Wednesday 27 June 2012

राखीव जागेच्‍या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक


   वर्धा दि.27-  शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्‍ये शासन पत्र दिनांक 3 जानेवारी 2012 नुसार मागासवर्गीय उमेदवारांना राखीव जागांवर प्रवेश घ्‍यावयाचा असल्‍यास जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्‍यात आले होते.आता शासनाने शैक्ष्‍णिक वर्ष 2012-13 मध्‍ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी,औषधनिर्माण शास्‍त्र, वास्‍तुशास्‍त्र ,हॉटेल मॅनेजमेंट अॅण्‍ड  कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र तीन महिन्‍यांच्‍या आत सादर करण्‍यासंदर्भात रुपये 100-/ च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर हमीपत्र  घेण्‍याची पूर्वीची पध्‍दती चालू ठेवण्‍याचे निर्देश दिलेले आहे.
            या पार्श्‍वभूमीवर सदर अभ्‍यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणा-या ज्‍या मागासवर्गीय उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र,कागदपत्र पडताळणीचे वेळी उपलब्‍ध नसेल अशा विद्यार्थ्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र 3 महिन्‍यात सादर करण्‍याबाबतचे रु.100/- च्‍या स्‍टॅम्‍पपेपरवर हमीपत्र ,कागदपत्र पडताळणीच्‍या वेळी अर्ज स्विकृत केंद्रावर सादर करावे. हमीपत्राचा नमुना संचालनालयाच्‍या www.dte.org.in/fe2012 संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
            मात्र पुढील शैक्षणिक वर्षी म्‍हणजेच 2012-13 मध्‍ये उपरोक्‍त प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सादर करतेवेळीच जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील याची सर्व संबंधितांनी नोंद ध्‍यावी असे सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण विभाग यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment