Friday 26 August 2016

                         कार्यक्षम  अधिकां-यापासून प्रेरणा घ्‍यावी
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :- शासकिय कामे करतांना एकमेकांचे सहकार्य घेऊन कामे केल्‍यास प्रशासकिय कामात गतीमान येऊन नागरिकाची कामे चांगल्‍या प्रकारे करता यईल यासाठी चांगल्‍या अधिकां-यापासून कामाची प्रेरणा घ्‍यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्‍यामुळे त्‍यांना प्रशासनाच्‍या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्‍हाधिकारी संजय दैने , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्‍हाधिकारी श्री.लोणकर,यांची प्रमुख उप‍स्थिती होती.
यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली  असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते शाल श्रीफळ व भेट वस्‍तू देऊन सत्‍कार करण्‍यात आला तर त्‍यांच्‍या जागे बदलून आलेले मंगेश जोशी यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नव्‍याने रुजु झालेले उपजिल्‍हाधिकारी  श्री. लोणकर  यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
शासकिय कर्तव्‍य बजावतांना नागरिकांचे समाधान हीच आपल्‍या कामाच्‍या यशाची पावती आहे. शासकिय कामाचे  वैभव नावडकर मध्‍ये सर्व गुण होते त्‍यामुळे त्‍यांना नुकतेच नागपूर विभागाच्‍या वतीने उत्‍कृष्‍ट अधिकारी म्‍हणुन गौरविण्‍यात आले होते. हिच त्‍यांच्‍या यशाची पावती होती. यासाठी आपण सर्वानी अशा अधिकांपासुन प्रेरणा घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
वैभव नावडकर म्‍हणाले  सर्व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाल्‍यामुळेच काम करण्‍यास उत्‍साह वाढला कारण शासकिय कामे करतांना एकटयाने कामे कधी च होत नसून सर्वानी मिळून एकजूटीने कामे केल्‍यामुळे  कामामध्‍ये पारदर्शकता आणता आली .
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महसूल संघटनेचे अध्‍यक्ष श्री. लोखंडे यांनी केले. यावेळी  जिल्‍हा नियोजन अधिकारी टेंभुणे, लेखाधिकारी प्रतापराज मासाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, तालुक्‍यातील सर्व तहसिलदार, महसूल विभागाचे कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.
                                                0000

                            बचत गटानी उत्‍कृष्‍ट उद्योजक बनावे
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :-बचत गटानी बाजापेठेतील उत्‍पादकाशी स्‍पर्धा करुन लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्‍कृष्‍ठ उद्योजक बनावे. यासाठी त्‍यांनी तयार केलेल्‍या उत्‍पादनाला शासनाच्‍या वतीने बाजार पेठ मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येईल  तसेच उद्योगाकरिता निधी सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विकास भवन येथे महाराष्‍ट्र ग्रामीण जिवनोन्‍न्‍ती अभियानांतर्गत उमेद,  माविम व कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प यांच्‍या वतीने आयोजित वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत  केले.
          या वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्‍या कार्यक्रमाला कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) चे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी, जिल्‍हा परिषदचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्‍हा अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक जांगडा, नाबार्ड च्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती बन्‍सोड, रितेश ताजने, माविमच्‍या जिल्‍हा व्‍यवस्‍थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍पाचे जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक  निलेश वावरे, प्रविण जयस्‍वाल व मिलींद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.
पुढे बोलतांना शैलेश नवाल म्‍हणाले बचत गटानी आपला  कायमस्‍वरुपी उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरु करुन रोजगार  निर्मिती करुन कुशल उद्योग सुरु करावे. यासाठी शासनाच्‍या योजनांचा लाभ घेऊन  आपला उद्योग सुरु करावा व बाजारपेठेत आपल्‍या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटानी उत्‍पादीत केलेल्‍या मालाला  शहरातील मध्‍यभागी दुकाणे सुरु करुन कमीशनवर विकण्‍यास प्रयत्‍न करण्‍यात येईल. गटानी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करुन शेतक-यांना भाडे तत्‍वार दयावी. या उपकरणामुळे शेतक-यांना आधुनिक शेती करण्‍यास मदत होईल बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्‍यास मदत होईल.  तसेच बाजारपेठेतील उत्‍पादनांशी स्‍पर्धा करुन या स्‍पर्धेत उतरायला पाहिजे. असेही ते म्‍हणाले.
प्रमोद पवार म्‍हणाले बचत गटानी बाजारपेठेमध्‍ये ज्‍या वस्‍तुची जास्‍त मागणी असेल त्‍याच वस्‍तुचे उत्‍पादन करावे. जेणेकरुन गटाच्‍या उत्‍पादित मालाला  भाव मिळून  गटाचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल. तसेच कंपनी च्‍या मालाशी स्‍पर्धा करुन कमी दरात मालाची विक्री केल्‍यास जास्‍त प्रमाणात बाजारपेठ मिळण्‍यास मदत होईल.
यावेळी कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) च्‍या वतिने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्‍यवरांचे हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
यावेळी केमचे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी व इतर मान्‍यवरांनी उपस्थित बचत गटाच्‍या महिलांना उद्योग सुरु करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.





