स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका,पुस्तके 5 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे
आवाहन
वर्धा, दिनांक 14 - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय
निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2015 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणा-या स्व.यशवंतराव
चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात 5
फेब्रुवारीपर्यंत पाठविता येणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर
यांनी सांगितले आहे.
दिनांक 1
जानेवारी ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके
या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा विनामुल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या
शीर्षाखालीही व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http:msblc.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 5 फेब्रुवारीपर्यंत पोहचतील, अशा
बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये
साहित्य 5 फेब्रुवारी 2016 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनीही केले आहे. लेखन, प्रकाशकांनी मंडळाकडे
प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण
राज्य वाडःय पुरस्कार 2015 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित
कालमर्यांदेनंतर येणा-या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही
त्यांनी कळविले आहे.
000000
प्र.प्र.क्र. 32 दिनांक- 14 जानेवारी 2016
जिल्ह्यात कलम 36 जारी
वर्धा, दि. 21 - जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यात कलम 36 दिनांक 18 जानेवारीपर्यंत जारी करण्यात आले आहे. आदेशान्वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंतचे कलम जारी करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 134 अन्ये कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.