Saturday 28 July 2012

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस


            वर्धा, दिनांक 29 : वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 13.98 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा- 20.7 मि.मी.(297.9), सेलू-12.00 मि.मी.(151.00), देवळी-16.00 (243.6), हिंगणघाट-23.00 मि.मी.(407.4), समुद्रपूर-7.2.3मि.मी. (452.7), आष्टी 7.00 मि.मी.(206.4), आर्वी 15.00 मि.मी.(390.00) आणि कारंजा-10.4 ( 292.5) पावसाची नोंद झाली आहे.

Friday 27 July 2012

वर्धा जिल्‍ह्यातील पावसाची माहिती दि. 28 जुलै 2012


वर्धा दि. 28 जुलै 2012
           
अ.क्र.
                बाब
 नैसर्गिक आपत्‍तीचा तपशील     
1
अतिवृष्‍टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक   
2
अ)यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्‍यममान
ब) गेल्‍या चोवीस तासातील सरासरी पाऊस
291.2

5.4
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृतांची संख्‍या, विज पउून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत गावे
-
6
बाधीत शहरे
-          
7
नुकसान झालेल्‍या घरांची संख्‍या
-          
8
नुकसान झालेल्‍या गोठ्यांची संख्‍या
-          
9
मृत झालेली जनावरे
-          
10
व्‍यापारी नुकसान
-          
11
आपदग्रस्‍त कुटूंबे व व्‍यक्‍ती
-          
12
पूल व रस्‍त्‍यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्‍ता)
-          
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
-          
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्‍यमान मि.मी. मध्‍ये (गेल्‍या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -  4.00(277.2)
2) सेलू – 2.0(139.0)
3)देवळी 1.0(227.00)
4)हिंगणघाट-4.00(384.0)
5)समुद्रपूर-निरंक
6)आर्वी-10.00(375)
7)आष्‍टी-10.8(199.4)
8)कारंजा-11.4(284.1)



पर्यावरण मंत्री संजय देवतळे रविवारी हिंगणघाटमध्‍ये



       वर्धा, दि.27- पर्यावरण व सांस्‍कृतिक कार्य मंत्री  संजय देवतळे  यांचे रविवार दि. 29 जुलै रोजी  सकाळी  10.45 वाजता  वरोरा येथून  हिंगणघाट येथे आगमन होईल.
       सकाळी 11 वाजता हिंगणघाट येथे निखाडे सभागृहात  आयोजीत गुणवत्‍त विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार तसेच ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या   गौरव समारंभास उपस्थित राहून दुपारी 1 वाजता  येथून  वरोरा साठी प्रयाण करतील.
                                                0000

खरीप पिकासाठी 304 कोटी 72 लाख रुपयाचे कर्ज वाटप - शेखर चन्‍ने


       वर्धा,दि.27 – शेतक-यांना  खरीप हंगामासाठी  जिल्‍ह्यातील विविध बँकातर्फे 304 कोटी  72 लाख रुपयाचा कर्ज पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज दिली.
जिल्‍ह्यासाठी  खरीप  हंगामासाठी  449.13 कोटी रुपयाचा पत आराखडा तयार करण्‍यात आला होता. जिल्‍ह्यात 21 जुलै अखेर 45 हजार 973 शेतक-यांना  304 कोटी  72 लक्ष रुपयाचे पीक कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्‍ह्याच्‍या पत आराखड्यानुसार 67.4 टक्‍के  पीक कर्जाचे  वाटप  पूर्ण झाले असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी यावेळी दिली.
राष्‍ट्रीयकृत  व जिल्‍हा बँकाना  खरीप हंगामासाठी  452 कोटी 87 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्‍ट  ठरवून देण्‍यात आले होते. तसेच रब्‍बी हंगामासाठी  35 कोटी  32 लक्ष रुपयाचे  पीक कर्ज वाटपाचे लक्ष निर्धारीत करण्‍यात आले आहे.
राष्‍ट्रीयकृत बँकानी 34 हजार  384 शेतक-यांना 247 कोटी  75 लाख रुपयाचे  खरीप पीक कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे.यामध्‍ये  सर्वाधिक बँक ऑफ  इंडियाने 13 हजार 523  शेतक-यांना 79 कोटी 19 लाख रुपयाचे खरीप पिक कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे.  बँक ऑफ महाराष्‍ट्र  या बँकेतर्फे 5 हजार 263 शेतक-यांना 14 कोटी 4 लक्ष रुपये , स्‍टेट बँकेतर्फे  9 हजार 531 शेतक-यांना 70 कोटी 55 लाख रुपये, सेंट्रल बँके तर्फे 1 हजार 548 शेतक-यांना 9 कोटी रुपये , बँक ऑफ बरोडा तर्फे 437 शेतक-यांना 21 कोटी 23 लाख रुपये , पंजाब नॅशनल बँकेतर्फे 2 हजार 488 शेतक-यांना 14 कोटी 97 लाख रुपये , युनियन बँकेतर्फे 447 शेतक-यांना 3 कोटी 28 लाख रुपये ,  आयडीबीआय बँकेतर्फे 201  शेतक-यांना 1 कोटी 67 लाख रुपये,  कॅनरा बँकेतर्फे 186 शेतक-यांना 64 लाख रुपये , सिंदीकेट बँकेतर्फे 100 शेतक-यांना  57 लाख रुपये  तर युको बँकेतर्फे 45 शेतक-यांना  32 लाख रुपये  व आंध्र बँकेतर्फे 27 शेतक-यांना 20 लाख रुपये वाटप पूर्ण झाले आहे.
       जिल्‍ह्यातील इतर वाणीजय  बँकेतर्फे 110 शेतक-यांना 1 कोटी 45 लाख रुपये  असे सर्व  वाणिज्‍य व राष्‍ट्रीयकृत बँकातर्फे 34 हजार 494 शेतक-यांना 249 कोटी  20 लाख रुपयाचे  कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.                                       
         वर्धा जिल्‍हा बँकेतर्फे  50 कोटी 67 लाख रुपयाचे कर्ज वाटप
        वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती  सहकारी बँकेतर्फे 10 हजार 739 शेतक-यांना 50 कोटी 67 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील इतर सहकारी बँकातर्फे 740 शेतक-यांना 4 कोटी 85 लाख  रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.
       खरीप  हंगामासाठी   जिल्‍ह्यातील  शेतकरी खातेदारांना पीककर्जाचे वाटप सुरु असून शेतक-यांनी  राष्‍ट्रीयकृत  तसेच सहकारी बँकेशी  संपर्क करुन  आवश्‍यकतेनुसार  कर्जाची मागणी करावी असे जिल्‍हा उपनिबंधक  सहकारी संस्‍था  जे.के. ठाकुर तसेच  जिल्‍हा अग्रणी बँकेचे  जिल्‍हा प्रबंधक  मोहन मशानकर  यांनी  आवाहन केले आहे.
                                  0000000

Thursday 26 July 2012

नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी नगर पालीकांना आर्थिक बळ देण्‍याचा प्रयत्‍न - जे.पी.डांगे


