प.क्र-505
दि.08.07.2021
मुख्यमंत्री महा आरोग्य
कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
जिल्ह्यात पाहिल्या
टप्प्यात 240 प्रशिक्षणार्थींना मिळणार प्रशिक्षण
आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या
नवीन संधी उपलब्ध
वर्धा, दि 8 जुलै (जिमाका):- राज्यामध्ये कोविड
१९ या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणा-या पॅरामेडीकल क्षेत्रातील
प्रशिक्षित मानव संसाधणाची तीव्र कमतरता जाणवत असुन या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार
करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर
राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन आज मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले.
जिल्ह्यात विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ध
आणि उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावंगी येथे दीप प्रज्वलन आणि
प्रशिक्षणार्थींना किट वाटप करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
प्रवीण महिरे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे व्यवस्थापक अभ्युदय मेघे, डॉ महाकाळकर, भाग्यश्री वाघमारे
उपस्थित होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस उपस्थित
होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे होम हेल्थ एड, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट
व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी मेघे, येथे इमरजेंसी मेडिकल टेक्निशिएन
या प्रशिक्षणासाठी एकुण ६० उमेदवार उपस्थित
होते.
जिल्ह्यात
४५० उमेदवारांनी विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून यामध्ये 12 अभ्यासक्रम
निश्चित करण्यात आले आहेत. यात होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, फ्लेबोटोमिस्ट,
हॉस्पिटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, जनरल ड्युटी असिस्टंट, रुग्णवाहिका चालक, मेडिकल
ड्रेसर, डायबेटीस असिस्टंट, इत्यादी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील
सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयासहित एकूण
11 रुग्णालयांची प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा सामान्य
रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू, भिडी, देवळी,
पुलगाव, आष्टी, समुद्रपूर, वडनेर आणि कारंजा रुग्णालयाचा समावेश आहे.
या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे
जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आवश्यक असे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि कोरोना सारख्या
महामारीच्या काळात इतर क्षेत्रात रोजगार कमी झाले असताना आरोग्य क्षेत्रात तरुणाना रोजगाराच्या नवीन संधी
प्राप्त होणार आहेत.
यावेळी
मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करुन सर्वांना मार्गदर्शन केले. सदरउद्घाटनीय
कार्यक्रमास मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, उद्योगमंत्री
सुभाष देसाई, कौशल्य विकास रोजगार वउद्योजकता मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे,वैद्यकिय शिक्षण
मंत्री अमित देशमुख, कौशल्यविकास रोजगार व
उद्योजकता राज्यमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment