वर्धा
दि.26- कृषी शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे
अचूक नियोजनामुळे तारण योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2 हजार दोनशे शेतक-यांना लाभ
मिळवून देणे शक्य झाले आहे.या योजनेअंतर्गत सोयाबीन करीता 2 कोटी 50 लाख रुपयाचे
वाटपही पूर्ण झाले आहे.
तारण
योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सोयाबीन करीता 9 कोटी रुपयाचे लक्षांक ठेवण्यात आले
होते. तारण योजनेअंतर्गत हिंगणघाट बाजार समितीने 1 कोटी रुपये आर्वी बाजार समितीने
30 लाख, पुलगांव 1 कोटी, सिंदीरेल्वे 27 लाख, वर्धा 21 लाख, रुपयाचे वाटप पूर्ण
केले आहे. शेतक-यांनी तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात
आले आहे.
वर्धा
जिल्ह्यासाठी खरीप हंगामामध्ये 452 कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतक-यांना देण्याचे
उदिष्ट ठरविण्यात आले होते त्यापैकी शेतक-यांना 417 कोटी रुपयाचे कर्ज वाटप
पूर्ण झाले आहे. रब्बी हंगामासाठी 2 कोटी 3 लाख रुपयाचे कर्जही शेतक-यांना देण्यात
आले आहे.
शेतक-यांना
पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे पीक कर्जासाठी पात्र
असलेल्या सर्व शेतक-यांना सहजपणे कर्ज उपलब्ध होत आहे.
शेतमाल तारण
योजनेअंतर्गत शेतक-यांना कृषीमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेमार्फत
उपलब्ध करुण देण्यात येत आहे.या कर्जावर बँकेमार्फत नियमानुसार व्याजाची
आकारणी करण्यात येत आहे.
रब्बी हंगामासाठी गव्हाचे बियाणे
रब्बी
हंगामामध्ये शेतक-यांना गव्हाचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे यासाठी 1 हजार 870
क्विंटल बियाणे महाबिजमार्फत उपलब्ध करुण देण्यात आले आहे. या बियानांवर 500
रुपये प्रति क्विंटल अनुदानही देण्यात आल्यामुळे शेतक-यांनी 200 क्विंटल गव्हाचे
बियाणे उचलले आहे.
कृषीमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक
नियोजनाबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व समितीचे
अध्यक्ष भाऊसाहेब ब-हाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली कृषी विकास
अधिकारी आर.के.गायकवाड,पणन अधिकारी के.एस.तुपे, अग्रणी बँकेचे एम.के.देव
पुजारी,जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख बिल्लाल, कृषी उद्योग विकास महामंडळाचे
जावळकर,महाबिजचे एन.पी.खांडेकर, जिल्हा सांखिकी अधिकारी ए.डी.गोतमारे आदि उपस्थित
होते.
000000
No comments:
Post a Comment