भूसंपादनापेक्षा
भूसंचयनाने
शेतक-यांना जास्त फायदे
-शैलेश नवाल
वर्धा:-
नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाना जोडणारा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा सेलू
तालुक्यातील काही गावामधून जाणार आहे. या प्रकल्पाकरिता लागणा-या
जमिनीचे भूसंपादन नव्हे, तर भूसंचयन करण्यात येणार आहे. या भूसंचयानामध्ये भूसंपादनापेक्षा जास्त फायदे
आहे. भूसंचयन प्रकल्पात शेतकरी हे
भागीदारी स्वरुपात सहभागी असणार आहे. शेती-उद्योगाशी संबंधित अन्य सुविधा
भूसंचयानामध्ये शेतक-यांना मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी
शैलेश नवाल यांनी दिली.
सेलू तालुक्यातील
कोटंबा येथील
ग्रामपंचायतीच्या सभागृहात
आयोजित नागपूर -मुंबई सुपर एक्सप्रेस
हायवे, महाराष्ट्र समृध्दी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे शेतक-यांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी धनश्याम भुगावकर, रस्ते विकास महामंडळाचे
अधिक्षक अभियंता, डाबे, कार्यकारी अभियंता श्रीमती अंसारी, सेलूचे तहसिलदार
रविंद्र होळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी
यांनी शेतक-यांशी चर्चा करतांना
सांगितले की, शेतक-यांचे समाधान
झाल्याशिवाय जमिन घेणार नाही.शेतक-यांशी
याबाबत चर्चा सुरुच राहील. भूसंपादनाचा कायदा लागू आहे. तुमची जमीन शासन
घेते ही शंका काढून टाका. भूसंचयानाबाबतचा आपला गैरसमज दूर करा, या नव्या
प्रकल्पामध्ये ज्या शेतक-यांच्या जमिनी
जातील,त्या शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये व यावर दरवर्षी 10 टक्के वाढ देण्यात
येणार आहे. जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतक-यांना देण्यात येईल. असे जिल्हाधिकारी
शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये राज्यातील 24 जिल्ह्ये
जोडले जात असून प्रकल्पाशेजारीच नवीन शहर बसविण्यात येत असून भूसंचयन मध्ये ज्या
शेतक-यांनी जमिनीची गुंतवणूक केली असेल.त्या शेतक-यांना त्यांच्या आवडिचा कुठलाही व्यवसाय करता येईल. शिवाय
या योजनेमुळे शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये शेतक-यांनी भूसंपादनापेक्षा भूसंचयन केल्यास जमिनीची गुंतवणूक होईलच त्याच
बरोबर, यामध्ये शेतक-याना शहरातल्या
भूखंडाचीविना अट मालकी मिळेल, दहा वर्ष वाढते अनुदान, दहा वर्षानंतरच्या जमिनीच्या
किंमतीची हमी, सातबा-यावर शिक्का
लावल्या जाणान नाही., शेतक-यांच्या मुलांना मोफत औद्योगिक शिक्षण, इत्यादी फायदे
भूसंचयन जमिनीची गुंतवणूक केल्यास मिळू शकेल.
यावेळी शेतक-यांनी
विचारलेल्या प्रश्नांचीही जिल्हाधिकारी शैलेश
नवाल यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये
ज्यांच्या जमिनी जाणारे व या परिसरातील
इतर शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment