शेतक-यांनी अधिकृत
विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी
करावे
वर्धा,
दि. 27- खरिप हंगामासाठी जिल्ह्यात
4 लक्ष 10 हजार 500 हेक्टर क्षेत्रात
नियोजन करण्यात आले असून त्यानुसार
कापूस , सोयाबीन ,तूर , ज्वारी
आदी बियाणांचा आवश्यकतेनुसार पुरवठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतक-यांनी
अधिकृत विक्रेत्याकडून व निर्धारीत दरानेच बियाणांची खरेदी करावी
असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती
जयश्री भोज यांनी केले आहे.
खरीप
हंगामासाठी 1 लक्ष 22 हजार 943 क्विंटल बियाणांचे नियोजन
करण्यता आले होते त्यानुसार 90 हजार
क्विंटलपेक्षा जास्त बियाणांचा
पुरवठा झालेला असून सोयाबिन पिकांचे
बियाणे बदल कार्यक्रमा
अंतर्गत 85 टक्के प्रमाणे बियाणांची मागणी
नोंदविण्यात आली असून शेतक-याला आवश्यकतेनुसार सर्व बियाणे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी
श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
जिल्ह्यात
बियाणांच्या मागणीनुसार पुरवठा व
विक्री सुरु असून 25 जून पर्यंत 59 हजार
310 क्विंटल बियाणांची विक्री
पूर्ण झाली आहे. यामध्ये 20 हजार 410 सार्वजनिक तर 38 हजार 900 क्विंटल बियाणे खाजगी विक्रेत्याकडून झाले आहे. संकरीत
कापसाची 2 हजार 239 क्विंटल तर सायोबीनची
56 हजार 200 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.
जिल्ह्यासाठी 90
हजार 055 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असून महाबीजसह सार्वजनिक वितरकांकडे
32 हजार 343 क्विंटल तर खाजगी विक्रेत्यांकडे 57 हजार 712 क्विंटल
बियाणांचा साठा उपलब्ध्ा आहे. ज्वारी
51 क्विंटल, संकरीत कापूस 4 हजार 250
क्विंटल, सोयाबिन 82 हजार 980 क्विंटल , तूर 2 हजार 746 क्विंटल , मूंग 16 क्विंटल
, उउीद 9 क्विंटल, तिळ 3 क्विंटल चा
पुरवठा उपलबध करुन देण्यात आलयाची माहितीही
जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज
यांनी यावेळी दिली.
000000
जिल्ह्यात सरासरी 102 मि.मी. पावसाची नोंद
जिल्हयात
पावसाने हजेरी लावल्यानंतर 26 जून पर्यंत 102 मि.मी. पावसाची नोंद झाली
असून, यामध्ये सर्वाधिक 175.03 मि.मी.
पाऊस हिंगणघाट तालुक्यात पडला आहे.
आर्वी 173.05 मि.मी., आष्टी 55.08 मि.मी., कारंजा 87.06 मि.मी., वर्धा
58.02 मि.मी., देवळी 66.04 मि.मी., सेलू 44 मि.मी. , समुद्रपूर 156.05 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे. मागील चार पाच
दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे पाणी उपलब्ध असल्यास शेतक-याने ज्या क्षेत्रात पेरणी केली आहे त्या क्षेत्रात स्प्रींकल पध्दतीने
संरक्षीत पाणी द्यावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बि.एम. ब-हाटे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment