण विकासासाठी काही योजना नव्‍याने सुरु केल्‍या. त्‍यामध्‍ये 2014-15 पासुन अपंगांसाठी शिष्‍यवृत्‍ती योजना सुरु केली आहे. याचा लाभ पूर्वमाध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक आणि पदवीधर विद्र्या‍र्थी  घेऊ शकतात .
त्‍याचबरोबर 80 टक्‍के पेक्षा जास्‍त अंपग असणा-या व्‍यक्‍तींना मोटराईज्‍ड ट्रायसिकल देण्‍याची योजना सुरु केली आहे. यामध्‍ये केंद्र सरकार 25 हजार अनुदान देते उर्वरित 12 हजार रुपये आमदार ,खासदार निधीतून उपलब्‍ध करुन दिल्‍यास दिव्‍यांग याचा सुध्‍दा लाभ घेऊ शकतात. देशात आतापर्यंत दोन हजार शिबिराच्‍या माध्‍यमातून 5 लाख पेक्षा जास्‍त दिव्‍यांगांना विविध दैनंदिन साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. कर्णबधिर मुलांसाठी  कॉकलिअर इम्‍प्‍लॉटची सुविधा उपलब्‍ध करुन दिली असून यासाठी 6 लाख रुपये अनुदान केंद्र शासन देते.  आतापर्यंत 355 मुलांवर इम्‍प्‍लाट केले असून आता ती मुले चांगल्‍याप्रकारे ऐकू व बोलू शकत आहे.
 याशिवाय केंद्र सरकार राष्‍ट्रीय  स्‍तरावर राष्‍ट्रीय क्रिडा केंद्र स्‍थापित करण्‍याचा विचार करीत आहे. यामुळे दिव्‍यांगांमध्‍ये असलेल्‍या  क्रिडागुणांचा विकास होईल. त्‍याचबरोबर दिव्‍यागांसाठी विशिष्‍ट प्रकारचे ओळखपत्र बनविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून  यामुळे दिव्‍यांग कोणत्‍याही शहरात कुठल्‍याही  योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही ते यावेळी म्‍हणाले. वर्धा जिल्‍हयाच्‍या उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन लवकरच त्‍यांनाही साहित्‍याचे वितरण करण्‍यात येईल, अशी हमी त्‍यांनी यावेळी दिली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्‍हयातील 532 दिव्‍यांगांना केंद्र सरकारच्‍या  सामाजिक न्‍याय विभागाने साहित्‍याचे वितरण केले याबद्दल सामाजिक न्‍याय  मंत्री थावरचंद गेहलोत यांचे प्रति आभार व्‍यक्‍त केले. केंद्र शासनाने आतापर्यत 71 नविन योजना सुरु केल्‍या याचा लाभ नागरिकांना घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले. तसेच उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगाना सूध्‍दा साहित्‍य वितरण करण्‍यासाठी लवकरच कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार समिर कुणावार, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल आणि सामाजिक न्‍याय विभागाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात  117 व्‍यक्‍तींना  तीन चाकी सायकल, 48 व्हील चेअर, 2 सीपी चेअर, 132 कुबडया, 39 वृध्द व्यक्तींना काठी, 10 अंध व्‍यक्‍तींना  काठी, 32 ब्रेल किट, 178 कर्ण यंत्र, बालकांसाठी 7 रोलेटर , मानसिक विकलांग व्यक्तींना एम.एस.आय.ई.डी. किट 176, कृष्ठ रुग्णांसाठी ए.डी.एल. किट 7 , अशा एकुण 748 साहित्याचे 532 व्‍यक्‍तींना वाटप करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी  केले कार्यक्रमाला प्रशासकिय अधिकारी , लोकप्रतिनिधी, लाभार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते


शेतक-यांचे समाधान होईपर्यंत
                         जमिनीला हात लावणार नाही
                                                   -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.20 :-नागपूर-मुंबई महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासाठी शेतक-यांच्‍या जमिनीचे भुसंपादन नव्‍हे तर भूसंचयन करण्‍यात येणार आहे. यामधुन शेतक-यांना विकसित भूखंड देण्‍यात येईल. या भूसंचयनासाठी लागणारी जमीन जोपर्यंत शेतक-यांच्‍या शंकाचे पूर्ण निरसन करुन त्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत शेतक-यांच्‍या  जमिनीला हात लावणार नाही असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. आर्वी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना त्‍यांनी हे स्‍पष्‍ट केले.
महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासंदर्भात आर्वीतनी ा यंत शेतक-यांच् शेतक-यांच्‍ तालुक्‍यातील शेतकरी –भूधारकांशी प्रशासनाच्‍या वतीने संवाद साधुन त्‍यांच्‍या शंकाचे निरसन करण्‍यात आले. यावेळी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता यु.व्‍ही. डाबे, तहसिलदार विजय पवार, पंचायत समिती सभापती  ताराबाई ताडाम उपस्थित होत्‍या.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी यांनी महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाबाबत. सादरीकरण करुन शेतक-यांना माहिती दिली. कोणताही विकास हा एकतर्फी न होता तो भागीदारीचा विकास व्‍हायला हवा आणि त्‍यासाठी शेतक-यांचा जास्‍तीत जास्‍त फायदा करुन देण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शेतक-यांच्‍या शेतातील पाईपलाईन, विहिर, विंधनविहीर, झाडे यांचेही सर्वेक्षण करुन त्‍यांची नोंद घेवून त्‍याचा मोबदला दिला जाईल. असेही त्‍यांनी यावेळी शेतक-यांचे शंका निरसन करतांना स्‍पष्‍ट केले. ज्‍या शेतक-यांच्‍या सातबारावर ओलिताची नोंद नाही ती सर्वेक्षणाच्‍या वेळी करुन घेण्‍यात येईल. तसेच कृषी समृध्‍दी केद्रामध्‍ये शेतक-यांना विकसित भुखंड हे लॉटरी काढून देण्‍यात येतील.
यावेळी त्‍यांनी शेतीचे आताचे दर आणि विकसित भुखंडाचे दर यातील तफावत उदाहरणाव्‍दारे पटवून दिली. तसेच शेतक-यांच्‍या शंकाचे निरसन केले.
आमदार अमर काळे म्‍हणाले लोकप्रतिनिधी म्‍हणुन लोकांचे हित बघणे जबाबदारी असुन शेतक-यांच्‍या विकासाठी या प्रकल्‍पासंदर्भात सकारात्‍मक भूमिका असेल. पण लोकांचे समाधान झाले तरच भूसंचयन करु देणार असुन शेतक-यांच्‍या काही प्रश्‍नांची उत्‍तर अजुनही शासनाकडे नाहीत. त्‍यासंदर्भात शासनाकडून स्‍पष्‍ट सुचना आल्‍या तरच भुसंचयन करणे शक्‍य होईल. शेतक-यांचे प्रश्‍नासंदर्भात मुख्‍यामंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य गजानन निकम, कार्यकारी अभियंता श्रीमती अन्‍सारी, शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


 

Thursday 18 August 2016

कापूस ते कापड प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार
                        -ना. दीपक केसरकर 
*
चंद्रपुर जिल्ह्याची प्रायोगिक  स्तरावर निवड. 
*
एम गिरी करणार तांत्रिक सहकार्य 
*5
वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
वर्धा, दि.17 :- महात्मा गांधीनी चरख्याचा उपयोग कापसापासून कपड़ा तयार करुन त्याकाळी विदर्भाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले होते. आजही महात्मा गांधींची ही विचारधारा विदर्भासाठी लागू होते. कापूस हे विदर्भातील शक्तिस्थान असून कापूस  उत्पादक शेतकऱ्यांच्या  कापसाचे मूल्य वर्धन करुन विदर्भात कापूस ते कापड  अशी मूल्यवर्धित साखळी  विकसीत करण्याची योजना राबवतोय. ज्यामुळे पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट होईल. हा प्रायोगिक प्रकल्प  चंद्रपुर  जिल्ह्यात  राबवण्याचा निर्णय घेतला असून एम गिरी यामधे महत्वाची भूमिका बजावेल असे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. एम गिरी येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
         यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, लीना बनसोड, एम गिरी चे संचालक डॉ प्रफुल्ल काळे,राहुल ठाकरे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, नियोजन अधिकारी उपस्थित होते. 
          महाराष्ट्रात रिसोर्स बेस प्लानिंग चा प्रयोग राबवण्यात येतोय.  यामधे  त्या- त्या  जिल्ह्यातील शक्तिस्थानावर काम करुन तेथील जनतेच्या  उत्पन्नात वाढ कशी करायची याचा विचार या प्रकल्पात करण्यात येईल. यामधे वस्तुच्या मूल्यवर्धनाला  खुप महत्व आहे. विदर्भात कापूस पिकवणारया  शेतकऱ्यांच्या घरामधे जर सूत तयार झाले तर मोठा आर्थिक बदल घडू शकतो.  असे काही प्रकल्प या आधी राबवले गेलेत. पण ते पायलट मॉडेल आहेत. त्या प्रायोगिक प्रकल्पांना मोठ्या स्तरावर एखाद्या  जिल्ह्यात राबवून यशस्वी झालोत तर विदर्भातील सर्व कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प राबवता येईल. असेही ते यावेळी म्हणाले. यासाठी एमगिरि या  भारत सरकारच्या अधीनस्थ संस्थेने  या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य  करावे. या संस्थे ने याविषयावर बरेच काम केले आहे.  सौर उर्जेवर आधारित चरखे बनवले आहेत. अशाच प्रकारची सौर उर्जेवर चालणारे लूम आणि रोमिंग मशीन्स त्यांनी  तयार कराव्यात. 
         तसेच सामूहिक सुविधा केंद्र तयार करावे. जिथे शेतकरी आपला कापूस देवून त्यापासून लळया किंवा सूत तयार करुन घेऊ शकेल. अर्थातच सुताची कींमत कापसापेक्षा जास्त असेल. याशिवाय कापड़ तयार करण्याच्या प्रक्रिएमधे सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील याचा विचार करुन प्रकल्प तयार करण्यासाठी एम् गिरी ने सहकार्य करावे यावर सुद्धा चर्चा झाली. विदर्भात कापसावर प्रक्रियेची अशी संपूर्ण साखळी विकसित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ करता येईल. यासाठी शासनाने प्रायोगिक स्तरावर यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात हा प्रयोग  राबविन्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण विदर्भात याची अमलबजावणी करण्यात येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.  डॉ काळे यांनी या प्रकल्पात एमगिरि संपूर्ण सहकार्य करण्याची हमी केसरकर यांना  दिली.  यावेळी एम गिरीचे अधिकारी उपस्थित होते. श्री केसरकर यांनी एमगिरि ने विकसित केलेले लूम रोमिंग मशीन्स आणि सूत कताई मशीन्स तसेच सोलर वर चालणाऱ्या मशीन्सची पाहणी केली. प्रथम  त्यांनी महात्मा गांधी आणि कस्त्तुरबा यांच्या पुतळ्यास कापूस माला घालून अभिवादन केले.
0000