                                           


















Wednesday 24 August 2016

                               भूसंपादनापेक्षा भूसंचयनाने
                                   शेतक-यांना जास्त फायदे
                                                                 -शैलेश नवाल
वर्धा:- नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाना जोडणारा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा सेलू तालुक्यातील  काही  गावामधून जाणार आहे. या प्रकल्पाकरिता लागणा-या जमिनीचे भूसंपादन नव्हे, तर भूसंचयन करण्यात येणार आहे. या  भूसंचयानामध्ये भूसंपादनापेक्षा जास्त फायदे आहे. भूसंचयन प्रकल्पात शेतकरी  हे भागीदारी स्वरुपात सहभागी असणार आहे. शेती-उद्योगाशी संबंधित अन्य सुविधा भूसंचयानामध्ये  शेतक-यांना मिळणार  असल्याची माहिती  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी दिली.
          सेलू तालुक्यातील  कोटंबा येथील  ग्रामपंचायतीच्या  सभागृहात आयोजित  नागपूर -मुंबई सुपर एक्सप्रेस हायवे, महाराष्ट्र समृध्दी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी शैलेश  नवाल हे शेतक-यांशी  संवाद साधतांना बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी  धनश्याम भुगावकर, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता, डाबे, कार्यकारी अभियंता श्रीमती अंसारी, सेलूचे तहसिलदार रविंद्र होळी उपस्थित होते.      
          यावेळी जिल्हाधिकारी  यांनी  शेतक-यांशी  चर्चा करतांना  सांगितले की, शेतक-यांचे  समाधान झाल्याशिवाय जमिन घेणार नाही.शेतक-यांशी  याबाबत चर्चा सुरुच राहील. भूसंपादनाचा कायदा लागू आहे. तुमची जमीन शासन घेते ही शंका काढून टाका. भूसंचयानाबाबतचा आपला गैरसमज दूर करा, या नव्या प्रकल्पामध्ये  ज्या शेतक-यांच्या जमिनी जातील,त्या शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये व यावर दरवर्षी 10 टक्के वाढ देण्यात येणार आहे. जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतक-यांना देण्यात येईल. असे  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी यावेळी  सांगितले.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये राज्यातील 24 जिल्ह्ये जोडले जात असून प्रकल्पाशेजारीच नवीन शहर बसविण्यात येत असून भूसंचयन मध्ये ज्या शेतक-यांनी जमिनीची गुंतवणूक केली असेल.त्या शेतक-यांना  त्यांच्या आवडिचा  कुठलाही व्यवसाय करता येईल.  शिवाय  या योजनेमुळे शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये शेतक-यांनी  भूसंपादनापेक्षा  भूसंचयन केल्यास जमिनीची गुंतवणूक होईलच त्याच बरोबर, यामध्ये शेतक-याना  शहरातल्या भूखंडाचीविना अट मालकी मिळेल, दहा वर्ष वाढते अनुदान, दहा वर्षानंतरच्या जमिनीच्या किंमतीची  हमी, सातबा-यावर  शिक्का  लावल्या जाणान नाही., शेतक-यांच्या मुलांना मोफत औद्योगिक  शिक्षण, इत्यादी  फायदे  भूसंचयन जमिनीची गुंतवणूक केल्यास मिळू शकेल.     

          यावेळी  शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जिल्हाधिकारी शैलेश  नवाल यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी  जाणारे व  या परिसरातील  इतर शेतकरी  मोठ्या संखेने  उपस्थित होते.