   सुधारीत बातमी        

  वर्धा,दि.26- जिल्‍ह्यातील नगर पालिकांना प्रशासकीय व आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. लोकांच्‍या मुलभूत गरजांची पूर्तता करण्‍यासाठी ज्‍या काही अडचणी येतात त्‍याचा एक आराखडा तयार करुन जिल्‍हाधिका-याच्‍या  शिफारशीसह   31 आगस्‍ट पर्यंत वित्‍त आयोगाला सादर कराव्‍या. जेणेकरुन नागरी सुविधा पुरविण्‍यासाठी नगर पालीकांना आर्थिक बळ देण्‍याचा प्रयत्‍न करता येईल अशी ग्‍वाही महाराष्‍ट्र राज्‍य  चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष  जे.पी.डांगे यांनी दिली.
  आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात नगर पालीकेचे अध्‍यक्ष, सभापती  व मुख्‍याधिकारी यांना शहराच्‍या प्रगतीसाठी येणा-या अडचणीवर आढावा बैठक घेण्‍यात आली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, प्रभारी निवासी उपजिल्‍हाधिकारी विजया बनकर, वर्धा नगर परिषदेचे अध्‍यक्ष आकाश शेंडे, हिंगणघाट न.प. अध्‍यक्ष सुरेश मुंजेवार तसेच आर्वि, पुलगांव, सिंदी (रे.) चे अध्‍यक्ष तसेच  न.प.चे सभापती व मुख्‍याधिकारी उपस्थित होते.
          भारतीय राज्‍य घटनेत 73 व्‍या घटना दुरुस्‍तीनुसार सुधारणा करुन  नगरपालीकांच्‍या अधिकारात व जबाबदारीत वाढ करण्‍यात आली आहे. हे  विषद करुन श्री. डांगे म्‍हणाले की नगर पालीकेचे उत्‍पन्‍न कमी व खर्च अधिक होतांना दिसतो. तसेच ज्‍या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे त्‍यांच्‍या प्रती नागरिकांच्‍या अपेक्षा सुध्‍दा वाढलेल्‍या असतात. अशाप्रसंगी ज्‍या वार्डातील लोकप्रतीनिधी आहेत त्‍यांनी त्‍यांच्‍या वार्डातील 18 बाबीवर एक सर्वकष अपेक्षित असलेल्‍या  विकास कार्याचा  लेखी स्‍वरुपाचा अहवाल सादर करुन तो मुख्‍याधिका-याला येत्‍या 15 दिवसात
 सादर करावा. जिल्‍ह्यातील प्रत्‍येक नगर पालीकांच्‍या मुख्‍याधिका-यांनी शहरातील सर्व नगर सेवकांच्‍या अडीअडचणी सोबत आर्थिक अनुदान किती लागणार यावर एकत्रीत अहवाल जिल्‍हाधिका-या मार्फत शिफारशीसह 31 ऑगस्‍ट पर्यंत वित्‍त आयोगाला सादर करावा. यामध्‍ये लोकप्रतिनिधीच्‍या मानधनामध्‍ये वाढ, आस्‍थापनावरील खर्च, वर्ग दोन व तीन च्‍या आस्‍थापनाची पदे भरण्‍यासाठी करावयाच्‍या सुधारणा, पाणी पुरवठ्याची कामे, शहर विकासासाठी नागरीकांच्‍या मुलभुत सोयी यांचा अंतर्भाव करण्‍यात यावा. तसेच न.प.चे करनिर्धारण पध्‍दती तसेच केंद्र सरकारचे 300 व राज्‍य सरकारचे 200 कायद्यांचा विचार करुन न.प.ने आवश्‍यक त्‍या बाबीवर कर निर्धारित करावे व उत्‍पन्‍न वाढविण्‍याचा प्रयत्‍न करावा असेही ते म्‍हणाले. आस्‍थापनेवर होणा-या खर्चाबाबत ते म्‍हणाले की कर्मचा-यांचे पगार व भत्‍ते याबाबत सविस्‍तर प्रस्‍ताव सुध्‍दा नगर पालीकांनी सादर करावा. अर्थसंकल्‍पात मंजूर अनुदान व नगर पालीकांना प्राप्‍त होणारी कराबाबतची प्राप्‍त  एकूण  रक्‍कम यातील येणारी तफावतीबाबत न.पा. आर्थिक बळ देण्‍यासाठी वित्‍त आयोग विचार करेल असेही ते म्‍हणाले.
         यावेळी वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगांव, आर्वी व सिंदी (रे) चे लोकप्रतीनिधी व मुख्‍याधिका-यांनी शहराच्‍या  विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी आर्थिक अनुदानाची मागणी करुन पाणी पुरवठा योजना व शाळांच्‍या पुर्नबांधनी व दुरुस्‍ती साठी अनुदानाची मागणी केली. तसेच तपशिलाने माहिती  सांगितली.
     यावेळी न.प. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                000000

विकास योजनांची अंमलबजावनी प्रभावीपणे करा जे.पी.डांगे


विविध विकास योजनांचा आढावा
वर्धा, दि. 26- जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध विकास योजना अधिक जलद गतीने  व प्रभावीपणे  राबविण्‍यासाठी  येणा-या अडचणी   तसेच निधीच्‍या उपलब्‍धतेबाबत  सुचना   विभाग प्रमुखांनी  सादर कराव्‍यात अश्‍या सुचना महाराष्‍ट्र राज्‍य चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष  जे.पी.डांगे यांनी आज दिल्‍यात .
      जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात  जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध विकास योजनांची  माहिती  तसेच अंमलबजावनी  यंत्रणांना योजनेच्‍या  प्रभावीपणे राबविण्‍यासाठी  येणा-या  अडचणींचा आढावा श्री. जे.पी.डांगे यांनी  घेतला. त्‍याप्रसंगी  ते  मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने , अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत , तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
         चवथ्‍या वित्‍त आयोगातर्फे  जिल्‍हास्‍तरावर  विविध विभागातर्फे राबविण्‍यात येणा-या  योजना संदर्भातील  सुचना  तसेच  विकास योजनांच्‍या अंमलबजावनी संदर्भात सुचना स्विकारण्‍यात येणार असून त्‍यानुसार  वित्‍त आयोगातर्फे अहवाल तयार करण्‍यात येणार असल्‍याचे  सांगताना  चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष जे.पी.डांगे म्‍हणाले की, जिल्‍हा‍स्‍तरावर  सर्व विभाग प्रमुखांनी  केलेल्‍या  सुचनांचा समावेश अहवालामध्‍ये  करण्‍यात येईल. यावेळी  विविध विभागांच्‍या  अडचणींची  तसेच योजनांच्‍या  अंमलबजावनीची माहिती  त्‍यांनी  आढावा बैठकीत घेतली.
जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी स्‍वागत करुन  वर्धा जिल्‍ह्यात  राबविण्‍यात येणा-या  विविध योजना, जिल्‍हा नियोजन मंडळ तसेच  विभागांना उपलब्‍ध होणारा निधी व विकासकामांचे नियेाजन  या संदर्भात माहिती दिली.
     महसूल विभागा संदर्भात जनतेला अधिक जलद गतीने सेवा पुरविण्‍याबाबत  विविध उपक्रम राबविण्‍यात येत असून  या योजनांचा लाभ   सामान्‍य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी  प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याची  माहिती  अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी दिली.
                                                                ...2..


 विकास योजनांची  अंमलबजावनी...      ...2..
      वर्धा जिल्‍ह्यातील वन क्षेत्राच्‍या विकासाबराबरच  जंगली जनावरामुळे  शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी प्रायोगीक तत्‍वावर  सोलर कुंपन बसविण्‍यात येत आहे. सध्‍या 10 किलोमीटरचे कुंपन पूर्ण झाले असून, ढगा व तारणपूर  येथे पर्यटन विकास तसेच बोरधरण परिसरात इकोटुरीझम  सुरु असल्‍याची माहितीही  जिल्‍हा उपवनसंरक्षक प्रदीप चव्‍हाण  यांनी दिली.
जिल्‍ह्यात कायद व सुव्‍यवस्‍थेची  परिस्‍थीती  नियंत्रणात असून जिल्‍हा स्‍तरावर तसेच ग्रामीण स्‍तरापर्यंत पोलीस बंदोबस्‍त  तसेच  पेालीस स्‍टेशनच्‍या इमारती , निवासी संकुल आदी बाबतही  यावेळी  अप्‍पर जिल्‍हा पोलीस अधिक्षक यांनी माहिती दिली.
आरोग्‍य, पशुसंवर्धन, मत्‍स्‍यव्‍यवसाय, सहाकार, कृषि , विद्यूत, सार्वजनिक बांधकाम, मत्‍स संवर्धन, सामाजिक वनीकरण, पर्यटन, क्रिडा आदी  विभागप्रमुखांनी जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची  माहिती तसेच  योजनेच्‍या अंमलबजावनी  करताना सुचना व येणा-या अडचणी याबाबतही बैठकीत माहिती दिली.
जिल्‍ह्यातील विविध योजनांची अंमलबजावनी बाबतच्‍या सुचना चवथ्‍या वित्‍त आयोगाकडे  जिल्‍हाधिकारी यांचे मार्फत सादर कराव्‍यात असेही  यावेळी  आयोगाचे अध्‍यक्ष्‍य  जे.पी. डांगे  यांनी यावेळी सांगितले.
जिल्‍हा नियेाजन मंडळातर्फे  जिल्‍ह्याच्‍या  विकासा संदर्भात तयार करण्‍यात आलेल्‍या  जिल्‍हा वार्षिक योजनेची तरतूद तसेच यामध्‍ये  सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  क्षेत्रबाह्य  उपाययोजनांच्‍या निधी बाबतची माहिती यावेळी  त्‍यांनी   दिली.   
या बैठकीस जिल्‍ह्यातील  सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्‍हा परिषदेच्‍या येाजनांचा आढावा
          जिल्‍हा परिषदे तर्फे राबविण्‍यात येणा-या विविध योजना त्‍यांची अंमलबजावनी व अडचणी बाबतचा चवथ्‍या वित्‍त आयोगाचे अध्‍यक्ष जे.पी.डांगे यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात आयोजीत पदाधिकारी व अधिका-यांच्‍या बैठकीत घेतला.
    यावेळी मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, सभापती गोपाल पांडुरंगजी कालोकर, नंदकिशोर कंगाले, श्रीमती उषाताई थुटे, निर्मलाताई बिजवे, अतिरीक्‍त मुख्‍य कार्यपालन अधिकारी बी.एन. मोहन व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

                           00000000

Wednesday 25 July 2012

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतील प्रगतीच्‍या पाऊलखुणा


            वर्धा, दिनांक 25 : 1977 पासून महाराष्‍ट्रामध्‍ये रोजगार हमी योजनेला प्रारंभ झाला. तथापि 2007 पासून या योजनेला राष्‍ट्रीय स्‍तरावर नव्‍या नावाने नामकरण करुन या योजनेला महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे संबोधून या योजनेचे क्रियान्‍वयन करण्‍यात आले. या योजने अंतर्गत जिल्‍ह्यात 2011-12 मध्‍ये 26 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले असून 1 कोटी 03 लक्ष 7 हजार 081 मनुष्‍य दिवस कामे उपलब्‍ध  करुन देण्‍यात आली त्‍यामध्‍ये 3 लक्ष 49 हजार 295 महिलांचा समावेश आहे त्‍याची टक्‍केवारी 33.68 एवढी आहे.
      महात्‍मा  गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेला 2007-08 पासून ग्रामीण क्षेत्रामध्‍ये व्‍यापक जनजागृती करण्‍यात आली त्‍याची फलश्रृती म्‍हणून गेल्‍या  4 वर्षामध्‍ये ग्रामीण क्षेत्राच्‍या विकास कामावर 4 लक्ष 65 हजार 302 मनुष्‍यदिवस  कामे उपलब्‍ध करुन देण्‍यात आली त्‍यावर 5 कोटी 67 लक्ष 64 हजार रुपये खर्च झाला आहे.
                        जनजागृती अभियान व लोकसहभाग
            गेल्‍या चार वर्षातील या योजनेच्‍या अल्‍प प्रतिसादामुळे सन 2011 पासून ग्रामीण क्षेत्रात व्‍यापक प्रसिध्‍दी करण्‍यात आली होती त्‍यामध्‍ये लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचा-यांच्‍या  कार्यशाळेचा समावेश आहे. प्रत्‍येक  तालुक्‍यामध्‍ये सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्‍था  यांचेही शिबीरे घेण्‍यात आली या कार्यक्रमातून शासनाचे निर्णय, योजनेचा आराखडा, अमर्यादा अधिकार व योजनेच्‍या अंमलबजावनी बाबत सरळ आणि सोप्‍या  शब्‍दात संदेश पोहचविण्‍यात आला. योजने अंतर्गत मजूरीबाबत शंकेचे निरसन सुध्‍दा या कार्यक्रमात केल्‍यामुळे विकासात्‍मक कामाला मोठी मागणी ग्रामीण भागातून येऊ लागली.
            प्रत्‍येक  गावामध्‍ये मजूरांची उपलब्‍धता होण्‍याच्‍या दृष्‍टीने दारिद्र रेषेखालील कुटूंबे व अल्‍पभुधारक यांना विशेष करुन जास्‍तीत जास्‍त मणूष्‍यबळ उपलब्‍ध करुन देण्‍याचा प्रयत्‍न झाला.                                                                           
                        लोकाभिमुख नियोजनात सिंचन सोयी  
            जिल्‍ह्यातील सिंचनाच्‍या  अभावामुळे अल्‍पभुधारक शेतक-यांना बारमाही उत्‍पन्‍न घेता येत नाही. ही बाब प्रशासनाने ओळखून जिल्‍ह्यामध्‍ये  सिंचन क्षमता वाढविण्‍यासाठी भरीव प्रयत्‍न करण्‍यात आले. जिल्‍ह्याच्‍या 517 ग्रामपंचायतीमध्‍ये 5 हजार 170 विहीरीचे लक्षांक देण्‍यात आले होते. आतापर्यंत 165 विहीरी बांधून पूर्ण झाल्‍या असून 873 विहीरीचे बांधकाम सुरु आहे. 4 हजार 235 विहीरींना तांत्रीक व प्रशासकिय मान्‍यता देण्‍यात आली असून या वैयक्तिक लाभाच्‍या योजनेमध्‍ये कायमस्‍वरुपी सिंचनाची सोय होणार आहे. त्‍यापासून 10 हजार हेक्‍टर  जिरायती जमिन बागायती करण्‍यास मदत होईल. विविध योजने अंतर्गत विद्युतपंप, पाइपलाईन, ट्रीप व स्प्रिंकलर इत्‍यादी सहाय्यभुत सुविधांमुळे आर्थिक सुबत्‍ता निर्माण होऊ शकेल.
                       शेततळे व इतर योजना
            ढाळीचे बांध, शेततळे, पाटस-या इत्‍यादी जलसंधारण कामामुळे  ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्‍या संधी उपलब्‍धते सोबत दुष्‍काळाचा सामना करण्‍यासाठी दुहेरी उद्देश  साध्‍य होणार आहे. जिल्‍ह्यात गेल्‍या  वर्षी 14 ठाळीचे बांध 95 विहीरीचे पूर्नरभरण, 23 शेततळे, 20 शोषखड्डे , 5 तलावातील गाळ काढणे आदी कामे या येाजनेतून यशस्‍वीपणे करण्‍यात आली.
                        पांधन रस्‍ते
            ग्रामीण भागातील पांधन रस्‍ते हा विषय शेतक-यांचा जिव्‍हाळ्याचा आहे. हे रस्‍ते  अनेक वर्षापासून दुरावस्‍थेत होते. सुवर्ण जयंती राज्‍स्‍व अभियाना अंतर्गत 517  ग्रामपंचायती क्षेत्रातील 215 गावातील 622 किलोमिटरची पांधन रस्‍ते  मोकळे करुन रस्‍ता  बनविण्‍यात आला.
                   फळबाग व वृक्ष लागवड
            समाजातील दूर्बल व अल्‍प भुधारकांच्‍या शेतावर फळबाग लागवडीचा कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात  येत आहे. 2012 च्‍या फळबाग लागवडीसाठी 30 हजार 978 शेतक-यांची निवड करण्‍यात आली असून 1 हजार 265 हेक्‍टर क्षेत्रामध्‍ये फळबाग लागवडीचा कार्यक्रम घेण्‍यात आला आहे.
          पर्यावरणाचा –हास, प्रदुषण आणि पाण्‍याचे दूर्मिक्ष या तीहेरी संकटावर मात करण्‍यासाठी शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या योजनेतून हाती घेण्‍यात आला आहे. यामध्‍ये नागरिक, ग्रामपंचायत, अशासकीय संस्‍था , औद्योगिक प्रतिष्‍ठाने व शासकिय विभागांना सहभागी करुन घेण्‍यात आले आहे. जिल्‍ह्याचे वृक्ष  आच्‍छादीत क्षेत्रामध्‍ये  वृध्‍दी करण्‍यासाठी अवतन  झुडपी जंगले उजाड टेकड्या  इत्‍यादी जमीनी हरीत करण्‍यासाठी सुरु असलेल्‍या पावसाळ्यामध्‍ये 608 रोपवाटीकेतून 85 लक्ष 34 हजार रोपे उपलब्‍ध  होणार असून त्‍या रोपाची लागवड करण्‍यात येणार आहे.
                                    राजीव गांधी सुविधा केंद्र
            प्रत्‍येक गावात शैक्षणिक सांस्‍कृतीक, धार्मिक आणि समाजोपयोगी कारणास्‍तव  एका सार्वजनिक वस्‍तूची गरज ओळखुन जिल्‍ह्यात 25 सुविधा केंद्र मंजूर करण्‍यात आलेली असून त्‍यापैकी 8  सुविधा केंद्र पूर्ण झाली असून 17 सुविधा केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे.
