Monday 11 January 2016

प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी पुढाकार घ्या
-    आशुतोष सलिल
Ø रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात
Ø नो व्हेकलडे मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Ø माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे विमोचन
Ø विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने वाहतुकीबाबत जनजागृती
     वर्धा, दिनांक 11 – रस्ता अपघात होऊ नये, यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. रस्ता वाहतुकीचे सर्व नियमांचे वाचन करून दैनंदिन जीवनात त्यांचे पालन करावे. तसेच प्रदूषणमुक्त जिल्हा व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात नो व्हेकल डे सारखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.
             रस्ता सुरक्षाआता कृतीची वेळ आहे हे ध्येय समोर ठेवून यावर्षीही 24 जानेवारीपर्यंत              उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते आहे. बजाज चौकातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रांगणात अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्र.पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, पोलिस उपअधीक्षक विक्रम साळी, पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, लॉयन्स क्लबचे अनिल नरेडी यांची उपस्थिती होती.  
      जिल्हाधिकारी आशुतोष म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत वाहतूक नियमांसंदर्भात माहितीपूर्ण पुस्तिका, घडी पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. सर्वांनी माहिती पुस्तिका, घडी पुस्तिकांचे वाचन करून वाहतुकीचे नियम माहिती करून घ्यावेत. दैनंदिन जीवनात त्यांची अंमलबजावणी करावी. पालकांनाही याबाबत माहिती द्यावी. प्रशासनामार्फतही जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वांनी प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी दैनंदिन कामांसाठी सायकलचा वापर करावा, असे यावेळी सांगितले.                                                            
                                                                                                                 पान दोनवर

प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी …  (पान एकवरून)
      जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. असुरक्षितपणे वाहन चालवून स्वत : बरोबरच इतरांनाही इजा होते, याचेही भान ठेवावे. सुरळीत वाहतुकीची जबाबदारी पोलिस विभागाबरोबरच नागरिकांचीही आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले.
      कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या वाहतुक नियमांसंदर्भातील माहिती पुस्तिका आणि घडीपुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान राही यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांनी केले. यावेळी पोलिस विभागाचे महेश चाटे, सहायक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी. झाडे, मोटार वाहन निरीक्षक .टी. मेश्राम, एम.डी. बोरडे, डी. पी. सुरडकर, जी.डी. चव्हाण, श्री. साळुंखे, श्री. पारसे, श्री. संघारे, श्री. इंगोले, श्री. सिरसाट, श्री. दडमन, श्री. कडू, श्री. कपडे, श्रीमती गि-हे, जवाहर नवोदय विद्यालय, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी  यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
    प्रभातफेरीने जनजागृती
      जवाहर नवोदय विद्यालय, भारत स्काऊट गाईड आणि हिंमत सिंग, विकास,आनंद मेघे, नेहरू आणि महर्षी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच वाहतुकीचे नियम पाळा…. अपघात टाळा, नसेल वेगावर नियंत्रणमिळेल मृत्यूला आंमत्रण, हॉर्नचा वापर गरजेनुसार कराआदी घोषणा देऊन वाहतुकीबाबत शहरातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. जिल्हा क्रीडा संकुल येथून इतवारा चौकमार्गे वल्लभभाई पटेल पुतळमार्गे बजाज चौकातील वाहतूक शाखा येथे आली. यावेळी पोलिस विभागाचे बँडपथक, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
        वाहतूक शाखेत चित्र प्रदर्शनी
            रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीच्या नियम आणि घ्यावयाची काळजी याबाबत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने उत्कृष्ट अशा प्रकारचे चित्र प्रदर्शन वाहतूक शाखेच्या प्रांगणात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, पोलिस उपअधीक्षक विक्रम साळी, पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांची उपस्थिती होती. संपूर्ण चित्रप्रदर्शनीची पाहणी करून जनतेने वाहतुकीचे नियम पाळावेत, असा संदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जनतेला यावेळी दिला.

                                         0000

No comments:

Post a Comment