 

Monday 22 August 2016

                  दिपालीला मिळाली उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची प्रेरणा
Ø एक दिवस प्रशासनासोबत
Ø जिल्‍हाधिकारी यांचा नविन उपक्रम
Ø स्‍पर्धा परिक्षार्थीसाठी प्रेरणा प्रकल्‍प
वर्धा, दि.22 :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षेची तयारी करण्‍यासाठी योग्‍य दिशा मिळावी यासाठी जिल्‍हा ग्रंथालय मध्‍ये येणा-या विद्यार्थ्‍यांसाठी महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे. याचेच पुढचे पाऊल म्‍हणुन या शिबिरात येणा-या विद्याथ्‍यांमधुन  एका विद्यार्थ्‍याला तिस-या शनिवारी प्रशासनासोबत एक दिवस घालविण्‍याची संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही अशी संधी मिळणारी पहिली विद्यार्थींनी ठरली असून यामुळे उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची नवी प्रेरणा मिळाल्‍याचे मत दिपालीने व्‍यक्‍त केले.
आज प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी  मिळण्‍यासाठी प्रंचड स्‍पर्धेचा सामना करावा लागतो. मोठया शहरांमध्‍ये स्‍पर्धा परिक्षेचे अनेक क्‍लसेस चालतात. मात्र ग्रामीण भागातील बेरोजगारांना शहरातील मुलांसारखी अशी क्‍लासेसची सुविधा उपलब्‍ध होत नाही. आहे त्‍या अपु-या सुविधांमधुनच ग्रामीण तरुण स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतात. अशा अभावग्रस्‍ततेच्‍या तयारी वरच एमपीएससी व युपएससी सारख्‍या परिक्षांना सामोरा जातेा. ग्रामीण भागातील अशा  नाहीरेंच्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी यांच्‍या पुढाकारातून जिल्‍हा  प्रशासन आणि जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोज‍न करण्‍यात येत आहे.
मागील दोन महिन्‍यापासून प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी सामाजिक न्‍याय भवन येथे दुपारी 2.30 ते 4.30 हे दोन तास विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात येते. आतापर्यंत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधिक्षक अंकित गोयल. , बॅक प्रोबेशनरी ऑफीसर वैभव गांवडे परिविक्षाधिन उपजिल्‍हाधिकारी स्‍वप्‍नील तांगडे यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांना प्रशासनाची तोंडओळख व्‍हावी आणि अधिका-यांच्‍या प्रत्‍यक्ष भेटीने त्‍यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्‍हाधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना एक दिवस प्रशासना सोबत घालवण्‍याची सुवर्ण संधी उपलब्‍ध करुन दिली आहे. महिन्‍याच्‍या तिस-या शनिवारी एका विद्यार्थ्‍याला ही संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही या प्रेरणा प्रकल्‍पातील पहिली विद्यार्थीनी ठरली असून शनिवारी जिल्‍हाधिकारी यांनी तीच्‍याशी प्रत्‍यक्ष संवाद साधला. ग्रंथालयामध्‍ये येणा-या अडचणी तसेच मार्गदशन कार्यशाळेत कोणकोणत्‍या विषयाचे मार्गदर्शन करण्‍याची गरज आहे, यावर चर्चा केली. महसूल अधिका-यांच्‍या बैठकीत सहभागी होण्‍याची संधीही तीला मिळाली. अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांनी प्रश्‍नांचा भडीमार करुन दिपालीला मुलाखतीच्‍या वातारवरणाची जाणीव करुन दिली.

सामान्‍य माणसाला मोठया अधिकां-शी  बोलायची भिती वाटते तिथे आज मला जिल्‍हाधिका-याशी थेट संवाद साधायला मिळाला ही गोष्‍ट माझ्यासाठी  कल्‍पनेपलिकडची आहे. यामुळे प्रशानाबद्दलची माझी भिती दूर झाली  असून प्रशासकीय अधिका-यांकडे असलेले अधिकार आणि कर्त्‍यव्‍य याची जाणिव झाली आहे. यातून मला नविन उर्जा मिळाली असून उपजिल्‍हाधिकारी होण्‍यासाठी मी आता खूप अभ्‍यास करणार असल्‍याचे दिपालीने सांगितले यासाठी तीने जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे आभार मानुन सर्व तरुणांना अशी संधी मिळाल्‍यास ग्रामीण भागातील तरुण मोठया प्रमाणात प्रशासनात येतील असा आशावाद तिने व्‍यक्‍त केला.
                                                                             दिपाली जयस्‍वाल