* 10 हजार गावांमध्ये योजनेची
अंमलबजावणी सुरु
* 3 महिन्याचे धान्य एकाचवेळी
* प्रत्येक महिन्याची 7 तारीख अन्न
दिवस
वर्धा
दि.30- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणारे धान्य कार्ड
धारकांना थेट गावात उपलब्ध करुण देणारा धान्य हमी योजना हा महत्वकांक्षी उपक्रम केंद्र शासनामार्फत
संपूर्ण देशात राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा
मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात
येणारे धान्य कमी मिळणे तसेच इतर प्रकारच्या तक्रारी नेहमी प्राप्त होत असल्यामुळे
धान्य हमी योजना हा अभिनव उपक्रम प्रायोजिक तत्वावर 400 गावामध्ये राबविण्यात
आला होता या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे राज्यातील 10 हजार गावामध्ये
धान्य हमी योजना राबविण्यात आली. आता ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याचा
निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिली.
राज्य शासन राबवित असलेल्या धान्य हमी योजनाचे सादरीकरण
केंद्रीयमंत्री व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिका-यासमोर करण्यात आले असून या
योजनेची उपयुक्तता लक्षात घेवून ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय
केंद्र शासनाने घेतला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तालुका व ग्रामीण भागातील
गोदामापर्यंत धान्याची वाहतूक करण्यात येते परंतु तालुक्यातील गोदामापासून रास्तभाव
दुकानापर्यंत ची वाहतूक होत असतांना धान्य इतर ठिकाणी वळविणे,संपूर्ण धान्यसाठा
अपेक्षीत ठिकाणी न पोहचणे आदि तक्रारींवर धान्य हमी योजना राबविण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
या योजनेच्या कार्उधारकांना 3 महिन्याचे धान्य एकाचवेळी वितरीत करणे,प्रत्येक महिन्याच्या
7 तारखेस अन्न दिवस पाळणे 8 ते 15 तारखेपर्यंत अन्न सप्ताह अंतर्गत अन्न
महामंडळाचे गोदाम ते गावाच्या चावडीपर्यंत धान्य वाहतूक करणे व चावडीवरच कार्ड
धारकांना धान्याचे वाटप करणे धान्य वाटपाची पूर्ण सूचना म्हणून गावातील कमीत
कमी 25 व्यक्तींना एसएमएस करण्यासोबतच धान्य वातूक करणा-या ट्रकला हिरवा रंग
देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री
अनिल देशमुख यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment