Friday 7 September 2012

पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण - जयश्री भोज


                  

* पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान पुस्तिकेचे प्रकाशन
* 104 ग्रामपंचायतींना प्रत्‍येकी  एक लक्ष रुपये

          वर्धा, दि. 7 -  ग्रामपंचायत स्‍तरावरील उदयन्‍मुख  खेळांडूसाठी  तसेच ग्रामीण भागात खेळाबद्दल  आवड निर्माण व्‍हावी यासाठी  पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत  प्रत्‍येक ग्रामपंचायत स्‍तरावर  एक लक्ष रुपये खर्च करुन क्रीडांगण बांधण्‍यात येणार आहे. ग्रामीण भागातील  विदृयार्थ्‍यांनी   या क्रीडांगणाचा  लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी   जयश्री भोज यांनी केले आहे.
      पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत पंचायत युवा क्रीडा व  खेळ अभियान  माहिती पुस्तिकेचे प्रकाशन  जिल्‍हाधिकारी   जयश्री  भोज यांच्‍या   हस्‍ते   झाले त्‍याप्रसंगी   मार्गदर्शन करताना श्रीमती भोज बोलत होते.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात  आयोजित प्रकाशन सोहळ्यास जिल्‍हा  माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्‍हा  क्रीडा अधिकारी  प्रदीप शेटीये उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात  पायका  योजने अंतर्गत  2008-09  यावर्षी   52 तसेच 2 009-10  यावर्षी   52   अशा  104   ग्रामपंचायतीची निवड करुन त्‍यांना प्रत्‍येकी  एक  लक्ष  रुपयाचे  अनुदान क्रीडांगण विकासाकरीता थेट ग्रामपंचायतींना  वितरीत करण्‍यात आले आहे. पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियाना अंतर्गत ग्राम पातळीपासून पाच क्रीडा स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात येणार असून, ग्रामपंचायतींनीही या क्रीडा स्‍पर्धामध्‍ये  सहभागी होण्‍याचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिले आहे.
           जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी  स्‍वागत   करुन प्रास्‍ताविकात   केन्‍द्र शासनाच्‍या मदतीने   पंचायत युवा  क्रीडा व खेळ अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक स्‍वरुपाच्‍या क्रीडा सुविधा निर्माण करण्‍यासाठी ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण विकासाकरीता एक लक्ष रुपयाचे अनुदान  मंजूर  केले आहे. पायका योजनेच्‍या  निकषानुसार    प्रत्‍येक   तालुक्‍यातील   10 टक्‍के   ग्रामपंचायतीची निवड करण्‍यात येवून शासनास अनुदान मंजूरीसाठी कृती आराखडा सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती प्रदीप शेटीये यांनी दिली.
          यावेळी   क्रीडा अधिकारी  अनिल बोरवा, माहिती अधिकारी  मिलींद  आवळे आदी उपस्थित होते.
                                          000000000      
                                                          

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा अंतर्गत सहा सोनोग्राफी केन्‍द्राविरुध्‍द कारवाही


                
                                  
                   * पीसीएनडीटी दक्षता समितीची  बैठक
              * सोनोग्राफी केन्‍द्राची  नियमित तपासणी करा
             * स्‍त्री भ्रृणहत्‍या टाळण्‍यासाठी जागृती मोहीम
      वर्धा, दिनांक 7 - गर्भधारणापूर्व  आणि प्रसवपूर्व  निदान  प्रतीबंधक  कायद्याअंतर्गत जिल्‍ह्यातील सहा  सोनोग्राफी केन्‍द्रांना  बंद केले असून, या केन्‍द्राविरुध्‍द   कारवाही  सुरु आहे. तसेच जिल्‍ह्यातील चार  गर्भपात केन्‍द्रही  बंद करण्‍यात  आली आहेत. स्‍त्री भ्रृण हत्‍या टाळण्‍यासाठी  जिल्‍ह्यात जनतेमध्‍ये जागृती करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती  निवासी उपजिल्‍हाधिकारी   सुनील गाडे यांनी दिली.
            पीसीएनडीटी  दक्षता समितीची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक  डॉ. सोनवणे , डॉ. जे.एन.शर्मा, लिगल सेलच्‍या प्रमुख अॅड. कांचन बडवाईक , जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसिलदार, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, शिक्षणाधिकारी  उपस्थित होते.
           गर्भलिंग निवड प्रतिबंधक कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  सोनोग्राफी तसेच गर्भपात केन्‍द्रांची नियमित  तपासणी करण्‍यात येत असून, ज्‍या केन्‍द्रांवर अनियमितता तसेच  संशयास्‍पद  दस्‍ताऐवज  आढळल्‍यास त्‍यांच्‍याविरुध्‍द कठोर कारवाही  करण्‍यात येत असल्‍याचे सांगताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. सानवणे म्‍हणाले की, जिल्‍ह्यात 33 सोनोग्राफी केन्‍द्र असून , यापैकी सहा केन्‍द्राविरुध्‍द   कारवाही  करुन  हे सर्व  प्रकरणे  जिल्‍हा न्‍यायालयाकडे  न्‍यायप्रविष्‍ठ आहेत. तसेच  45  गर्भपात केन्‍द्र असून , चार केन्‍द्राविरुध्‍द  कारवाही करुन  ही केन्‍द्र  बंद करण्‍यात आली आहेत.
          जिल्‍ह्यात  स्‍त्री भ्रृण हत्‍या टाळण्‍याच्‍या अनुषंगाने   सामाजिक  संस्‍थाचे सहकार्य घेण्‍यात येत असून, शालेय महाविद्यालयीन स्‍तरावर चित्रकला व निबंध स्‍पर्धा आयेाजीत करण्‍यात आल्‍या आहेत. तसेच  भिंतीचित्र स्‍पर्धाचेही  आयेाजन करण्‍यात आले  असल्‍याची माहिती  डॉ. सोनवणे यांनी दिली.
             मुलगी वाचवा या अभियाना अंतर्गत  टोलफ्री नंबरवर दोन तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून  त्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात आली आहे. mulgi.com   या वेबसाईडवरही प्राप्‍त  होणा-या तक्रारीची दखल घेण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील तसेच तालुकास्‍तरावर असलेल्‍या सोनोग्राफी केन्‍द्र, एमटीपी केन्‍द्र यांची नोंदणी  अनिवार्य असून नुतणीकरणाबाबतही  आदेश देण्‍यात आले आहे. या केन्‍द्रांना दर तीन महिन्‍यानी  भेटी तपासणी  करण्‍यात  आल्‍याची माहितीही यावेळी देण्‍यात आली.
                     गरोदर मातांची तपासणी करणार
       जिल्‍ह्यातील  गरोदर मातांची  तपासणी  करुन त्‍यांची नोंदणी अनिवार्य करण्‍यात आली आहे. जिल्‍हा व ग्रामीण रुग्‍णालयात   यासंदर्भात कारवाही सुरु असून इतर दवाखान्‍यातही    नोंदणीबाबत सुचना देण्‍यात येणार असल्‍याचेही या बैठकीत सांगण्‍यात आहे.
          प्रारंभी पीसीएनडीटी लिगल सेलच्‍या प्रमुख कांचन बडवाईक यांनी  गर्भलिंग निदान तपासणी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  सुरु असलेल्‍या  विविध उपक्रमाची  माहिती दिली.
          यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवलेकर, डॉ. दामट, एक्‍सरेतज्ञ डॉ. जे.एन.शर्मा, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  यांनी सोनोग्राफी केन्‍द्रांची तपासणी करताना महसूल अधिकारी व पोलीस यांनीही  उपस्थित राहून कठोरपणे तपासणी करण्‍याचे दृष्‍टीने सहकार्य करावे अशी सुचनाही केली.
          यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दामट यांनी आभार मानले.                                                                    0000000


Thursday 6 September 2012

वर्धा जिल्‍ह्यात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पांच व्‍यक्‍ती मृत व दोन जखमी


         
               * जिल्‍ह्यात 24 तासात 870.8 मि.मी. पाऊस
               * आर्वी येथे 210 मि.मी. पावसाची नोंद
               * आर्वी येथे 200 घरात पुराचे  पाणी 
               * पुरग्रस्‍तांसाठी पाच अस्‍थायी निवारे
               * प्रशासनातर्फे औषधोपचार व भोजनाची व्‍यवस्‍था
               * जिल्‍हाधिका-यांकडून पुर परिस्‍थीतीची  पाहणी

          वर्धा, दि. 5 – वर्धा जिल्‍ह्यात मागिल 24 तासात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पाच व्‍यक्‍ती  दगावले असून, तीन व्‍यक्‍ती  जखमी झाले आहेत. आर्वी शहरातून वाहणा-या गावनाल्‍याला आलेल्‍या पुरामुळे सुमारे  200 घरात पाणी शिरल्‍यामुळे  घरांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील  सुमोर 1 हजार 300 नागरिकांना सुरक्षित स्‍थळी  हलविण्‍यात आले असून, त्‍यांना जिल्‍हा प्रशासनातर्फे  औषधी  व भोजनाची  व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
         वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे जिल्‍ह्यातील सर्व नद्या व नाल्‍यांना पूर आला आहे. आर्वी शहरातून वाहणा-या गावनाल्‍याला आलेल्‍या पुरामध्‍ये राजेश महादेव गेडाम (45), अशोक दशरथ सवाईत (52) हे  पुरात वाहून गेले असून, श्रीमती चंद्रभागा गोविंद राऊत  (70) ही महिला पुराच्‍या पाण्‍यामुळे  भिंत पडून मृत पावली. हिंगणघाट तालुक्‍यातील कापसी येथील पुराच्‍या   पाण्‍यामध्‍ये अजय गंगाधर दौंड (45) हा वाहून गेला असून, आष्‍टी तालुक्‍यातील  लहान आर्वी येथील श्रीमती सुमित्राबाई बापुराव कुकडे (82) घराची भिंत पडून मृत पावल्‍या.
         जखमीमध्‍ये  वर्धमनेरी येथील  अमृत बळीराम चोरे, हिंगणघाट येथील सौ. बबली  खिची  (22) व चि. हर्ष खिची (2) घराची भिंत पडून जखमी झाले आहेत.
              पुरग्रस्‍तांसाठी  पाच ठिकाणी पर्यायी व्‍यवस्‍था 
       आर्वी  शहरामधून वाहना-या गावनाल्‍याला रात्री 1.30 वाजता आलेल्‍या पुरामुळे  शहराच्‍या आठ वार्डामध्‍ये  मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून , सुमारे 200 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे तर 300 घरांचे अंशता नुकसान झाले आहे.
          पुरग्रस्‍तांना  जिल्‍हा प्रशासनातर्फे  पाच ठिकाणी  तात्‍पुरते  कॅम्‍प सुरु करुन  निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.  यामध्‍ये  गुरुनानक धर्म शाळेत चारशे बाधीत व्‍यक्‍ती , राणी लक्ष्‍मीबाई विद्यालयात दोनशे, श्रीराम प्राथमिक शाळेत दिडशे, कन्‍नमवार विदृयालयाता शंभर तर एएमपीएस कॉन्‍व्‍हेंटमध्‍ये  सुमारे अडिचशे  बाधीत  व्‍यक्‍तींची पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
        जिल्‍हाधिकारी श्रीमती  जयश्री भोज यांनी तातडीने आर्वी शहराच्‍या पुरग्रस्‍त भागाची पाहणी करुन  बाधीत कुटूंबासाठी करण्‍यात आलेल्‍या पर्यायी व्‍यवस्‍थेची माहिती घेतली  तसेच सर्व बाधीत कुटूंबाना भोजन तसेच औषधोपचार आदी  मदत तात्‍काळ  देण्‍याच्‍या सुचना उपविभागीय महसूल अधिकारी सुनिल कोरडे, तहसिलदार  श्री. चवहाण यांना दिल्‍या आहेत.
       पुरग्रस्‍तांना  मदत कार्यासाठी   शहरातील  इंडीयन रेडक्रॉस, लायन्‍स , व्‍यापारी संघटना, बँका, पत्रकार संघ  आदिंनीही  प्रशासनास सहकार्य करीत आहेत.  मृत व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना तातडीने मदत  देण्‍यात येईल तसेच ज्‍या घराचे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे त्‍याचे सर्वेक्षण करुन त्‍यांनाही  मदत देण्‍यात येईल अशी  ग्‍वाही पुरग्रसतांना  जयश्री भोज यांनी यावेळी दिली.
                               दोनशे पशुधन मृत्‍यूमुखी
      नाल्‍याला  आलेल्‍या पुरामुळे  सकाळी  तारखेडा, बागपुरा, दत्‍तवार्ड, अवघड वार्ड, जमुनादास वार्ड, वाल्‍मीक वार्ड आदी वस्‍तयांमध्‍ये सकाळी  चार वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्‍यामुळे  सुमारे दोनशे गायी , बक-या व इतर पशुधन पुरात वाहून गेल्‍याने  मृत्‍यूमुखी  पडले. पुरात  मृत्‍यूमुखी पडलेल्‍या पशुधनाचा पंचनामा करुन त्‍यांना  आर्वी -पुलगाव रस्‍त्‍यावर जमीनीत  पुरविन्‍याची व्‍यवस्‍था प्रशासनातर्फे  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  उपविभागीय अधिकारी  सुनिल कोरडे यांनी दिली.
       नाल्‍याच्‍या पुरात ट्रक, इंडिका कार, मोटरसायकल, पानटप-या व चहाचे दुकानेही वाहून गेल्‍यामुळेही त्‍यांचे नुकसान झाले आहे.
                    जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी  870.8 मि.मी.ची नोंद
      वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात 870.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी 108.9 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्‍यात 210 मि.मी., देवळी 176.5 मि.मी., वर्धा 100.7 मि.मी., सेलू 57 मि.मी., हिंगणघाट 86 मि.मी., समुद्रपूर 90.2 मि.मी., आष्‍टी 80.2 मि.मी. तर कारंजा तालुक्‍यात 70.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
       जिल्‍ह्यात 24 तासात पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे  निम्‍न वर्धा प्रकल्‍पाची  31 दरवाजे 2  सेंटीमीटरने उघडण्‍यात आले आहे. त्‍यामुळे वर्धा नदीमध्‍ये पाण्‍याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे नदीकाठच्‍या लोकांनी  सतर्क राहण्‍याचे आवाहन  जिल्‍हाधिकारी श्रीमती भोज यांनी केले आहे.
                                                               00000

निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे 31 दरवाजे उघडले; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा



               *  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांची प्रकल्‍पाला भेट  
           * 6 हजार क्‍युबीक मीटर  पाण्‍याचा विसर्ग  सुरु
     वर्धा, दि. 5 – वर्धा जिल्‍ह्यात सतत पडत असलेल्‍या पावसामुळे तसेच अप्‍पर वर्धा  प्रकल्‍पातून पाण्‍याचा विसर्ग सुरु असल्‍यामुळे  निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे  31 दरवाजे  अडीच मीटरने उघडण्‍यात आले आहे. त्‍यामुळे  प्रकल्‍पामधून  6 हजार क्‍युबीक मीटर प्रती सेकंदाचा विसर्ग सुरु आहे. 
         निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील पाण्‍याची पातळी सतत वाढत असून सध्‍या 280.85 मिटर एवढी आहे. त्‍यामुळे  या प्रकल्‍पातून  पाणी  सोडण्‍यात येत आहे.
         जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील  जलसाठा  तसेच  या प्रकल्‍पातून  सोडण्‍यात येणा-या  पाण्‍यामुळे बाधीत होणा-या गावासंदर्भात  कार्यकारी अभियंता आशिष देवगडे यांचेकडून माहिती घेतली.  अप्‍पर वर्धा प्रकल्‍पातून  पाणी सोडण्‍यात येत असून आर्वी तालुक्‍यात झालेल्‍या  अतीवृष्‍टीमुळे  प्रकल्‍पामध्‍ये  पाणी  वाढत असल्‍यामुळे  वर्धा जिल्‍ह्यातील  नदी काठावर असलेल्‍या सर्व ग्रामस्‍थांनी   सतर्क रहावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज यांनी केले आहे.
            निम्‍न वर्धा प्रकल्‍पामध्‍ये   प्रकल्‍पाच्‍या  दोनशी मिटर एवढया उपयुक्‍त साठ्यापेक्षा पाण्‍याची पातळी वाढत असल्‍यामुळे   प्रकल्‍पामध्‍ये  6 हजार क्‍युबेक मीटर प्रतिसेकंद  पाण्‍याचा विसर्ग  सुरु आहे.  प्रकल्‍पातील   पाण्‍याच्‍या पातळी संदर्भात सहाय्यक   अभियंता आर.एम.लायचा व एम.एम.खडतकर  सतत कार्यअभियंता आशिष देवगडे यांचया मार्गदर्शनाखाली  प्रकल्‍पातील पातळीवर  लक्ष ठेवून आहेत.
                        आर्वी येथील पुरग्रस्‍तांना दिलासा
       जिल्‍हाधिकारी श्रीमती  जयश्री भोज यांनी  आर्वी येथील शहरातून  वाहना-या गावनाल्‍यामुळे  बाधीत झालेल्‍या  कुटूंबाची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले. आर्वी येथील पुरात दोन व्‍यक्‍ती  वाहून गेल्‍या असून, श्रीमती चंद्रभागा राऊत ही महिला घराची भिंत पडून मृत पावली आहे.
       नाल्‍या-काठावरील घरांमध्‍ये   पुराचे पाणी शिरल्‍यामुळे व घराचे पुर्णतः नुकसान झाल्‍यामुळे बाधीत झालेल्‍या कुटूंबांना तात्‍पुरता निवा-याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. गुरुनानाक धर्मशाळेत जाऊन बाधीत कुटूंबाची जिल्‍हाधिका-यांनी भेट घेतली तसेच त्‍यांना आवश्‍यक मदतीची ग्‍वाही दिली. तसेच एएमपीएस कॉन्‍व्‍हेंट  येथील बाधीत कुटूंबानाही  त्‍यांनी भेट देवून त्‍यांचे सांत्‍वन केले. तसेच भोजन व  औषधोपचाराची व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या सुचना उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे यांना यावेळी दिल्‍यात.
                                               00000       

प्रज्ञावंत विद्यार्थी घडविण्‍यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम करण्‍याची गरज- ज्ञानेश्‍वर ढगे


     
·        दोन शिक्षकांना राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार 
·        आठ तालुक्‍यातील आठ शिक्षकांना जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कार प्रदान
    वर्धा, दि. 5 – ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्‍ये अनेक गरीब विद्यार्थी  जि.प.च्‍या शाळेमधून शिक्षण घेत असतात. शासनाने  या विद्यार्थ्‍यांसाठी अनेक सोयी व सुविधा उपलब्‍ध  करुन दिलेलया आहेत. स्‍पर्धेच्‍या यंगात या विदृयार्थ्‍यांमध्‍ये गुणात्‍मक बदल , आत्‍मनिर्भयपणा व प्रज्ञावंत विदृयार्थी घडविण्‍यासाठी शिक्षकांनी अधिक  परिश्रम करण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन जि.प.चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
भारताचे माजी राष्‍ट्रपती सर्वपल्‍ली  राधाकृष्‍ण यांचा जन्‍मदिवस शिक्षक दिवस म्‍हणून साजरा केल्‍या जातो. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या गुरजनाविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी जि.प.च्‍या शिक्षण विभागामार्फत येथील विकास भवनामध्‍ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला त्‍याप्रसंगी ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते.
यावेळी जि.प.चे उपाध्‍यक्ष संजय कामनापूरे शिखण सभापती प्रा. उषाकिरण थुटे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले, महिला व बालकल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे, अर्थ व बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जि.प.सदस्‍य मिलिंद  भेंडे व पंचायत समितीचे पदाधिकारी  व सदस्‍य मंचावर उपस्थित होते.
 चारित्र संपन्‍न व सामर्थ्‍यशाली राष्‍ट्र घडविण्‍यासाठी शिक्षकाचे महत्‍वपूर्ण योगदान असते असे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की विदृयार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्र उभारणीचे  तसेच प्रतिष्‍ठा  उंचावण्‍याची जबाबदारी पार पाडण्‍यासाठी शिक्षक महत्‍वपूर्ण कार्य करु शकतात. अनेक विद्यार्थ्‍यांमध्‍ये सुप्‍त गुण असतात. या सुप्‍त गुणांना योग्‍य असे मार्गदर्शन शिक्षक देवू शकतात. जिल्‍ह्यात शाळांमध्‍ये संगणकाची सुविधा उपलब्‍ध  असून संगणकाचे ज्ञान विदृयार्थ्‍यांमध्‍ये रुजविण्‍यासाठी शिक्षकांनी प्रयत्‍न केले पाहीजे असेही ते म्‍हणाले.
 याप्रसंगी शिक्षण सभापती प्रा. थुटे म्‍हणाल्‍या की विद्यार्थ्‍यांमध्‍ये चांगले संस्‍कार  रुजविण्‍याची गरज असून भविष्‍यामध्‍ये   गुणवंत विदृयार्थी घउू शकतील. शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. स्‍पर्धेच्‍या  युगात जि.प.शाळेमध्‍ये विदृयार्थ्‍यांची पटसंख्‍या टिकवायच्‍या असतील तेव्‍हा शिक्षकांनीसुध्‍दा परिश्रम घ्‍यावे लागतील. चांगले व सुसंसकृत व हुशार विद्यार्थी घडविण्‍याची जबाबदारी शिक्षकांनी स्विकारावी असे आवाहन त्‍यांनी याप्रसंगी केले.
 यावेळी उपाध्‍यक्ष श्री. कामनापुरे  म्‍हणाले की शिक्षण क्षेत्राचा व्‍यवसाय पवित्र आहे. त्‍याचे पावित्र जपण्‍यासाठी आवश्‍यक ती काळजी घेण्‍याची गरज असून गुणवंत विद्यार्थी घडविण्‍यात यावे असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
 यावेळी जि.सदसय मिलिंद भेंडे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कारांसाठी जिलह्यातून दोन शिक्षकाची निवड करण्‍यात आली त्‍यामध्‍ये प्राथमिक विभागात वंदना येनुरकर व माध्‍यमिक विभागात प्रदिप गौतम  यांचा समावेश आहे. जिल्‍हास्‍तरावर आठ पंचायत समित्‍या मधून प्रत्‍येकी एका शिक्षकाची निवड पुरसकारासाठी करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये चेतना आष्‍टनकर वर्धा, गोविंद कावळे सेलू, विश्‍वमित्र सेंदूरसे देवळी, प्रमोद बोरकर हिंगणघाट, शेषराव भोंगाडे समुद्रपूर, मेघा तुपकर आर्वी, लक्ष्मिकांत काकपुरे आष्‍टी व राजेंद्र धार्मिक कारंजा यांचा समावेश आहे. त्‍यांना मान्‍यवरांचे हसते शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ,प्रमाणपत्र  व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात आले तसेच पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती  परीक्षेमधील 49 गुणवंत प्राप्‍त विदृयार्थी व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती मध्‍ये परिक्षेत्रामध्‍ये 28 गुणवंत प्राप्‍त विदृयार्थ्‍यांना स्‍मृती चिन्‍ह व पुष्‍पगुच्‍छ  देवून मान्‍यवरांकडून गुणगौरव करण्‍यात आला.
     तत्‍पूर्वी माजी राष्‍ट्रपती सर्वपल्‍ली राधाकृष्‍ण व क्रांती ज्‍योती सावीत्रीबाई फुले यांच्‍या प्रतीमेला माल्‍यार्पण व दिप प्रज्‍वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली.
      यावेळी केंद्रीय मंत्री कपिल सिब्‍बल यांनी पाठविलेल्‍या संदेशाचे वाचन गटशिक्षणाधिकारी डी.वाय.तेलंग यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन संजय चौधीर व संध्‍या सांयकार यांनी तर प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी हरिदास बांबोर्डे व आभार श्री. मेश्राम यांनी मानले.
   याप्रसंगी शिक्षणाधिकारी लक्ष्मिनारायण सोनवणे यांचेसह जिल्‍हृयातील जि.प.व पं.स.चे पदाधिकारी व सदस्‍य, शिक्षक , केंद्र प्रमुख व मोठ्या संख्‍येने शिक्षक उपस्थित होता.
                         0000



Tuesday 4 September 2012

आधार नोंदणी मध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर


वर्धा दि.4-  आधार नोंदणीमध्‍ये राज्‍यात वर्धा जिल्‍ह्याने उकृष्‍ट कार्य केले असून जिल्‍ह्यातील एकूण 12 लाख 99 हजार 592 लोकसंखेपैकी 10 लाख 54 हजार 743 लोकांनी आधरची नोंदणी केली आहे.
          जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी राबविलेल्‍या नियोजनबध्‍द  अभियानामुळे वर्धा जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यात  आधार नोंदणीला जनतेनेही उत्‍फूर्त  प्रतिसाद दिला आहे.जिल्‍ह्यात केवळ 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी शिल्‍लक असून सप्‍टेंबर पासून पुन्‍हा नोंदणी साठी तालुका व ग्रामस्‍तरावर विशेष कॅम्‍प आयोजित करण्‍यात येत आहेत.
            आधार नोंदणीसाठी  जनतेमध्‍ये केलेल्‍या विशेष जागृती व अभियानामुळे हा कार्यक्रम यशस्‍वी ठरला आहे. जिल्‍ह्यात तालुका निहाय आधार नोंदणी व कंसात लोकसंख्‍या पुढील प्रमाणे आहे.
            वर्धा तालुका 2,89,635 (3,57,437) सेलू 1,12,876 (1,29,579) देवळी 1,29,803 (1,59,706) हिंगणघाट 1,85029 (2,23,411) समुद्रपूर 93,560 (1,16,991) आर्वी 1,15,236 (1,45,887) आष्‍टी 63,236 (76,186) व कारंजा घाडगे तालुक्‍यात  65,368 आधाराची नोंदणी झाली आहे.
            जिल्‍ह्यात 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी अद्याप शिल्‍लक असून सप्‍टेंबर व ऑक्‍टोंबर या तीन महिन्‍यात विशेष अभियानाव्‍दारे ही नोंदणी पूर्ण करण्‍यात येत आहे.आधार नोंदणी साठी जिल्‍ह्यातील जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
0000

आष्‍टी व वर्धा तालुक्‍यात जोरदार पाऊस जिल्‍ह्यात 14.4 टक्‍के पाऊस


            वर्धा दि. 4 – वर्धा जिल्‍ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने सर्वत्र हजेरी दिल्‍यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सिंचन प्रकल्‍पामधेही विक्रमी वाढ झाली आहे.
            वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात 114.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पडलेल्‍या 14.4 टक्‍के पावसामुळे जिल्‍ह्यात आजपर्यन्‍त 54.5 टक्‍के पाऊस पडला आहे.अद्याप पावसाने सरासरी ओलांडली नाही.
तालुका निहाय पडलेल्‍या पावसामुळे सर्वाधिक आष्‍टी तालुक्‍यात 47.2 मिलीमिटर वर्धा, 36.6 मिलीमिटर, तसेच इतर सहा तालुक्‍यात सरासरी 5 ते 6 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली आहे. 
                                          0000

नवे निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाढे


          वर्धा दि.4-  निवासी उपजिल्‍हाधिकारी पदावर सुनिल गाढे यांनी नियुक्‍ती झाली असून त्‍यांनी नव्‍या पदाची सुत्रे स्विकारली आहेत.यापूर्वी ते नासिक जिल्‍ह्यातील सुरगाणा येथे तहसिलदार पदावर कार्यरत होते.
सुनिल गाढे यांची महाराष्‍ट्र  लोकसेवा आयोगातर्फे 2002 मध्‍ये तहसिलदार या संवर्गात निवड झाली असून तळोदा (नंदुरबार),सटाणा (नासिक), नेवासा (अहमदनगर),नांदगांव (नासिक) येथे कार्यरत होते. सुनिल गाढे हे राहूरी तालुक्‍यातील कणगट येथील असून बी.एस.सी.एम.ए. परिक्षा उतीर्ण असून वृत्‍तपत्र पदविका परिक्षा पास केली आहे. भूमी अभिलेख विभागात सर्वेक्षक पदाचाही त्‍यांना अनुभव आहे.
          सुरगांव येथे घरपोहोच धान्‍य वितरण अंतर्गत 108 ठिकाणी यशस्‍वीपणे योजना राबविली असून स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, लोकसभा व विधानसभा निवडणूक विषयक कामे यशस्‍वीपणे हाताळली आहेत.
00000

जिल्‍हास्‍तरीय बॉक्सिंग स्‍पर्धा गुरुवार पासून


   वर्धा दि.4- जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धाचे आयोजन गुरुवार दिनांक 6 सप्‍टेंबर पासून जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्‍यात आले आहे.बॉक्सिंग स्‍पर्धामध्‍ये 14 ते 19 वयोगटातील मुले व मुलींचा समावेश आहे.
            क्रीडा व युवक सेवा संचालनालय,तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी,कार्यालया अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
            शालेय बॉक्सिंग स्‍पर्धेत नव्‍याने 14 वर्षे मुले,17 व 19 वर्षे मुले व मुली हे वयोगट समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत. जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धेत जिल्‍ह्यातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोदवावा. अधिक माहिती करीता राज्‍य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सिंग विजय डोबाळे व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.
0000

Sunday 2 September 2012

हातमाग पध्‍दतीचे थाटात उदघाटन हातमाग कापड प्रदर्शनी तालुका स्‍तरावरही -आकाश शेंडे


वर्धा दि.2 -  ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मिळून देण्‍यासाठी हातमाग उद्योग व्‍यवसाय महत्‍वाची कामगीरी बजावत असते, या व्‍यवसायाला गौरवशाली परम्‍परा असून या व्‍यवसायाची व्‍याप्‍ती  वाढवून देण्‍यासाठी प्रत्‍येक तालुक्‍यात हातमाग कापड प्रदर्शनी लावण्‍यात यावी असे प्रतिपादन येथील नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांनी केले.    
          येथील सार्वजनिक वाचनालय येथे विकास आयुक्‍त हातमाग वस्‍त्रोद्योग विभाग, भारत सरकार व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्‍ट्र शासन यांनी प्रायोजित केलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय हातमाग कापड प्रदर्शनीचे त्‍यांचे ह्रस्‍ते उदघाटन झाले.त्‍या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्‍हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर व जिल्‍हा माहिती अधिकारी पी.जे.गडेकर व वस्‍त्रोद्योग विभागाचे प्रदर्शनी प्रमुख वासुदेव मेश्राम आदि मान्‍यवर उपस्थित होते.
कृषी उद्योगानंतर हातमाग हा देशातील जास्‍तीत जास्‍त बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा व्‍यवसाय असल्‍याचे सांगून नगराध्‍यध्‍य शेंडे म्‍हणाले की, एकेकाळी हातमाग कापड हा सर्व सामान्‍य लोकांचा आवडणारा कापड होता आता नव्‍या यंत्रयुगात या उद्योगाला कमी महत्‍व प्राप्‍त होत आहे. या उद्योगाच्‍या वाढीसाठी व गेलेली वैभवशाली परंपरा पुन्‍हा स्‍थापित करण्‍यासाठी शासन पुरेशा उपाय योजना करण्‍या सोबत  हातमाग कापडाचे प्रदर्शन प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी लावण्‍याची गरज आहे असेही ते म्‍हणाले.
याप्रसंगी उपनिबंधक ठाकूर यांनी हातमाग उद्योगामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते तसेच ग्रामीण लोकांच्‍या कलागुणांना सुध्‍दा मोठया प्रमाणावर वाव मिळतो असेही ते म्‍हणाले .
         यावेळी बोलतांना जिल्‍हा माहिती अधिकारी गडेकर म्‍हणाले की, विदर्भातील नागपूर हे हातमाग कापड व साड्यांसाठी प्रसिध्‍द होते. आता कापड उद्योगात स्‍पर्धा वाढली आहे.या स्‍पर्धेला तोंड देण्‍यासाठी हातमाग उद्योगांनी पुरेशा उपाय योजना करुन ग्राहकांच्‍या मागणीनुसार कापड उत्‍पादित करुन या उद्योगाला चालना द्यावी असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            हातमाग कापड प्रदर्शनी 10 सप्‍टेंबर,2012 पर्यन्‍त सकाळी  11 ते रात्री 8.30 वाजेपर्यन्‍त उघडी राहणार असून या प्रदर्शनात महाराष्‍ट्रातील कानाकोप-यातील विणकर संस्‍थांनी भाग घेतला आहे. सुंदर कला कुसरीच्‍या पारंपारीक कापडाचे वैभवशाली उत्‍पादन विक्रीस ठेवण्‍यात आले आहे.सदर प्रदर्शनीमध्‍ये बेडशिट,चादर ,टावेल, नॅपकीन, कर्टन क्‍लाथ, टसर सिल्‍क व कॉटन साड्या ड्रेस मटेरियल इत्‍यादी  माल विक्रीसाठी उपलब्‍ध असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.
            कार्यक्रमाचे संचालन व आभार वासुदेव मेश्राम यांनी केले.   
0000

बँक खाते उघडण्‍यासाठी युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करा - जिल्‍हाधिकारी



वर्धा दि.2 – जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणा-या प्रत्‍येक 18 वर्षावरील व्‍यक्तिींना शासकीय योजनेचा लाभ देण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेमध्‍ये स्‍वतःचे  खाते उघडणे गरजेचे असून या कार्यासाठी जि.प.मध्‍ये कार्यरत आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांचे  सहकार्य घेण्‍यात येणार आहे. अपूरा वेळ व अधिक कामे करण्‍यासाठी कार्याचे  नियोजन करुन युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
          विकास भवन येथे आज बँकेत खाते उघडण्‍यासंबंधाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी उपआयुक्‍त संजयसिंग गोतम, बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी अजित कोरडे,जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक मोहन मशानकर ,नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोडे, उपजिल्‍हाधिकारी जया बनकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          राष्‍टीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी  18  वर्षावरील सर्व लाभार्थ्‍यांना अनेक लाभ बँकेमार्फत शासनाकडून मिळणार असल्‍याचे नमूद करुन जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे शून्‍य रकमेवर स्‍वतःचे खाते उघडण्‍यात येणार असून अपू-या कालावधीत अधिकतम कामे येत्‍या 2 ऑक्‍टोंबर पर्यन्‍त पूर्ण करावी लागणार आहे. त्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्‍यात येते त्‍याच प्रमाणे या कार्यासाठी सुध्‍दा  झोनल अधिकारी व केंद्र अधिकारी नियुक्‍त करण्‍यात येणार आहे.त्‍यांचे या  कामावर लक्ष ठेवून आढावा घेण्‍यात येणार आहे.खाते उघडण्‍यासाठी ग्रामीण क्षेत्रातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घेवून त्‍यांच्‍याकडून प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील या आशा व अंगणवाडी सेविकांना तलाठी व ग्राम सेवक मदत करणार आहे. स्‍थायी रहिवाशी पत्‍यासाठी ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरण्‍यात येणार असून आधार कार्डाचा क्रमांक व नाव लिहीलेले दोन फोटो अर्जासोबत लागणार आहे. त्‍यासाठी महसूल विभाग आवश्‍यक ती उपाय योजना करणार आहे. या कार्यासाठी  अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्‍या कडून बृहत आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु झाले असून निवडणूकीच्‍या  मतदार यादीची मदत या कार्यासाठी घेण्‍यात येणार असल्‍यारचे त्‍यांनी सांगितले.
          याप्रसंगी उपायुक्‍त गौतम यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते काढणा-या लाभार्थ्‍यांना शासनाकडून मिळणा-या योजनेच्‍या लाभाची माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिका-यांनी येणा-या अडचणीबाबत कशा पध्‍दतीने त्‍याचे  निराकरण करावे याची माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, मनोज काळे, सुनिल कोरडे, तहसिलदार सुशांत बनसोड, सचिन गोस्‍वामी, व इतर तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी व सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
0000

बँक खाते उघडण्‍यासाठी युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करा - जिल्‍हाधिकारी


    
वर्धा दि.2 – जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणा-या प्रत्‍येक 18 वर्षावरील व्‍यक्तिींना शासकीय योजनेचा लाभ देण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेमध्‍ये स्‍वतःचे  खाते उघडणे गरजेचे असून या कार्यासाठी जि.प.मध्‍ये कार्यरत आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांचे  सहकार्य घेण्‍यात येणार आहे. अपूरा वेळ व अधिक कामे करण्‍यासाठी कार्याचे  नियोजन करुन युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
          विकास भवन येथे आज बँकेत खाते उघडण्‍यासंबंधाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी उपआयुक्‍त संजयसिंग गोतम, बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी अजित कोरडे,जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक मोहन मशानकर ,नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोडे, उपजिल्‍हाधिकारी जया बनकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          राष्‍टीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी  18  वर्षावरील सर्व लाभार्थ्‍यांना अनेक लाभ बँकेमार्फत शासनाकडून मिळणार असल्‍याचे नमूद करुन जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे शून्‍य रकमेवर स्‍वतःचे खाते उघडण्‍यात येणार असून अपू-या कालावधीत अधिकतम कामे येत्‍या 2 ऑक्‍टोंबर पर्यन्‍त पूर्ण करावी लागणार आहे. त्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्‍यात येते त्‍याच प्रमाणे या कार्यासाठी सुध्‍दा  झोनल अधिकारी व केंद्र अधिकारी नियुक्‍त करण्‍यात येणार आहे.त्‍यांचे या  कामावर लक्ष ठेवून आढावा घेण्‍यात येणार आहे.खाते उघडण्‍यासाठी ग्रामीण क्षेत्रातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घेवून त्‍यांच्‍याकडून प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील या आशा व अंगणवाडी सेविकांना तलाठी व ग्राम सेवक मदत करणार आहे. स्‍थायी रहिवाशी पत्‍यासाठी ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरण्‍यात येणार असून आधार कार्डाचा क्रमांक व नाव लिहीलेले दोन फोटो अर्जासोबत लागणार आहे. त्‍यासाठी महसूल विभाग आवश्‍यक ती उपाय योजना करणार आहे. या कार्यासाठी  अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्‍या कडून बृहत आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु झाले असून निवडणूकीच्‍या  मतदार यादीची मदत या कार्यासाठी घेण्‍यात येणार असल्‍यारचे त्‍यांनी सांगितले.
          याप्रसंगी उपायुक्‍त गौतम यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते काढणा-या लाभार्थ्‍यांना शासनाकडून मिळणा-या योजनेच्‍या लाभाची माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिका-यांनी येणा-या अडचणीबाबत कशा पध्‍दतीने त्‍याचे  निराकरण करावे याची माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, मनोज काळे, सुनिल कोरडे, तहसिलदार सुशांत बनसोड, सचिन गोस्‍वामी, व इतर तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी व सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
0000