वर्धा दि.26- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे
केवळ ग्रामीण भागात रोजगाराची हमी मिळवून दिली त्यासोबत शेतक-यांना उत्पादक
कामांनमुळे शेती सुधारणेसह सिंचनासाठी विहीरीचा कार्यक्रमही अत्यंत लाभदायक ठरत
आहे. वर्धा जिल्ह्यात 900 विहिरी पूर्ण करुण शेतक-यांना सिंचनसुविधाही आपल्या
शेतात निर्माण करणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार
योजनेअंतर्गत शेतक-यांच्या शेतात विहिर खोदण्याला प्राधान्य देण्यात आले असून
यावर्षात 900 विहिरी पूर्ण झाल्या असून शेतक-यांच्या शेतीच्या अभिलेखात
विहिरींची नोंद घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्या आहे.
मगरा रोहयो अंतर्गत मजुरांना
कामे उपलब्ध करुण देतांना ग्रामपंचायत स्तरावर उत्पादक कामे घेतल्यास शेती उत्पादन
वाढीला मदत होऊ शकेल ही संकल्पना समोर ठेवून ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या माध्यमातून
कामांच्या नियोजनाला प्राधान्य देण्यात आले आहे. वर्धा जिल्हा हा कृषि व फलोत्पादनामध्ये
प्रगतीशिल जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो शेतीवर सिंचनाच्या सुविधा
उपलब्ध झाल्यास विविध प्रकारचे पीक तसेच फलोत्पादनही या जिल्ह्यात
शेतक-यांकडून घेतल्या जाते.
जिल्ह्यात विविध योजना
अंतर्गत शेतात विहिरी खोदण्यांचा धडक कार्यक्रम सुरु असून 4 हजार 299 विहिरींना
तांत्रिक मान्यतासुध्दा देण्यात आली आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील 517
ग्रामपंचायतीमध्ये मगरा रोहयो योजनेअंतर्गत विहिरीनाही प्राधान्य देण्यात आले
आहे. त्यामुळेच 900 विहिरी पूर्ण झाल्या आहे. यामध्ये वर्धा तालुक्यात 270,
देवळी 171, समुद्रपूर 122, हिंगणघाट 131, सेलू 56, आष्टी 75, कारंजा 52 तर आर्वी
तालुक्यात 33 विहिरींचा समावेश असल्याची माहिती
उपजिल्हाधिकारी जगदिश संगितराव यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment