वर्धा दि.27- शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्ये शासन पत्र दिनांक
3 जानेवारी 2012 नुसार मागासवर्गीय उमेदवारांना राखीव जागांवर प्रवेश घ्यावयाचा
असल्यास जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते.आता शासनाने शैक्ष्णिक
वर्ष 2012-13 मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी,औषधनिर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र
,हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आत
सादर करण्यासंदर्भात रुपये 100-/ च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्याची पूर्वीची पध्दती चालू ठेवण्याचे
निर्देश दिलेले आहे.
या
पार्श्वभूमीवर सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणा-या ज्या मागासवर्गीय
उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र,कागदपत्र पडताळणीचे वेळी उपलब्ध नसेल अशा
विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र 3 महिन्यात सादर करण्याबाबतचे रु.100/-
च्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र ,कागदपत्र पडताळणीच्या वेळी अर्ज स्विकृत
केंद्रावर सादर करावे. हमीपत्राचा नमुना संचालनालयाच्या www.dte.org.in/fe2012 संकेतस्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
मात्र
पुढील शैक्षणिक वर्षी म्हणजेच 2012-13 मध्ये उपरोक्त प्रवेशासाठी प्रवेश अर्ज
सादर करतेवेळीच जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील याची सर्व संबंधितांनी
नोंद ध्यावी असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment