Tuesday 12 January 2016

मानसिक, शारीरिक सक्षमतेनेच ध्येय गाठणे शक्य
बिमला नेगी- देऊस्कर
Ø परिसंवादात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
 वर्धा, दिनांक 9-  धेय्य ठरविल्याशिवाय यश मिळत नाही. यशप्राप्तीसाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक सक्षमता व इचछा शक्तीच्या जोरावरच आपण कठीणातील कठीण ध्येय गाठू शकतो, असा  आत्मविश्वास  गिर्यारोहक बिमल नेगी-देउस्कर यांनी आपल्या उत्तराखंडमधील गिर्यारोहनाच्या अनुभवन कथनातून अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये निर्माण केला.
विकास भवन  येथे  नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत ध्येय गाठताना स्वीकारावयाच्या आव्हान या विषयावर त्या अनुभव कथन केले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अपर पोलिस अधीक्षक स्मिता पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अविनाश देऊस्कर आदींसह सर्व विभागाचे प्रमुख आणि अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
             नेगी यांनी गिर्यारोहन करताना नियोजन, जोखीम, योग्य आणि वेळेत निर्णय, सहनशीलता आणि समाजसेवेचे भान यावर उत्तराखंडमध्ये झालेल्या हानी आणि केदारनाथ, हरसाल या ठिकाणी आलेला गिर्यारोहनाचा अनुभव यावेळी पॉवरपॉइंटच्या माध्यमातून आँखों देखा हाल सर्वांसमोर मांडला. जिल्ह्यातील आंजी येथे त्यांची  संस्था साहसी खेळ, गिर्यारोहन यावर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्वतच त्यांना जगण्याची आणि आयुष्यला उभारी देतात, त्यामुळे प्रत्येकाने हिमालय पहावा, अनुभवावा असेही सांगितले. केदारनाथ दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या सक्षम नेतृत्त्व आणि सुक्ष्म नियेाजन, अचूक निर्णय यामुळे भाविकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासही मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
         जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त बिमला नेगी यांच्या साहसी वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये त्यांनी  एव्हरेस्ट, पर्वतारोहण एक्सपिडिशनमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारतर्फे पहिला नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 1994 मध्ये त्यांना देण्यात आला. ॲडव्हांचर स्पोर्टसमध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे अर्जुन अवॉर्ड, गिर्यारोहण क्षेत्रासोबतच महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच विविध क्षेत्रात महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. समाजातील अतिमागास तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचे अविरतपणे कार्य सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील 35 आदिवासी गावांमध्ये असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्यांसाठी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासोबतच अनाथ मुले तसेच दिव्यांगांसाठी बिमला नेगी विशेष कार्यक्रम राबवित आहेत.
              वूमेन ॲडव्हांचर नेटवर्कस ऑफ इंडियाच्या माध्यमातून श्रीमती बिमला नेगी यांनी गो ग्रीन गर्लस एक्सपीडीशन या 3 हजार किलोमीटरच्या कलकत्ता ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल प्रवास तसेच लीन, ग्रीन, हेल्थी इंडियाच्या माध्यमातून कच्छ ते कोची अभियान राबविले आहे. कष्टकरी महिलांसाठीही त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष कार्य केले आहे.
             गिर्यारोहन  क्षेत्रात बारा राष्ट्रीय स्तरावरील त्या एक्सपिडीशन मध्ये त्या सहभागी झाल्या असून त्यांनी या मोहिमेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2013 मध्येही त्या भागीरथी एक्सपीडिशनमध्ये सहभागी झाल्या.  तसेच भूटान येथे स्नो मॅन ट्रॅक आहे. तो ट्रॅक 400 किलोमीटर आहे, तो पार करण्यासाठी 11 खिंडी पार कराव्या लागतात. तो त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार केला असल्याचे यावेळी  सांगितले.
                  प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते बिमला नेगी, श्रीमती भारती, अविनाश देऊस्कर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसनही यावेळी श्रीमती नेगी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गडेकर यांनी केले.
0000










No comments:

Post a Comment