      या योजनेवर 26 कोटी 05 लक्ष 15 हजार रुपये 2011-12 या वर्षात खर्च झाला असून यामध्‍ये मजुरीचा खर्च 16 कोटी 37 लक्ष 64 हजार, साहित्‍यावरील खर्च 8 कोटी 51 लक्ष 80 हजार व प्रशासकीय खर्च 1 कोटी 15 लक्ष 71 हजार रुपयांचा समावेश आहे. या अंतर्गत यामध्‍ये 4 हजार 481 कामांना मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून 562  कामे पूर्ण झाली आहे. 1 हजार 822 कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. यावर 17 हजार 890 मजूर उपस्थित होते.
           भविष्‍यातील नियोजनात या जिल्‍ह्यातील पाणी टंचाई असलेल्‍या गावामध्‍ये  व्‍यापक जलसंधारणाची कामे घेण्‍यात येणार असल्‍यामुळे  ही गावे टँकर मुक्‍त होण्‍यासाठी प्रशासनाकडून सर्वकष प्रयत्‍न करण्‍यात येतील.अल्‍पभुधारकांना दुग्‍धव्‍यवसाय हे सहाय्यभुत ठरणारी बाब असून जनावरांसाठी वैरण विकास कार्यक्रम यशस्‍वीपणे योजना राबविल्‍या जाणार आहेत.
      ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्‍या  पुरेशा संधी या योजनेमुळे उपलब्‍ध होणार असून अल्‍पभुधारक व दारीद्र रेषेखालील व्‍यक्‍तींचे जीवनमान निश्चितच उंचावेल. त्‍यासाठी शासन व प्रशासन प्रयत्‍नशिल असून प्रगतीच्‍या या पाऊलखुणा इतरांना प्रेरणादयी ठरतील असा विश्‍वास वाटतो.                                       
                                                                                                                  मिलिंद आवळे
                                                  0000000                                

Monday 23 July 2012

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस



वर्धा, दिनांक 24 : वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असून, मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 81.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस समुद्रपूर तालुक्यात 26.1 मि.मी. पाऊस झाला आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा- 4.1 मि.मी.(246.2), सेलू-2 मि.मी.(219), देवळी-3.6 (205), हिंगणघाट-23 मि.मी.(360), आर्वी-10 मि.मी.(343),
आष्टी 9.2 मि.मी.(155.8), समुद्रपूर-26.1मि.मी.(416.1),
आणि कारंजा-3.4( 238.1)मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 260.5 मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस


       वर्धा, दिनांक 23 : वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 177.07 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिंगणघाट तालुक्यात 52 मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात 50.3 मि.मी. पाऊस झाला आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा-12 मि.मी.(242), सेलू-6 मि.मी.(117), देवरी-17.08 (201.04), हिंगणघाट-52 मि.मी.(337), समुद्रपूर-50.3मि.मी. (390), आष्टी 12.06 मि.मी.(146.06), आर्वी 15 मि.मी.(333) आणि कारंजा-12 ( 234)
                                  ***