जनतेसाठी सेतुकेंद्रात विशेष कक्ष
31 ऑगष्ट पर्यन्त अर्ज,धारिका स्वीकारणार
शासनाकडे पाठविलेल्या धारकांची यादी
वर्धा दि.26- मंत्रालयाच्या ईमारतीला लागलेल्या आगीत ज्या विभागाच्या फाईल नष्ट झाल्या त्या विभागाशी संबंधित जनतेच्या प्रकरणाची माहिती अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या सेतू केंद्रात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जनतेनी मंत्रालया संदर्भात प्रलंबित प्रकरणाची असलेली माहिती अथवा प्रस्ताव सेतू केंद्रात सादर करावे असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले आहे.
वर्धा जिल्ह्यात शासनाकडे मंजूरीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात वर्धा व हिंगणघाट येथे प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. जनतेकडून 31 ऑगष्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी मागील तीन वर्षात शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत त्याची यादी तयार करावी अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील 17 व पोलीस विभागा संदर्भतील 7 प्रकरणे मंत्रालयात मान्यतेसाठी प्रलंबित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली. विधीमंडळा संदर्भातील सर्व प्रश्न, तारांकित पश्न व आवश्यक माहिती तात्काळ पाठवावी असेही त्यांनी सांगितले.
सर्व ईमारतीवर सुरक्षा यंत्रणा
जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या ईमारतीमध्ये अग्निशमन तसेच अन्य सुरक्षा यंत्रणाची तपासणी करावी तसेच ज्या ईमारतीमध्ये आवश्यक यंत्रणा नाहीत तेथे तात्काळ लावण्यात याव्यात अशी सूचना यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.
सुरक्षा यंत्रणा निश्चित केलेल्या मानकानुसार असावी तसेच जिल्हा व तालुका रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जेथे जनतेची वर्दळ आहे अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच नगर परिषदांनी अग्निशमन यंत्राणा सदैव सज्ज राहील याची दक्षता घ्यावी. अशा सूचनाही सर्व विभाग प्रमुखांना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिल्यात.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी स्वागत करुन जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
00000
No comments:
Post a Comment