Wednesday 26 December 2012

अन्‍न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख आज शहरात


                वर्धा दि.26- अन्‍न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांचे गुरुवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागपूर येथून आगमण होईल.
          श्री. तुळजाबाई एज्‍युकेशन सोसायटीतर्फे बापुरावजी देशमुख जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजित अखिलभारतीय खो खो स्‍पर्धेच्‍या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील व येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
0000

तारण योजनेअंतर्गत 2 हजार दोनशे शेतक-यांना लाभ 417 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप



           वर्धा दि.26-  कृषी शेतमालाच्‍या बाजार व्‍यवस्‍थापनाचे अचूक नियोजनामुळे तारण योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील 2 हजार दोनशे शेतक-यांना लाभ मिळवून देणे शक्‍य झाले आहे.या योजनेअंतर्गत सोयाबीन करीता 2 कोटी 50 लाख रुपयाचे वाटपही पूर्ण झाले आहे.
          तारण योजनेअंतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन करीता 9 कोटी रुपयाचे लक्षांक ठेवण्‍यात आले होते. तारण योजनेअंतर्गत हिंगणघाट बाजार समितीने 1 कोटी रुपये आर्वी बाजार समितीने 30 लाख, पुलगांव 1 कोटी, सिंदीरेल्‍वे 27 लाख, वर्धा 21 लाख, रुपयाचे वाटप पूर्ण केले आहे. शेतक-यांनी तारण योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्‍यात आले आहे.
          वर्धा जिल्‍ह्यासाठी खरीप हंगामामध्‍ये 452 कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतक-यांना देण्‍याचे उदिष्‍ट ठरविण्‍यात आले होते त्‍यापैकी शेतक-यांना 417 कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. रब्‍बी हंगामासाठी 2 कोटी 3 लाख रुपयाचे कर्जही शेतक-यांना देण्‍यात आले आहे.
         शेतक-यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी सकारात्‍मक भूमिका घेतल्‍यामुळे पीक कर्जासाठी पात्र असलेल्‍या सर्व शेतक-यांना सहजपणे कर्ज उपलब्‍ध होत आहे.
        शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतक-यांना कृषीमालाच्‍या किंमतीच्‍या 70 टक्‍के कर्ज बँकेमार्फत उपलब्‍ध करुण देण्‍यात येत आहे.या कर्जावर बँकेमार्फत नियमानुसार व्‍याजाची आकारणी  करण्‍यात येत आहे.
                       रब्‍बी हंगामासाठी गव्‍हाचे बियाणे
        रब्‍बी हंगामामध्‍ये शेतक-यांना गव्‍हाचे बियाणे सहज उपलब्‍ध व्‍हावे यासाठी 1 हजार 870 क्विंटल बियाणे महाबिजमार्फत उपलब्‍ध करुण देण्‍यात आले आहे. या बियानांवर 500 रुपये प्रति क्विंटल अनुदानही देण्‍यात आल्‍यामुळे शेतक-यांनी 200 क्विंटल गव्‍हाचे बियाणे उचलले आहे.
          कृषीमालाच्‍या बाजार व्‍यवस्‍थापनाचे अचूक नियोजनाबाबत जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी व समितीचे अध्‍यक्ष भाऊसाहेब ब-हाडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड,पणन अधिकारी के.एस.तुपे, अग्रणी बँकेचे एम.के.देव पुजारी,जिल्‍हा मार्केटिंग अधिकारी शेख बिल्‍लाल, कृषी उद्योग विकास महामंडळाचे जावळकर,महाबिजचे एन.पी.खांडेकर, जिल्‍हा सांखिकी अधिकारी ए.डी.गोतमारे आदि उपस्थित होते.  
000000

रोजगारहमी योजनेमुळे शेतक-यांना दिलासा जिल्‍ह्यात 900 विहीरी पूर्ण



      वर्धा दि.26-  महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे केवळ ग्रामीण भागात रोजगाराची हमी मिळवून दिली त्‍यासोबत शेतक-यांना उत्‍पादक कामांनमुळे शेती सुधारणेसह सिंचनासाठी विहीरीचा कार्यक्रमही अत्‍यंत लाभदायक ठरत आहे. वर्धा जिल्‍ह्यात 900 विहिरी पूर्ण करुण शेतक-यांना सिंचनसुविधाही आपल्‍या शेतात निर्माण करणे शक्‍य झाले आहे.
          महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत शेतक-यांच्‍या शेतात विहिर खोदण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात आले असून यावर्षात 900 विहिरी पूर्ण झाल्‍या असून शेतक-यांच्‍या शेतीच्‍या अभिलेखात विहिरींची नोंद घेण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्‍या आहे.
          मगरा रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्‍ध करुण देतांना ग्रामपंचायत स्‍तरावर उत्‍पादक कामे घेतल्‍यास शेती उत्‍पादन वाढीला मदत होऊ शकेल ही संकल्‍पना समोर ठेवून ग्रामपंचायत व ग्रामसभेच्‍या माध्‍यमातून कामांच्‍या नियोजनाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. वर्धा जिल्‍हा हा कृषि व फलोत्‍पादनामध्‍ये प्रगतीशिल जिल्‍हा म्‍हणून संपूर्ण राज्‍यात ओळखला जातो शेतीवर सिंचनाच्‍या सुविधा उपलब्‍ध झाल्‍यास विविध प्रकारचे पीक तसेच फलोत्‍पादनही या जिल्‍ह्यात शेतक-यांकडून घेतल्‍या जाते.
          जिल्‍ह्यात विविध योजना अंतर्गत शेतात विहिरी खोदण्‍यांचा धडक कार्यक्रम सुरु असून 4 हजार 299 विहिरींना तांत्रिक मान्‍यतासुध्‍दा देण्‍यात आली आहे. त्‍यासोबतच जिल्‍ह्यातील 517 ग्रामपंचायतीमध्‍ये मगरा रोहयो योजनेअंतर्गत विहिरीनाही प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. त्‍यामुळेच 900 विहिरी पूर्ण झाल्‍या आहे. यामध्‍ये वर्धा तालुक्‍यात 270, देवळी 171, समुद्रपूर 122, हिंगणघाट 131, सेलू 56, आष्‍टी 75, कारंजा 52 तर आर्वी तालुक्‍यात 33 विहिरींचा समावेश असल्‍याची माहिती  उपजिल्‍हाधिकारी जगदिश संगितराव यांनी दिली.
00000